मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आयुष्य....."सप्टेंबर २००५" ला लिहिलेली एक कविता

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आयुष्य तेंव्हा "सायरा बानो" सारखं असतं इकडून तिकडे हिंडण्याचं चकाट्या पिटत फिरण्याचं .....जेंव्हा आपलं वय "एक ते चार" असतं ! आयुष्य मग "गीता बाली" सारखं होतं पुष्कळ वेळ बागडण्याचं, मग पुस्तकांशी झगडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "पाच ते आठ" असतं ! आयुष्य डोलणार्‍या "वहिदा" सारखं होतं क्षणात गिरकी घेण्याचं , बर्‍याचदां फिरकी घेण्याचं .....जेंव्हा आपलं वय " नऊ ते बारा " असतं ! आयुष्य आता "नूतन" सारखं होतं प्रसंग कित्येक हसण्याचे, अपुर्‍या प्रयत्नांनी फसण्याचे .....जेंव्हा आपलं वय " तेरा ते सोळा " असतं ! आयुष्य रसाळ , "शर्मिला" सारखं होतं क्षण अन क्षण आवडण्याचं, कशाचीही भुरळ पडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " सतरा ते वीस " असतं ! आयुष्य आता "विद्या सिन्हा" सारखं होतं प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं , कुठेतरी टिकयला धडपडण्याचं .....जेंव्हा आपलं वय " एकवीस ते पंचवीस " असतं ! यानंतरचं आयुष्य "मधुबाला" सारखं होतं कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत कधी हौसे मौजेनं मुरडण्याचं - तर कधी हौस गरजेपायी खुरडण्याचं .....जेंव्हा आपलं वय "सहवीस ते कितीही" असतं !

वाचने 2264 वाचनखूण प्रतिक्रिया 3

स्वाती राजेश Sat, 03/29/2008 - 18:20
कविता छान आहे. पण सप्टेंबर २००५ ला लिहिली आहे, हे लिहिण्यात काय हेतु आहे ते कळाले नाही. बाकी कविता उत्तम.

In reply to by स्वाती राजेश

उदय सप्रे Mon, 03/31/2008 - 09:21
स्वाती राजेश, माझी आणखीन एक कविता याच नावाने आहे (जी सध्ध्या मिळत नाहिये!) त्यामुळे संग्रही मी तशी नोंद केली होती.शिवाय कवितेवर तारीख - साढारण कालावधी लिहिण्याची जुनी सवय पण आहे. जमल्यास "शिवरायांचे "८" वा वे रूप" हा मि.पा. वरील लेख पण वाचावा ही विनंती. उदय सप्रे

वरदा Sun, 03/30/2008 - 00:27
आहे....कधी अवखळ , कधी शांत , कधी "काय होईल?" याची भ्रांत ह्म्म्म्म.......ते खरं म्हणा....