मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

भटकंती स्पेशल २०१० कॅलेंडर

भटकंती अनलिमिटेड ·
लेखनप्रकार
समस्त मिपा'कर बंधू आणि भगिनी. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. नववर्षासाठी आम्ही काही तरी भेट म्हणून एक उपक्रम राबवला आहे. एक भटकंती स्पेशल कॅलेंडर. पूर्ण कॅलेंडर इथे देण्याऐवजी पहिल्या वर्षाचे पान इथे दाखवत आहे. बाकी कॅलेंडर माझ्या ब्लॉगवरुन डाऊनलोड साठी उपलब्ध आहे.

२०१०-विजयी भव!!!

कलंत्री ·
२०१० च्या वर्षाची सुरवात होण्यास काही तासांचाच अवकाश आहे. एक वर्ष संपणार आणि दुसरे सुरु होणार. पाश्चात्य विचारांत जी काही कमी अथवा आक्रमकता असो, पण आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र उत्साहाचा आणि उमेदीचा आहे. माणुसमात्र अनेक अनियमितता अथवा बंधनाने बांधला गेला आहे, परंतु अश्या वर्षाच्या सुरवातीस मात्र त्याचा कल हा आशावादी आणि संकल्पाचा असतो ही बाजु मला जमेची वाटते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक गोष्टी करण्याच्या राहुन जातात त्यांना अश्या वर्षाच्या सुरवातीच्या कल्पनेने परत एकदा उजाला देता येतो.

चौसष्ठ घरातला आनंद!

चतुरंग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२००८ साली जागतिक विजेता बनून भारतीय बुद्धीबळाचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवणारा आनंद विश्वनाथन हा ११ डिसेंबर ला वयाची ४० वर्षे पूर्ण करत आहे! आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो. २०१० साली होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

अजून एक क्रियाशील आदर्श

विकास ·
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

बुधिया, पा आणि आपण

ऋषिकेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले. ज्या वयात रेकॉर्ड म्हणजेच काय हे कळत नाहि त्यावयात त्याला एका रेकॉर्डसाठी त्याला ६५ कि.मी धाववलं गेलं होतं. त्यावेळी त्या मुलाला प्रसिद्धी बरोबरच सहानूभूती मिळाली होती. त्याच्या प्रशिक्षकांना बहुदा दंड/शिक्षा झाल्याचेही आठवते. आज बालदिनाच्या निमित्ताने त्या बुधियाची पुन्हा आठवण झाली. अशी अचानक आठवण होण्यामागे म्हटलं तर काहिच कारण नाहि आणि म्हटलं तर बरीच आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोवती मला सतत दिसणारे बुधिया. एक नाहि तर अनेक बुधिया.

उचललेस तू मीठ मुठभर

भोचक ·
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

त्रिपुरी पोर्णिमा

अश्विनीका ·
लेखनविषय:
कार्तिक महिन्यातील पोर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पोर्णिमा. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्रिपुरासुराच्या अनिर्बंध वागण्याने त्रस्त झालेले देव त्रिपुरासुराचा अंत झालेला पाहून हर्षित झाले आणि त्यांनी हा विजय दिवे प्रज्वलित करून व आतषबाजी करून साजरा केला. म्हणून ह्या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात. तिथी एकच असते , तोच पुर्णाकृती चंद्र आसमंतात असतो तरी प्रत्येक पोर्णिमा वेगळी भासते.

चाळीशी

विकास ·
"A mere forty years ago, beach volleyball was just beginning. No bureaucrat would have invented it, and that's what freedom is all about."
Newt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)
आज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा "स्पेश्शल" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा "औपचारीक" चाळीसावा वाढदिवस आहे.

एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

भडकमकर मास्तर ·
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला. लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"... मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे..... खूप मजेदार आहे. लेखातले काही मुद्दे असे, १.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा....

स्वर्गाची सहल

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्‍याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो. येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो pavanchakki हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच. इथला भन्नाट वारा आणि रानफुले.