>>स्वतःला न पटणार्या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते.
खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष!
>>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती.
मुक्ताफळे उधळणार्या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
आजानुकर्णा,
अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार.
- सर्किट
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते.
सर्किटशेट,
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले.
भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे.
----
अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले.
अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-)
म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर !
- (लोहार) सर्किट
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे.
तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप..
प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे.
अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले.
फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती.
गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली,
तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती.
शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते.
काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला.
मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी.
जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी.
मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.
त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे,
गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ?
जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली.
ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता.
एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे.
त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
प्रतिक्रिया
+१
डोन्ट केअर!
अवचट
समयसूचकता
सहमत आहे.
अगदी असेच
गदगदलो
खरे आहे
हेच
+१
अत्युत्तम
अगदी खरे आहे
दुवा
आता कस
प्रश्न
आवडला
सुंदर
छान आहे..
गोंडसे व
लेख