Skip to main content

धर्म

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

वास बापूंचा

लेखक रानरेडा यांनी रविवार, 08/04/2018 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाआधी एक काळ असा आला कि मी आणि भाऊ दोघेही मुंबईबाहेर नोकरी करीत होतो आणि आई काहीशी एकटी झाली होती. त्याच वेळी बिल्डींग मध्ये अनेक बायका अनिरुद्ध बापू भक्त झाल्या होत्या आणि आई हि बरीच नास्तिक असली तरी त्यांच्या बरोबर जाऊ लागली. मग एकदा कधीतरी तिने हे एक खरेखुरे साधुपुरुष आहेत, किती चांगले बोलतात असे सांगितले. थोडे ऐकताच मी तिला सांगितले कि सर्च जण फ्रोड असतात, तू यांच्या नादी लागू नकोस.नंतर तिने भावाला सांगितले ( मी नसताना ) ; तर भाऊ तिला अशा चोरांच्या नादी लागू नकोस म्हणून ओरडला. मग तिची आणि भावाची वादावादी झाली. मग तिने मला सुनवले कि तुम्ही कसे आजीबात धार्मिक नाही ....

.... बाकी तुमचं चालू द्या।

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 19/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
काल एक मेसेज आला.... गुढीपाडवा साजरा करू नका... कलश म्हणजे राजाचं शिर... वगैरे वगैरे. काल मुद्दाम डेक्कनवर गेलो... आमच्या राजाला नमस्कार केला. आज गुढी उभारली... कडुनिंबाची पानं खाल्ली... श्रीखंड केलं.... बाकी तुमचं चालूद्या! काही लोकांनी दीपिका पदुकोणचं नाक - शिर उडवण्याची मागणी केली म्हणे. तिने भारतीय संस्कृतीचा अपमान... वगैरे वगैरे... चित्रपट बघितला नाही पण ती पोरगी दृष्ट लागण्याइतकी सुंदर दिसते. तिचे काही चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा बघतो... छान वाटतं....बाकी तुमचं चालूद्या! फेसबुकवर पोस्ट वाचली....मुसलमानांनी नेहेमीच हिंदूंना.... वगैरे वगैरे.

तहान..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
"हे राम शिव शंकरा..Sssss" होय मी धार्मिकच आहे. रोज निद्राधीन होताना मनाची कवाडं बंद करण्याआधी ही शब्दफुलं अंतरात्म्याला वहावीच लागतात मला. त्याशिवाय ह्या देव्हाऱ्यात रात्रीचा निरव येत देखील नाही. त्याचे कर्तव्य करायला. देहाची कुडी जन्माला आलो तेंव्हा अमुक एका धर्माचा ठसा घेऊन आली नव्हती.तो धर्मच नव्हे तिचा! हां., पण आधाराची गरज हा मात्र तिचा मूलभूत स्थायीभाव! ती तहान मात्र अत्यन्त नैसर्गिक,शाश्वत, अविनाशी!

गीतेतील विशिष्ट ७ श्लोक आणि त्यांचे परस्परसंबंध

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 या दिवशी प्रकाशित केले.
भगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांशी परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ - गीतेवरील विविध पुस्तकांवर आधारित प्रथम सगळे श्लोक पाहूया: भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ४६ || यावानर्थ उदपाने सर्वत: संप्लुतोदके || || तावान्सर्वेषु वेदेषु ब्राम्हणस्य विजानात: || भगवद्गीता: अध्याय २ श्लोक ५६ || दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः || || वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते || भगवद्गीता: अध्याय ७ श्लोक २१ || यो यो यां यां तनु भक्त: श्रद्धायार्चीतुमीछति || || तस्य तस्याचालाम श्रद्धां तामेव विदधम्यहम || भगवद्गीता: अध्याय ९ श्लोक २३

गीताई माऊली माझी...

लेखक विकास यांनी सोमवार, 22/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
​आचार्य विनोबा भाव्यांनी त्यांच्या आईला गीता ऐकण्याची इच्छा होती पण संस्कृत येत नव्हते म्हणुन, श्रीमद्भगवद्गीतेचे "गीताई"च्या रुपाने मराठीकरण केले. ते करताना, मूळ श्लोक आणि त्यांचे छंद वगैरे जसेच्या तसे ठेवण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला.

कबुलीजबाब ... एका ज्ञानियाचा! (भावानुवाद)

लेखक मूकवाचक यांनी शनिवार, 06/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याने आपल्या आंतरिक चिदानंद अस्तित्वाची असीम ब्रह्माशी असलेल्या एकतानतेची प्रचिती घेतली; अशा ज्ञानियासाठी पुनर्जन्म, कुठलेही स्थित्यंतर आणि बंधमुक्ती संभवत नाहीत. तो या सगळ्यांच्या पलीकडे असतो. तो आपल्या सर्वार्थाने परिपूर्ण अशा सच्चिदानंद मूळस्वरूपात अविचलपणे स्थित झालेला असतो. त्या पुढील वाटचालीत स्वतःचा देह आणि बाह्य जगताचा आभासी स्वरूपात येणारा प्रत्यय ज्ञानियाला पूर्णपणे नष्ट करता येत नसला तरी (आत्मस्वरूपापासून विचलीत होण्याइतके) हे मृगजळ त्याला कदापी चकवा देउ शकत नाही.

थोडेसे गीतेबद्दल ...

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे दोन लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे. चूकभूल द्यावी घ्यावी! त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल!! - निमिष सोनार * * * || लेख क्र १ || * * * कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध करण्याचे अर्जुनाने नाकारले तेव्हा त्याला समजावताना आणि विविध वैदिक उपदेश करतांना म्हणजेच "भगवदगीता" सांगताना एका क्षणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, "कर्म कर पण ते करतांना फलाची अपेक्षा ठेवू नको म्हणजे त्या फलाशी तू बांधला जाऊन तुला ते फळ भोगावे लागणार नाही!

देव,धर्मादी संकल्पना-- एंटरटेनमेंट विथ लाईफटाईम वॅलिडीटी.

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी मंगळवार, 12/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
देव आणि धर्म नावाची संकल्पना कशी अस्तित्वात आली आणि का याच्यावर बरेच मंथन झाले आहे.यावर बर्याच थेअरीज आहेत.पैकी उत्क्रांतीवादानुसार देव आणि धर्म यावर बर्याच लोकांचा विश्वास असतो याचं कारण माणुस उत्क्रांत होत असताना त्याला या गोष्टींचा नक्कीच फायदा झाला असणार.आदिमानवाच्या अविकसित बुद्धीला पडणारे प्रश्न त्याच्या क्षमते बाहेरचे असल्याने त्याने सतत असणार्या अनिश्चिततेवर ,त्यातून येणार्या भीतीवर मात करण्यासाठी काही मानसिक,बौद्धिक दरिद्री कल्पना विकसित केल्या त्यात देव आणि धर्म याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो.पण ही पण एक थेअरी आहे,याला सर्वानुमते आधार नाही. मग मनुष्याने मानसिक स्वास्थ देऊ शकणार्या पण