आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता
लेखनविषय:
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं
इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं !
आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं
पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं !
आयुष्य डोलणार्या "वहिदा" सारखं होतं
क्षणात गिरकी घेण्याचं , बर्याचदां फिरकी घेण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं !
आयुष्य आता "नूतन" सारखं होतं
प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्या प्रयत्नांनी फसण्याचे
.....जेंव्हा आपलं वय " तेरा ते सोळा " असतं !
आयुष्य रसाळ , "शर्मिला" सारखं होतं
क्षण अन क्षण आवडण्याचं, कशाचीही भुरळ पडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " सतरा ते वीस " असतं !
आयुष्य आता "विद्या सिन्हा" सारखं होतं
प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं , कुठेतरी टिकयला धडपडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय " एकवीस ते पंचवीस " असतं !
यानंतरचं आयुष्य "मधुबाला" सारखं होतं
कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत
कधी हौसे मौजेनं मुरडण्याचं - तर कधी हौस गरजेपायी खुरडण्याचं
.....जेंव्हा आपलं वय "सहवीस ते कितीही" असतं !
वाचने
2264
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
छान कविता.
In reply to छान कविता. by स्वाती राजेश
कविता
साधी आणि छान