इतकं सोप्पं होतं???
नक्कीच नाही...
-------------------------------------------------------
लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय?
पिरातै म्हणाल्या, 'फिल्मी वाटतंय'. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते.