Skip to main content

धर्म

बोनेदी बारीर पूजो

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 10/10/2018 या दिवशी प्रकाशित केले.
“महालय आच्छेन. आजे चॊक्खू दानेर दिन !” (पितृपंधरवडा संपतोय आज, आज देवीच्या मूर्तींना डोळे रेखण्याचा - चक्षु-दानाचा दिवस आहे) माझे मित्र राधामोहन बाबू उत्साहात बोलले आणि मी मनातल्या मनात जुन्या कोलकाता शहराच्या अरुंद रस्त्यावरून कुमारटोली (कुंभारवाडा) भागात फेरी मारून आलो सुद्धा. कोलकात्याच्या दुर्गापूजेची महती आणि मोहिनीच तशी आहे. चला तर, तुम्हालाही माझ्यासोबत थोडे फिरवून आणतो. 'दुर्गापूजा' (बंगालीत फक्त 'पूजो') असा नुसता शब्द जरी ऐकला तरी समस्त बंगालीजनांचे डोळे लकाकतात आणि चेहऱ्यावर हमखास स्मिताक्षरे उमटतात.

सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास

लेखक कवितानागेश यांनी बुधवार, 10/10/2018 या दिवशी प्रकाशित केले.
सुखदु:ख मीमांसा - एक अनेकरंगी अभ्यास Emotions drive people and people drive performance, हे बोधवाक्य वाचून काय समजते? भावना मनुष्याला गती देतात आणि मनुष्य कृतीशीलतेला गती देतो. प्रत्येक कृतीमागचं कारण कुठलीतरी भावना हेच आहे. पण emotions, हा शब्द वाचून मात्र आधी कुणाच्याही डोळयासमोर उभे राहणारे चित्र आहे ते, अश्रूंनी भरलेले डोळे अन् व्याकुळ भाव! जास्तीत जास्त माणसांच्या मनात खोलवर रुजलेली अन् नकोशीही असलेली अशी हीच भावना आहे - दु:ख, सल, बोच, त्रास.... तीच भावना मूळापासून शोधून, उकलून, स्पष्ट करून, अभ्यासून तो गुंता सोडवताना केलेला एक सर्वांगीण अभ्यास, आपल्यासमोर पुस्तकरूपानी आलेला आहे.

गणपती बाप्पा मोरया,थोडे व्रत समजून घेऊ या!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 12/09/2018 या दिवशी प्रकाशित केले.
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.

तामीळनाडू आणि गूगल ट्रेंड

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 27/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
करुणानिधींच्या तब्ब्येती बद्दलची बातमी पहात होतो. त्यांच्या लोकप्रीयतेची सद्य स्थिती पहावी म्हणून गूगल ट्रेंड उघडले. तमीळनाडू मधील सध्याचे (गेल्या १२ महिन्यातले) गूगल ट्रेंड्स तपासले तर काही निकाल जरा अनपेक्षीत वाटले. * तामीळ भाषा आणि त्या खालोखाल तामीळ नाडू हे शब्द सर्वाधीक शोधले जातात हे ओघाने आले. * तामीळनाडूच्या नेते मंडळीत सध्या हयात मध्ये केवळ रजनीकांत ही रजनीकांत आहे. डिएमके चे करुणानिधी त्यांचे सुपूत्र स्टालीन ,ए आय ए डिएम के चे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, राहुल गांधी, पि.

सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.

वेगळ्या प्रतिमांचे मुस्लीम

लेखक माहितगार यांनी शनिवार, 21/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्‍या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी.

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: कर्ण एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 20/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: एपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच "माध्यमांतर" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे!!

२००० ? ८८ ? २१ वे शतक ? ईश्वरी समानता, धर्म आणि प्रवेशाची चर्चा !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 09/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
* ह्या धाग्यात राजकारण्याचे उल्लेख आले आहेत पण राजकारण हा ह्या धाग्याचा विषय नाही हे प्रतिसाद देताना लक्षात घ्यावे हि नम्र विनंती लक्षात घेऊन अनुषंगिका व्यतरीक्त राजकीय अवांतरे टाळावीत. *** नमनाला घडाभर, अस्मादिकांचा एक अनुभव *** एका आफ्रीकन देशातील एका आफ्रीकन कंपनीच्या ऑफीस मध्ये एक आफ्रीकन स्त्री, एक बिझनेस डील पूर्ण होतो. तोंडी आदेश निघतात, कागदपत्रांची पुर्तता करण्यात स्टाफ गर्क होतो, चहाची पण ऑर्डर होते. बिझनेस मिटींग मध्ये हाच मधला थोडासा वेळ बिझनेस शिवाय चर्चा - (सहसा अविवाद्य कारण बाकी मिटींगचा उद्देश औपचारीकच असतो) -होण्याची शक्यता असते, तसे इथेही झाले .

विज्ञान सनातन (अनादी) आहे, कि ईश्वर निर्मीत ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 01/07/2018 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रामुख्याने एकेश्वरवादी 'श्रद्धावंत' आणि आस्तीकांसाठीचा प्रश्न आहे. विज्ञान हा शब्द आधूनिक कालिन सायन्स याच अर्थाने वापरला आहे. श्रद्धावंतांसमोर विज्ञानाच्या बाबतीत हा प्रश्न या पुर्वी कुणी ऊपस्थीत केला आहे का, किंवा उहापोह केला आहे का माहित नाही. (ज्यांना धागालेख न वाचता शीर्षकावरुन सरळ चर्चा सहभाग घ्यायचा आहे त्यांनी तसे करण्यास हरकत नाही.) पण अशा धर्तीवरचे जरा वेगळे प्रश्न ग्रीक तत्वज्ञांनी ऊपस्थीत केले होते. त्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या विकासाच्या सुरवातीच्या काळात ईश्वरादेश (उदा बायबल) सनातन म्हणजे ईश्वरा प्रमाणेच अनादी आहेत की एकेश्वर निर्मीत असा प्रश्न उपस्थीत केला गेला.

अ का पेला - A cappella

लेखक राघवेंद्र यांनी शुक्रवार, 08/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.