मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळाख्यान

शैलेश ·

विसोबा खेचर 02/04/2008 - 15:51
अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले । येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।। मस्त! :) विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे... तात्या.

प्राजु 03/04/2008 - 00:02
म्हणते... आवडले आख्यान. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चित्रगुप्त 13/05/2024 - 15:11
आज अचानक गाठ पडे ... सोळा वर्षांपूर्वीचे, मिपाच्या प्रारंभिक काळातले हे मिसळाख्यान आज अचानक सापडले. याचे पुढले भाग आलेले नाहीत का ? 'शैलेश यांचे सर्व लेखन' मधे फक्त एवढेच आहे ? त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.

विसोबा खेचर 02/04/2008 - 15:51
अशाप्रकारे मिसळाख्यानाचे । प्रथम अध्यायाचे पान पहिले । येथेच समाप्त जाहले । आता भेटू विरामानंतरी ।। १८ ।। मस्त! :) विरामानंतरच्या आख्यानाची वाट पाहतो आहे... तात्या.

प्राजु 03/04/2008 - 00:02
म्हणते... आवडले आख्यान. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चित्रगुप्त 13/05/2024 - 15:11
आज अचानक गाठ पडे ... सोळा वर्षांपूर्वीचे, मिपाच्या प्रारंभिक काळातले हे मिसळाख्यान आज अचानक सापडले. याचे पुढले भाग आलेले नाहीत का ? 'शैलेश यांचे सर्व लेखन' मधे फक्त एवढेच आहे ? त्याकाळी सक्रीय असलेले बहुतांश मिपाकर आता दिसत नाहीत.
जय जय मिसळपावा । तूझी किर्ती अमर्यादा । गुणानुक्रम तुझे वर्णीता । विद्वज्जनही थकती ।। १ ।। टोपीकरांचा* प्रभाव पडूनी । कैसे कैसे जन वर्तती । चिंताक्रांतले थोर ज्ञानी । अंतराळी सभेसी ।। २ ।। इतालियन चायनीज भक्षती । नटमोग-या मालिका बघती । आणिक मिरवती फ्याशनी । तयांसी शहाणे करावे ।। ३ ।। मजसी तेथ पाचारण करोनी । मिसळीचे गुण वर्णुनी । वेवस्थित काव्य रचोनी । मिसळपावी प्रकाशना सांगितले ।। ४ ।। त्यांची आज्ञा शिरोधर । मी तो केवळ आज्ञाकार । कवितेचा गंधही ना ठाव । परि प्रयत्न करीतो ।। ५ ।। अहो ही मिसळ अलौकिक । तेणे साधली ओवी मज । आणि श्रोते आपण विद्वान । म्हणूनी धारिष्ट्य करीतो ।। ६ ।। अंतःकरण करावे कुशाग

पाऊस माझ्यासाठी काय आहे?

उदय सप्रे ·

मीनल 01/04/2008 - 17:14
मातीचा तो गंध पाऊस आणतो विजलेल्या देहाला तो धुंद करतो ती ही मग हळ्ळूच गालात हसते. पाऊस-- हाच तिचा होकार आहे.

मदनबाण 01/04/2008 - 17:31
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! खरच !!!!! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात क्लासच !!!!! (पावसाची वाट पाहणारा चातक) मदनबाण

प्राजु 02/04/2008 - 06:38
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

उदय सप्रे 02/04/2008 - 09:27
तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत. तुम्ही लिहिलेल्या तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान ! स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का? माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com उदय "सप्रे"

मीनल 01/04/2008 - 17:14
मातीचा तो गंध पाऊस आणतो विजलेल्या देहाला तो धुंद करतो ती ही मग हळ्ळूच गालात हसते. पाऊस-- हाच तिचा होकार आहे.

मदनबाण 01/04/2008 - 17:31
हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! खरच !!!!! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात क्लासच !!!!! (पावसाची वाट पाहणारा चातक) मदनबाण

प्राजु 02/04/2008 - 06:38
तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! कविता खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

उदय सप्रे 02/04/2008 - 09:27
तुमचा "ब्लॉग" आवडला , पण सगळ्याच कविता वाचायला वेळ नव्हता, सावकाश वाचून अभिप्राय नक्की कळवीन, मला "ओरबाडल्यासाखे" वाचायला - विशेषतः - कविता - नाही आवडत. तुम्ही लिहिलेल्या तरूवेलीं ल्यायल्या हिरवा शृंगार गवताच्या गालिच्यावर फुलांचा बहार रानामध्ये घुमली शीळ हिरवीगार.. पाऊस... चराचराची माय आहे! या ओळी पण तितक्याच समर्पक वाटल्या ! खरच छान ! स्वतःचा "ब्लॉग" कसा बनवायचा असतो?खर्च किती येतो वगैरे मला सांगू शकाल का? माझा ई-मेल आय डी : sudayan2003@yahoo.com उदय "सप्रे"
तिच्या मोकळ्या केसांत अलगद झिरपतो माझी इच्छा कशी तो आपसुक पुरवतो? तिच्या ओठांवर थांबलेला त्याचा एक थेंब पाऊस.....प्रेमाचं दव नाही तर काय आहे? हिरव्यागार पनांवर टपोरं मोगर्‍याचं फूल फुलत असतं घेवून तिच्याच वेणीची चाहूल अड्खळतं अवचित माझं प्रत्येक पाऊल पाऊस्.....तारुण्य आणि रसिकतेची माय आहे ! कोसळणार्‍या सरी तिला चिंब भिजवतात अबोली साडीला अंगाशी घट्ट सजवतात मनात आपसुक प्रेमाचे अंकूर रुजवतात पाऊस....हुरहुरणार्‍या मनावरची साय आहे ! चहाचा शेवटचा कप शिल्लक आहे थरथरणार्‍या तिला पण तो हवा आहे अर्धा घेवून ती उष्टावलेला अर्धा मला देते हा असा "अमृताचा" क्षण प्रत्येकाला हवा आहे ! पावसामुळेच तर हे सगळं

आयुष्य

जयवी ·

बेसनलाडू 01/04/2008 - 10:15
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं माणूसपण जोपासायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं. हे विशेष आवडले. (दमदार)बेसनलाडू

विसोबा खेचर 01/04/2008 - 11:48
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं. वा जयू! अप्रतिम कविता...! अगदी भैरवीसारखीच दमदार, दर्जेदार! मनोगत सोडल्यापासनं आज खूप दिवसांनी तुझी एक उत्तम कविता वाचनात आली आणि खूप बरं वाटलं! त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं क्या बात है! आपला, (मित्रांची सुखदु:ख वाटणारा आणि आपल्याच मस्तीत मजेत जगणारा!) तात्या.

कविता मस्त आहे पण मला माझ्या बालपणी बालपण मिरवायचे म्हणजे काय ते माहीतीच नव्हते हो त्यामुळे 'खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असत' या शब्दांचा अर्थ खरा मला उमगलाच नाही. :( माझ्या लहानपणी सारखे वाटायचे कधी एकदा मोठा होतोय. पण या शब्दांचा अर्थ आपण मोठे असलो तरी लहान किंवा नम्र होऊन रहायचे असा असेल तर मात्र ते खरोखरच फार सुंदर आहे. खरोखर एखादा माणूस खूप मोठा असेल वयाने, मानाने, अनुभवाने पण तरीहि तो चारचौघात नम्रपणाने मिळून मिसळून राहत असेल तर ते खरोखर 'लहानपणा मिरवल्यासारखेच' नाही का! पुण्याचे पेशवे

प्राजु 02/04/2008 - 06:22
जयवी ताई, खूपच छान आहे गं कविता. आयुष्या दमदार भैरवीने संपवण्याची कल्पना खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मीनल 02/04/2008 - 07:48
बोधात्मक कविता आहे. कवितेची सुरवात होते ती प्रश्नाने. जरा रागाचा स्वर दिसतो.आयुष्याबद्दलच्या नकारात्मक विधानाबद्दलचा राग असेल तो. मग तो राग जातो आणि खर तर आयुष्य कस जगायच याबद्दल बोलण केले आहे. उदाहरणातून उपदेश आहेत.सल्ले म्हणा हव तर. थोडक्यात आयुष्यात काय काय करायला हव ते सांगितले आहे. ब-याचदा स्वतः जगलेल्या आयष्याच्या अनुभवाची हलकिशी किनार आहे अस वाटत. Philosophical ,idealistic` विचार मांडले आहेत. त्यात रात्र आहे ,पहाट आहे , सुख आहे ,दु:ख आहे ,हसायच आहे ,रडायच आहे. सर्व ठिकाणी पॉझिटिव्ह विचार. नकाराच `न` ही नाही आहे कवितेत. constuctive & objective oriented advices! अस सर्व छान छान स्वप्नवत असल तरी ,आयुष्याचा अंत अटळ आहे या वास्तवाच ही भान आहे कवियित्रेला. तो `शेवट` असला तरी दमदार असावा असा ठासून आग्रह आहे. आयुष्याच कस जगाव याच उत्तम मार्गदर्शन क्रेले आहे. कवितेचा ठराविक अस काही स्ट्र्कचर नाही .तरी ही यमक जुळत कविता सहज वाहत जाते. लहान मोठी गद्दासारखी वाक्य असली तरी ही उपमान ,उपमेय अलंकारिक शब्दांमुळे सुंदर काव्य झाले आहे.

सर्किट 02/04/2008 - 22:12
सुंदर कविता. आयुष्याच्या अखेरच्या दमदार भैरवी वरून संजोपरावांच्या "मरणा काय तुझा तेगार" ची आठवण झाली. - सर्किट

जयवी 17/04/2008 - 17:11
बेसन लाडू...... धन्यवाद !! तात्या....अहो सध्या जरा कामात असल्यामुळे नियमित लिखाण करता येत नाहीये. पण अगदी नेहेमीसारख्याच तुमच्या मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी भरपूर आभार :) पुण्याचे पेशवे.... प्रत्येकाची बालपण मिरवायची कल्पना वेगवेगळी असू शकते. मस्तपैकी लाड करुन घ्यायचे.......सगळं लेवून मिरवून घ्यायचं.... कशाची चिंता करायची नसते लहानपणी....!! माझं लहानपण देवकृपेने असंच गेलं :) प्राजु..... धन्यवाद..... मला पण आवडते ती ओळ :) मीनल किती छान उकल करुन सांगितलंस गं....... खूप खूप धन्यवाद !! सर्किट्.....तहे दिल से शुक्रिया !!

शितल 17/04/2008 - 17:35
वा! काय छान अर्थ आहे कवितेचा, जगवे तर असेच. मी तर ही कविता स॑ग्रहित करून ठेवणार आणि माझ्या मित्र्-मैत्रिणी॑नाही पाठ्वणार.

विदेश 17/04/2008 - 18:52
तुमच्या काव्य-लेखनातून किती सहज-सुलभतेने शब्द अर्थासकट उतरतात! फारच छान. (तरी पण- आयुष्य म्हणजे काय असतं मिसळपाव खात-खातच जगायचं असतं)

आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.

सही !!!

तुझी कविता छान आहे असं म्हणणं म्हणजे द्विरूक्ती होते, नाही का जयश्री ? :) ---------------------------------- आणि कवितेत हरवायचं असतं गाव स्वप्नातलं जपायचं असतं ----------------------------------

जयवी 18/04/2008 - 22:18
शितल.... दिल खुष कर दिया तुमने :) विदेश...... एकदम मान्य !! मनस्वी, मनस्वी, डॉ.दिलीप...... तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. संदीप.... क्या बात है......!!

बेसनलाडू 01/04/2008 - 10:15
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं माणूसपण जोपासायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं. हे विशेष आवडले. (दमदार)बेसनलाडू

विसोबा खेचर 01/04/2008 - 11:48
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं. वा जयू! अप्रतिम कविता...! अगदी भैरवीसारखीच दमदार, दर्जेदार! मनोगत सोडल्यापासनं आज खूप दिवसांनी तुझी एक उत्तम कविता वाचनात आली आणि खूप बरं वाटलं! त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं क्या बात है! आपला, (मित्रांची सुखदु:ख वाटणारा आणि आपल्याच मस्तीत मजेत जगणारा!) तात्या.

कविता मस्त आहे पण मला माझ्या बालपणी बालपण मिरवायचे म्हणजे काय ते माहीतीच नव्हते हो त्यामुळे 'खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असत' या शब्दांचा अर्थ खरा मला उमगलाच नाही. :( माझ्या लहानपणी सारखे वाटायचे कधी एकदा मोठा होतोय. पण या शब्दांचा अर्थ आपण मोठे असलो तरी लहान किंवा नम्र होऊन रहायचे असा असेल तर मात्र ते खरोखरच फार सुंदर आहे. खरोखर एखादा माणूस खूप मोठा असेल वयाने, मानाने, अनुभवाने पण तरीहि तो चारचौघात नम्रपणाने मिळून मिसळून राहत असेल तर ते खरोखर 'लहानपणा मिरवल्यासारखेच' नाही का! पुण्याचे पेशवे

प्राजु 02/04/2008 - 06:22
जयवी ताई, खूपच छान आहे गं कविता. आयुष्या दमदार भैरवीने संपवण्याची कल्पना खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मीनल 02/04/2008 - 07:48
बोधात्मक कविता आहे. कवितेची सुरवात होते ती प्रश्नाने. जरा रागाचा स्वर दिसतो.आयुष्याबद्दलच्या नकारात्मक विधानाबद्दलचा राग असेल तो. मग तो राग जातो आणि खर तर आयुष्य कस जगायच याबद्दल बोलण केले आहे. उदाहरणातून उपदेश आहेत.सल्ले म्हणा हव तर. थोडक्यात आयुष्यात काय काय करायला हव ते सांगितले आहे. ब-याचदा स्वतः जगलेल्या आयष्याच्या अनुभवाची हलकिशी किनार आहे अस वाटत. Philosophical ,idealistic` विचार मांडले आहेत. त्यात रात्र आहे ,पहाट आहे , सुख आहे ,दु:ख आहे ,हसायच आहे ,रडायच आहे. सर्व ठिकाणी पॉझिटिव्ह विचार. नकाराच `न` ही नाही आहे कवितेत. constuctive & objective oriented advices! अस सर्व छान छान स्वप्नवत असल तरी ,आयुष्याचा अंत अटळ आहे या वास्तवाच ही भान आहे कवियित्रेला. तो `शेवट` असला तरी दमदार असावा असा ठासून आग्रह आहे. आयुष्याच कस जगाव याच उत्तम मार्गदर्शन क्रेले आहे. कवितेचा ठराविक अस काही स्ट्र्कचर नाही .तरी ही यमक जुळत कविता सहज वाहत जाते. लहान मोठी गद्दासारखी वाक्य असली तरी ही उपमान ,उपमेय अलंकारिक शब्दांमुळे सुंदर काव्य झाले आहे.

सर्किट 02/04/2008 - 22:12
सुंदर कविता. आयुष्याच्या अखेरच्या दमदार भैरवी वरून संजोपरावांच्या "मरणा काय तुझा तेगार" ची आठवण झाली. - सर्किट

जयवी 17/04/2008 - 17:11
बेसन लाडू...... धन्यवाद !! तात्या....अहो सध्या जरा कामात असल्यामुळे नियमित लिखाण करता येत नाहीये. पण अगदी नेहेमीसारख्याच तुमच्या मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी भरपूर आभार :) पुण्याचे पेशवे.... प्रत्येकाची बालपण मिरवायची कल्पना वेगवेगळी असू शकते. मस्तपैकी लाड करुन घ्यायचे.......सगळं लेवून मिरवून घ्यायचं.... कशाची चिंता करायची नसते लहानपणी....!! माझं लहानपण देवकृपेने असंच गेलं :) प्राजु..... धन्यवाद..... मला पण आवडते ती ओळ :) मीनल किती छान उकल करुन सांगितलंस गं....... खूप खूप धन्यवाद !! सर्किट्.....तहे दिल से शुक्रिया !!

शितल 17/04/2008 - 17:35
वा! काय छान अर्थ आहे कवितेचा, जगवे तर असेच. मी तर ही कविता स॑ग्रहित करून ठेवणार आणि माझ्या मित्र्-मैत्रिणी॑नाही पाठ्वणार.

विदेश 17/04/2008 - 18:52
तुमच्या काव्य-लेखनातून किती सहज-सुलभतेने शब्द अर्थासकट उतरतात! फारच छान. (तरी पण- आयुष्य म्हणजे काय असतं मिसळपाव खात-खातच जगायचं असतं)

आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.

सही !!!

तुझी कविता छान आहे असं म्हणणं म्हणजे द्विरूक्ती होते, नाही का जयश्री ? :) ---------------------------------- आणि कवितेत हरवायचं असतं गाव स्वप्नातलं जपायचं असतं ----------------------------------

जयवी 18/04/2008 - 22:18
शितल.... दिल खुष कर दिया तुमने :) विदेश...... एकदम मान्य !! मनस्वी, मनस्वी, डॉ.दिलीप...... तुमच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं. संदीप.... क्या बात है......!!
आयुष्य म्हणजे काय असतं देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....? खरं तर....

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

विसोबा खेचर ·

आनंदयात्री 31/03/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज 31/03/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन 31/03/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत 31/03/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु 31/03/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार 31/03/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर 01/04/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू

आनंदयात्री 31/03/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज 31/03/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन 31/03/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत 31/03/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु 31/03/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार 31/03/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर 01/04/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

यशोदेचा घनश्याम ·

आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु 31/03/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी 31/03/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल 01/04/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.

आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु 31/03/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी 31/03/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल 01/04/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

जे घुसळे रवी

अजय जोशी ·

दिनेश५७ 30/03/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

विसोबा खेचर 30/03/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन 30/03/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ 30/03/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी 31/03/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.

दिनेश५७ 30/03/2008 - 10:42
दही घुसळून काढलेलं लोणी रवीला दिसत नाही... ते कवीला दिसतं... म्हणूनच, जे न देखे रवी, ते देखे कवी, असं म्हणतात? ... त्याला फक्त घुसळणं माहीत असतं... वा: !!!

विसोबा खेचर 30/03/2008 - 13:03
तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वा, कविता अगदी झकास आहे! आवडली आपल्याला... आपला, (लोणी आणि ताक प्रेमी) तात्या.

सचिन 30/03/2008 - 15:33
अजयजी, १दम खास !! कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो -- हे सुरेख !!

ठणठणपाळ 30/03/2008 - 19:27
कवितेचा विशय मस्त आहे. बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. >तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. (क्षमस्व.)

अजय जोशी 31/03/2008 - 23:43
वास्तवात असं होत नाही. कवींचे पायसुद्धा अनेकदा मातीचेच असतात. माझ्या मते तरंगणा-या गोळ्यासाठी कवी कधीच कविता करीत नसतो. आपली प्रतिभा लोकांपर्यंत पोहोचावी असा तो प्रयत्न करतो. मंथनातून निघालेले नवनीत(रस) इतरांना मिळावे यासाठी कविता लिहीली जाते असे मला वाटते. तरंगणा-या गोळ्यासाठी म्हणजे मान-सन्मान-कीर्ति-पैसा असा अर्थ लावू नये असे मला वाटते. कारण हे सर्व ओघाने येतेच. या गोष्टींसाठी निरपेक्ष रहावे असे माझे म्हणणे नाही.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:55
बोलीभाशेत लिहिलेल्या या कवितेत 'स्निग्धता' हा शब्द खटकतो. ..............बालीश भाशेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला ठणठणपाळ? बाकी टिळकांच्या भाषेतच सांगायचे झाले तर " दीडकीची भांग घेतली की वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात" कोणत्याही मीटर जाउंदे..भावना सुद्धा नसलेल्या या असल्या कवितेला वाहवा देणारे च मला ग्रेट वाटतात.
कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो दही घुसळून लोणी काढणारी रवी असतो कवीला माहीत घुसळणे फक्त स्निग्धता लोण्यात मिसळणे फक्त स्वत: मात्र फिरुन फिरुन बुडत असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो स्निग्धतेच्या अंशासाठी जग सारं धावतंय रवीचं चाक गरागरा फिरतंय तरंगणा-या गोळ्यापासून अलिप्त जो असतो कवी म्हणजे कवी म्हणजे कवी असतो

चेहरा

सुवर्णमयी ·

विसोबा खेचर 28/03/2008 - 20:05
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है, केवळ अप्रतीम...! एक अत्यंत दर्जेदार, संग्रही ठेवावे असे काव्य, असंच मी म्हणेन... "सोनाली, जियो....!" अशी मनापासून दाद देतो... आपला, (अंतर्मूख!) तात्या.

उत्खनक 13/12/2022 - 15:17
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा जबर. आवडेश.

विसोबा खेचर 28/03/2008 - 20:05
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है, केवळ अप्रतीम...! एक अत्यंत दर्जेदार, संग्रही ठेवावे असे काव्य, असंच मी म्हणेन... "सोनाली, जियो....!" अशी मनापासून दाद देतो... आपला, (अंतर्मूख!) तात्या.

उत्खनक 13/12/2022 - 15:17
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा जबर. आवडेश.
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा जाई होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

उदय सप्रे ·

कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही. बाकी कविता उत्तम.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे 31/03/2008 - 09:21
स्वाती राजेश, माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे. जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती. उदय सप्रे

वरदा 30/03/2008 - 00:27
आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....

कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही. बाकी कविता उत्तम.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे 31/03/2008 - 09:21
स्वाती राजेश, माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे. जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती. उदय सप्रे

वरदा 30/03/2008 - 00:27
आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्ना

मन आंब्याचा मोहोर....!

प्राजु ·

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:11
वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...! मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... या ओळी सर्वात जास्त भावल्या! आपला, (मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:19
प्राजु....जबरा कविता बरं का! मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... या ओळी विशेष आवडल्या... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चकली 28/03/2008 - 02:28
प्राजु....मस्त कविता पण मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:45
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :) आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग 28/03/2008 - 02:41
किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या! बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:) चतुरंग

सचिन 28/03/2008 - 03:12
प्राजु, अतिशय उत्तम कविता ! मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. ... हे म्हणजे एकदम उच्च !! कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल 28/03/2008 - 03:41
माझं मन हिला कसं काय कळ्ळल? माझं एकटीच ?की तुमचं ही ? आपल्या सर्वांच????? मन वढाय वढाय ,नाही कधी समजले.. मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु 28/03/2008 - 05:25
तात्या, इनोबा, सचिन, धन्यवाद. चकली ताई, इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. चतुरंग, धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं.. मिनल, एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चकली 28/03/2008 - 21:42
धन्यवाद! मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली. चकली http://chakali.blogspot.com

वरदा 28/03/2008 - 08:47
प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू 28/03/2008 - 08:49
छान. कविता आवडली. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... हे विशेष आवडले. अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो. (वाचक)बेसनलाडू

प्राजु 28/03/2008 - 08:57
बे.ला. , ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 28/03/2008 - 09:40
प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन 28/03/2008 - 11:28
मस्तचं... मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... अप्रतीम! लयं भारी... प्राजु ताई थोडे माझेही शब्दं मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं... मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं... आपला पंखा (मनस्वी) चेतन

प्राजु कविता मस्त आहे गं... मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी ही पहिलीच ओळ खास आहे..

सुवर्णमयी 28/03/2008 - 17:11
प्राजु कविता आवडली. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मस्तच!

शैलेश 28/03/2008 - 21:46
कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त! शैलेश

विसोबा खेचर 29/03/2008 - 00:17
हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो! आपला, (कट्टर मिपाकर!) तात्या.

मीनल 29/03/2008 - 04:04
आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.---- ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे. तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे. ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे. तेच आपल्या मनाला भिडतात. वाचकाला विचार करायला लावतात या ओळी. म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी? मन हे प्रतिबिंब कसे? मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे. वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो . अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते. कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल. मन `हे` `ते`च आहे असे म्हणते. दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही. Simile नाही .तर Metaphor आहे. यामुळे ते विचार करायला लावते. दोहोंमधले साम्य शोधायला लावते. कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे! यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही. बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली. अधिक गोड वाटते. भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे. तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो. खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते. प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे. मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला. ती लिहून काढली इथे मिपावर. म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना. म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?) पण कवितेचा नाही. अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का? ते तुम्ही लिहा.

In reply to by मीनल

प्राजु 29/03/2008 - 06:17
मिनल, अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं. तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास? ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

कारकुन 29/03/2008 - 04:15
प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! -कारकुन

वरदा 29/03/2008 - 05:26
तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

In reply to by वरदा

प्राजु 29/03/2008 - 06:19
अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :)) पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

कारकुन 29/03/2008 - 07:23
प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी (अरसिक) कारकुन

In reply to by कारकुन

मीनल 29/03/2008 - 07:42
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली. खरे आहे तुमचे म्हणणे. पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते. कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे . प्रत्येक कविता गेय नसते. कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते. प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे. हे कुठेही लागू होते नाही का ? लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल. That`s it ! End of topic from my side .

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 06:39
असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा ....... हे मस्त! :) अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:12
त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

In reply to by कारकुन

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:18
नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..! असो, संपवुया हा विषया आता इथेच... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:25
हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल 29/03/2008 - 07:27
प्राजु ,वरदा , तात्या म्हणतात ते बरोबर आहे. कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा. `सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही. तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर -- करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही? त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे. कारकुनांच्या मते चोथा झाला. पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस. माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास! मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच! पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी. दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे. तुझ्या लेखन शैलीशी नसावा. कारकून साहेब , कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात? मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो . तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी? आम्हाला वाचायला आवडतील.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:39
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? हा हा हा ! खूपच सोपी आहे, थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता... जसे, थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन.. - सर्किट

सर्किट 29/03/2008 - 07:37
असो. माझे मत कार्कुनासारखेच आहे.. तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे. काय तरी नवीन टाका बॉ ! प्राजू, कविता तशी वाईट नाहीये. पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ? सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच.. पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ? मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत.. प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा.. उदा: दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा.. किंवा असेच काही तरी.. तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग ! उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही ! तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते. पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग. दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 29/03/2008 - 07:50
चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ? डिस्कनेक्टेड आहे ते इथे! आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का? कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे? रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:58
ये पुठिल पुठिल क्या है ? मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे ! - (आपला मित्र) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

डॉ. सर्कीट,

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..


या पेक्षा.......

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!


या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 29/03/2008 - 09:45
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:47
प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन! खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल 29/03/2008 - 07:58
आभार तात्या. आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . आता फक्त वाचन करणार या विषयाचे. किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा? कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा. . . . . हे पहा पुन्हा `चोथा`!! बस !! पुरे झाल आता.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 08:02
आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . धन्यवाद !!!! जियो !! जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल. - (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 30/03/2008 - 00:18
दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा
मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम (मनकवडा) कोलबेर डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

वरदा 30/03/2008 - 00:07
मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही... माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?

विसोबा खेचर 28/03/2008 - 02:11
वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...! मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... या ओळी सर्वात जास्त भावल्या! आपला, (मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:19
प्राजु....जबरा कविता बरं का! मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... या ओळी विशेष आवडल्या... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चकली 28/03/2008 - 02:28
प्राजु....मस्त कविता पण मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

इनोबा म्हणे 28/03/2008 - 02:45
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :) आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग 28/03/2008 - 02:41
किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या! बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:) चतुरंग

सचिन 28/03/2008 - 03:12
प्राजु, अतिशय उत्तम कविता ! मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. ... हे म्हणजे एकदम उच्च !! कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल 28/03/2008 - 03:41
माझं मन हिला कसं काय कळ्ळल? माझं एकटीच ?की तुमचं ही ? आपल्या सर्वांच????? मन वढाय वढाय ,नाही कधी समजले.. मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु 28/03/2008 - 05:25
तात्या, इनोबा, सचिन, धन्यवाद. चकली ताई, इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. चतुरंग, धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं.. मिनल, एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चकली 28/03/2008 - 21:42
धन्यवाद! मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली. चकली http://chakali.blogspot.com

वरदा 28/03/2008 - 08:47
प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू 28/03/2008 - 08:49
छान. कविता आवडली. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... हे विशेष आवडले. अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो. (वाचक)बेसनलाडू

प्राजु 28/03/2008 - 08:57
बे.ला. , ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 28/03/2008 - 09:40
प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन 28/03/2008 - 11:28
मस्तचं... मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... अप्रतीम! लयं भारी... प्राजु ताई थोडे माझेही शब्दं मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं... मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं... आपला पंखा (मनस्वी) चेतन

प्राजु कविता मस्त आहे गं... मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी ही पहिलीच ओळ खास आहे..

सुवर्णमयी 28/03/2008 - 17:11
प्राजु कविता आवडली. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मस्तच!

शैलेश 28/03/2008 - 21:46
कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त! शैलेश

विसोबा खेचर 29/03/2008 - 00:17
हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो! आपला, (कट्टर मिपाकर!) तात्या.

मीनल 29/03/2008 - 04:04
आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.---- ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे. तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे. ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे. तेच आपल्या मनाला भिडतात. वाचकाला विचार करायला लावतात या ओळी. म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी? मन हे प्रतिबिंब कसे? मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे. वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो . अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते. कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल. मन `हे` `ते`च आहे असे म्हणते. दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही. Simile नाही .तर Metaphor आहे. यामुळे ते विचार करायला लावते. दोहोंमधले साम्य शोधायला लावते. कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे! यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही. बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली. अधिक गोड वाटते. भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे. तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो. खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते. प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे. मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला. ती लिहून काढली इथे मिपावर. म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना. म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?) पण कवितेचा नाही. अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का? ते तुम्ही लिहा.

In reply to by मीनल

प्राजु 29/03/2008 - 06:17
मिनल, अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं. तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास? ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

कारकुन 29/03/2008 - 04:15
प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! -कारकुन

वरदा 29/03/2008 - 05:26
तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

In reply to by वरदा

प्राजु 29/03/2008 - 06:19
अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :)) पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

कारकुन 29/03/2008 - 07:23
प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी (अरसिक) कारकुन

In reply to by कारकुन

मीनल 29/03/2008 - 07:42
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली. खरे आहे तुमचे म्हणणे. पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते. कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे . प्रत्येक कविता गेय नसते. कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते. प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे. हे कुठेही लागू होते नाही का ? लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल. That`s it ! End of topic from my side .

In reply to by वरदा

विसोबा खेचर 29/03/2008 - 06:39
असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा ....... हे मस्त! :) अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:12
त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

In reply to by कारकुन

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:18
नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..! असो, संपवुया हा विषया आता इथेच... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन 29/03/2008 - 07:25
हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल 29/03/2008 - 07:27
प्राजु ,वरदा , तात्या म्हणतात ते बरोबर आहे. कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा. `सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही. तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर -- करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही? त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे. कारकुनांच्या मते चोथा झाला. पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस. माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास! मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच! पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी. दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे. तुझ्या लेखन शैलीशी नसावा. कारकून साहेब , कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात? मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो . तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी? आम्हाला वाचायला आवडतील.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:39
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? हा हा हा ! खूपच सोपी आहे, थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता... जसे, थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन.. - सर्किट

सर्किट 29/03/2008 - 07:37
असो. माझे मत कार्कुनासारखेच आहे.. तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे. काय तरी नवीन टाका बॉ ! प्राजू, कविता तशी वाईट नाहीये. पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ? सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच.. पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ? मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत.. प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा.. उदा: दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा.. किंवा असेच काही तरी.. तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग ! उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही ! तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते. पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग. दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल 29/03/2008 - 07:50
चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ? डिस्कनेक्टेड आहे ते इथे! आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का? कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे? रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 07:58
ये पुठिल पुठिल क्या है ? मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे ! - (आपला मित्र) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

डॉ. सर्कीट,

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..


या पेक्षा.......

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!


या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर 29/03/2008 - 09:45
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर 29/03/2008 - 07:47
प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन! खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल 29/03/2008 - 07:58
आभार तात्या. आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . आता फक्त वाचन करणार या विषयाचे. किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा? कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा. . . . . हे पहा पुन्हा `चोथा`!! बस !! पुरे झाल आता.

In reply to by मीनल

सर्किट 29/03/2008 - 08:02
आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . धन्यवाद !!!! जियो !! जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल. - (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 30/03/2008 - 00:18
दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा
मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम (मनकवडा) कोलबेर डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

वरदा 30/03/2008 - 00:07
मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही... माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?
मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी.. मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी.. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा.. मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा.. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रां