मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चेहरा

सुवर्णमयी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा गर्दीत माणसांच्या का ओळखू न आला? मी चेहऱ्यास माझ्या धुंडाळले कितीदा पत्ता जुनाच होता, रस्ता तसाच होता मुद्दाम आठवांना सांभाळले कितीदा जाई होऊन वाघ फिरणे होते तसे नफ्याचे ( गाढव मनात त्याच्या ओशाळले कितीदा)

वाचने 2116 वाचनखूण प्रतिक्रिया 3

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 20:05
पाने झडून गेली,पक्षी उडून गेले मातीस घट्ट धरूनी मी ठेवले कितीदा क्या बात है, केवळ अप्रतीम...! एक अत्यंत दर्जेदार, संग्रही ठेवावे असे काव्य, असंच मी म्हणेन... "सोनाली, जियो....!" अशी मनापासून दाद देतो... आपला, (अंतर्मूख!) तात्या.

उत्खनक Tue, 12/13/2022 - 15:17
आभास फक्त होता, मी थांबले कितीदा माझ्याच सावलीने धास्तावले कितीदा जबर. आवडेश.