Skip to main content

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 28/03/2008 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्नांनी फसण्याचे .....जेंव्हा आपलं वय " तेरा ते सोळा " असतं ! आयुष्य रसाळ , "शर्मिला" सारखं होतं क्षण अन क्षण आवडण्याचं, कशाचीही भुरळ पडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " सतरा ते वीस " असतं ! आयुष्य आता "विद्या सिन्हा" सारखं होतं प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं , कुठेतरी टिकयला धडपडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " एकवीस ते पंचवीस " असतं ! यानंतरचं आयुष्य "मधुबाला" सारखं होतं कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत कधी हौसे मौजेनं मुरडण्याचं - तर कधी हौस गरजेपायी खुरडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "सहवीस ते कितीही" असतं !
लेखनविषय:

वाचने 2281
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया