मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्म

युगांतर आरंभ अंताचा भाग १४

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ऱथ महाली पोचला. भीष्म व्यथित मनाने आपल्या कक्षात जाऊन बसले. 'गुरुंनी केलेले शाब्दिक आघात, त्यांचा अपूर्ण राहिलेला न्याय, आपल्यामुळे दुखावलेली, उधवस्त झालेली अंबा..... ! हस्तिनापूरा, वचनबद्ध नसतो, तर गुरुंवर हत्यार चालवण्याचे महापाप करण्याआधीच इच्छामृत्यू घेतला असता मी!' विचित्रवीर्य तोल सांभाळत भीष्मांच्या कक्षाबाहेर आला, "भ्राता भीष्म...." त्याच्या हाकेने विचारांतून बाहेर पडत भीष्मांनी मागे वळून बघितले. उठून त्याला धरत आसनावर बसायला भीष्मांनी मदत केली,"युवराज, आपण का आलात? मला बोलावले असते....

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ११

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काशीचा राजमहाल सुवासिक फुलांनी सजला होता. दास दासी येणाऱ्या राजांचे गुलाब पाणी, अत्तरे शिंपडत स्वागत करत होते. स्वयंवरात जमलेल्या राजांनी आसन ग्रहण केले. काशीनरेशने सर्व स्वयंवरात आलेल्या राजांना अभिवादन करून स्थानबद्ध झाले. लाल रंगाच्या पायघड्यांवरून डोक्यावर माळलेल्या सुवर्ण हिरेजडीत शिरोमणी ते पायातल्या बोटात घातलेल्या जोडव्यांचा भार पेलत अंबा, अंबिका, अंबालिका तिथे पुष्पवर्षावात तिथे हजर झाल्या. स्वयंवर सुरु करण्याची घोषणा देत दासांनी तीन सजवलेले पुष्पहार तिन्ही राजकन्यांसमोर धरले. भीष्माचार्यांनी महालात प्रवेश केला आणि थेट काशीनरेश पुढे जाऊन उभे राहिले.

युगांतर आरंभ अंताचा भाग १०

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"बोलावलेत राजमाता?" भीष्म कक्षात प्रवेश करून हात जोडून उभा राहिला. "हो भीष्म!" "काय आज्ञा आहे?" "उद्याच्या दिवशी काशीनगरीला एक स्वयंवर योजला आहे काशीनरेश नी. त्यांच्या तीन राजकन्यांचा. तु त्यात सहभागी हो. अंबा, अंबिका आणि अंबालिका मला पुत्रवधू म्हणून हव्या आहेत." "महाराणी सत्यवती?" "काळजी नसावी. तुझी प्रतिज्ञा मी तुला मोडायला सांगणार नाही." "मग राजमाता, ही स्वयंवरास जाण्याची आज्ञा ?" " विचित्रवीर्यसाठी, भीष्म!" "पण राजमाता, नियमाप्रमाणे, स्वयंवर विचित्रवीर्यने स्वतः जिंकायला हवे.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ८ व ९

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
देवव्रत.... त्याने हस्तगत केलेल्या शस्त्रांपुढे एकही राजा शस्त्र उचलू धजत नव्हता. त्याची किर्ती सर्वत्र पसरली. शंतनूची राजगादी सांभाळणारा एक उत्तम राजा म्हणून देवव्रत सोडून बाकी कोणी नव्हते. धर्म, न्याय, युद्धकला..... सर्वोत्तम होता देवव्रत! राज्याबद्दल त्याला वाटणारी आपुलकी, जिव्हाळा! राजाला शोभेल असेच त्याचे वर्तन होते. त्याच्या कर्तव्यदक्षपणा बद्दल शंतनूला दाट विश्वास होता. शंतनू आता निश्चिंत झाला होता. वनविहार करत अनेकदा नदी काठी जाऊन बसायचा. प्रवाहाच्या जलावर हात फिरवत जुन्या आठवणी ताज्या करण्यात त्याला रस वाटू लागला. असेच एका दिवशी शंतनू नदीकाठी बसला होता.

युगांतर आरंभ अंताचा भाग ६ व ७

मृणालिनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली ! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

युगांतर- आरंभ अंताचा!

मृणालिनी ·
अशी एकही कथा, पात्र, भावना, प्रसंग दुनियेत नाही जयांचा उल्लेख व्यासांनी महभारतात केलेला नाही. जगत गुरु म्हणून व्यासांना पुजले जाते. व्यासगुरुपोर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर सर्वांसाठी माझ्यादृष्टीने महाभारताची कथा! युगांतर- आरंभ अंताचा! महाभारत! ही कथा नक्की कोणाची? सत्यवतीच्या सिंहासन लालसेची ? की भीष्माचार्यांच्या महान प्रतिज्ञेची? शाप- उ:शापांची? की वरदानाची? धर्माच्या विजयाची? की अधर्माच्या पतनाची? ऱक्ताने माखलेल्या कुरुक्षेत्राची? की इंद्रप्रस्थाच्या अस्तित्वाची? ज्याने अगणित घावांतून रक्तधारांची वृष्टी.... भूमीवर होत असतानाही, पराक्रमांची पराकाष्ठा करत, रण गाजवलं त्याची?

अभंग...

bhagwatblog ·
लेखनविषय:
काव्यरस
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||

कुत्रत्वाचं नातं

इरामयी ·
लेखनविषय:
काही समस्या या धाग्यावर माझ्या एका प्रतिसादाला एक संतापयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली गेली आहे. प्रतिसाद लिहिणाऱ्यांचा (श्री. बाप्पू) राग मला समजू शकतो आणि त्यांचं मत चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही.

शूर दुचाकीस्वार श्रीमान अभिवंदनचे अरमान

अभ्या.. ·
लेखनप्रकार
पेर्णा आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन याच्या पराक्रमावर, आमचे परम मित्र आणि गुरु काकासाहेब खोपोलीकर यांनी लिहिलेले १४(बहुतेक, जास्तकमी झाल्यास जबाबदार नाही) ओळींचे खंडकाव्य! (हे लिहिण्यास काकासाहेबांना अडिच दिवस लागले. तस्मात् वाचकांनी एक दिवस तरी काढून संपूर्ण खंडकाव्य, प्रस्तावनेसह वाचावे व फोनबुकमधील कुठल्याही मोबाईल नंबरवर आपला अभिप्राय कळवावा ही विनंती!) खंडकाव्य: अभिवंदन, अभिवंदन! वीस जून २०१८ रोजी आपला शूर दुचाकीस्वार अभिवंदन सोलापूरकर, पुणे देशातून पिंपरी चिंचवडास परतला.

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

गामा पैलवान ·
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.