बुद्ध,,,,,
काय दिले तू मानवजातीला?,,,,
शांती,,,
ती तर केव्हाच कैद झाली आहे
रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,,
संयम,,,
नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे
अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,,
हास्य,,,
पहा बर तुला सापडते का?
भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,,
सत्य,,,
असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात
सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,,
ज्ञान,,,
मदमस्त सत्ता आणि मोह,लोभित मक्तेदार
उपभोगत आहे ज्ञानाला बनवून आपली दासी,,,
अहिंसा,,,
खोट्या अहंमसाठी एकमेकांच्या नरडीचे घोट घेणे
हेच वर्तमानात हिंसेचे तत्वज्ञान होऊ