Skip to main content

कविता

आज मला समजलं

लेखक अभिषेक पांचाळ यांनी सोमवार, 27/02/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
आई , ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आठवणीच्या डोहामध्ये , मन पुरं भिजलं तहान भूक झोप सारं , क्षणात परकं होतं अनोळखी ते मोठं घर , गिळून मला खातं मनात माझ्या उत्तरांचं , काहुर एक माजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं गर्दी असते बाजूला , पण हाकेला तो ओ नसतो दूर जाऊन उमगलं , एकटेपणा काय असतो दूर जाऊन सहवासाच्या , किंमतीचं ते बीज रुजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं आवाजाची किमया न्यारी , ओढीची ती तहान सारी शब्द ऐकता तुझे ते सारे , होते जणू जादू प्यारी आवाजातही ओढ असते , हे तुझ्याशी बोलून समजलं आई, ओढ म्हणजे काय असत , ते आज मला समजलं - अभिषेक पांचाळ , पुणे
काव्यरस

:( ?

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी सोमवार, 27/02/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रूपाने मिळाला, अस्तित्व घडवणारा एक वटवृक्ष. माझ्या पावलांना प्रकाश पुरवणारी तुझी सावली, पानापानांना जीवनरसाने ओथंबून टाकणारी मुळंही तुझीच. माझी सगळी शस्त्र इथेच परजलेली, संकटसमयी तुझ्याच ढोलीत लपवलेली. हरवलो जरी कधी तरी, स्वतःला शोधायला आलो, तुझ्याच गार सावलीत सापडत गेलो स्वतःला, दरवेळी नव्याने. पण आपल्या छोट्याशा विश्वाचा आधार असलेली तुझी मु़ळं, खोलवर जाऊ लागलीत, अनोळखी विश्वाच्या दिशेनं. माझ्यावरचा ऊनपाऊस अलगद झेलणाऱ्या तुझ्या फांद्या, आधार शोधू लागल्यात अनंताचा. जाळी होत चाललेल्या तुझ्या पानांमधुन, अंधार झिरपू लागलाय अताशा. मुक्त होत चाललीस तू, कणाकणाने, क्षणाक्षणाने. पण... तु

तुझ्या ऊन्हाचं कौतुक..

लेखक प्राची अश्विनी यांनी रविवार, 26/02/2017 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ऊन्हाचं कौतुक किती करावं करावं माप पदरी सुखाचं किती भरावं भरावं बघ तुळशीला आल्या मखमालीच्या मंजिर्या चिऊताईच्या दातांनी किती खुडावं खुडावं खिडकीच्या गजावर झुले डांगराचा वेल बोटभर आधारानं वर चढावं चढावं नंदी बसलेला दारी गळी लेणं घुंगराचं येताजाता भक्तीभावे तिथं नमावं नमावं झुल्यावर लेकरांची किलबिल चारीठाव सांज सरता सयेने पाय वळावं वळावं पुण्य कुठल्या जन्माचं आज फळुनिया आलं भरलेल्या गोकुळात दिस सरावं सरावं
काव्यरस

ट्रिंग ट्रिंग !!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी शुक्रवार, 24/02/2017 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

वेदना..

लेखक राघव यांनी गुरुवार, 23/02/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते.. मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते! जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे.. विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे! कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते.. फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते! आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते! असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे! राघव

पाऊस असा रडतो

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 22/02/2017 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
पापण्यांच्या दाराशी हाक येती जीवास जखमांचे रंग फुटती घन वेदनांतूनी पाऊस असा रडतो दूर दूर वारा टाहो फोडतो उरात क्षितिजाच्या वैषम्य पेटले वैरी वादळ डोळ्यांत आले आगीत बुडाला प्राण वेडापिसा राऊऴातला नाद अस्त झाला कसा

कदाचित (भयगुढ कविता)

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 22/02/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित ही फक्त हवा असेल जी चाल करून येतीये विव्हळणाऱ्या जीर्ण फांद्यांना खिडक्यांवर फटकारतीये कदाचित हा फक्त पाऊस असेल जो ढगांना प्रसवतोय दाराछतातून टपटपून अंगावर बर्फशहारे आणतोय कदाचित ह्या फक्त सावल्या असतील ज्या श्वापदांसारख्या दिसताहेत सराईत शिकाऱ्यासारख्या मला चारीबाजूंनी घेरताहेत कदाचित हा फक्त कावळा असेल जो आत्ताच खिडकीवर धडकलाय रक्ताळलेली चोच आदळून काचांना तडे देत सुटलाय कदाचित हा फक्त भास असेल कुणीतरी जोरात किंचाळल्याचा आपोआप दिवे विझल्याचा अन मानेवरच्या उष्णगार श्वासांचा कदाचित भासच असेल हा कदाचित स्वप्न असेल कदाचित... ती आली असेल -------------------

एवढं करंच...

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 19/02/2017 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
अविचार करण्याआधी एक काम कर कृत्रिम जगाच्या चौकटीतून एकदातरी बाहेर पड दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून पाखरासारखं उडून बघ खळाळणाऱ्या नदीमध्ये मासोळीसारखं पोहून बघ फेसाळ धबधब्याखाली निमुट उभा रहा पावलं थकेपर्यंत बेलगाम धावून पहा रस्ता हरवलेल्या पावलांना खोलवर जंगलात ने गळा फाटेपर्यंत ओरड आसवं संपेपर्यंत रडून घे संध्याकाळ झाली की डोंगरमाथ्यावर जा सावल्या लांबताना अन सुर्य हरवतांना पहा शक्य झाल्यास रात्रीही थांब तिथं जंगल अंगावर येईल, रातकिड्यांचे आवाज ओरबाडतील हरवलेल्या दाही दिशा, गळा दाबायला सरसावतील पण लवकरच जिवंतपणा घेऊन पहाटकिरणं उगवतील अंधाररस्ता उजळेल पक्षी आशेचं गीत गा

नसतेस घरी तू जेव्हा

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 18/02/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
संदीपच्या या कवितेविषयी लिहीण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही, फक्त एक उत्कट अनुभव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ही कविता कार्यक्रमात एकदा तरी सलीलऐवजी संदीपनं गावी, अशी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे, कारण तो ही कविता जगलायं. आयुष्यातली सगळी नाती मान्यतेची आहेत कारण विवाह या बेसिक मान्यतेतून ती निर्माण होतात. पत्नी ही व्यक्ती नाही, ते तुम्ही घडवलेलं एक नातं आहे. जो हे नातं अत्यंत उत्कटतेनं आणि हृदयाची बाजी लावून घडवतो, त्याला ही कविता कळू शकेल.

मंद मंद पहाट

लेखक चांदणशेला यांनी शुक्रवार, 17/02/2017 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंद मंद पहाट वेडी दवांत नाचती अजूनही थोडी उतरता माथ्यावरूनी रात्र खुळी उमलली गगन वेलींतूनी सूर्य कळी निळ्या निळ्या अभ्रांच्या छतावरूनी गेले कोमल किरणांचे कर फिरूनी फडफड पाखरांची उभ्या झाडांवरती उषाराणी अशी तेथूनी फिरती ऐसे लावण्य झाकाळती धुके असीम धरेचे रम्य गूढ बोलके
काव्यरस