मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राजीव अनंत भिडे ·
लेखनविषय:
आमचे प्रिय मित्रवर्य, रसिकग्रणी तात्यासाहेब अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांच्या हातून रौशनी, साधना कोळीण, पाटणकर आजोबा यासारखी उत्तमोत्तम व्यक्तिचित्रं या पुढेही लिहिली जावोत हीच शुभेच्छा! आम्हाला ग्रिटींग कार्ड बनवंण्याची कला माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं चित्र इथे डकवून त्याला या रंगीत शुभेच्छा देत आहोत. ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू!

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

ऋषिकेश ·

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

गाण्यांशी निगडीत आठवणी

देवदत्त ·
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

छोटा डॉन ·
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?

काही "दारोळ्या"

छोटा डॉन ·
लेखनप्रकार
मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............." प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ मी दारू सॊडणार आहे दारू म्हणते़ तुझा संकल्प मीच ऊद्या मॊडणार आहे *************************************** दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत *************************************** माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रूसण्यावर जाऊ नका एकदा प्यायला बसलॊ की माझ्या असण्यावर जाऊ नका *************************************** मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा कुणीही पिताना दिसला॰॰॰ की आशेने पहाणारा *************************************** घराभॊवती कु

'तारे जमींन पर'!

वर्षा ·
लेखनविषय:
सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे. आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्‍यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्‍या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या!

महान इजिप्शियन संस्कृती

सागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महान इजिप्शियन संस्कृती सुमेरियन संस्कृती ही जगातली सर्वात पहिली संस्कृती मानली जाते. ह्या संस्कृतीने जगाला दिलेली अभूतपूर्व देणगी म्हणजे चक्र. चक्राचे उपयोग किती आहेत हे सांगण्याची गरजच नाही. आजकाल जगातील सर्व वाहने, यंत्रे वगैरे गोष्टी चक्रावरच चालतात. ही सुमेरियन संस्कृती युफ्रेटिस नदीच्या काठी उदयास आली. ज्याप्रमाणे सुमेरियन संस्कृतीचा आधार युफ्रेटिस नदी होती, त्याप्रमाणे इजिप्शियन संस्कृतीचा आधार नाइल नदी होती. यावरुन असे दिसून येते की जगातील बहुतेक प्राचीन संस्कृती नदीकाठी उदयास आल्या होत्या. आपली सिंधू संस्कृतीदेखील नदीकाठीच उदयास आली होती.

नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर

सागर ·
लेखनविषय:
(नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर लिखित पुस्तकाचे परिक्षण बरेच दिवसांपूर्वी लिहिले होते. तेच येथे देत आहे.) मित्रांनो, मी बरीच पुस्तके वाचली आहेत."नाझी भस्मासुराचा उदयास्त" हे वि.ग.कानिटकर यांचे त्यापैकीच एक अतिशय उत्कृष्ट ऎतिहासिक पुस्तक आहे.अलिकडेच मी या पुस्तकाचे वाचन पूर्ण केले.अनेक पारायणे करुनही हे पुस्तक सारखे सारखे वाचावेसे वाटते.हे पुस्तक वाचताना पदोपदी मला आपल्या देशात माजलेल्या अराजकतेची आठवण झाल्याशिवाय होत नाही.मित्रांनो, तुम्हीदेखील हे सुंदर पुस्तक वाचले असेलच.

भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य : (संपूर्ण)

सागर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुष्कर यांच्या आर्य चाणक्य यांच्यावरील विष्णुगुप्त या कथेमुळे मला माझ्या एका जुन्या कथेची आठवण झाली. ती संपूर्ण येथे देत आहे... (संपूर्ण) - o भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य o - भाग १: चंद्रगुप्त मौर्य हा आपणा सर्वांना भारतसम्राट म्हणून परिचित आहेच. पण तो भारतसम्राट कसा झाला? त्यासाठी त्याला कोणकोणते कष्ट सोसावे लागले? हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या चंद्रगुप्त मौर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते, त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगला पाहिजे.