आयुष्य
लेखनप्रकार
आयुष्य म्हणजे काय असतं
देवाने जन्माला घातलं म्हणून काय जगायचं असतं....?
खरं तर.... आयुष्यातलं बालपण मिरवायचं असतं
माणूसपण जोपासायचं असतं
दुसर्यांना हसवत स्वतःही फुलायचं असतं
पहाटेच्या दवबिंदूत नहायचं असतं
प्राजक्ताच्या मोत्यांना टिपायचं असतं
रातराणीच्या झुळुकांनी मोहरायचं असतं
चंद्राच्या साक्षीनं बहरायचं असतं
निसर्गाच्या श्रीमंतीत वावरायचं असतं
स्वतःचं राजेपण स्वतःच घडवायचं असतं
मित्रमैत्रिणींना जोडायचं असतं
त्यांच्या सुखदु:खात हसायचं आणि रडायचं असतं
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
जयश्री अंबासकर
वाचने
7834
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
खरं तर....
क्या बात है..
छान कविता
वा..
बोधात्मक कविता
भैरवी
धन्यवाद !!
स॑ग्रहित करून ठेवणार
आयुष्य-
उत्तम
कविता आवडली.
आयुष्याच्या मैफलीत बेधुंद गायचं असतं
प्रत्येक गाण्यात वाहून जायचं असतं
अंतरीच्या रागांनी आयुष्य आलापायचं असतं
आणि एका दमदार भैरवीनं संपवायचं असतं.
सही !!!
द्विरूक्ती !
तहे दिल से शुक्रिया !!