Skip to main content

मांडणी

RIP पंडित

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 06/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला. कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही. 'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स..... अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं.

पन्नास पावसाळ्या नंतरचा जमाखर्च

लेखक मिडास यांनी सोमवार, 02/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही. आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव एक survey फॉर्म घेऊन समोर येतात. १) शिक्षण पूर्ण ?

मिपाच्या नव्या थीमची ओळख

लेखक नीलकांत यांनी रविवार, 01/01/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला मिपाला नवीन थीम लावली आहे. या थीम मध्ये रंगसंगतीसह अनेक बदल केलेले आहेत. त्या नव्या बदलांची सवय होई पर्यंत नेमके काय बदल आहेत आणि नवी ठेवण कशी आहे हे आपण येथे बघुया. सध्याची मिपाची थीम ही मोबाईल व अन्य लहान स्क्रिनसाईज असलेल्या डीव्हाईससाठी सहज अनुरूप होईल अशी थीम आहे. त्यामुळे संगणक, लॅपटॉप सोबतच यापुढे मोबाईल, टॅब आदीवर मिपावाचन आणि प्रतिक्रिया देणे सहज सोपे होईल अशी अपेक्षा आहे. १) तुर्तास मिपाचा लोगो नाहीये. - ही तात्पुरती सोय आहे. मिपाचा लोगो लवकरच वरच्या भागात असेल. २) मेन्यु - सध्या वरच्या मेन्युमध्ये साहित्य प्रकार नावाचा मेन्यु आहे.

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 30/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील. माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले. तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा....

नग्नता आणि मुक्ती

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 14/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या जैनीजमवर आलेल्या एका तद्दन पोस्टवर बरीच सांगोपांग चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी नग्नता आणि मुक्तीच्या संबंधाविषयी कुतुहल प्रकट केलं होतं. त्या निमित्तानं ही पोस्ट. प्रथम महावीराचा अध्यात्मिक विचार समजून घेऊ. महावीराच्या दृष्टीनं आपलं शरीराशी झालेलं तादात्म्य हा स्वरुपोलब्धितला एकमेव अडसर आहे. त्यामुळे त्याची सर्व साधना, शरीराशी झालेलं तादात्म्य संपवण्यावर केंद्रित आहे. तदनुसार, केश विमोचनादी अत्यंत क्लेशदायी साधना दिगंबर पंथात आल्या आहेत.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पाणी - अर्थात Virtual Water & Water Footprints

लेखक डिस्कोपोन्या यांनी बुधवार, 14/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , या वर्षी (किंवा सलग गेले 3 वर्ष) १९७२ च्या दुष्काळा पेक्षाही भयानक असा दुष्काळ उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी प्रादेशिक पातळीवर राजकारण चालू आहे. दुष्काळ निवारणासाठी वेगवेगेळे packages जाहीर केले गेले.. काही ठिकाणी अक्षरशः अशी परिस्थिती होती कि घरी आलेल्या पाहुण्यांना खायला जे पाहिजे ते देतो मात्र पाणी मागू नका अशी विनंती करावी लागल्याच्या बातम्या वृत्तपत्रात येऊन गेल्या. महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात तर महिन्याकाठी रु.३०००/- पेक्षा जास्त फक्त पाण्यासाठी खर्च करावे लागत होते.

हरत कोणी नाही!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 14/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
play तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही! क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण… ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल… सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो! गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे… हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल! पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून, जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे… ते करायलाही जिगर लागते!

माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian?

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 11/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
शाकाहार मांसाहार असे म्हटले कि लगेच माणूस मूलतः Vegetarian की Non Vegetarian? हा प्रश्न लोक विचारू लागतात. आणि त्यावर आपापली मतही अभिनिवेशाने मांडू लागतात. आता Non Vegetarian चं भाषांतर अ-शाकाहारी असे काहीतरी होईल, मांसाहारी नाही म्हणून मुद्दाम वरच्या प्रश्नात तसे लिहिलेले आहे.आम्ही पूर्ण पणे Vegetarian आहोत असे म्हटले तर मग दुध, तूप, लोणी, मध असे प्राणीजन्य पदार्थ खाण टाळावे लागेल. आश्चर्य म्हणजे आपल्या धर्मात ह्या गोष्टी उपासाला देखील चालतात. (मला कधी कधी कळतच नाही आपल्या धर्माचं, म्हणजे एकादशी,चतुर्थीला भाज्या पण चालत नाहीत पण हे उपरोल्लेखित प्राणीजन्य पदार्थ चालतात.

तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 08/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे. सूफ़ीजमचा नज़रिया कळला तर इर्शाद क़ामिलचा हा कलाम, हृदयाला स्पर्शून गेल्याशिवाय राहाणार नाही.

नोटबंदी आणि विवेकाचा दुष्काळ!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 03/12/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी( म्हणजे T.V. आणि सोशल मिडीयावर) आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून राहिली आहे. ती म्हणजे नोटाबंदी. काय अभूतपूर्व परिस्थिती, दिवाळी नंतर शिमगा लगेचच यावा आणि सर्वत्र धुळवड साजरी व्हावी असे चित्र. महामहीम पंतप्रधान मोदीशेठ ह्यांचे परम भक्त आणि परम शत्रू, सगळेच डोके गमावलेल्या मुरार बाजी प्रमाणे थैमान घालताना दिसताहेत. बरे दोघांना हि सर्वसामान्य जनतेच्या हालाची, तिच्या देशभक्तीची, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची कोण काळजी?