Skip to main content

विरंगुळा

हडळीचा आशिक

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 30/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हडळीचा आशिक जपानमध्ये हितोशी नावाचा एक माणूस रहायचा. तो एका पाषाणरह्रद्यी बाईच्या प्रेमात पडला. तिला राजी करायला त्याने भलते कष्ट उपसले. ती म्हणजे त्याला सर्वस्व वाटायची. तिच्या वाचून त्याला स्वतःचे आयुष्य फोलफोल वाटायचे. शेवटी एकदाची ती बया त्याच्यावर प्रसन्न झाली. त्याच्याशी लग्न करायला तयार झाली. पण हाय! नेमक्या त्याच दिवशी, आपण एका असाध्य रोगाने ग्रस्त आहोत, आपण काही फार दिवस जगणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तरी आपला हिरो तिच्याशी लग्न करतो. तिचे शेवटचे दिवस सुखात जावेत म्हणून आटापिटा करतो. पण, मृत्यू शय्येवर असताना मात्र हि बया त्याला म्हणते, “ मला एक वचन द्या.

जय गांधी बाबा

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 29/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तर नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता ऑफिस गाठण्यासाठी प्रचंड गडबडीत तयारी चालू होती. एक तर थंडीच्या दिवसात आरामात जाड ब्ल्यांकेट पांघरून मस्त झोपायचं असतं, आणि आम्ही ७ च्या ऑफिससाठी धडपडत असतो. कसं बसं ६:५५ ला सगळं आवरून निघणार तेवढ्यात बॉस चा मेसेज आला. "Lets take a day off today.. it seems we have a national holiday and a dry day too... so don't go off to find a bar now... have fun". "आयचा घो... आज कसली सुट्टी आता? किती मुश्किलीनं काल ल्याब सेट करत आणली होती. आता मधेच सुट्टी कसली? आणि सुट्टी तर सुट्टी हे काल नाही का सांगता येत? च्यामैला रविवारी सुट्टी नाही देत कधी.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 28/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. पण त्यांच्या सरकारात-कामाला गेलं,की त्यांचं धोरण पाळणं अटळ असे. कारण जर का ते एकदा जरी चुकलं,की त्यांच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हायची..ती कायमचीच! पुढे चालू... ================================================== या त्र्यंबक गुरुजींच्या सहवासात, मार्केटींग फंडे असं ज्याला हल्ली म्हणतात ते मी अगदी भरपूर म्हणजे भरपूर पहात होतो. पण तरिही मला असं वाटायचं, की खरा व्यावसायिक तोच ज्याच्याजवळ स्वतःचे ग्राहक गोळा होतातं.

भूकंपामागची कारणे

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 28/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भूकंप हा कधी होईल आणि कुठे होईल ह्याचे उत्तर विज्ञानाला आजही निश्चितपणे देता येत नाही. मात्र वेळोवेळी राजकीय व धार्मिक नेते आपली पोळी भाजून घेण्याकरता भूकंपाचा वापर करत आहेत. ८० वर्षापूर्वी नेपाळ व बिहारच्या आसपास असाच मोठा भूकंप होऊन अनेक लोक मेले. २०१५ मधेही तेच झाले. १९३४ साली जेव्हा भूकंप झाला तेव्हा गांधी बाबा (मोहनदास करमचंद) म्हणून गेले की हिंदू लोक अस्पृश्यता पाळतात म्हणून देवाने त्यांना शिक्षा दिली. आता ही बातमी देवाने जातीने ह्या माणसाच्या कानात कुजबुजली का अन्य काही प्रकारे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचवला गेला ते आजवर कळलेले नाही.

नशीब - भाग १

लेखक कविता१९७८ यांनी मंगळवार, 28/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कावेरी एक खेडेगावात राहणारी सामान्य मुलगी, वयात आलेली, गहुवर्णी, मैत्रीणीसारखा कुणी राजकुमार शहरातुन यावा आणि आपल्याला त्याच्या राजमहालात घेउन जावा अशी स्वप्न बाळगणारी. मागे तीन बहीणींचा गोतावळा असलेली. कावेरीचं शिक्षण दहावीपर्यंत झालं होतं, त्यानंतर ती आईला घरकामात मदत करत होती. वडील शेती करत होते तसेच त्यांनी थोड्या जागेत पालेभाज्या लावल्या होत्या, ते गावात विकण्याचे काम कावेरी बरेचदा करत असे.

‘माझी’ क्रिएटीव्हिटी

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 27/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी 'यु ट्युब'वर सफरचंदाचा हंस बनविण्याचा व्हिडियो पाहिला आणि ठरवले की आपण देखील सफरचंदाचा हंस बनवायचा. हिला (बायको) व त्याला (मुलगा) ती विडीयो क्लिप दाखवली आणि डीक्लेर केले की आज मी सफरचंदाचा हंस बनवणार. त्यावर आमची झालेली चर्चा आणि त्याचा परिणाम खाली देत आहे. पण त्या आधी त्या व्हीडीयोची लिंक देत आहे. मी – “अगं, सफरचंद कुठे ठेवलीत ?” ही – “किती वर्षे झाली आपल्या लग्नाला ? घरातच राहता ना ? आणि सफरचंदं कुठे ठेवतात ?

क्रीडायुद्धस्य कथा - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म!

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 22/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी जुनी.... म्हणजे तितकीही जुनी नाही.... पण तरीही आजच्या मानाने जुनीच! पूर्वी - म्हणजे फेसबुक अस्तित्वातही नव्हतं तेव्हा.... आयफोन, आयपॅड सोडाच - आयपॉडही नव्हता. विकिपीडिया, यूट्यूब, ट्विटर... काही काही नव्हतं. माणसं चालताना समोर बघत चालायची. कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोनही नसायचा. २४ X ७ न्यूज चॅनल्सचं पेव नव्हतं फुटलेलं... सास बहू सीरियल्सना कोणी सीरियसली घ्यायचं नाही त्यामुळे टीव्ही पण कमीच पाहिला जायचा. इंटरनेटच धड नव्हतं तिथं कसलं ई-कॉमर्स अन कसलं क्लाउड कम्प्यूटिंग! तर सांगायची गोष्ट. आजच्या पेक्षा फारच वेगळा काळ होता.

अनाहिता इन रसायनी

लेखक मितान यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा कट्टा होऊन तीन चार महिने होऊन गेले. सर्व अनाहितांना पुन्हा भेटण्याचे वेध लागले. मग प्रस्ताव आला. निमंत्रक मुंबईकर अनाहिता. चर्चा झाल्या. ठिकाणं चाळली गेली. तारखांसाठी पानं फडफडवून झाली. कुठून कोण कोण येणार याची यादी झाली. आणि शेवटी कट्टा ठरला. बहारीनहून विशाखाताई आणि जर्मनीहून स्वातीताई याच काळात पुणे मुंबईत येणार होत्या. त्या दोघींनीही यायचं नक्की केलं. उत्साह अजून वाढला. ठिकाणाच्या बाबतीत अजून गोंधळ होते. त्या चर्चांचा कंटाळा येऊन अजयाने तिचं घर हे ठिकाण फायनल केलं ! आणि काउंटडाऊन सुरू झाला. तेवढ्यात ते मेलं अनाहिता बंद पडलं. मग कसंकाय वर भागवलं.

मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है ....

लेखक कहर यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मै और मेरी घडी अक्सर ये बाते किया करते है .... "५.३० पहिला गजर झाला ५ मिनटात उठुया" "अरे दुसरा गजर झाला ? साला ५ मिनटात ६.१५ कसे वाजले " "६.३५ झालेत आताशी ? आज दाढी करायला वेळ आहे आपल्याला " "७.२५ वाजले ? बाप रे उशीर झाला ..

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 20/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अश्या तर्‍हेनी अखेर हे नावाला नाटकापुरतं-धरलेलं नाटक होऊन.. बर्‍याचश्या करमणुकि नंतर पब्लिक आपापल्या घरी पांगलं... पुढे चालू... ============================================== पांगलं ते पांगलं खरं,पण आंम्ही सगळी देवीच्या देवळापासून घरी चालत चालत येता येता हीचं अजुन एक नाटक सुरु झालं. ही:-आत्मू... मी:- काय? ही:-तू गाणी कधीपासून लिहितोस? मी:- १ अठवड्यापूर्वीपासून...(पलिकडून काकाचा हशा!) ही:- सांग ना???? मी:- अगं खरच १ अठवड्यापूर्वीपासून...काका म्हणाला-लिही!