Skip to main content

मुक्तक

पेटती चूल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/05/2016 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
ए.आय डी सी ला असताना अनेक युनिट्स इलेक्ट्रिसिटी चा "स्यान्क्शन लोड" आहे त्या पेक्षा जास्त मशीन कारखान्यात लावत असत.

कातरवेळ

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 26/05/2016 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
कातरवेळ,सूर्यास्तानंतर मिट्ट काळोख होईपर्यंतची ही वेळ, तशी जेमतेम पाऊण एक तासाची. पण ही वेळ कशी जीवघेणी असू शकते ह्याचा अनुभव मी क्षणोक्षणी घेत असतो. एकदा सुधागडला गेलो होतो. गडावर जायचा आजचा जो प्रचलित मार्ग आहे तो आहे पाच्छापुराहून. औरंगजेबाचा पुत्र शहजादा अकबर शहेनशहाशी बगावत करून आला होता ते संभाजीराजांचे साह्य घेण्यासाठी तेव्हा राजांनी त्याच्या सोय गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका लहानशा वाडीत केली होती. तेव्हापासून अकबराच्या छावणीमुळे ते ओळखलं जाऊ लागलं पाच्छापूर ह्या नावाने. आज ह्या मार्गावर एक भक्कमशी शिडी लावलीय. तेव्हा ती नव्हती. नाडसूरच्या एसटीने उतरलो ते धोडसे गावात.

समुद्र

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 26/05/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा पूर्वी पायाशी येउन घोळणारा तो, आता उगाच कोरड्या झालेल्या मला भिजवेल अन निमूट माघारी वळणाऱ्या पायांना थिजवेल … एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा माझ्यावर सोडलेली त्याची ती जालीम लाट, उगाच आणलेले उसने आवसान जाताना पुसत जाणार अन घट्ट रुतलेल्या पायांचाही पुन्हा पुन्हा तोल ढासळणार एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा पसरला आहे मिट्ट काळोख चहूकडे, हल्ली सूर्याबरोबर बहुदा तो रात्रीचे तारेही गिळतो, अन दूरवर ते लाईट हाउस अन इथे मी दोघेच रात्रभर जळतो …. एकट्याने समुद्रावर जायची भीती वाटते आताशा - विश्वेश

हिरवीन

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 24/05/2016 12:53 या दिवशी प्रकाशित केले.

चालवायचंच म्हटलं तर...

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 21/05/2016 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
चालवायचंच म्हटलं तर अगदी काहीही चालतं चालून बिघडोस्तोर सगळंच चालवलं जातं चालून चालून बिघडल्यावर मात्र चालण्यासारखं काहीच नसतं बिघडवायला काय हो अगदी काहीही चालतं बिघडून पुन्हा चालनं मात्र चालण्यासारखं नसतं

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

मी मारलेल्या एकूण माश्या

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 20/05/2016 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी मारलेल्या एकूण माश्या सत्तावीस मोजण्यात खूप वेळ जातो खिडकीचा एक ग्रील तुटला आहे त्याच्या जरासं खाली एक झुरळ फिरते आहे बघण्यात खूप वेळ जातो कंटाळा आल्यावर मी एखादी कविता लिहायला घेतो शब्द? शोधण्यात खूप वेळ जातो आरसा फुटलाय माझ्याकडचा रोज उठून कोण बघणार त्यात? साला, जगण्यात खूप वेळ जातो आयुष्य ! ही तर एक शिक्षाच आहे भोगण्यात खरंच खूप वेळ जातो -जव्हेरगंज

राँग नंबर

लेखक हर्मायनी यांनी गुरुवार, 19/05/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशात चंद्र कधीचा डोक्यावर आला होता. घड्याळात १२ चा ठोका वाजूनही गेला होता. ती कधीची हातात फोन घेऊन आकाशाकडे वेड्यागत बघत बसली होती. फोन करावा की न करावा या विचारात! आज त्याचा बर्थ डे! मागच्या वर्षी ती होस्टेलच्या गेट वरून उडी टाकून त्याच्या रूमवर गेली होती. फुल भारी plan होता तो! सगळा ग्रुप जमला होता. मग खूप धमाल केली होती. अशाच एका क्षणी हसता हसता त्याने अचानक तिला I love you म्हटलं होतं. त्याचं सगळंच धक्कादायक आणि अनपेक्षित. कधी काय करेल याचा नेम नाही. हीच spontaneity तिला भावली होती. आणि ती काय लाजली होती!

गेले मोदी कुणीकडे

लेखक anilchembur यांनी मंगळवार, 17/05/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

चिमणीचे दप्तर.

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 17/05/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
परमेश्वराने स्त्री व पुरुष अशा दोन जाती जरी निर्माण केल्या असल्या तरी त्यांच्यात एकमेकाबद्दल वाटणारे प्रेम, आदर , आपुलकी, जिव्हाळा हे मात्र कांही वेगळेच असते . मग हे नाते मुलाचे व आईचे असेल किंवा वडिलांचे व त्यांच्या मुलीचे असेल अथवा भाऊ बहिणीचे ही असू शकेल, मात्र नात्या प्रमाणे प्रत्येकाची एकमेकाबद्दल असणारी ही ओढ, ही कांही न्यारीच असते आणी शेवटी स्त्री व पुरुषाला जन्म देणारी एकमेव व्यक्ती ही स्त्रीच असते . आता पहा ना, माझी सात वर्षाची छोटी मुलगी ,मी तिला प्रेमाने "चिमणी" म्हणतो . तिची आणि माझी अशी काय गट्टी जमते कि कधी कधी मला असे वाटू लागते कि आपण तिच्या शिवाय राहुच शकणार नाही.