Skip to main content

कविता

हवा एक पाऊस..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी मंगळवार, 14/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हवा एक पाऊस मला गाफिल पाहुन अवचित बरसणारा... लटक्या रागावर माझ्या लडिवाळ हसणारा... हवा एक पाऊस ओळखीच्या खुणांवर उगीचच रेंगाळणारा... ओल्या वाटांवरल्या पाउलखुणा जपणारा... हवा एक पाऊस बेधुंद उत्कट सरींनी मला वेढणारा... घेऊनी मिठीत मजला अलवार शहारणारा... हवा एक पाऊस दूर माळरानात रातराणीस छेडणारा... मालवून चांदण्या सार्‍या रात्र नशावणारा........... हवा एक पाऊस फक्त माझ्या अन माझ्यासाठीचा झरणारा पसरलेल्या आभाळातुन ओंजळीत विसावणारा.........

वर्तुळ

लेखक शब्दवेडी यांनी मंगळवार, 14/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मी मि.पा. वर नवीन आहे. हा माझा कवितेचा पहिलाच प्रयत्न … चू. भू. दे. घे. प्रतिसाद आणि गुण-दोष विवेचन अपेक्षित वर्तुळ वर्तुळावर्तुळाच्या जगण्यात झिंग नाही आयुष्य व्यापून टाकेल इतका कुठल्याच वर्तुळाचा परीघ नाही …. अपुरेपणाच्या विस्तृत्वाला कोणतीच रेषा छेदत नसते कितीही 'सुटावं' म्हटलं प्रत्येक वर्तुळाला त्रिज्या असते …. वर्तुळाच्या गोलाईचा कोणताच एक आकार नाही मोजमाप काढण्याचं 'अचूक' असं कोणतच एक सूत्र नाही …. गुरफटलेल्या आकृत्यांना खरंतर स्वत:ची नावंच नसतात आणि व्यासंच हरवलेल्या वर्तुळांना पत्यांना, गावंच नसतात …. - शब्दवेडी

राधाबाई

लेखक प्रशु यांनी सोमवार, 13/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गोकुळ त्यागीले, वृंदावनहि, मथुरेत ही नाही ! नेल्या माता, दादा ताता, भद्रा आणि गाई ! अठरा पद्म गोपहि नेले; तुज पुसले देखील नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! कालिंदिच्या त्या तटा वर होता जेव्हा रावा ! पुनवेच्या त्या रासेला वटातळी वाजवीत होता पावा ! गोपिकांच्या गराड्यातं; तव विस्मरण झाले पाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! साता समुद्रा पार वसे ती सोन्याची द्वारिका ! वसतो तेथे कृष्ण मुरारी सवे आठ बायका ! आता कैचा, परत यायचा, फिरकायाचा नाही !! राधाबाई, तुझं काही खरं नाही!! गावहि उठला, आप्तही फिरले, गाळी मारे सास ! अनयानेहि दिली त्यागुनी उरली सुरली आस ! मरणासन्न ह
काव्यरस

वादळ

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ उठत.. एक मनात... एक दर्यात पड-झड़ होतेच न दोघात मोठी कुठली? सांग माझ्या कानात मनात... भावना उध्वस्त; दर्यात जीव अस्वस्थ! मनातल्या नात्यात द-या बनतात; सागरातल्या द-या भरून निघतात! दर्याच्या वादळात आधार मनाचा मनाच्या वादळात आधार कोणाचा? सारंगाची नजर किनारा शोधते उध्वस्त मन मात्र कायमचे हरते

प्रतिबिंब

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 12/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मेघ सावळा का नभी एकटा? तो वाट प्रियेची बघ, पाहतसे विरह वेळा ही असह्य झाली प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे सखी प्रिया तव दूर वसुधा आतुर मिलना मनी कळवळे सरतील कधी, क्षण विरहाचे? नभास वेड्या कधी ना कळे... शल्य त्याचे कुणा ना कळले हलकेच कसे नभ ओघळले? विरह वेदना जळी बुडाली.. प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले... बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी विशाल... अ फ़ोटो आंतरजालावरून साभार
काव्यरस

पायाखालची वीट दे....!

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 10/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

प्राजक्त

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 09/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे, गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे. एव्हाना जगलो एकटाच, सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे. आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात, घरास थोड़े घरपण मिळू दे. बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची, आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे. -जिप्सी

भंगलेले अभंग शशिचे

लेखक शशांक कोणो यांनी गुरुवार, 09/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुकी रंगे पोस्टच्या संगे लाईक कमेंट रेलचेल !! फोटोंच्या डोळा लोक होती गोळा अन मुक्ताफळा उधळती !! एकटेच यावे गुज पोस्टावे लाईक ठोकावे इतरांना !! परी काय सांगू नशीब हे पंगू कोणी भिंतीवर फिरकेना !! पाहुनीया वाट लागलीय वाट अधिक काहीही बोलवेना !! शशि म्हणे देवा ऐसा मित्र ठेवा आम्हांला सदा अप्राप्य - जय जय फेसबुक समर्थ

मिपासार

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….