Skip to main content

कविता

संतापाचा रीटेक

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 17/02/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
अडखळत अडखळत चालताना फार पारा चढतो असं वाटतं जो तो येऊन माझ्याच पुढ्यात अडतो ट्रॅफिकमधे गाडी स्कूटर, गर्दीमधे माणसं हॉर्न वाजवून, ओरडून बिरडून बदलत नाही फारसं वाटतं एकेकाला कुदवावं, किंवा सरळ साला उडवावं काय म्हणजे मला चायला ज्याने त्याने अडवावं? पण कुदवताही येत नाही, उडवताही येत नाही मनाला जे हवं ते घडवताही येत नाही आता आम्ही सलमान खान नाही, की कुणी लोकल डॉन नाही आणि बघताच जगाने बाजू व्हावं, अशी आमची शान नाही बरं उडत बिडत जाऊ शकू तर आम्ही ब्याट म्यान नाही मग आहेच आपली चरफड, शिव्या-शाप नि खळखळ यंत्रवत गर्दीमधे आम्हीच होतोय अडगळ मग कुणीतरी म्हणून जातं, इथे असंच असतं जखमेवरती मीठ टाकावं, तसं हे व
काव्यरस

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

लेखक बटाटा चिवडा यांनी बुधवार, 15/02/2017 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

प्रेम

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 14/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वा
काव्यरस

१०० नंबरी प्रेम

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 14/02/2017 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------- बायकांच्या बडबडीने जेव्हा इच अँड एव्हरीजण कंटाळला 'रोज शंभरच शब्द बोलायचे' सरकारने नियम काढला मला फारसा त्रास नव्हता नेहमीच मी कमी बोलायचो गप्पा,भांडण,उपदेश मोजक्या शब्दांत मांडायचो नियम लागू व्हायच्या थोडं आधी मला भलताच नाद लागला एका गोग्गोड बडबड्या पोरीवर नकळंत जीव जडला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तिला प्रपोज करायचं ठरवलं शंभर शब्द काय बोलायचे गणित मांडायला घेतलं "हॅपी व्हॅलेंटाईन डे" ऐवजी "हॅपी व्हॅलेंटाईन" पण चालून जाईल "माझं तुझ्यावर प्रेम आहे" पेक्षा "आय लव्ह यू" त कमी शब्दहानी होईल "तुझं हसणं, रुसणं, सत्तत बडबडणं मला आव

तूच तू...

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/02/2017 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
तोच चांद नभी अन् रात आज तीच ती सागराच्या लाटेवरची गाज देखील तीच ती तोच वारा... तीच नशा तेच धूसर क्षितिजही..... त्याच त्या नभामधुनी चांद किरणे तीच ती.... मात्र आज नको मज हे आठव तुझी दाटते..... साय-ओल्या वाळूमधली पाऊल खुण बोलावते.... तू असशी जर इथे तर.... सर्वकाही हवेसे! तूच नाही जर इथे तर.... जीणे अर्थहीन... नकोसे!!!
काव्यरस

बोल नुपूरांचे

लेखक चांदणशेला यांनी बुधवार, 08/02/2017 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन समयी नित्य येई त्या लहरींतूनी मंजूळ ध्वनी तरंगे किनारी फुले सुगंधी अंतरंगी भावपिसारा पसरूनी रेशमी हिंदोळ्याच्या शुभ्र तटी मनोहर निर्झराची मुक्त वाणी फुलून आल्या दिशा दाही चोहीकडे हसे वसुंधरा कामिनी हिरव्या दलांत बोल नुपूरांचे निळ्या अंबरी चुकली धरणी
काव्यरस

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 08/02/2017 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप औलीया आहे याची साक्ष देणारी ही एक सुरेख कविता ! स्वच्छंद जगण्याची आदीम उर्मी प्रत्येकाच्या अंतरी आहे पण रोजच्या जगण्यात ती हरवून गेलीये.

तुझ्या अंतरीची (चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 06/02/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद

दु:ख अवघा धृवतारा मागते

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/02/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

!!...'मानवी भूकंप'...!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 05/02/2017 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत
काव्यरस