भाषण

लेखनविषय:
लेखनप्रकार
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) "मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.

जनरेशन गॅप आणि निळाई

CD प्लेयर मध्ये बिप्या बघताना अचानक light जाऊन CD आतमध्ये अडकण्याची जी भीती आहे.....त्याची जाणीव आजच्या generation ला नाही. वरचा मेसेज कायप्पा वर भिरभिरत आला आणि डोळ्यासमोर अनेक निळ्या पिवळ्या आठवणी रुंजी घालु लागल्या (त्या यथावकाश डोक्यात विसावल्या). त्यांना शब्दरुप देउन जोवर प्रसारित करत नाहित तोवर त्या तिथेच ठाण मांडुन बसणार याची खात्री पटल्याने लगोलग जिल्बी टंकायला घेतली. तरी टंचनिका हाताशी नसल्याने (आणी विषय इतका स्फोटक असताना ती हाताशी वगैरे नसणेच जास्त श्रेयस्कर असल्याने) अंमळ जास्त वेळ लागला टंकायला.

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

लेखनप्रकार
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा.

निलपक्षी

लेखनविषय:
लेखनप्रकार
सगळे रंग विरळ होत होत सर्वत्र शुभ्रतेची चादर समोर पसरत होती, वेडावाकडा मार्ग तुडवत पुढे पुढे जात राहिलो, अनंत अडथळे बाजूला सारत. मनात प्रश्न नाहित ना कुठले विचार. प्रत्येक जिवाला उपजतच ज्ञान होते की, श्वेतवाळवंटाच्या राज्यात कुठेतरी एक झरा आहे, ज्याचे अमृतमय पाणी अक्षय आनंद देतं, चिरंजीवीत्व देतं. हा शोध माझा नाही आहे. प्रत्येक जीव ते अमृत मिळवण्याचा अनंतकाळापासून प्रयत्न करत आहे, अगदी पहिला एकपेशीय जीव ते स्वतंत्र बुद्धी असलेला हा मानव! सर्वांनीच याचा शोध घेतला, घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून निष्पन्न काय झाले माहिती नाही, पण एका गुणसुत्रातून दुसऱ्या गुणसूत्रात ही लालसा जीवागणिक पसरत गेली.

हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ

लेखनप्रकार
हिंदी चित्रपट गीतांमध्ये दडलेला असाही अर्थ हिंदी चित्रपटगीतांमधल्या काही गाण्यांमध्ये सापडलेला हा अर्थ आहे. हा अर्थ काहीसा व्यक्तिसापेक्ष आहे. एकाला जो अर्थ दिसेल, तो दुस-याला दिसेलच असं नाही. पण त्या गाण्याची पार्श्वभूमी, त्याचे चित्रण, त्याचे चित्रपटातील संदर्भ व आपण कोणत्या काळात ते गाणं ऐकलं, हे थोडं बाजूला ठेवलं तर खूप वेगळा अर्थ सापडतो. काही गाण्यांमध्ये तर पूर्ण धर्माचं सार आहे; काही गाण्यांमध्ये आध्यात्मिक जीवनदृष्टी आहे तर काही गाणी ही जणू गुरू- शिष्य नात्याच्या विविध छटा दाखवतात तर काही अध्यात्मिक दृष्टीची प्रचिती देतात.

रश्दी अबाझा

लेखनविषय:
लेखनप्रकार
रश्दी अबाझाचा जन्म तेरेझा लुईगी, जी इटालियन होती आणि सैद अबाझा, जो जन्माने इजिप्तीयन होता या दांपत्याच्या पोटी ३ ऑगस्ट १९२६ ला झाला. रश्दी अबाझाचे कुटुंब खूप श्रीमंत होते आणि इजिप्तच्या राजकारणात मोठे स्थान होते. रश्दी च्या कुटुंबात बरेच लोक राजकारण, वकिली, पत्रकार, लेखक होते, पण त्याला शरीर सौष्ठव मध्ये रस होता. त्याचे अरबी सोबत इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, फ्रेंच या भाषांन्वर प्रभुत्व होते. १९४८ मध्ये रश्दी एका कॅसिनो मध्ये बिलियर्ड्स खेळत असताना त्याला कमाल बरकत नावाच्या दिग्दर्शकाने पाहिले, त्याला पाहून कमाल इतका प्रभावित झाला कि आपल्या चित्रपटात प्रमुख भमिका दिली.

पाऊस...

लेखनविषय:
काव्यरस
मला पाऊस आवडतो, मला पाऊस आवडत नाही... मी शांत आहे, संयमी आहे... पण तो अंत बघतो माझा... वाट बघायला लावतो... आला नाही तो की बिथरत जाते मी.. माझ्याही नकळत.. अवचित येतो मग तो.. कोसळतो... मी भानावर येईतो कोसळून झालेलं असतं त्याचं... निथळत राहतो मग तो, पागोळ्यांमधून.. आर्त बघतो... मी तुटून जाते... हरवते धुक्यात.. आणि तो पुन्हा बरसतो, चिंब भिजवतो, कुशीत घेतो अलगद.. मी विरघळत राहते.. संयमाचं बोट सुटलेलं...

चित्रपट परिक्षण : डंकर्क

लेखनविषय:
लेखनप्रकार
शक्यतो मी इंगजी चित्रपट कमी पाहातो. पण तोच जर ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक असेल तर मी जरुर पाहातो. असाच मागच्या आठवड्यात डंकर्क चित्रपट पाहाण्याचा योग आला आणि माझा वेळ आणि पैसा वसुल! हा चित्रपट दुसर्‍या महायुध्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे. जर्मनी च्या नाझी फौजानी फ्रान्सच्या समुद्र किनार्‍यावर ब्रिटिश आणि फ्रेन्च फौजांना जमीन , वायु आणि समुद्र या सर्व ठिकाणाहुन प्रचंड हल्ले करुन सळो की पळो करुन सोडले असताना हे मित्र देश कसे आक्रमणातुन वाचतात आणि हजारो सैनिकांचे जीव कसे वाचवले जातात याचे सुन्दर चित्रण या चित्रपटात आहे.

दक्षिणायन चित्रपटांचे !

लेखनविषय:
लेखनप्रकार
युट्युबवर शोधतांना उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट जास्त सापडत नाहित. जे उत्तम आशय असलेले आहेत ते उत्तम दर्जाचे चित्रिकरण असलेले असतीलच असे नाही. बहुसंख्य मराठी, हिंदी चित्रपट एकतर नवीन आले असताना चित्रपटगृहात बघीतलेले असतात किंवा थोड्याच दिवसात युट्युब, टोरंटस वर मिळतात. हॉलीवुड चित्रपट देखील बरेच पाहायला मिळतात. पण ते कधी कोणत्या प्रकारचे धक्के देतील ते सांगता येत नाही म्हणून घरात बघण्याला मर्यादा येतात. या सगळ्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत दक्षिणेचे चित्रपट पहायला सुरुवात केली आणि मग ते आवडू लागले. विशाखापटटणमला कंपनीच्या कामानिमित्त महिनाभर रहावे लागले होते.

एका मास्तराचे मिपामालकास पत्र. ;)

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मिपामालक. सगळीच माणसं संस्थळावर नीट नसतात, आणि सगळीच तितकी सरळ. हे शिकेलच ना 'तो' मात्र त्याला एकदा सांगा. संस्थळावर प्रत्येक चांगल्या सदस्यांबरोबर एक 'गर्दीही' असते. आपला 'हिशेब टीशेब' ठेवणारेही असतात. आपल्या 'सोसायटीत' आजूबाजूला असतात तसे 'रंगेल' माणसंही असतात. संस्थळासाठी आयुष्य समर्पित करणारे सदस्य असतात, काही काड्या टाकणारेही असतात, तसे सदस्यांना जपणारे ....! मला माहीती आहे. संस्थळावर सगळ्याच गोष्टी नाही बोलता येत आणि सांगताही येत तुम्हाला.... तरीही, जमलं तर एकदा व्य.नि. मनीतून त्याच्याशी बोला आणि त्याला सांगा... सदस्य जपावा लागतो, सांभाळावा लागतो.
Subscribe to कला