Skip to main content

विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो.. पुढे चालू... ================================== अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात.

एक -प्रेक्षणीय- पहेली लीला

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 10/04/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
. १९६६ साली वैजयन्तीमालाची प्रमुख भूमिका असलेला 'आम्रपाली' हा चित्रपट. शंकर जयकिशनचे संगीत, एम.आर.आचरेकरांचे कलादिग्दर्शन, भानू अथय्या यांनी केलेली वशभूषा, गोपीकृष्ण यांचे नृत्य दिग्दर्शन, वैजयंतीमालाचे सौंदर्य आणि या सर्वांतून साकारलेली एकाहून एक सरस नृत्य-गीते, यामुळे तो त्याकाळी चांगलाच गाजला होता. ...

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 08/04/2015 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. "तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्‍या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो. पुढे चालू... ===================== "गगन...सदन तेजोमय तिमिर हरून करुणाकर दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..." "आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!!

चाँदसिंग बुलू..........एक लघुकथा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/04/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
चाँदसिंग बुलू........ सकाळीच अफजलचा दिल्लीहून फोन आला. ‘औलीयाभाई रामराम !’ ‘हां बोला औलियाखान सलाम !’ ‘बुरकासाब (बुरका म्हणजे प्रमुख) एलोराला येणार आहे ना संमेलनाला ?’ ‘म्हणजे काय ! येणार तर !’ ‘माझ्या मुलाला तुमच्याच हातून दिक्षा द्यायची आहे, आठवण आहे ना?’’ ‘अफजल ते तर लक्षात आहेच पण साधू बुलूला तो कसला कागद सापडला आहे त्याचे वाचनही करायचे आहे हे लक्षात ठेव.’ ‘ हो ! हो! ते तर आहेच बुलूसाब’ आमचा बुलू समाज तसा फार जूना नाही पण आहे अत्यंत सधन.

सुगंधा - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 06/04/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुने साथ जो मेरा छोडा दिवाना तेरा मर जायेगा..........." दुरवर संध्याकाळच्या कातरवेळेत अमोघच्या कानावर हे सुर पडत होते आणि तो आणखीनच भावनात्मक झाला. तिला विसरणे खरंच इतके अवघड होते? का? ती जेव्हा आपल्या आयुष्यात नव्हती तेव्हा आपण जगत नव्हतो तिच्या आधी आपल्या आयुष्यात कुणी दुसरी होती असेही नाही. मग ? आपल्याला तिची सवय लागलीये? तिचं सतत समोर राहणं आपल्याला खलायचं, तिचं वागणं , बोलणं , हसणं खिदळणं सर्वच नावडतीचं मीठ अळणी असल्यासारखं वाटायचं , मग आता असं झालय तरी काय आपल्याला, का ती सारखी डोळ्यासमोर दिसते? का तिच्या बांगड्यांचा आवाज कानात घुमतोय.

एक संवाद - २

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 19/03/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक संवाद - 1 ती - काय रे ? कुठे होतास इतका वेळ ? ऑन लाईन दिसत नव्हतास… तो - उशीरा आलो आज. ती - ओके, काय विशेष? उशीर का झाला? तो - आता तूपण बायको सारखे प्रश्न विचारायला लागलीस ती - नाही सांगायचं तर नको सांगूस. तो - अरे लाँग ड्राईव ला गेलो होतो ना. ती - ओह्ह. तो - तुला बोलावलं होतं, नाही आलीस. ती - कुठे गेला होतास तो - असं काही ठरवून नव्हतो गेलो ती - म्हणजे ? तो - नाशिकरोड ला चालवत राहिलो ती - ओके, आणि मग तो - एक रिपोर्ट बनवतो आणि देतो तुला मग वाचत बस.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/03/2015 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. " बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????" पुढे चालू... ================================= हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही. .............................................. कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं.