Skip to main content

मांडणी

दिवस रिहॅब चे !!!!!!

लेखक वरुण मोहिते यांनी सोमवार, 19/09/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
अँब्युलन्स मधून खाली कोण तरी उचलत आहे .आता आठवत नाही कोण होता तो .वर कोणीतरी न्हेलं ते हि आठवत नाही .डायरेक्ट जाग १५ तासांनंतर ,इंजेकशन दिलं असावं .बहुधा झोपेचं असावं आता हे हि आठवत नाही आता पिक्चर प्रमाणे फ्लॅश बॅक सांगतो .. सुरवात साधी सरळ छान घर मज्जा मज्जा अश्या टाइप . नीट शिक्षण कॉलेज पोस्ट डिग्री हा सगळा प्रवास (त्यात काय झालं हे परत कधीतरी )सगळंच चांगलं असला की घरचेही फार विचार करत नसावेत बहुधा .कारण कोणाला काय माहित कधी काय होता ते.कारण थोडं ड्रिंक परत कॉलेज मध्ये g.s होतो बाकी मजा मस्ती हे सगळं घरी माहित होतं त्यात काही विशेष पण नाही.

का एवढे धप्पा धापा पोलिसांच्या मागे लागलेत लोक ?

लेखक वाल्मिक यांनी रविवार, 18/09/2016 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला 2013 चा जानेवारी महिना आठवतो ,निर्भया प्रकरण आणि मेणबत्ती नुकतेच झाले होते ,कोणतेही वर्तमान पात्र उघड फक्त बलात्कार बातम्या ,जणू भारतात लोक दुसरे काही काम करतच नाहीत आता पण सध्या गणपतीभर पोलिसांना मारणेच चालू आहे ,ते पण दर वेळी नवीन MO आता माझा प्रश्न 2012 ला जेव्हा रजा अकॅडेमिच्या वेळी गर्भवती पोलीस कॉन्स्टेबल महिलाना मारहाण झाली ,हाच मीडिया आणि हेच पक्ष का गॅप होते ? मी राज ठाकरे यांचा पाठीराखा नाहीये पण फक्त त्यांनहीच आवाज उठवला होता सौजन्य सप्ताह पळून पण लोक पोलिसांबद्दल अढी बाळगून आहेत ,पण अचानक एवढा उद्रेक कसा ?

एकक !

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 16/09/2016 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका : ही कविता जमेल तेथे फक्त एक शब्द वापरून करण्याचा प्रयत्न आहे. एका स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचे क्षण /घटना एका शब्दानं प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केले आहे. म्हणून शीर्षक एकक असे नाही . तर, एक स्त्री चे विश्व कसे एकक असून, साखरे प्रमाणे इतरांच्या आयुष्यात विरघळून जाते - इतरांच्या आयुष्यास अर्थ भरण्यास तिची स्वतःची ओळख.. अगदी तिच्या बाबांनी उत्कट प्रेमानं तिला दिलेले नाव सुद्धा - ती विसरून जाते (लग्न नंतर नाव बदलण्याच्या रीती वरून) - एका परिवारास अनेक प्रकारे जोडून -मात्र कुठे तरी ती 'एकक' म्हणून हरवून जाते... ह्या छोट्या अश्या निरीक्षणा वर लिहिण्याचा अल्प सा प्रयत्न आहे.
काव्यरस

राऊ कादंबरीमधील एक प्रसंग

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 12/09/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
राऊ कादंबरी परत एकदा वाचून संपवली. प्रत्येकवेळी ती मनाला वेगवेगळ्या प्रकारे भिडते. अनेकांनी अनेकदा त्यावर लिहिलं आहे. चर्चा देखील झाल्या आहेत. अलीकडे बाजीराव-मस्तानी सिनेमा देखील येऊन गेला. त्या काळात तर पेशवे... मराठा साम्राज्य... प्रेम... बेबंद स्वभावाचे बाजीराव पेशवे... या सगळ्यावर खूप खुप उहापोह झालाच. म्हणून परत एकदा राऊ कादंबरी हातात घेतली होती. त्यातील एक प्रसंग मनात खूप भिडला.. टोचला... जेव्हा मस्तानीला आपा पुणे सोडून जा सांगतात आणि बाजीराव पेशव्यांचा निरोपही न घेता मस्तानी बुंदेलखंडाला रवाना होते. ही बातमी समजताच बाजीराव पेशवे दोन दिवसांची अविरत घोडदौड करत तिला गाठतात.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

अर्पणपत्रिका...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 09/09/2016 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं एक वेगळं, स्वतःच असं जग आहे हे सगळ्यांना ठाउक आहे. पण या पुस्तकांत सुद्धा एक त्याचाच भाग असलेलं पण तेवढचं स्वतंत्र अस एक जग असतं ते म्हणजे 'अर्पणपत्रिका'... मनात वाटलं या अर्पणपत्रिका, हे जग एकत्र आणलं तर... बस या एका विचाराने हा धागा काढला आहे... मला भावलेल्या आवडलेल्या काही अर्पणपत्रिका मी इथे देत आहे... आपणही या संग्राहात हातभार लावावा अशी विनंती... अर्पणपत्रिका म्हटलं कि सगळ्यात पहिल्यांदा मला जी.ए. आठवतात.. म्हणुन सुरुवात त्यांच्याचकडुन.. ‘हिरवे रावे’ हा कथासंग्रह आपल्या आईला अर्पण करताना जी.ए. म्हणतातः कै.

गोखल्यांचे सीमोल्लंघन

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 03/09/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गोखल्यांचे सीमोल्लंघन गोखले टिळक रोडवरच्या महाराष्ट्र बँकेत होते. बाजीराव रोडला घर आणि दूर टिळक रोडला नोकरी... असं खूप मोठ्ठं सीमोल्लंघन गोखले दररोज करीत असत. आमचे वडिल हे गोखल्यांचे श्रद्धास्थान. आयुष्यातली कोणतीही छोटीमोठी गोष्ट त्यांच्याशी शेयर केल्याशिवाय गोखले रहात नसत. आमच्या वडिलांची दाद त्यांना महत्त्वाची वाटे.

<< हिशेब-ठिशेब>>

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

गणपती उत्सव का इव्हेंट???...

लेखक निकुंज यांनी शुक्रवार, 02/09/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली. पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???...

देह / अवयव दान - काळाची गरज

लेखक क्रेझी यांनी बुधवार, 31/08/2016 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या टाईम्स ऑफ इंडिया पेपरमधे मी ऑनलाईन ऑर्गन डोनेशन बद्दल वाचलं. खाली दोन साईट्स दिल्या आहेत जिथे जाऊन हे करता येईल www.dmer.org www.ztccmumbai.org काही विचारपूस करावयाची असल्यास हेल्पलाईन नंबर्स helpline numbers: 1800274744, 1800114770 मला ह्याबाबतीत बरंच कुतुहल आहे. मला माझे डोळे दान करायची इच्छा आहे पण मला चष्मा आहे तरी मी डोळे दान करू शकेन का? मध्यंतरी मी एके ठिकाणी वाचलं की, माणसाच्या शरिरातला प्रत्येक अवयव म्हणजे हृदय सुद्धा नविन पेशींनी तयार होतं, त्याला बराच काळ लागतो.