Skip to main content

विरंगुळा

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 16/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. असो! इथे आमचा पार्ट संपतो. आणि यजमानांकडला आजच्या काळात निरनिराळ्या पद्धतीनी साजरा होणारा मंगळागौर जागविणे हा पार्ट सुरु होतो. पूजा संपते आणि कहाणी वगैरे वाचून या सगळ्या मुलि ,पुन्हा तेथून आपापल्या नोकरी व्यवसायांना पळतात,आणि आंम्ही पुढच्या यजमानदारी मार्गस्थ होतो. पुढे चालू... ====================================== हा आमचा पार्टच असा आहे पुरोहितांचा. यजमानांचा पार्ट सुरु व्हायच्या आधी संपणारा. आणि संसारात चाललेल्या पार्टांना धंद्यापाठी धावताना दुर्लक्ष करायला लावणारा.

डोक्क्यात जाणारी सेल्समनशिप

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 14/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन. ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy).

हम तो तेरे आशिक है...

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९८१ साली या देशात २ क्रांतिकारी घटना घडल्या. एक माझा जन्म झाला दूसरी एक दुजे के लिये रिलीज झाला. रातोरात वासू - सपना ही जोडी हीर - रांझा, सोनी-महिवाल, सलीम - अनारकली यांच्या पंक्तीत जाउन बसली. पण वासू - सपना या जोडीचा वारसा इतर सर्व जोड्यांपेक्षा अविनाशी ठरला. हा वारसा होता जिथे जागा मिळेल तिथे आपली स्वतःची "वासू - सपना" जोडी कोरण्याचा.

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)

लेखक नाखु यांनी मंगळवार, 12/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)

यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेत
तर मंडळी कसे आहात आप आपल्या जागी पी सी समोर, मजेत आहात ना मजेत रहा ह्सत रहा अधून मधून फसतही रहा. हसताय ना, मी निटेश सांगळे. नाही नाही इथल्या हितेशशी माझा काहीही संबंध नाही ते कधी मधी हिताची बात करतात मी संहीतेतल्या दुरूस्त्या करतो.

काही नवे करावे म्हणून.

लेखक नूतन सावंत यांनी शनिवार, 09/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
रत्नागिरी येथे पूर्वी अंगण नावाचे खाद्यगृह होते.जेवण झकासच असायचे.आपणपण इथे एक खाद्यगृह सुरु करूया, अशी इच्छा मनात धरून जागा शोधायला सुरुवात केली.जागांच्या अव्वाच्या सव्वा किंमती पाहून थंडावलो.पण तुमच्याकडे पैसे आहेत हे दलालांना समजले की,जागांच्या वेगवेगळ्या ऑफर्स यायला सुरुवात होते.त्यप्रमाणे कोणीतरी फणसोप येथी आंबाच्या बागेची माहिती सांगितली. जागा पाहून आलो तेव्हा ऐन मे महिना.झाडे रोपदळच पण आंबे लागलेले.सोबत आई होती.तिच्या माहेरी म्हणजे माझ्या आजोळी आंब्याचे उत्पन्न भरपूर.अनुभवही खूप."एकदा बाग घेतली तर पन्नास ते साठ वर्षे बघायला नको" असा तिचा शेरा.जागेत पाण्याची सोय नव्हती पण जवळच ओहोळाच

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 06/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते.

छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 05/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रण स्पर्धा क्र. ९ सावली: निकाल या स्पर्धेलाही छान प्रतिसाद मिळाला. छायाचित्रे जरा कमी आली पण सगळीच अतिशय सुंदर होती. पहिल्या क्रमांकावर आलेले छायाचित्र वगळता इतर सर्वांनाच फार थोड्या फरकाने गुण मिळालेत.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 04/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........ पुढे चालू... ============================= मग येतो श्रावणामधला ठरला मंगळवार .. हल्ली हे शिवंमंगलागौरी व्रत ,व्रत म्हणून कोणी करत असलं नसलं..तरी त्यात मिळणारी एंजॉयमेंट राहिलेली आणि काळानुसार अगदी वाढलेली सुद्धा असल्यानी, कमी अधिक प्रमाणात का होइ ना?

एक "टवाळ" संध्याकाळ

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी रविवार, 03/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.

सत्यकथा .. अध्याय १ आणि २

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 30/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
..................................................अध्याय पहिला...................................................................... नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.