चंद्र नको , तारे नको

लेखनविषय:
काव्यरस
चंद्र नको , तारे नको , नको खोटी भेट शब्द हवे , शब्दांसारखे , ओठांमधले थेट भारी नको , साधी नको , नको पुरी गोड भाषा हवी , प्रेमाची , त्याला प्रेमाचीच जोड आज नको , उद्या नको , नको काही क्षणांची साथ हवी , जन्मासाठी , उरल्या साऱ्या जन्मांची हसू नको , रुसू नको , नको आशा सुखाच्या बस हात हवा , हातामध्ये , तुफानी त्या दुःखाच्या अश्रू नको , दुःख नको , नको भाव ते रोशाचे एक हवे बस , रोज मला , दर्शन तुझ्या हास्याचे सुख नको , ऐवज नको , नको आस कुणा गंधाची छंद हवा बस , तुझाच जीवा , ओढ असो या छंदाची - अभिषेक पांचाळ

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

काव्यरस
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव

कवितेवरची कविता

लेखनविषय:
काव्यरस
काही कविता सुचलेल्या, काही चक्क पाडलेल्या, काही कविता छोट्या, तर काही उगीच वाढलेल्या... काही कविता भिजवणा-या आषाढातल्या धारांसारख्या, काही लागतात जीवाला, वळवातल्या गारांसारख्या.. काही असतात सरळ सोप्प्या होतात त्यांची गाणी, हाती येत नाहीत काही; अळवावरचं पाणी.. काही असतात साध्यासुध्या स्पष्ट असतो अर्थ, तर काही "ग्रेस"फुल्ल नादी लागणं व्यर्थ... काही असतात लाजाळू त्यांची बनते वही, काही इतक्या उतावीळ 'लाईकू'न घ्यायची घाई.. कशीही का असेना कविता असते सई, एकदा हात धरला की साथ सोडत नाही..

पागोळ्या

लेखनविषय:
काव्यरस
मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं मला बी पान्यात खिळू द्या की अंगात वारं भिन्नू द्या की रं मला बी पावसांत भिंजू द्या की ——- (चाल क्र. १) गच् झाकून टोपलं भाकार पिठलं शेताकडं चालूया लप् लप् लुगाड टाचून धोतार खोचून लावनी करतिया लग् बग् इरल्याखाली गानं घुमूं द्या SS इरल्याखाली गानं घुमू द्या की रं, मला बी कामावर यिऊं द्या की ——- (चालीत बदल – चाल क्र.

विमान

लेखनविषय:
काव्यरस
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सु

बाळकडू

लेखनविषय:
आज पहाटेच कोसळला एक जुनाट निर्मनुष्य वाडा अन त्याला साथ देणारा चिमणीपाखरांचा खोपा नजर आपसूक शोध घेऊ लागली हरवलेल्या अस्तित्वाचा पण तुटक्या घराच्या काही काटक्याच फक्त उडत होत्या स्मशानराखेसारख्या. बुल्डोजरच्या कोलाहलात हरवलेले उमलत्या चोचींतले कोवळे स्वर ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली चिवचिवणारी अखेरची धडपड मनात चर्र झालं पण… शहाण्या माणसाकडून तिला एवढंतरी बाळकडू मिळालं पिलांना घेऊन चिमणी उडाल्याचं मला मागाहून कळालं.

मन

लेखनविषय:
का कुणास ठाऊक उगाच मन उदास होत आतल्या आत कुढत असतं. अपेक्षांचं ओझ उगाच खांदयावर पेलत असतं , पूर्ण झाल्यातर आनंद नाही तर रागराग करत बसतं. मनाचा खेळ सारा , घटकेत भविष्यात तर, घटकेत भूतकाळात तरंगळत असतो. वेध घेता भविष्याचा भूतकाळ पायाशी घुटमळत असतो , पाऊल टाकता पुढच चर्र्कन भूतकाळ झोंबून जातो. असचं जगतो प्रत्येकजण गटांगळ्या खात, पण वर्तमानाचा कुणाला पत्ताच नसतो. कर्णी सगळी मनाची, पण दोष मात्र चेहऱ्याला क्षणांत हसरा तर क्षणांत हिरमुसलेला. काय हवं असत या मनाला? एकदा विचारावं त्यांनी त्याच्याच मनाला मग कळेल घालमेल चेहऱ्याची. आकाशात ढग दाटावे तसे विचार येतात भरून , कधी गर्जना तर कधी सर येते धा

राउळी या मनाच्या

लेखनविषय:
ब्लॉग दुवा : http://www.apurvaoka.com/2017/03/poem-moon-sky-stars-memories-marathi.html a राऊळी या मनाच्या वृत्तः भुजंगप्रयात जसा चंद्र हा या महाली नभाच्या तशी ती वसे राऊळी या मनाच्या तिला काढिता घोर अंधार दाटे स्मृती राहती या रुपे चांदण्यांच्या तिला वाटले तोडुनी बंध जावे न मी आड आलो तिच्या निर्णयाच्या तशी मी मना लाविली शिस्त आहे करू लागले योजना ते उद्याच्या न ठेवीन विश्वास आता त्वरेने न मोड

अर्धा घाव

लेखनविषय:
काव्यरस
गडद काळ्या अंधाराला फुटे वाचा अर्धा घाव काळजात राहिला कुणाचा रिमझिम अशी डोऴ्यांत लागली नाचू गाभार्यात आठवणींची भेट पुन्हा वेचू पिऊनी धरणी रात्र निजली तरी कशी दिशांना जाग आली थकले सारे दीप व्यथांचे जळूनी गेले पथ कुणाचे

कातरवेळी

लेखनविषय:
काव्यरस
कातरवेऴी दिसे तुझा गाव जागला पुन्हा सांज केशरी भाव डोंगराआड मालवून गेला सूर्य हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य नजर तुडवीत काळोख फुटला अवकाशी लाल शुक्रतारा पेटला भय असे गात्रातूनी उठले अवेऴी दैवाने पाश जखडले
Subscribe to कविता