Skip to main content

कविता

शुष्क

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 26/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य ना सुखांचे अंधार दाट होता बुद्धयाच वेदनांशी श्रृंगार थाटलेला झाली उजाड़ स्वप्ने, सत्यास दंभ होता चातुर्य प्राक्तनाचे कळलेच ना कदापी रक्तास चटक ओल्या लागून आज गेली जखमाच त्या, तयांशी, संसार थाटलेला अस्तित्व जाणिवांचे उधळून रात्र गेली त्यां टाळणे मलाही जमलेच ना कदापी होता तसाच आहे ओसाड माळ तिथला पान्हा वसुंधरेचा वक्षात गोठलेला मी रान शुष्क होतो पाऊस स्तब्ध तिथला गोंजारणे फुलांना रुचलेच ना कदापी झाडांस कोरडेपण जेव्हा असह्य झाले तो कोंब पालवीचा बुंध्यात आटलेला तो बहर जून होता फसवेच गंध झाले ते श्वास पाळणेही पटलेच ना कदापी विशाल कुलकर्णी
काव्यरस

गोषवारा

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 25/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हा कशाला गोषवारा पाहिजे फक्त थोडासा इषारा पाहिजे माणसाला अन्न वस्त्रे खोपटे शासनाला शेतसारा पाहिजे श्वासही आहेत चोरासारखे जिंदगानीवर पहारा पाहिजे हात या राखेतही टाकेन मी पोळणारा पण निखारा पाहिजे जीव ओवाळून टाकावा असा जीव कोणी लावणारा पाहिजे घोषणांची केवढी बुजबुज इथे- देशव्यापी एक नारा पाहिजे माणके मोती हिरे सगळीकडे फक्त माती खोदणारा पाहिजे काजवे उसने किती आणायचे आपुला कोणी सितारा पाहिजे टाक तू कचरा पुरेसा अंगणी स्वच्छतेसाठी पसारा पाहिजे डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

शीर्षक सुचले नाही

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 25/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले अजून केस ओढतो कशास काव्य वाचले इथून चार चोरले तिथून चार ढापले करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले" छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?" तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता? पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी? -- स्वामी संकेतानंद आता मी पळतो..........

हिरवाई..!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 24/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
https://fbcdn-photos-g-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-0/11011683_874883005931320_1886834214894539045_n.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=e150fb00433e127ce5eb77b63cd14a3d&oe=56498752&__gda__=1448309304_9470a65a2ebf713595aaffabdcccfc60 पक्षी हिरवे झाडे हिरवी हिरवे सारे झाले हिरवाईने पाण्यालाहि हिरवे हिरवे केले! रंगा
काव्यरस

पुन्हा पाऊस

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 24/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाट झाकोळली, आज आभाळाची काया गूज धरितीशी करण्या, होई अनावर तो राया भारावला आसमंत सारा, स्पर्श होताच मखमली स्तब्ध होऊनी ऐकते, ती आर्जव अंतरातली का उठते वादळ? तिच्या आसपास उडे पाचोळा कुणी सांगा त्यांना, हा त्रुप्तिचा अबोल सोहळा किती काळाचा विरह बाई, कसा सोसते शांत तोही विसरून भान, मग जाई तिच्या कुशीत बोले काही क्षणांचा सहवास ठेव माझी आठवण कसा सोडवते ग हात, डोळ्यात पाऊस साठवून?

समाधी

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 23/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप चोरटा एक कटाक्ष मध्यान्ही काळोखात पेंगले निवांत नेत्र मायाळू मंद सूरात गारढोण श्वासस्पर्श युगे धरला अबोला अजागळ अजस्र देह आतून अथांग ओला स्पर्शून गंगामाई घाबरे परत फिरे दुधाळ स्तनामधुनि पाझरती नीलहिरे चुनखड़ी गा त्याचा अनंत उच्छवास सालीना मिळतो आहे लोबानी मुखवास ------------- . nrsimha >> ओली शेवाळलेली दगडी जन्मठेप कदंबकाठावर कोण उसळून घेई झेप >> पहिल्या दोन ओळी समाधीचे वर्णन करताहेत

.....ही मनाची अंतरे...

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 22/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कोस अथवा मैल ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही मनाची अंतरे... होतसे संवाद अपुला ते दिवस गेले कुठे स्पर्शातुनी वितळायची ही मनाची अंतरे... जन्म घेती नवनवे वाद का शब्दातुनी मौनातुनी वाढायची ही मनाची अंतरे .... एकमेकाना इथे का आज सारे टाळती सांगा कशी मिटवायची ही मनाची अंतरे.... लांब आहे जायचे, अन प्रवासही एकटा उमजून हे सांधायची ही मनाची अंतरे....
काव्यरस

पाऊस

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 22/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चांगलाच पाऊस सुरु झालाय, त्याच्याकडे पाहताना काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी आठवल्या.

सरिंवर सरी आल्या ग...

लेखक मितान यांनी बुधवार, 22/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजात माझी जागा वर्ग कोणताही असला तरी खिडकीच्या बाजूची असायची. बाहेर गुलमोहराची झाडे, त्यावरची कावळ्याची घरटी, खारोट्यांचा दंगा वर्गात व्याख्यान म्हणून चाललेल्या काही गोष्टी सुसह्य करायच्या. अपवाद म्हणावा अशी एक घटना घडली नि मनावर कायमचा ठसा उमटवून गेली. समीक्षेचा तास सुरू होता. साठोत्तरी वास्तववादी साहित्याच्या चिंध्या करणं चालू होतं. सर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक असल्याने आवेशाने एकेक कळीचा मुद्दा उकलवून दाखवत होते. आम्ही त्यांच्या व्यासंगापुढे लीन होऊन आ वासून ऐकत होतो. तेवढ्यात बाहेर झिमझिम पावसाला सुरुवात झाली.

पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले..

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 16/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पहा कशी लोळते सुखाने उधारवारी अजून खस्ताच खात आहे दुकानदारी पदोपदी देव ठाण मांडून बैसलेले निघून गेली कुठेतरी माणसे बिचारी खरेच हे शिस्तप्रीय आहेत लोक सारे उभे पहा दूर दूर रांगेतले भिकारी शहर तुझे प्रेक्षणीय आहेच,वाद नाही उभारल्या छान तू नव्या देखण्या गटारी बरेचसे कर्ज आज माझे फिटूनजाते मिळून जाती मला कधी जर तुझी उधारी डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस