मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि 12/08/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत 12/08/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव 13/08/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त 13/08/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

चित्रगुप्त 11/08/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि 12/08/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत 12/08/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव 13/08/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त 13/08/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे ·

संपूर्ण इतीहास थोडक्यात मांडलाय. खरेतर याला संवादिनी ची बखर म्हणतत येईल . १९८७ मधे महू ,म प्र मधे होतो. दहा नंतर एस टि डी स्वस्त म्हणून शनिवारी लाईन लावायचो.

गवि 08/08/2025 - 21:01
अतिशय उत्तम आढावा.. हा काळ, त्या काळातले सर्वकाही आणि त्यापूर्वीचे आणि आजपर्यंतचे सर्वकाही नुसतेच वापरणे नव्हे तर त्यात काही ना काही योगदान देत आलेली एकमेवाद्वितीय पिढी म्हणजे Gen X.. आमची.. एकाच पिढीत आणि एकाच आयुष्यात सर्वाधिक जास्त बदल पाहिलेली. तूर्त पोच. आणखी बरेच काही आठवले या निमित्ताने.

अभ्या.. 08/08/2025 - 22:47
तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. थोडा ग्याप पडला सर. म्हणजे एक पायरी राहिल्यासरखी वाटली. १९९८ ला रात्री एस्टीडी बुथवर मीटर बघत बोलाय्यचे लोक तेंव्हा काहीजण घरात अँटेना लावून ते ५ कीमी च्या अंतरात चालणारे कॉर्डलेस बाळगायचे. आणि त्याच वर्षी मुंबईच्या पेपरात "कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत(स्टार उद्योग) ह्यांचा मोबाईल फोन (पोलिसांच्या वीऑकीटॉकीसारखा दिसणारा, मोटोरोला कंपनी) हरवला आहे, आणून देणार्‍यास योग्य बक्षीस" अशी जाहिरात वाचल्याचे स्मरते. नंतर एटीअँडटी (जो नंतर बिर्ला टाटा अ‍ॅन्ड एटीअ‍ॅन्ड टी झाला, नामकरण आयडीया चिटचॅट झाले. आणि एअरटेल आणि मग बीपीएल( नंतर हच , मग व्होडाफोन, आता व्ही आय मधली व्ही) ह्या कंपन्यांचे कार्डस आणि त्यांचे पेपर व्हावचर्स चालले. इनकमिंगला पैसे घेणारा हा काळ होता. हॅन्डसेट हे सिमेन्स, सोनी एरिकसन, मोटोरोला, पॅनासॉनिक आणि नंतर नोकीयाचे आले. काही पोस्टपेड प्लान्स नी इनकमिंग फ्री दिले मात्र रिम (रिलायन्स इंडीया मोबाईल) आल्यानंतर इनकमिंग सगळ्यांचेच फ्री झाले. मधला काही काळ टाटा आणि रिलायन्सच्या वॉकी सारख्या वायरलेस डब्बा फोनने पण गाजवला. व्हर्जिन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल अशा सर्व्हिस पण येऊन गेल्या. बहुतांशी सगळ्या जीएसएम होत्या. हा काळ २००५ पर्यंत चालला. सिंगल कलर डिस्प्ले पासून कलर डिस्प्ले पर्यंत मोबाईल प्रवास होताना सॅमसंगचे बाडा ओएस वर आधारित टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग ऑडिओ, व्हिडीओ, इमेज, रिंगटोन असे ट्रान्सफर ब्ल्युटूथ किंवा आयआर ने केले जाई किंवा दुकानात जाउन डायरेक्ट केबल जोडून भरले जाई. ज्यावेळी स्मार्टफोन आणि व्हाटसप आले २०१०/११ ला तेंव्हापासून कनेक्टिव्हीटी आणि डेटा ह्याचा धबधबा सुरु झाला.

In reply to by अभ्या..

ही माहितीची भर घातल्याबद्दल धन्यवाद!! माझ्यामते स्थळ काळानुसार हे तपशील बदलत असतात. म्हणजे एखादा शहरी माणुस आणि गावाकडचा माणुस यांच्या अनुभवात फरक पडु शकतो. काही ट्रेंड्स ईथे असतात, तिथे नाही वगैरे. शिवाय मी साधारण २००१ पासुनचा काळ घेतला आहे, तोही एक फरक. पुन्हा धन्यवाद

सोत्रि 09/08/2025 - 04:14
पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय?
इलॅान मस्कची न्युरालिंक कंपनी अशा चीपवर काम करत आहे. टेलीपथी हा ट्रेडमार्क रजिस्टर करून त्या नावाने चीप इंन्प्लांट करण्याचे प्रॅाडक्ट कंपनी विकते आहे. डिसक्लेमर>जाहिरात VoIP वरून माझा एक जुना लेख आठवला! - (तंत्रज) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी ही हा लेख लिहिताना नायक्विस्ट नियम वगैरे तांत्रिक बाजु लिहावी का या विचारात होतो, पण आळस केला आणि फक्त स्मरण रंजनापुरते लिहिले. पण आता वाटतेय बरेच केले.

चित्रगुप्त 10/08/2025 - 08:22
माझा मोबल्या मला दिवसातून तीनचार वेळा तरी हुडकावा लागतो, कारण तो मी खिशात कधीच ठेवत नाही. बाहेर जाताना ब्यागेत आणि घरी असताना इकडेतिकडे कुठेतरी. कायप्पासकट सगळे मला लॅपटॉपवर करायला बरे वाटते. मोठा पडदा आणि कीबोर्ड, प्रकाश सहजपणे कमीजास्त करत लेखन-वाचन, विडियो बघणे, बँकेचे काम, वगैरे निवांत करता येते. एका वेळी अनेक टॅब- मुख्यतः यूट्यूब, चॅटजीपीटी, पिंटरेस्ट, मिपा, गूगल ड्राईव्ह वगैरे उघडून ठेऊन मधुनच हे तर मधुनच ते असे सहज करता येते. आवडलेली चित्रे, फोटो गूगल ड्राईव्हवर साठवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे (विशेषतः मॅकबुकवर) अनेक तास बसले तरी डोळे शिणावत नाहीत.... वगैरे. मोबल्याचा उपयोग फोन करायला, ओटीपीसाठी आणि फोटो काढायला चांगला होतो. -- माझ्यासारखे आणखी आहेत का कोणी लॅपटॉप प्रेमी ?

काय सुंदर लिहिलं आहे ! ह्या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती सोबत आपल्या आयुष्याचा प्रवास ही डोळ्यासमोर तरळून गेला. दीड रुपये पर मिनिट कॉलिंग होतं त्या दिवसात एकेक रुपया साठवून प्रेयसी सोबत केलेले संवाद स्मरले. नंतर whatsapp वर केलेले तासनतास व्हिडिओ कॉल आठवले. कोव्हिडच्या काळात फॅमिली सोबत गप्पा टप्पा करत एकामेकाला आधार देणारे ग्रुप कॉल आठवले. नॉस्टॅल्जिक केले राव तुम्ही.

कपिलमुनी 11/08/2025 - 14:44
एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस>> इथून पुढे १-२ वर्षात रीयल टाईम ओन्लाइन भाषांतर होईल .. हव्या त्या भाषेतून अप्ल्याला हव्या त्या भाषेत होइल

"पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? " ईथे "पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कानातच एखादी चिप बसवतील काय? असा बदल करायचा आहे.

संपूर्ण इतीहास थोडक्यात मांडलाय. खरेतर याला संवादिनी ची बखर म्हणतत येईल . १९८७ मधे महू ,म प्र मधे होतो. दहा नंतर एस टि डी स्वस्त म्हणून शनिवारी लाईन लावायचो.

गवि 08/08/2025 - 21:01
अतिशय उत्तम आढावा.. हा काळ, त्या काळातले सर्वकाही आणि त्यापूर्वीचे आणि आजपर्यंतचे सर्वकाही नुसतेच वापरणे नव्हे तर त्यात काही ना काही योगदान देत आलेली एकमेवाद्वितीय पिढी म्हणजे Gen X.. आमची.. एकाच पिढीत आणि एकाच आयुष्यात सर्वाधिक जास्त बदल पाहिलेली. तूर्त पोच. आणखी बरेच काही आठवले या निमित्ताने.

अभ्या.. 08/08/2025 - 22:47
तर हे सगळे २००४ पर्यंत असेच चालू राहिले. थोडा ग्याप पडला सर. म्हणजे एक पायरी राहिल्यासरखी वाटली. १९९८ ला रात्री एस्टीडी बुथवर मीटर बघत बोलाय्यचे लोक तेंव्हा काहीजण घरात अँटेना लावून ते ५ कीमी च्या अंतरात चालणारे कॉर्डलेस बाळगायचे. आणि त्याच वर्षी मुंबईच्या पेपरात "कोल्हापूरचे प्रसिध्द उद्योगपती संजय घोडावत(स्टार उद्योग) ह्यांचा मोबाईल फोन (पोलिसांच्या वीऑकीटॉकीसारखा दिसणारा, मोटोरोला कंपनी) हरवला आहे, आणून देणार्‍यास योग्य बक्षीस" अशी जाहिरात वाचल्याचे स्मरते. नंतर एटीअँडटी (जो नंतर बिर्ला टाटा अ‍ॅन्ड एटीअ‍ॅन्ड टी झाला, नामकरण आयडीया चिटचॅट झाले. आणि एअरटेल आणि मग बीपीएल( नंतर हच , मग व्होडाफोन, आता व्ही आय मधली व्ही) ह्या कंपन्यांचे कार्डस आणि त्यांचे पेपर व्हावचर्स चालले. इनकमिंगला पैसे घेणारा हा काळ होता. हॅन्डसेट हे सिमेन्स, सोनी एरिकसन, मोटोरोला, पॅनासॉनिक आणि नंतर नोकीयाचे आले. काही पोस्टपेड प्लान्स नी इनकमिंग फ्री दिले मात्र रिम (रिलायन्स इंडीया मोबाईल) आल्यानंतर इनकमिंग सगळ्यांचेच फ्री झाले. मधला काही काळ टाटा आणि रिलायन्सच्या वॉकी सारख्या वायरलेस डब्बा फोनने पण गाजवला. व्हर्जिन, डोकोमो, युनिनॉर, एअरसेल अशा सर्व्हिस पण येऊन गेल्या. बहुतांशी सगळ्या जीएसएम होत्या. हा काळ २००५ पर्यंत चालला. सिंगल कलर डिस्प्ले पासून कलर डिस्प्ले पर्यंत मोबाईल प्रवास होताना सॅमसंगचे बाडा ओएस वर आधारित टच स्क्रीन मोबाइल आले आणि मग ऑडिओ, व्हिडीओ, इमेज, रिंगटोन असे ट्रान्सफर ब्ल्युटूथ किंवा आयआर ने केले जाई किंवा दुकानात जाउन डायरेक्ट केबल जोडून भरले जाई. ज्यावेळी स्मार्टफोन आणि व्हाटसप आले २०१०/११ ला तेंव्हापासून कनेक्टिव्हीटी आणि डेटा ह्याचा धबधबा सुरु झाला.

In reply to by अभ्या..

ही माहितीची भर घातल्याबद्दल धन्यवाद!! माझ्यामते स्थळ काळानुसार हे तपशील बदलत असतात. म्हणजे एखादा शहरी माणुस आणि गावाकडचा माणुस यांच्या अनुभवात फरक पडु शकतो. काही ट्रेंड्स ईथे असतात, तिथे नाही वगैरे. शिवाय मी साधारण २००१ पासुनचा काळ घेतला आहे, तोही एक फरक. पुन्हा धन्यवाद

सोत्रि 09/08/2025 - 04:14
पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय?
इलॅान मस्कची न्युरालिंक कंपनी अशा चीपवर काम करत आहे. टेलीपथी हा ट्रेडमार्क रजिस्टर करून त्या नावाने चीप इंन्प्लांट करण्याचे प्रॅाडक्ट कंपनी विकते आहे. डिसक्लेमर>जाहिरात VoIP वरून माझा एक जुना लेख आठवला! - (तंत्रज) सोकाजी

In reply to by सोत्रि

मी ही हा लेख लिहिताना नायक्विस्ट नियम वगैरे तांत्रिक बाजु लिहावी का या विचारात होतो, पण आळस केला आणि फक्त स्मरण रंजनापुरते लिहिले. पण आता वाटतेय बरेच केले.

चित्रगुप्त 10/08/2025 - 08:22
माझा मोबल्या मला दिवसातून तीनचार वेळा तरी हुडकावा लागतो, कारण तो मी खिशात कधीच ठेवत नाही. बाहेर जाताना ब्यागेत आणि घरी असताना इकडेतिकडे कुठेतरी. कायप्पासकट सगळे मला लॅपटॉपवर करायला बरे वाटते. मोठा पडदा आणि कीबोर्ड, प्रकाश सहजपणे कमीजास्त करत लेखन-वाचन, विडियो बघणे, बँकेचे काम, वगैरे निवांत करता येते. एका वेळी अनेक टॅब- मुख्यतः यूट्यूब, चॅटजीपीटी, पिंटरेस्ट, मिपा, गूगल ड्राईव्ह वगैरे उघडून ठेऊन मधुनच हे तर मधुनच ते असे सहज करता येते. आवडलेली चित्रे, फोटो गूगल ड्राईव्हवर साठवता येतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे (विशेषतः मॅकबुकवर) अनेक तास बसले तरी डोळे शिणावत नाहीत.... वगैरे. मोबल्याचा उपयोग फोन करायला, ओटीपीसाठी आणि फोटो काढायला चांगला होतो. -- माझ्यासारखे आणखी आहेत का कोणी लॅपटॉप प्रेमी ?

काय सुंदर लिहिलं आहे ! ह्या तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती सोबत आपल्या आयुष्याचा प्रवास ही डोळ्यासमोर तरळून गेला. दीड रुपये पर मिनिट कॉलिंग होतं त्या दिवसात एकेक रुपया साठवून प्रेयसी सोबत केलेले संवाद स्मरले. नंतर whatsapp वर केलेले तासनतास व्हिडिओ कॉल आठवले. कोव्हिडच्या काळात फॅमिली सोबत गप्पा टप्पा करत एकामेकाला आधार देणारे ग्रुप कॉल आठवले. नॉस्टॅल्जिक केले राव तुम्ही.

कपिलमुनी 11/08/2025 - 14:44
एक जपानी, एक भारतीय आणि एक अमेरिकन किंवा जर्मन माणूस>> इथून पुढे १-२ वर्षात रीयल टाईम ओन्लाइन भाषांतर होईल .. हव्या त्या भाषेतून अप्ल्याला हव्या त्या भाषेत होइल

"पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कोणताच एखादी शिप बसवतील काय? " ईथे "पुढचा टप्पा काय असेल? माणसाच्या कानातच एखादी चिप बसवतील काय? असा बदल करायचा आहे.
नमस्कार मंडळी हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच. तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता.

कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे ·

आर्या१२३ 28/07/2025 - 14:48
अप्रतिम ! छान आहेत आठ्वणी. हे वाचुन श्री दादा गोडसे यांना पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. माझ्या एका मैत्रीणीच्या माहेरी पुज्य श्रीधर स्वामींची उपासना आहे. तिने पद्मावती मठातला फोटो पाठवला. ती सांगत होती की पद्मावतीचा मठ पुर्वी त्यांचाच होता. त्यांच्या नंतर तो वरदपुर संस्थानाने घेतला.

आर्या१२३ 28/07/2025 - 14:48
अप्रतिम ! छान आहेत आठ्वणी. हे वाचुन श्री दादा गोडसे यांना पाहण्याची ईच्छा निर्माण झाली. माझ्या एका मैत्रीणीच्या माहेरी पुज्य श्रीधर स्वामींची उपासना आहे. तिने पद्मावती मठातला फोटो पाठवला. ती सांगत होती की पद्मावतीचा मठ पुर्वी त्यांचाच होता. त्यांच्या नंतर तो वरदपुर संस्थानाने घेतला.
कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ 28/07/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा 29/07/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत 29/07/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti 29/07/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 30/07/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ 29/07/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म 29/07/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ 29/07/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म 29/07/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा 29/07/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक 29/07/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

क्विक कॉमर्स आणि आपण

आकाश खोत ·

विवेकपटाईत 21/07/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि 21/07/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत 21/07/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि 21/07/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म 21/07/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. 21/07/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत 21/07/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत 21/07/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti 21/07/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.

विवेकपटाईत 21/07/2025 - 13:56
बहुधा स्वस्त मिळत नाही. या शिवाय आवश्यक वस्तु सोडल्यास बाकी किमान 35% नफे देणार्‍यांच्या वस्तु विकतात. भाज्या तर महाग आणि शिळ्या मिळतात. बाकी नवी पिढी आळशी झाली आहे.

गवि 21/07/2025 - 14:11
कोणतीही नवीन पद्धत रूढ होऊ लागली की अशा प्रकाराचे विचार आणि आक्षेप येत असतात. साहजिकच आहे ते. फेरीवाले, किराणा दुकान, किराणा दुकानाची होम डिलिव्हरी, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणारी लहान दुकाने. मग त्यांच्या मोठाल्या शोरुम, तिथे जाऊन डिस्काउंट मधे खरेदी करण्याची क्रेझ, मॉल कल्चर, मग अमेझॉन ऑनलाईन, आणखी सवलत.. थेट घरपोच सामान, न आवडल्यास आठवड्याभरात वस्तू परत करता येण्याची सोय. आता दहा मिनिटांत बसल्याजागी वस्तू. या प्रत्येक टप्प्यावर आधीचे दुकानदार रडले. नवीन आलेल्या पद्धतीने आम्हाला संपवले, खाऊन टाकले वगैरे तक्रारी केल्या. पण चक्र चालूच राहते.

In reply to by गवि

आकाश खोत 21/07/2025 - 14:28
बरोबर आहे.  नवनवीन यंत्रे आली तेव्हा मजुरांना नकोसं वाटलं असेल. संगणक आले तेव्हा बँका आणि सरकारी कर्मचाऱ्यांना ते शिकणं नकोसं वाटलं असेल. आता एआय आलं तेव्हा आयटीवाल्यांना आणि काही काही क्षेत्रात लोकांना आपल्या रोजगाराला धोका वाटतो आहे.  सगळ्या बदलांचं असं होतंच. त्यामुळे मी त्या मुद्दयांवर फक्त वाचनात आलं तेवढाच उल्लेख केला.  मला स्वतःला चालणं फिरणं, व्यायाम आणि पेट्रोलचा अपव्यय टाळणं या मुद्द्यांमुळे जास्त वाटतं कि शक्य असेल तेव्हा किरकोळ खरेदी पायी जाऊन केलेली बरी.  शेवटी बदल तर होतच राहतील, पण जे आपल्यासाठी चांगलं वाटतं ते राबवावं. 

In reply to by आकाश खोत

गवि 21/07/2025 - 14:53
यातून होणारं दीर्घकालीन नुकसान किंवा अपाय हा वास्तव आहे. बटण दाबलं की वाट्टेल ती गोष्ट घडून यावी इथवर "प्रगती" होत आली की नुसते तोंडी हुकूम सोडून बटण देखील प्रत्यक्ष न दाबता कार्यवाही व्हावी असे तंत्र येते. मग तोंडाने आज्ञा तरी कशाला द्यायची? मनात विचार आला की तिकडे बटण दाबले जाईल असे पुढचे तंत्र. मग त्यानंतर मनात विचार देखील येण्याच्या आत, तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र...

In reply to by गवि

कुण्या शहाण्या माणसांना कळते की आपण सिम्युलेशन मधे राहत आहोत. समजा नसलो राहत तर: माणसाला हे भाकीत करता येत इथवर कमी काळात (उणी पुरी काही हजार वर्षे) पोचता येत असेल तर मिलियन वर्षे किंवा बिलियन वर्षे अस्तित्वात असलेल्या सूपर इंटेलिजन्स नी आपल्यासाठी सिम्युलेशन बनवली नसतील कशा वरून.
तुमच्या सवयींचा अभ्यास करून तुमच्या मनात नेमका कधी तो विचार येणार याचे आधीच भाकीत करून बटण दाबून टाकणारे तंत्र
या ही पुढची पायरी-. तुमचा उपयोग काय? सध्या मुलं जन्माला घालणे सोपे आहे एखादा सोफेस्टिकेटेड बायो केमिकल रोबोट बनवण्या पेक्षा म्हणून तुम्हाला जन्माला घालणे. त्या पुढे, ते ही नाही. तुमचे सिंथेटिक वर्जन्स तयार करणे. एखादी टाइप २ संस्कृती बनवणे. त्या पुढे, बाहेर पडणे. सूर्यमालेतून.

स्वधर्म 21/07/2025 - 14:40
सगळ्यांना समजतंय पण... सुखासीनतेची चटक लागली आहे. मी ४ थ्या मजल्यावर राहतो. तिथे चढत जाणं मला सहज शक्य आहे, जे मी बर्‍याचदा करतोही, पण कधी कधी लिप्ट वापरतो. समोर सोय आहे म्हटल्यावर ती टाळायला मानसिक श्रम पडतातच. पहिल्या मजल्यावर लिप्टने जाणारे धडधाकट महाभाग आहेत. त्यामुळे आपण कसं जगायचं ते ज्यानं त्यानं ठरवायचं हेच खरं.

अभ्या.. 21/07/2025 - 17:28
अगदीच ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी उत्तम सुविधा आहे, काही कमी स्कील वाल्यांसाठी रोजगार मिळत्ओय ते खरंच पण आपण ग्राहक म्हणून काय काय मूल्य देतोय ह्याच विचार करायला हवा. नुसतेच वस्तूंचे पैसे की आपली सगळी खाजगी माहिती? डिलिव्हरी बॉईज हे फक्त साधन आहेत. तुमची सगळी माहीती अगदी तुम्हाला काय, कीती, कोणत्यावेळी लागते, तुम्ही पे कसे करता, तुमच्याकडे कोणते मोबाईल, लॅपटॉप, वाहने आहेत हे सगळे ऑनलाईन सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडे सेव्ह होत आहे. एआय च्या माध्यमातून त्याचे विश्लेषण होत आहे. त्यातून तुमचे, तुमच्या घराचे पूर्ण अ‍ॅनालिसिस उपलब्ध होत आहे. आर्थिक, शारिरिक, बौद्ध्दिक, मानसिक अगदी सगळे डिटेल्स. मग ह्या माहितीचा उपयोग तुमच्यासाठीच केला जाणार आहे. तेंव्हा बघा. राहता रहिलं अशा कंपन्यांना स्पर्धात्मक डिलिव्हरी वेळेची मर्यादा घालण्यापासून रोखणे गरजेचे आहे. डेडलाईनसाठी जीवाचा आकांत करीत, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत धावणार्‍या ह्या डिलिव्हरी बॉइज ना आत्ताच आळा घातला गेला पाहिजे.

In reply to by अभ्या..

आकाश खोत 21/07/2025 - 20:53
हा एक आणखी वेगळाच आणि सखोल दृष्टिकोन आहे. असा विचारही चटकन मनात येत नाही. याचेही परिणाम भयावह असु शकतात.

In reply to by अभ्या..

बहुतेक वेळा आपण फुकटातली अ‍ॅप डाउन्लोड करताना अनेक प्रकारचे अ‍ॅक्सेस देत असतो. त्यात काँटॅक्ट लिस्ट, कॅमेरा, मायक्रोफोन, गूगल लोकेशन असे अनेक असतात. त्या अ‍ॅप च्या वापरासाठी ते सगळे अ‍ॅक्सेस खरेच आवश्यक आहेत का? हा विचार आपण करत नाही. यातुनच पुढे आयडेंटीटी थेफ्ट, डिजिटल अरेस्ट असे गंभीर किवा गेलाबाजार नकोसे मार्केटिंग कॉल्स, कायप्पा फॉरवर्ड्स असे प्रकार होउ शकतात. आजही तुम्ही एखाद्या विषयावर चर्चा केलीत तर तूनळीवर त्याचे व्हिडिओ दिसु लागतात. म्हणजे तुम्ही २४ तास तुमच्या फोनच्या निगराणीखाली आहात. अगदी झोपेत सुद्धा. आणि त्या साठलेल्या डेटाचे अ‍ॅनालिसिस करायला ए आय आहेच. त्यामुळे तुम्ही किती वाजता, कुठल्या रस्त्याने, कुठे जाता, काय खाता पिता,काय बोलता, कुठले कपडे घालता ,किती कॅलरी जाळता, तुमच्या आवडी निवडी,तुमचे रोग, त्यावरची औषधे, घरात माणसे किती, त्यांची माहिती वगैरे सगळे गूगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल,अ‍ॅमेझोन कडे आहे. त्याचा वापर कसा करायचा हाच काय तो मुद्दा आहे. यापुढे जाउन काही उदाहरणे -- ईटलीचे सरकार मस्कच्या स्टारलिंक शी इंटरनेट बॅकबोन सेवा घेण्याबद्दल करार करणार होते. पण ईतक्यात त्यांना समजले की अमुक तमुक देशाची ईंटरनेट सेवा, अमेरिकन सरकारच्या सांगण्यावरुन स्टारलिंकने खंडीत केली. तेव्हा हा धोका वेळीच ओळखुन त्यांनी करार रद्द केला. उद्या गूगलने जी पे, जी मॅप, जी मेल, तूनळी वगैरे भारतासाठी बंद केले किवा मायक्रोसॉफ्ट ने कायप्पा बंद केले तर आपल्यापुढे काय पर्याय आहेत हे बघायला पाहीजे.

काय मागवावं आणि काय नाही याचं खरंच तारतम्य पाहिजे. लेख वाचून ही शॉर्ट फिल्म आठवली. बाकी पेट्रोलच्या मुद्याबाबत, मागच्या गल्लीत जाण्यासाठी सुद्धा स्कुटर वापरणारे लोक पाहीले आहेत, घरातही आहेत :)

पटतयं, परंतू आजच्या तरूणाईची रॅट रेस बघता ही खरोखरच एक सोय आहे असे वाटते. सोमवार ते रविवार अखंड बिझी असलेल्यांना हे एक वरदानच म्हणावे लागेल. अर्थात मुंबई पुण्या सारख्या ठिकाणी. इतर ठिकाणी हे प्रकार अजून सुरू झाले नसावेत. आमच्या सारखी रिकामटेकडी जुनी खोडं आजही चार पावले दुर जाऊन काही ताजं,स्वस्तात मिळतयं का हे शोधत असते. पण आजून थोडे दिवस गेले की आम्हांला पण सोय होणार आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

आकाश खोत 21/07/2025 - 21:03
वयस्कर लोक अगदी एकटेच राहत असतील आणि चालणं फिरणं बंद झालेलं असेल तर खरंच चांगली सोय आहे.  नाही तर वयस्कर लोकांसाठी सुद्धा फेरफटका मारणं, खाली चार लोकांशी बोलणं हा चांगला विरंगुळा असतो. मी एका कुटुंबाला ओळखतो, त्यातला मुलगा सर्व सोयी वापरू शकतो, वापरतो. त्याचे बाबा मात्र रोज ठराविक वेळी भाजी आणि फुलं आणायला एक चक्कर मारतात म्हणजे मारतातच.  आपण हिंडू फिरू शकतो, छोटी मोठी कामं करू शकतो याने सुद्धा आत्मविश्वास आणि उभारी मिळते. माझे आजोबा ७५ वर्षांपर्यंत सकाळ संध्याकाळ मस्त फिरायचे. नंतर एक दोन दुखण्यांनी फिरणं कमी झालं आणि मग झपाट्याने कमी होत बंदच झालं. त्यामुळे जोपर्यंत जमतंय तोपर्यंत फिरावंच. 

Bhakti 21/07/2025 - 19:38
खरंय,मी ऑनलाईन जास्त मागवत नाही.पण जवळ जायला देखील स्कुटी वापरते.जे मला आणखीन आळशी करत आहे हे जाणवते.मी आधी असं करत नसे, कदाचित मी वयस्कर व्हायला लागली आहे ;)

खाजगी माहिती वेगवेगळ्या मार्गाने चव्हाट्यावर येत आहे. आगदी सुलभ शौचालयाचे शुल्क देताना यु पी आय मार्गे सुद्धा इथे मला तुकोबाराय यांचा अभंग आठवतो. संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:ख लेश।। धृ ।। तेथे मी राहीन होऊनी याचक। धालितील भीक तेचि मज।। 1 ।। पंताचिये गावी माहितीचा सुकाळ.|.नाही पळवाट लेशमात्र || रहावे लागेल मांजर होऊन| दावतील भिती तेच मज|| या चक्रव्यूहातून सुटका नाही. सारेच अभिमन्यू इथे नाही कोणी अर्जुन

लेख आवडला.
दुसरं म्हणजे हा कुठला नव्याने निर्माण झालेला रोजगार नाही तर आहे त्या किराणा भुसार आणि छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम करणारा, त्यांच्या जागी आलेला रोजगार आहे.
याविषयी साशंक आहे. कारण झेप्टो आणि इतर कंपन्यांचे डिलिव्हरी देणारे लोक कुठून तरी एखादी वस्तू विकत घेऊन आपल्याला आणून देतात. त्या वस्तू ते कुठून आणतात? मला वाटते किराणा- छोटे व्यापारी आणि आपण यात घरी डिलीव्हरी देणारे ही आणखी एक पायरी आली आहे. ते डिलीव्हरी वाले त्या छोट्या व्यापार्‍यांकडूनच वस्तू विकत घेतात आणि आपल्याला आणून देतात. त्यामुळे झेप्टो आणि इतर कंपन्यांमुळे छोट्या व्यापार्‍यांच्या व्यवसायावर परिणाम होत असेल असे वाटत नाही. २०१८-१९ मध्ये स्विगी-झोमॅटोचा वापर वाढल्यावर एक व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड फिरत होता की बघा केवढी मंदी आली आहे. पूर्वी कोणत्याही हॉटेलमध्ये गर्दी दिसायची पण आता नाही. याचा अर्थ लोकांना अधिक खर्च करणे परवडत नाहीये वगैरे वगैरे. मात्र होत असे होते की हॉटेलांचा धंदा बसला नव्हता- फक्त विक्रीचे स्वरूप बदलले होते. पूर्वी जे लोक तिथे जाऊन खायचे ते आता स्विगी-झोमॅटोवर ऑर्डर देऊन घरी बसून वेबसिरीज बघत खायला लागले.
फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स".

डीग्री!

अमरेंद्र बाहुबली ·

मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. म्हणजे दुसर्याच विषयाची प्रश्नपत्रिका हातात आलीये. अभ्यास पूर्ण झाला नाही आहे. त्यानंतर जाग आल्यावर भानावर यायला १०-१५ सेकंद लागतात त्यानंतर स्वप्नच होते हे समजुन हायसे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गवि 09/07/2025 - 06:02
सेम टू सेम. हल्ली कमी झाले आहे पण चाळीशीपर्यंत खूपच वेळा पडायचे असे परीक्षा आणि पेपरचे स्वप्न. कोणत्याही प्रश्नाची संगती न लागणे, वेळ चालला आहे पण आपलं पेपर सोडवणं सुरु देखील झालेलं नाही, पेपर सोडवत असताना वेगळ्याच काही घटना आणि विघ्ने उत्पन्न होत आहेत इत्यादि. मास्टर्स (PG) करण्याच्या बाबतीत देखील स्वप्ने पडत असतात. मी इतर काही बाही सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस केले असले तरी मूळ डिग्री फक्त बॅचलरची आहे. आपण पुढे शिकून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करत आहोत, पण अजून काडीमात्र अभ्यास सुरू केलेला नाही. किंवा ऑलरेडी परीक्षा झाली आहे आणि आता त्याचा निकाल लागणार आहे किंवा लागतो आहे असेही असते स्वप्नात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भीमराव 14/07/2025 - 23:06
भावा, मला कधीतरी चार पाच महिन्यातुन- एखाद्या वेळी वर्षातुन एकदा स्वप्न पडतं की माझं कोणत्यातरी विषयाचं असाईनमेंट सबमिशन राहिलं आहे. आणि मी दचकून जागा होतो आणि समजतं साला ते चिंधी आयुष्य संपलं त्याला दहा पंधरा वर्षे झाली. माझं स्वतः चं निरीक्षण आहे कि ज्या ज्या वेळी हापुसात कामाचा जास्त ताण असतो नेमकं त्याच वेळी हे होतं‌. मला कधी वेळेत सबमिशन करायची सवयच नव्हती. कदाचित मेंदू मध्ये ती सबमिशन ची काळजी कुठे तरी कोरलेली गेली आहे‌. ज्या ज्या वेळी हापुसात डैडलाईन डोक्यावर आलेली असते त्या त्या वेळी मेंदू जुन्या कोरलेल्या काळजी सोबत हे लिंक करतो आणि त्यामुळे ते स्वप्न परत रिपीट टेलीकास्ट होतं‌. तु एकदा कधीतरी निट विचार कर, सगळे तुकडे जोडून पहा‌. तुला नक्की उत्तर मिळेल. आणि एकदा तुला कारण सापडलं की मग हे स्वप्न एंजॉय करशील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 15/07/2025 - 10:46
Mark list आणि एक तात्पुरते passing certificate मिळाल्यावर नोकरी लागली. निकालानंतर तीन चार महिन्यांनंतर पदवीदान समारंभ होतो व डिग्री सर्टिफिकेट देतात.( Convocation ceremony) तिथे घेतले नाही तर युनिव्हर्सिटीच्या कार्यालयातून घ्यायचे असते. तेही मी नाही घेतले. हे नसेल तर ग्रज्युएट मतदार संघात मतदान करता येत नाही. हा छोटा.

कालच रात्री एका अशाच स्वप्नात तळमळत होतो. हिन्दी सक्ती बद्दल चाललेल्या गदारोळामुळे,चर्चेमुळे उत्तररात्री स्वप्नात शाळा,शिक्षक व आमचे भजी खाणारे हिन्दीचे शिक्षक आले होते. हिन्दीच्या पेपरात प्रश्न होता ,बटाट्याची भाजी कशी बनवतात यावर हिन्दीत लिहा. तळमळत राहीलो पण उत्तर लिहीता आले नाही. मराठीत कधी बटाट्याची भाजी लिहीता आली नाही ती हिन्दीत कधी येणार . बेक्कार झोप नाही आली.

विवेकपटाईत 09/07/2025 - 11:17
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व सर्टिफिकेट एका सुरक्षित जागी घरात बहुतेक कपाटात, पलंगच्या आत ठेऊन दिल्या जाते. पुढे तीस एक वर्ष सर्टिफिकेट कुठे ठेवले आहे. घरात कोणीही लक्षात ठेवत नये. घर बदलले जातात किंवा घराची डागडूजी होताना कचरा फेकताना डिग्री ही गहाळ होते. माझ्या एका मित्राला निवृत झाल्यावर डिग्रीची आठवण आली. घरात ती सापडली नाही. आपण निवृत अधिकारी आहोत सहज डुप्लीकेट मिळून जाईल. त्यांनी युनिवेर्सिटीत फोन केला. उत्तर मिळाले साहेब. 40 वर्ष जुनी कागद शोधणे सौपे नाही. दरवर्षी काही लाखाच्या वर विद्यार्थी इथे स्नातक इत्यादि होतात. तुम्ही स्वत या. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला काही दक्षिणा द्या. जुने रिकार्ड शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे नशीब उत्तम असेल तर ते सापडतील. ... तसे चान्स खूप कमी आहे. आता रिकार्ड डिजिटल ठेवणे सुरू झाले असेल तर 30- 40 वर्षांनंतर ते सापडू शकतील, अशी आशा करू शकतो. बाकी पीएम डिग्री केस मध्ये केजरीवालची माफी सुप्रीम कोर्टाने स्वीकार केली नाही. त्यांच्या वर केस सुरू राहणार.

या लेखाप्रमाणे आणि वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हा अनुभव मलाही आहे. पडलेली स्वप्नं लक्षात राहत असल्याने त्याचे मनोवैज्ञानिक अर्थ अधून मधून शोधण्याची सवय आहे. एआय म्हणतोय शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.

Bhakti 15/07/2025 - 13:07
त्या डीग्रीच्या जोरावर आयुष्यात खुप मोठं काहीतरी स्वप्न‌ पाहिलेलं‌ असतं.कदाचित एखादा विषय सुटता सुटत नाही,मध्येच आडमुठ्या सारखा येतो.त्यामुळे डीग्रीच्या जोरावरचे स्वप्न डळमळीत होते.आणि मग आयुष्यभर स्वप्नात तो पेपर ,डीग्री येत राहते. यावरचा उतारा म्हणजे लवकरात लवकर दुसरी डीग्री आनंदाने सहज मिळवणं !!! मला एम एस्सीचा गणिताचा पेपरचे पास होण्यापुरते गुण परत तपासत आहे.हे स्वप्न‌नंतर दोन अजून डीग्री मिळवल्यानंतर‌ पडणं‌ बंद झाले ;) -खुप डीग्री मिळवलेली भक्ती :)

In reply to by Bhakti

छान! हा लेख लिहिल्या नंतर डिग्रीचे स्वप्न पडणे बंद झाले आहे. तरी पाहतो पुढील काही दिवस.

मलाही असे स्वप्न पडते नेहेमी. म्हणजे दुसर्याच विषयाची प्रश्नपत्रिका हातात आलीये. अभ्यास पूर्ण झाला नाही आहे. त्यानंतर जाग आल्यावर भानावर यायला १०-१५ सेकंद लागतात त्यानंतर स्वप्नच होते हे समजुन हायसे वाटते.

In reply to by कानडाऊ योगेशु

गवि 09/07/2025 - 06:02
सेम टू सेम. हल्ली कमी झाले आहे पण चाळीशीपर्यंत खूपच वेळा पडायचे असे परीक्षा आणि पेपरचे स्वप्न. कोणत्याही प्रश्नाची संगती न लागणे, वेळ चालला आहे पण आपलं पेपर सोडवणं सुरु देखील झालेलं नाही, पेपर सोडवत असताना वेगळ्याच काही घटना आणि विघ्ने उत्पन्न होत आहेत इत्यादि. मास्टर्स (PG) करण्याच्या बाबतीत देखील स्वप्ने पडत असतात. मी इतर काही बाही सर्टिफिकेशन्स आणि कोर्सेस केले असले तरी मूळ डिग्री फक्त बॅचलरची आहे. आपण पुढे शिकून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पूर्ण करत आहोत, पण अजून काडीमात्र अभ्यास सुरू केलेला नाही. किंवा ऑलरेडी परीक्षा झाली आहे आणि आता त्याचा निकाल लागणार आहे किंवा लागतो आहे असेही असते स्वप्नात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भीमराव 14/07/2025 - 23:06
भावा, मला कधीतरी चार पाच महिन्यातुन- एखाद्या वेळी वर्षातुन एकदा स्वप्न पडतं की माझं कोणत्यातरी विषयाचं असाईनमेंट सबमिशन राहिलं आहे. आणि मी दचकून जागा होतो आणि समजतं साला ते चिंधी आयुष्य संपलं त्याला दहा पंधरा वर्षे झाली. माझं स्वतः चं निरीक्षण आहे कि ज्या ज्या वेळी हापुसात कामाचा जास्त ताण असतो नेमकं त्याच वेळी हे होतं‌. मला कधी वेळेत सबमिशन करायची सवयच नव्हती. कदाचित मेंदू मध्ये ती सबमिशन ची काळजी कुठे तरी कोरलेली गेली आहे‌. ज्या ज्या वेळी हापुसात डैडलाईन डोक्यावर आलेली असते त्या त्या वेळी मेंदू जुन्या कोरलेल्या काळजी सोबत हे लिंक करतो आणि त्यामुळे ते स्वप्न परत रिपीट टेलीकास्ट होतं‌. तु एकदा कधीतरी निट विचार कर, सगळे तुकडे जोडून पहा‌. तुला नक्की उत्तर मिळेल. आणि एकदा तुला कारण सापडलं की मग हे स्वप्न एंजॉय करशील.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 15/07/2025 - 10:46
Mark list आणि एक तात्पुरते passing certificate मिळाल्यावर नोकरी लागली. निकालानंतर तीन चार महिन्यांनंतर पदवीदान समारंभ होतो व डिग्री सर्टिफिकेट देतात.( Convocation ceremony) तिथे घेतले नाही तर युनिव्हर्सिटीच्या कार्यालयातून घ्यायचे असते. तेही मी नाही घेतले. हे नसेल तर ग्रज्युएट मतदार संघात मतदान करता येत नाही. हा छोटा.

कालच रात्री एका अशाच स्वप्नात तळमळत होतो. हिन्दी सक्ती बद्दल चाललेल्या गदारोळामुळे,चर्चेमुळे उत्तररात्री स्वप्नात शाळा,शिक्षक व आमचे भजी खाणारे हिन्दीचे शिक्षक आले होते. हिन्दीच्या पेपरात प्रश्न होता ,बटाट्याची भाजी कशी बनवतात यावर हिन्दीत लिहा. तळमळत राहीलो पण उत्तर लिहीता आले नाही. मराठीत कधी बटाट्याची भाजी लिहीता आली नाही ती हिन्दीत कधी येणार . बेक्कार झोप नाही आली.

विवेकपटाईत 09/07/2025 - 11:17
एकदा नौकरी लागल्या नंतर सर्व सर्टिफिकेट एका सुरक्षित जागी घरात बहुतेक कपाटात, पलंगच्या आत ठेऊन दिल्या जाते. पुढे तीस एक वर्ष सर्टिफिकेट कुठे ठेवले आहे. घरात कोणीही लक्षात ठेवत नये. घर बदलले जातात किंवा घराची डागडूजी होताना कचरा फेकताना डिग्री ही गहाळ होते. माझ्या एका मित्राला निवृत झाल्यावर डिग्रीची आठवण आली. घरात ती सापडली नाही. आपण निवृत अधिकारी आहोत सहज डुप्लीकेट मिळून जाईल. त्यांनी युनिवेर्सिटीत फोन केला. उत्तर मिळाले साहेब. 40 वर्ष जुनी कागद शोधणे सौपे नाही. दरवर्षी काही लाखाच्या वर विद्यार्थी इथे स्नातक इत्यादि होतात. तुम्ही स्वत या. एखाद्या चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याला काही दक्षिणा द्या. जुने रिकार्ड शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमचे नशीब उत्तम असेल तर ते सापडतील. ... तसे चान्स खूप कमी आहे. आता रिकार्ड डिजिटल ठेवणे सुरू झाले असेल तर 30- 40 वर्षांनंतर ते सापडू शकतील, अशी आशा करू शकतो. बाकी पीएम डिग्री केस मध्ये केजरीवालची माफी सुप्रीम कोर्टाने स्वीकार केली नाही. त्यांच्या वर केस सुरू राहणार.

या लेखाप्रमाणे आणि वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे हा अनुभव मलाही आहे. पडलेली स्वप्नं लक्षात राहत असल्याने त्याचे मनोवैज्ञानिक अर्थ अधून मधून शोधण्याची सवय आहे. एआय म्हणतोय शिक्षणानंतरही, आयुष्याच्या उत्तरार्धात परीक्षेची स्वप्ने पडणे सामान्य आहे आणि बहुतेकदा सततच्या चिंता किंवा जागृत जीवनात परीक्षेची भावना दर्शवते, शैक्षणिक अपयशाची खरोखरची भीती नसते. ही स्वप्ने सहसा ताणतणाव, अपुरेपणाची भावना किंवा सध्याच्या जीवनातील परिस्थितीत कामगिरी करण्याच्या दबावाचे प्रकटीकरण असतात, जरी त्या परिस्थिती शैक्षणिक नसल्या तरीही.

Bhakti 15/07/2025 - 13:07
त्या डीग्रीच्या जोरावर आयुष्यात खुप मोठं काहीतरी स्वप्न‌ पाहिलेलं‌ असतं.कदाचित एखादा विषय सुटता सुटत नाही,मध्येच आडमुठ्या सारखा येतो.त्यामुळे डीग्रीच्या जोरावरचे स्वप्न डळमळीत होते.आणि मग आयुष्यभर स्वप्नात तो पेपर ,डीग्री येत राहते. यावरचा उतारा म्हणजे लवकरात लवकर दुसरी डीग्री आनंदाने सहज मिळवणं !!! मला एम एस्सीचा गणिताचा पेपरचे पास होण्यापुरते गुण परत तपासत आहे.हे स्वप्न‌नंतर दोन अजून डीग्री मिळवल्यानंतर‌ पडणं‌ बंद झाले ;) -खुप डीग्री मिळवलेली भक्ती :)

In reply to by Bhakti

छान! हा लेख लिहिल्या नंतर डिग्रीचे स्वप्न पडणे बंद झाले आहे. तरी पाहतो पुढील काही दिवस.
माझी डिग्री अर्धवट राहिलीय मी तळमळतोय, नेहमी, रोज. कधी होईल पूर्ण? का होत नाहीये? का राहताहेत विषय? मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय. डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतलं. जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती. माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो. इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले. पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो, पण ती पूर्ण होत नाहीये. कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये, तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये. लिहूनही पास होत नाहीये. तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय — सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय. डिग्री पूर्ण होत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·

गवि 09/07/2025 - 06:09
प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का? कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच. निर्मिती करत रहा. सफाई येईलच.

In reply to by गवि

३ Copyright strike आले के बंद होते मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे

गवि 09/07/2025 - 06:09
प्रयत्न चांगला आहे. टूल बरेच मर्यादित दिसते. आणखी एक शंका आली की गाण्याची मूळ चाल व्हिडिओत ऐकू येते आहे. हे गाणं पब्लिक डोमेनमधे अद्याप निश्चितच आले नसावे (कॉपीराइट फ्री). तर कॉपीराइट मुद्दा तुम्ही कसा हॅण्डल करता? Copyright strike आल्यास तुमचा चॅनेल बंद केला जातो याची कल्पना असेलच. तिथे एका चॅनेलवर मराठी संपूर्ण चित्रपट अपलोड केलेले दिसले. त्याचेही हक्क मिळवले आहेत का? कॉपीराइट तुमच्याकडे नसलेले गाणे व्हिडिओत वापरले तर ते व्हिडिओज मॉनेटाइज होऊ शकत नाहीत याचीही कल्पना असेलच. निर्मिती करत रहा. सफाई येईलच.

In reply to by गवि

३ Copyright strike आले के बंद होते मि म्हणुन २ चनेल ठेवले होते,एकात गाणे चेक केले ,दुस्र्यात पुर्ण अपलोड हक्क चेक करणे यु टुब चे काम आहे
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्र

मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·

आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा. मस्तच. पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.

In reply to by कर्नलतपस्वी

पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. तोच विचार होता पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला काम खुप वेळ खाउ आहे

In reply to by कर्नलतपस्वी

माझा टाईम फिकस नस्तो तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ? आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात

स्वधर्म 04/07/2025 - 17:55
अजून करा. लाईक केले आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?

In reply to by स्वरुपसुमित

शशिकांत ओक 06/07/2025 - 23:35
सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.

तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)

अभ्या.. 10/07/2025 - 17:07
एकच नंबर झालेय गाणे. अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.

आबांच्या गावाला जाऊ या असा व्हिडिओ करा. मस्तच. पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. बादवे,कुठले माध्यमातून बनवले. ट्रेड शिक्रेट असेल तर ना सांगू.

In reply to by कर्नलतपस्वी

पंचतंत्रातील गोष्टी ॲनिमेट करा. तोच विचार होता पण इथे रेडीमेड वोइस ओवर मिळाला काम खुप वेळ खाउ आहे

In reply to by कर्नलतपस्वी

माझा टाईम फिकस नस्तो तुम्ही पंच तंत्राच्या कोणेत्याही गोष्टी चा वोइस ओवर करुन ५ मिंटाची एम पी ३ देउ शकाल ? आणि मी इतके केले,मि इतके केले ,यु टु ब चनेल माझा ,पैसे किति वगैरे मधे वाद होउ शकतात

स्वधर्म 04/07/2025 - 17:55
अजून करा. लाईक केले आहे. लहान मुलांना नक्की आवडेल. स्क्रीन ओरिएंटेशन पोर्टेट तर पोर्टेटच ठेवा. मधेच बदलते आहे. बाकी सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?

In reply to by स्वरुपसुमित

शशिकांत ओक 06/07/2025 - 23:35
सगळ्या क्लीप्स छोटे छोटे प्रॉम्प्ट्स वापरूनच केले आहे की एकच मोठा (वन शॉट) प्रॉम्प्ट वापरलाय?
काल पुण्यात एआयवरील कार्यशाळेत अनेक टूल्स वर काम करायला दिले होते.

तीन वर्षांच्या भाच्याला मामाच्या गावाला खूप आवडलं, म्हणजे पाहिलं तेव्हा काही विशेष प्रतिक्रिया नव्हती, पण ४-५ दिवसांनी म्हणाला ते गाणं दाखव म्हणजे 'लहान मुलांसाठी' हा उद्देश साध्य झालाय :)

अभ्या.. 10/07/2025 - 17:07
एकच नंबर झालेय गाणे. अजुन भरपूर बनवा. वाटल्यास तुम्ही स्वतः गाणी रचा, प्रोफेशनल सिंगरकडून प्लेबॅक बनवुन घेऊन, स्वतः कहाणी रचून, स्टोरीबोर्ड तयार करुन (म्हणजे कॉपी राईटचा प्रॉब्लेम येणारच नाही) एक फुल साईज गाण्यांचा (निदान ४ मिनिटाचे एक गाणे) फुल साईज अल्बम (निदान १२ गाण्यांचा) बनवा. यु ट्युबवर पब्लिश करा. कुणाला पार्टनर घेऊच नका. भरपूर प्रसिध्दी मिळेल.
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे ५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले ) पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा २००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा https://youtu.be/BkBI81Uu2Pw

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी ·

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 01/07/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे 01/07/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस 02/07/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत 03/07/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी 04/07/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस 05/07/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 05/07/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस 05/07/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस 06/07/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 06/07/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/07/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 08/07/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 09/07/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 09/07/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 16/07/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु 16/07/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या 31/07/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य 09/07/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.

"सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती" कट कारस्थाने करण्यासाठी मात्रुभाषेचा आणि हिंदीचा असा गैरवापर? कधी ईतिहासाचे खोदकाम तर कधी मातृभाषा/हिंदी तर कधी भ्रष्टाचार.. भाउ तोरसेकरछाप पत्रकार ह्याला यशस्वी रणनीती म्हणतील पण फडण्वीस आणि भाजपा ह्यांनी जो विश्वास गमावला आहे त्याचे काय? मराठी राजकारणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नसतो असे एका दिग्गज कॉन्ग्रेस नेत्याने म्हंटले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लीत मोठ्या शर्यतीत पात्रताधारक म्हणून छबी बनविण्यासाठी सध्या उलथे पालथे निर्णय घेतल्या जात आहेत, असे वाटते. अपेक्षा करण्यात गैर नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शक्य आहे. पण ह्यांचे बॉस गुजरातमध्ये १२ वर्षे सत्तेवर असताना- स्वर्णिम गुजरात, गुजरात अस्मिता,तिकडची चकाचक बस स्टेशन्स्,गुजराती अनिवासी भारतियांचा डंका. हे सगळे कानावर यायचे. फडणवीस त्यांचा कित्ता गिरवतील असे वाटले होते. पण हे उलटेच करत आहेत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कपिलमुनी 01/07/2025 - 10:52
गुजरात आणि महाराष्ट्र यांचे राजकारण वेगवेगळे राहिले आहे . इथले राजकारण व्यक्तिकेंद्रीत नाही. गुजरात सारखा बेस भाजप ला महाराष्ट्रात नाही. तेवढे पोलरायझेशन पण नाही. भाजप शहरी पक्ष , शेटजी -भटजींचा पक्ष अशी इमेज आहे /होती. त्यामुळे उच्च वर्णींयांचा पक्ष अशी इमेज असल्याने विरोधक शाफुआं मांडणी करत असतात . सध्या फ२० फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत . पुढ्च्या १० वर्षात महराष्ट्रातून विरोधी पक्ष नामशेष झाला असेल ( सर्व मोठे नेते भाजप मध्ये असतिल).. तोवर देवाभाउला गुजरात पॅटर्न वापरता येणार नाही. पण आहे त्या पटावर सोंगट्या अशा फिरवल्या आहेत की बाकीच्यांचे मोहरे अडकले आहेत .. आता राज ठाकरेंना आघाडीत बसवणार की राज्यात युती / ठाकरे बंधू /आघाडी अशी तिहेरी लढत होणार ? यात फायदा फक्त भाजप चा होणार..

सुबोध खरे 01/07/2025 - 19:42
देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला. हायला उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूना फडणवीसांचा डाव कळत नसेल तर ते खड्ड्यात जायच्याच लायकीचे आहेत. असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. श्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम लांगुलचालन केलेले बहुसंख्य त्यांच्या मतदारांना पटले नाही. केवळ बाळासाहबांच्या पुण्याईवर किती दिवस आपला गाडा चालवणार. जोवर मुख्यमंत्री झाले नव्हते तोवर श्री उद्धव ठाकरे यांची झाकली मूठ सव्वा लाखाची होती. त्यानंतर संजय राऊत या नी त्यांचे पाय चाटताना काढलेले उद्गार जसे उद्धव ठाकरे हे जागतिक आरोग्य संघटनेला कोव्हीड बद्दल सल्ला देतात किंवा जो बायडन यांनी पुतीन याना फोन करून विचारले कि ये उद्धव ठाकरे कौन है ये हार नाही मानता सारखे महाभंपक व्हिडीओ व्हायरल झाले आणि समाजात असलेली श्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा इतकी डागाळली कि आता यातून सावरणे जवळ जवळ अशक्य आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्यासाठी श्री शरद पवार यांनी वापरलेले प्यादे आहे अशी आवई पण उठली. एक वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ती म्हणजे फडणवीस यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर झालेलि टिका सुद्धा लोकांना पटणारी नव्हती. त्यातून त्यावर कोणताही आक्रस्ताळेपणा न करता फडणवीस यांनी असे डाव खेळले कि ते शरद पवारांच्या इतक्या वर्षांच्या मुत्सद्दीपणाला पण गाळात घालून त्यांनी शिवसेनाच नव्हे तर राष्ट्र्रवादीत उभी फूट पाडली. फडणवीसांची किंवा भाजपचे एकंदर राजकारण महाराष्ट्रात खुद्द भाजपच्या ठाम कार्यकर्त्यांना सुद्धा पटणारे नाही. परंतु आज तरी फडणवीसांच्या तुलनेचा नेता महाराष्ट्रात नाही हि वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

"देवाभाऊनी हीच बाब हेरली आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी पट जोडून त्यांनी उद्धव यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का दिला." पण देवाभाउंच्या प्रतिमेचे काय? राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात पाठवायची भाषा करणार्या देवाभाउ आणी त्यांच्या पक्षाने 'कथित' भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतले. New documents with signatures of Praful Patel establish his undeniable links with Dawood Ibrahim https://www.opindia.com/2019/10/praful-patel-dawood-ibrahim-link-document-signatures/ patel ई.डी.ने धाड टाकायची, मग असले नेते/त्यांच्या संस्था/पैसा भाजपाबरोबर आल्या की मग 'क्लीन चीट' . त्या बिचार्या किरीट सोमैय्यांची अस्वथा काय होत असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. BJP leader Kirit Somaiya accuses Maharashtra minister Hasan Mushrif of Rs 127-crore corruption kirit https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/somaiya-accuses-minister-mushrif-of-over-100-cr-corruption/articleshow/86178643.cms?from=mdr पुलवामा असो ,उरी असो वा आताचे ऑपरेशन सिंदूर, भाजपा नेत्यांबद्दल नेहमीच संशय निर्माण होतो.

कंजूस 02/07/2025 - 17:17
सध्याचा प्रश्न आहे तो मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी. हिंदी विरोधी हा मराठी माणसाची अस्मिता असेलही आणि त्यांच्या रक्षणार्थ उद्धव आणि राज यांनी धावणे त्यांना योग्य वाटत असेल. पण हिंदीला टाळणे म्हणजे त्यांनी बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारली आहे. अमराठी लोकांच्या दृष्टीने ते विरोधक ठरले आहेत. आणि हेच लोक मुंबईत मतदार आहेत. बाकी आम्ही शाळेत हिंदी शिकतच होतो ते कांग्रेस, शिवसेना (उद्धव) यांचा मुंबईत दरारा असताना. तेव्हा त्यांनी विरोध केला नाही किंवा ही तिसरी भाषा कशाला बोलले नाहीत. उलट आदित्य ठाकरे एका चर्चा व्हिडिओत सांगतात की आजोबांचा ( बाळासाहेबांचा)आग्रह होता की अधिक भाषा शिका. म्हणजे तेही तोंडावर पडले आहेत. पाचवीपासून ऐवजी पहिलीपासून शिका याला विरोध एवढेच. आता " हिंदी कशी यशस्वीरीत्या परतली" याचा विजयोत्सव पाच जुलैला होणार आहे म्हणे ठिकठिकाणी. तर दिंडी का रांडा होणार ते लवकरच कळेल.

In reply to by कंजूस

चेन्नई,बेंगळुरु,हैद्राबाद,कोचीन,तिरुव्नंतपूरम येथेही हिंदी मातृभाषा असणार्यांची संख्या लक्षणिय आहे. मुंबईएवढी नसेल पण बहुतांशी शेठजी.व्यापारी गुजराती/मारवाडी आहेत. नोकर्या करणारे(आय टी वगैरे) उत्तर भारतिय आहेत. तिथे त्यांच्या तोंडातुन हिंदीचा'ह' निघत नाही. स्टॅलिन्/चंद्राबाबु नायडु सोडा, कर्नाटकातील भाजपाचे नेतेही "कन्नडिगानी हिंदी शिकावी" असे म्हणायची हिंमत करणार नाहीत. तिकडचे चॅनेलवालेही कोणी हिंदी बोलु लागला तर लगेच थांबवतात. खुद्द ए.आर. रेहमान हिंदीत बोलु लागला तेव्हा लगेच थांबवला होता.

विवेकपटाईत 03/07/2025 - 11:58
बहुतेक थोक मतपेटीसाठी उर्दू तिसरी भाषा लादायचा काहींचा मनसुबा आहे. त्यासाठीच हिंदीचा विरोध आहे. एकदा हिन्दी तिसरी भाषा झाली की उर्दू तिसरी भाषा म्हणून लादणे सहज शक्य होणार नाही.

जास्तीत जास्त कार्यकर्ते UPSC,MPSC कसे यशस्वीपणे कसे पुर्ण करतील याकडे आज लक्ष दिले तर उद्या त्यांचा महाराष्ट्र, मराठी माणसालाचभरपूर फायदा होईल. . आज उत्तर प्रदेश, बिहार,राजस्थान या राज्यातील सर्वात जास्त विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होत.आहेत. बाकी हिन्दी पाचवी पासून ठिक आहे.

कपिलमुनी 04/07/2025 - 09:59
मनसे विरुद्ध मोर्चा काढला आहे. नॉन मराठी मतांचे ध्रुवीकरण + मराठी मधली ५०% मते जरी मिळाली तर भाजप सहज निवडून येणार. गणित फिट्ट बसणार

कंजूस 05/07/2025 - 01:19
हेच होणार >> राज ठाकरे आणि उद्धव सेना पवार गट आणि काँग्रेस या चार दिशेला तोंड असलेली गाडी कोणत्या दिशेला ओढणार हे नेत्यांना कळणार नाही आणि जनतेला पटणार नाही.>> शिवाय राज आणि उद्धव एक झाले तर महाविकास आघाडीचं काय होणार? .

एकीकडे 'मराठी' विषयावरुन महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतांना काल पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी जय महाराष्ट्र आणि जय गुजरातचा नारा लावला. माणसं सत्तेसाठी आणि हुजरेगिरीसाठी कोणता स्तर गाठू शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण वाटलं. गुजराती समाजाच्या गुणांच्या आरत्या ओवाळाव्या लागल्या. गुजराती लोकांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली त्यामुळे मी जय गुजरात म्हणालो. गुजरात काय पाकिस्तानात आहे काय असे खुलासे मा. उपमुख्यमंत्र्यांना द्यावे लागत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरद पवार, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचेही जय कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश म्हणलेले vudioes आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 05/07/2025 - 22:53
थुंकलेले चाटावे ते राजकीय पक्षांनी.. पवार , चव्हाण , भुजबळ , राणे पवित्र करणे असो.. की पवार ठाकरे घरोबा असो. किंवा सध्याचा ठाकरे बंधुप्रेम असो... सब घोडे बारा टक्के

कंजूस 05/07/2025 - 20:45
हिंदीच्या ओक्टोपसने मराठीला केव्हाच विळखा घातला आहे. मुंबईत दोन अमराठी लोक भेटले तर ते मराठीत कशाला बोलतील? पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेली आणि आता जागे झाले.

अगदी १०१% राजकीय हेतूने प्रेरीत निर्णय होता असे वैयक्तिक मत. कदाचित तो निर्णय घेतानाच अंमलात येण्यापूर्वी तो मागे घ्यायचा असाच डाव असेल पण त्यातून ठाकरेंना मात्र अडकवायचे हा हेतू असेल. महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यावर होतील. मुंबई सोडून इतर महापालिका कोणाच्या ताब्यात आहेत याने फारसा फरक पडणार नाही. अनेक राज्यांपेक्षा मोठी आर्थिक उलाढाल असलेली मुंबई महापालिकाच सगळ्यात महत्वाची. नोव्हेंबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत उबाठा सेनेला पूर्ण राज्यात २० च जागा मिळाल्या असल्या तरी त्यातील १० मुंबईतील आहेत. मुंबईत तो गट प्रभाव राखून आहे हे नक्की. तसेच महापालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कनेक्ट आणि कार्यकर्त्यांचे जाळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक उपयोगाला येते. तिथे उबाठा गटाची ताकद आहे हे नक्की. तसेच अनेक नगरसेवक हे स्थानिक पातळीवरील स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर निवडून येतात. उबाठामध्ये अनेक दशकांपासून असलेले असे लोक आहेत. त्यांना मते मिळतात ती स्वतःची असतात- उबाठा पक्षासाठी मिळालेली असतीलच असे नाही. त्यामुळे विधानसभेत जसा स्वीप केला तसा महापालिका निवडणुकीत होईलच असे नक्कीच नाही. उलट महापालिका निवडणुक भाजपला या स्थानिक कारणांमुळे जड गेली तरी आश्चर्य वाटू नये. एकतर उबाठाला (पूर्वी पक्ष एकसंध होता तेव्हापासूनच) मराठी मतदारांची मते सगळी नक्कीच नाही पण मोठ्या प्रमाणावर मिळत आली आहेत. ती एकनिष्ठ मते भाजपकडे जाणार नाहीत. शिंदे त्यातील किती मते आणतात ते बघायचे पण मुंबईत शिंदे गटापेक्षा उबाठाची ताकद जास्त आहे असे वाटते. भाजपशी युती तोडल्यानंतर भाजपविरोधी अमराठी मते उबाठाकडे जाऊ शकली असती. तसेच बदललेल्या परिस्थितीत मुस्लिम मतेही जाऊ शकली असती- अजूनही जातील. अशावेळेस तो हिंदी सक्तीचा निर्णय आला. त्यानंतर मग ठाकरेंना त्याविरोधात भूमिका घेणे भाग झाले. त्यामुळे मग उबाठाकडे जी अमराठी मते अन्यथा गेली असती त्या मतदारांना संभ्रमात टाकले गेले. त्यात अपेक्षेप्रमाणे मीरा-भाईंदरला त्या दुकानदाराला मारहाण करण्यात आली. त्याविरोधात मोर्चा निघाला आणि तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल पण झाला. त्या दुकानदाराला बदडून २००३ मध्ये रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या बिहारी लोकांना बदडून केली तशीच चूक केली गेली आहे असे वाटते. त्या घटनेमुळे २००४ मध्ये उत्तर भारतीयांचे काँग्रेसकडे counter polarization झाले होते. तसे यावेळी व्हायला आपण होऊन त्यांनी मदत केली आहे. आणि ते पोलरायझेशन भाजपच्याच बाजूने होणार ही शक्यता जास्त. तसेच राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. समजा राज-उध्दव एकत्र आले तर मग उबाठाच्या मुस्लिम मतदारांमध्येही काही प्रमाणात चलबिचल होईल ही पण अपेक्षा असेल. तसेच कोणीही उसकावले की लगेच ते लोक तलवार उपसून अंगावर येतात. पण आपण असे डोके गरम करून काहीतरी करावे म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा फायदा होईल म्हणून आपला प्रतिस्पर्धीच आपल्याला उसकावत असेल, त्याच्या सापळ्यात आपण बळी पडायचे नाही तर आपले डोकं थंड ठेवायचे इतका विचार दोन्ही सेनावाले कधीच करत नाहीत. त्या केडियाला भाजपनेच 'मराठी बोलणार नाही जा....' असे वक्तव्य करायला सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. अपेक्षेप्रमाणे त्याच्या ऑफिसमध्ये तोडफोड झाली- खरं तर अशी तोडफोड त्यांनी करावी म्हणूनच मुद्दामून ते वक्तव्य केडियाने कशावरून दिले नसेल? केडिया बिल्डर आहे. जर ऑफिसमध्ये तोडफोड झाली आणि त्यातून ५-१० लाखाचे नुकसान झाले तरी त्याला ती रक्कम विशेष नाही. पण अशा घटना झाल्या की त्यातून मग अमराठी मतदारांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि काँग्रेस-उबाठा एकत्र असतील तर अमराठी मतदारांपुढे भाजप हा एकच पर्याय राहतो आणि अशी तोडफोड करून आपण त्या मतदारांना भाजपकडे ढकलत आहोत याचा विचार ते करणार नाहीत या अपेक्षेने- खरं तर खात्रीनेच केडियाला ते वक्तव्य द्यायला भाजपने सांगितले असले तरी आश्चर्य वाटू नये. बाकी महापालिका निवडणुकीत कोणीही निवडून आले तरी नगरसेवक आणि बिल्डर यांच्यामधील अभद्र युती कायमच राहणार आहे. शहरात अजून मोठे मोठे टॉवर उभे राहून पाणी वाहून नेणारे नैसर्गिक स्त्रोत बुजवले जाऊन दरवर्षी तेवढ्यात पावसात अधिकाधिक मोठे पूर येणारच आहेत. त्यामुळे आपल्या सामान्यांच्या आयुष्यात घंटा काहीही फरक पडणार नाहीये. तरीही उबाठासेनेचा माज उतरवायला त्यांचा पराभव व्हावा असे मला नक्कीच वाटते. नवे भाजपचे नगरसेवक आले की मग केडिया त्याचे जे काही तुटपुंजे नुकसान त्या तोडफोडीतून झाले असेल ते अधिक टी.डी.आर किंवा एफ.एस.आय मिळवून शेकडो पटींनी भरून काढेल. बाकी मराठी माणसासाठी सेनेने जे काही केले होते ते स्थानिय लोकाधिकार समितीने- त्याला ५० वर्षे झालीत आता. यांची मर्दुमकी फक्त मराठी बोलत नाही म्हणून फेरीवाले, इस्त्रीवाले वगैरे साध्यासाध्या माणसांना बदडण्यापुरतीच. मुंबईतील मराठी टक्का कमी होत होता, मराठी शाळा बंद पडत होत्या त्याविषयी त्यांनी काही भरीव काही केल्याचे ऐकिवात नाही. आता ठाकरेंनी परत एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरल्यावर या सगळ्या गोष्टी पुढे आणून त्यातील किमान काही मराठी मतदारांमध्येही चलबिचल निर्माण करायची संधी आता भाजपकडे आहे. फडणवीसांनी तेवढ्यापुरता हा एक निर्णय घेऊन उबाठांना सापळ्यात अडकवले असे दिसते. आणि त्यात नेहमीप्रमाणे मारहाण, तोडफोड करून ते त्या सापळ्यात चालत गेले असे वाटते. एकूणच जी मराठी मते उबाठाकडे अन्यथाही गेली असती ती तिथेच राहणार आहेत. पण अमराठी मते जी उबाठाकडे गेली असती त्यांना मात्र भाजपकडे जायचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटी कोणत्याही निवडणुकीत मते किती फिरतात यावरच निकाल बदलत असतो. या सगळ्या प्रकारात उबाठाकडे नव्याने किती मते येतील आणि विरोधात किती जातील हा हिशेब केल्यावर उबाठासाठी तो हिशेब ऋण असेल असे वैयक्तिक मत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही म्हणता तस खरंच झालं असेल तर एक प्रश्न पडतो की एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती? बरं समजा राज उद्धव यांनी हा मुद्दा उचलूनच धरला नसता तर पहिली पासून तीन तीन भाषा शिकवणार होते का? म्हणजे आपल्या राजकीय सोयीसाठी ६ वर्षाच्या मुलांचा वापर.

In reply to by रात्रीचे चांदणे

एवढं सगळं करण्यापेक्षा गेल्या सहा सात वर्षात मुंबईकरांचे जे काही प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला असता तर बरं झालं असतं की? त्यासाठी सगळ्या महाराष्ट्राला वेठीस धरायची कांय गरज होती?
याविषयी मला तरी काही सांगता येणार नाही. मी भाजप समर्थक आहे हे जगजाहीर असले तरी मी पक्षाचा प्रवक्ता नाही त्यामुळे त्यांनी एखादी गोष्ट केली तर ती का केली किंवा केली नाही तर का केली नाही याविषयी मी माझे तर्क मांडू शकतो- पक्षाची भूमिका नाही. बाकी स्थानिक पातळीवर सगळे चोर असतात. कोणत्याही पक्षाला स्थानिक पातळीवर खरोखरच काही करावे असे वाटते असे मला तरी वाटत नाही. आज मुंबईत काही शे ठिकाणी मोठमोठ्या टॉवर्सचे बांधकाम सुरू आहे. एकेक फ्लॅट तीन-चार कोटींचे आहेत. म्हणजे किती हजार कोटींची उलाढाल तिथे नुसत्या टॉवर्सच्या बांधकामात चालली आहे याची कल्पना करता येते. सध्या कोणाचा किती टक्के रेट आहे कल्पना नाही पण बर्‍यापैकी असावा. इतका मलिदा कोणी सोडेल याची खात्री सोडाच अपेक्षाही नाही. त्यामुळे असेच मोठेमोठे टॉवर बनत राहणार आणि पुढील तीसेक वर्षात मोठ्ठा पूर येऊन हे शहर बुडणार. त्यामुळे महापालिकेत कोणीही सत्तेत आले तरी त्यात बदल होईल याची मला तरी अपेक्षा नाही. राजकीय दृष्टीने तो निर्णय का घेतला असेल याविषयी वर लिहिलेच आहे. तसाही हा निर्णय यावर्षी अंमलात येणे कठीणच होते. एप्रिल-मे मध्ये निर्णय झाला आणि जूनपासून लगेच अंमलबजावणी तशीही सुरू होणार नव्हती. त्यामुळे समजा ठाकरेंनी थंड घेऊन भाजपचा पोपट केला असता तर मग सगळा धुराळा खाली बसल्यावर शांतपणे तो निर्णय मागे घेतला असता. त्यात आजच राजन विचारेंच्या कार्यालयात मराठी बोलले नाही म्हणून काही दुकानदारांना कानफाटवल्याचा व्हिडिओ ट्विटरवर बघितला. ते बघून फडणवीसांना मनातल्या मनात गुदगुल्या होत असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

कंजूस 06/07/2025 - 22:36
दुकानदारांना कानफाटवल्याचा जो प्रकार मनसेने चालवलाय त्याला कांग्रेसचा विरोधच असेल. पण आता सेना विकास आघाडीत आहे आणि त्यांनी राजला हात धरून आणल्यावर कासावीस झाले असतील. त्यामुळे मविआ फुटणार हे निश्चित.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निवडणूक निर्णयाकडे लक्ष ठेवून सगळ्या हालचाली. सापळे सगळेच लावतात. कोण आडकतय ते बघावे लागेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कपिलमुनी 06/07/2025 - 22:47
सुरुवातीला हा विचार मांडला तेव्हा लोकांना पटला नव्हता. आता हळूहळू त्याचे राजकीय परिणाम समोर येत आहेत. यात काँग्रेसची फरफट झाली. परवा सुळेंना पाठवून पवारांनी दोन्ही दगडांवर पाय ठेवायचा नेहमीचा प्रकार केला आहे. जिथे जास्त शिते तिथे ते जातील

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भाजप कार्यकर्ते, प्रत्येक गोष्टीत जी काही चूक घडेल किंवा घडले की त्याचं भविष्याच्या दृष्टीने कसा फायदा असतो, त्याला 'गोबरयुगात' केंद्रात 'माष्टर ष्ट्रोक' असे म्हणतात. तर इकडे महाराष्ट्रात फडणविसांचे डावपेच किंवा हे सगळं त्यांचं 'स्क्रीप्टे'ड प्रयोग आहेत, इतकं म्हटलं की, शाब्दिक पोचा-यांची गरज पडत नाही. खरी मेख अशी आहे की, दोघे ठाकरे बंधू एकत्र आले तर भविष्यात आपल्या सत्तेला किती हादरे बसू शकतील या कल्पनेनेच सध्या भाजप गटात अस्वस्था आहे. फडणविसांनी मराठी माणसाच्या विजयी मेळाव्याला 'रुदाली' म्हणने यात सगळं आलं. मुंबई महानगरपालिका ही रंगीत तालीम असेल. दोघांची युती झाली तर, मुंबई महानगरपालीकेत भाजपचा प्रवास अजूण कठीण होईल हे कोणीही सांगेल त्याला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. आता राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करतील का ? तर मला स्वतःला अशी काही युती महानगर पालिकेत जरी युती झाली तरी भविष्यात अशी युती अशी होईल असे वाटत नाही, दोघांची इच्छा असली तरी. सद्य भाजप सरकार आपल्या साम,दाम, दंड भेद या नितीचा वापर करुन या दोघा भावांना एकत्र येऊ देणार नाही हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. मनसे- जागा वाटप त्या त्या तालुक्यातील काम करणारे नेते कार्यकर्ते यांच्यातील दोन्ही पक्षातील मतभेद पुढे चव्हाट्यावर येतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे, महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात प्रभाव सोडला तर इतर जिल्ह्यात फारसा प्रभाव नाही. राज ठाकरे यांचे भाषण, विचार अगदी मार्मिक असतात. सभांना गर्दी होते पण निवडून येण्याइतकी त्यांची ताकद लागत नाही, त्याचं कारण इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडून येण्यासाठीचे प्रयत्न करणे, युती करणे, कार्यकर्त्यांची फौज बूथवर उभे करणे, निवडणूकांपूर्वी वातावरण करणे आणि इतर गोष्टीत सुरुवात जोरदार करुनही ते कायम मागे पडतात. मनसेला नाश्कातून महाराष्ट्रात इमेज बिल्ट करण्याची संधी होती पण ते झालं नाही. भाजप विरोधात राज ठाकरे यांनी पूर्वीच्या लोकसभेत भाजप विरोधात प्रचारात मुसंडी घेतली होती. 'लाव रे तो व्हीडीयो' म्हणून त्यांच्या सभा गाजल्या होत्या. पण पुढे ते भाजपच्या गळाला लागले आणि त्यांचा भाजप विरोध कमी होत होत त्यांच्या दावनीला ते गेले. भरवशाचं राजकारण करायचं तर, एकदा आपण स्थिरास्थावर होईपर्यंत थेट भूमिका व्यवस्थेविरुद्ध घेतली पाहिजे, नेमके यांचं राजकारण अशावेळी कच खातं आणि त्यांच्या वाट्याला अपयश येतं. मनसे, भाजपाच्या अमिषाला बळी पडणार नाहीत याची गॅरंटी नाही. सारांश, युती अवघड वाटते. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 06/07/2025 - 22:49
कोणी कितीही काही म्हणले तरी याचा डायरेक्ट फटका शिंदेंना बसणार आहे आणि फायदा भाजपला.. देवाभाऊचे पत्ते फिट बसत आहेत..

एक गोष्ट कळत नाही. इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही. तरीही तोंडदेखल्या ते दोन मुद्दे त्यांचे होते. मग त्यांना एका कृतीतून दोन्ही मुद्दे रेटता येतील अशी नामी संधी होती. पूर्ण भारतात काही लाख/कोटी बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यापैकी काही हजार/लाख मुंबईत राहतात हे मी अगदी शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे. २०११ मध्ये माझे ऑफिस महालक्ष्मी स्टेशनजवळ फेमस स्टुडिओच्या शेजारी होते. तिथे जायला मी रे रोड या हार्बर लाईनच्या स्थानकात उतरून १६४ नंबरची बस पकडून जायचो. रे रोड स्टेशनच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे ती बांगलादेशींनी भरलेली आहे हे उघड गुपित होते. कधी आयुष्यात अंघोळ न केलेले अंगाला वास मारणारे ते घाणेरडे बांगलादेशी बसमध्ये आजूबाजूला वावरायचे त्याची किळस यायची. पण करता काही यायचे नाही. कारण माझ्यासारखे लोक मारामारी करू शकत नाहीत. पण उबाठावाल्यांचा मारामारी करण्यात पहिल्यापासूनच हातखंडा होता. मग मुंबईत जिथेजिथे बांगलादेशी आहेत तिथेतिथे जाऊन त्यांना बदड बदड बदडून मुंबई आणि देश सोडून जायला त्यांना भाग पाडायची नामी संधी त्यांच्याकडे होती. त्या बांगलादेशींना कायदेशीरपणे हाकलता येणे फारच कठीण आहे कारण त्यांनी पैसे चारून सगळी डॉक्युमेन्ट्स बनवून घेतली आहेत. त्यांना हाकलायचा एकच उपाय म्हणजे हा- उठता लाथ बसता बुक्की असे करत बदड बदड बदडायचे आणि इथे राहायलाच नको असे वाटणे भाग पाडायचे. तसेही ते लोक मराठीभाषिक नाहीत, भारतीय नाहीत आणि हिंदूही नाहीत. मग असे बांगलादेशींना बदडून उबाठासेनेचे मराठी आणि हिंदुत्व हे दोन्ही मुद्दे साध्य झाले नसते का? तसे झाले असते तर मग मी अगदी आजन्म उबाठासेना समर्थक झालो असतो. भाजपवाल्यांना मारामारी जमत नाही त्यामुळे ते काही बांगलादेशींना हाकलणार नाहीत पण उबाठावाल्यांनी हाकलले असते तर पूर्ण देशावर आणि मुंबईवर कधी न फेडता येतील असे उपकार त्यांनी करून ठेवले असते. पण कुठचे काय- त्यांची मर्दुमकी फक्त युपीतून आलेले फेरीवाले, इस्त्रीवाले, दुकानदार वगैरे हातावर पोट असलेल्या साध्यासाध्या लोकांविरूध्दच. आणि त्यातील बरेचसे हिंदूच असावेत असे म्हणायला जागा आहे. आणि हे यांचे हिंदुत्व.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इतकी वर्षे उबाठासेनेने मराठी आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे तोंडदेखले लावून धरले होते. या दोन्ही मुद्द्यांशी त्यांचा खरा संबंध नव्हताच याविषयी मिपावर अनेकदा चर्चा झाली आहे तेव्हा त्याविषयी परत लिहित नाही.
अजिबात लिहू नका, असे वाटते. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. हिंदूत्ववादी संघटना म्हणूनच स्व.बाळासाहेब ठाकरें यांच्या शिवसेनेची ताकद होती. भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. 'जेवायला ताट द्यावे, पण बसायला पाट देऊ नये' अशी म्हण आहे. ताट आणि पाट दोन्ही दिल्यामुळे भाजप डोईजड झाली. महाराष्ट्रातून हिदुत्ववादी म्हणजे आम्हीच अशी इमेज शिवसेनेची कमी होत गेली. आणि भाजपचं फावलं अर्थात हिंदुत्ववाद्यांचा आणि धर्माचा वापर केवळ मतांसाठीच उपयोग होतो. स्पेशल हिंदूमाणसासाठी रुपयाचा फायदा नाही, हे मागील लोकसभेत लोकांच्या लक्षात आलं आहेच. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:09
सर्वप्रथम महाराष्ट्रात 'गर्व से कहो हम हिंदू है' चा नारा स्व.बाळासाहेब ठाकरेंनी लावला. मुदलात खोट आहे. गर्व से कहो हम हिंदू है' हा नारा बाळ ठाकरेंचे बाळासाहेब होण्याच्या अगोदर पासून विश्व हिंदू परिषदेने लावलेला आहे कोणताही क्लेम साहेबांसारखा बाळासाहेबांच्या नावावर खपवला जातो. बाकी "तुमचं" चालू द्या

In reply to by सुबोध खरे

शिवसेनेची स्थापना झाली १९६६ मध्ये. बाळासाहेबांनी १९८७ पर्यंत हिंदुत्व मधील हिं पण उच्चारला नव्हता. मराठी मराठी करून फार तर मुंबईत काही नगरसेवक निवडून आणता येतील पण त्यापलीकडे जायचे असेल तर मराठी मुद्दा उपयोगाचा नाही हे लक्षात आल्यावर. १९८० च्या दशकात देशात हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. १९८२ मध्ये मदुराईला धर्मांतरे झाली त्याचे पडसाद सगळीकडे उमटले. १९८४ पासून संघ परिवाराने राममंदिर मुद्दा लावून धरायला सुरवात केली. मग शहाबानो आणि अयोध्येत कुलूप उघडणे यातून हळूहळू हिंदुत्वाचे वारे वाहायला सुरवात झाली होती. ती वेळ हेरून मग बाळासाहेबांनी १९८७ मधील पार्ल्याच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाचा उच्चार केला - पक्षाची स्थापना झाल्यानंतर २१ वर्षांनंतर. तोपर्यंत मराठी हाच मुद्दा त्यांचा होता. आणि मराठी हा मुद्दा म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे काम होते त्यातून अनेक मराठी तरुणांना नोकऱ्या लावल्या. अन्यथा मराठी पाट्या, बेस्टची तिकिटे मराठीत छापा यापलीकडे लोकाधिकार समितीप्रमाणे फार विधायक कामे मराठी माणसांसाठी नव्हती. म्हणजे या सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सेनेचे हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे फारच कुचकामी होते.' पण शिवसेनेचे दोन्ही मुद्दे मान्य झाले तर. शिवसेनेने मराठी माणूस आणि मराठी विषय घेवून राजकारण केले हे तरी मान्य झालं. मराठी माणूस आणि मराठी भाषा, मराठी माणसाला रोजगार दिला यात शिवसेना होती. शिवसेनेने 'गर्व से कहो हम हिंदू'चाही नारा महाराष्ट्रात दिला. मराठी भाषा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपा महाराष्ट्रात कुठे होती एवढे सांगा आता. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 08/07/2025 - 10:53
भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले. काय सांगताय? भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. आणि त्यानंतर सलग पहिल्या पाच लोकसभांमध्ये त्यांना मिळणाऱ्या जागा ३,४,१४,३५ आणि २२ अशा आहेत. आणीबाणीत जनता पक्षात विलीन झाल्यानंतर नव्या अवतारात भाजप आला तेंव्हा १९८४ साली २, नंतर १९८९ साली ८५ आणि त्यानंतर गेली ३५ वर्षे तीन आकड्यात खासदार निवडून येत आहेत. शिवसेनेचा पहिला खासदार १९८९ साली निवडून आला आणि केवळ १९९६ साली भाजप बरोबर युती केल्या वर शिवसेनेला ११ खासदार निवडून आणता आले. अन्यथा दोन आकड्यात खासदार नाहीत कि तीन आकड्यात आमदार काही निवडून आणता आले नाहीत. बेडकीने किती वल्गना केल्या तरी तिचा बैल होत नाही. तेंव्हा "तुमचं" चालु द्या

In reply to by सुबोध खरे

भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली त्यानंतर त्यानंतर त्यांचं इकडे तिकडे आणि तुकडे वगैरे पडले. नवा 'भारतीय जनता पार्टी' नावाचा पक्ष स्थापन व्हायला १९८० उजाडला. स्व.बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापना झाली १९६६ ला. कोणता पक्ष मोठा आहे, वयाने एवढेही कळत नसेल तर बोलणे खुंटले. -दिलीप बिरुटे

भाजपने सेनेचं बोट धरुन महाराष्ट्रात पाय रोवले.
याविषयी मिपावर यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या प्रतिसादांमध्ये लिहिले आहे. त्यातील एक तरी मुद्दा चुकीचा आहे हे सिद्ध करता येईल का? १. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनसंघाला पूर्ण देशात ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी अर्ध्या- म्हणजे दोन जागा आताच्या महाराष्ट्रातून आल्या होत्या. त्या होत्या- रत्नागिरीतून प्रेमजीभाई असर आणि धुळ्यातून उत्तमराव पाटील. तेव्हा शिवसेनेचा जन्मही झाला नव्हता. ज्या काळात काँग्रेसच्या नावावर दगडही निवडून यायचा त्या काळात एका राज्यातून दोन लोकसभेच्या जागा जिंकणे ही तितकी सोपी गोष्ट नव्हती. ती जनसंघाने केली होती. २. १९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती? ३. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती? या जागा राज्याच्या वेगवेगळ्या भागात होत्या हे लक्षात घ्यायला हवे. ४. जनसंघाने महाराष्ट्रात १९६७ च्या निवडणुकांमध्ये ४, तर १९७२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ५ जागा जिंकल्या होत्या. भाजपची स्थापना झाल्यावर १९८० आणि १९८५ मध्ये अनुक्रमे १२ आणि १६ जागा जिंकल्या होत्या. त्याउलट शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षांच्या काळात महाराष्ट्र विधानसभेत फक्त चार आमदार निवडून आणले होते आणि ते सगळे मुंबईतूनच होते. मुंबईबाहेर त्यांची ताकद शून्य होती. ते चार आमदार होते- १९७० मध्ये परळमध्ये पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक, १९७२ मध्ये विधानसभा निवडणुकीत गिरगावमधून प्रमोद नवलकर, १९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझगावमधून छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत पार्ल्यातून रमेश प्रभू. तुलनाच करायची झाली तर २०२२ मध्ये एकाच निवडणुकीत केजरीवालांच्या आपने दिल्लीतून येऊन गुजरातच्या वेगवेगळ्या भागात मिळून ५ जागा जिंकून दाखविल्या होत्या. आणि शिवसेनेने १७ वर्षात तब्बल चार आमदार आणि ते पण सगळे मुंबईतून. ५. १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे नेते भाजपच्या कमळ या चिन्हावर लढले होते. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह १९९० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाले. ते पण का मिळाले? तर १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर विद्याधर गोखले मुंबईतून लोकसभेची जागा जिंकले- भाजपशी युती असताना. १९८९ मध्ये शिवसेनेचे इतर तीन खासदार निवडून आले होते- वामनराव महाडिक, औरंगाबादमधून मोरेश्वर सावे आणि परभणीतून अशोक देशमुख. त्यांना तर निवडणुक आयोगाने शिवसेना या पक्षाच्या नावावर निवडणुक लढूही दिली नव्हती आणि ते अपक्ष म्हणून निवडणुक लढले आणि जिंकले. १९८५ मध्ये छगन भुजबळ जिंकले ते मशाल या चिन्हावर. १९८५ च्याच महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सगळ्या वॉर्डांमध्ये एकच चिन्ह नव्हते त्याचे कारण केंद्रीय निवडणुक आयोगाने कोणतेही चिन्ह तेव्हा शिवसेनेला दिलेच नव्हते त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठीही एकच चिन्ह शिवसेनेच्या उमेदवारांना नव्हते. आणि असल्या पक्षाने महाराष्ट्रात भाजपला मोठे केले. घंटा.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आणि मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले. १९७० पासून त्याची सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली. पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही. महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं. कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेबांकडे युतीची भिक मागितली. स्व. बाळासाहेबांनी भाजपाला भिक द्यायच्या ऐवजी जेवणाचं ताट आणि पाट दोन्हीही दिले आणि इथेच घाताला सुरुवात झाली. दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे. शिवसेनेने भाजपाला बोट दिलं नसतं तर महाराष्ट्रात भाजपा एव्हाना भिकेला लागला असता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुंबईत शिवसेनेची स्व. बाळासाहेबांनी १९६६ ला स्थापना केल्यानंतर, पहिल्या चार पाच वर्षात चार-पाच आमदार निवडून आले.
कोणते चार-पाच आमदार हो? कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते?
भारतीय जनता पार्टीची स्थापना १९८० झाली.
भाजप हाच पूर्वाश्रमीचा जनसंघ होता हे तुमच्यासारख्या झंटलमन प्रा.डॉ ना माहित नाही?
पहिल्या काही काळात दहा-पंधराच्या वर कधी भाजपाच्या आमदारांची संख्या गेली नाही.
बरं मग? आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती ३५ खासदार- १९६७ मध्ये. सुरवातीला असाच संघर्ष करत, झगडत भाजप आज आहे तितका मोठा झाला आहे. पण शिवसेनेने १९७० ते १९८७ या १७ वर्षात केवळ चार आमदार निवडून आणले होते हे माझे म्हणणे खोडून काढून दाखवा आधी.
महाराष्ट्राच्या भूमीत कधीच भाजपाला पोषक वातावरण नव्हतं.
तसंच गुजरातमध्ये नव्हते, कर्नाटकात नव्हते, त्रिपुरात नव्हते, हरियाणात नव्हते. अनेक राज्यांमध्ये नव्हते. आज गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. त्रिपुरात दोन विधानसभा निवडणुका सलग भाजपने जिंकल्या आहेत. कर्नाटकातही पक्षाचे सरकार पूर्वी होते. लोकसभेत राज्यात २८ पैकी २५ जागा जिंकण्यापर्यंत पक्षाने मजल मारली आहे. या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने इतकी मोठी मजल मारलीच ना? मग पूर्वी कधीतरी भाजपला पोषक वातावरण नव्हते याचा नक्की काय रेलेव्हन्स आहे?
कॉंग्रेस आणि विविध पक्षांया काळात भाजपाला महाराष्ट्रात कुत्रही विचारत नव्हतं.
जसं काही शिवसेनेला हत्ती-घोडेच पालख्या घेऊन आले होते विचारायला. हॅ हॅ हॅ
दहा पंधराच्या पुढे कधीही न गेलेल्या भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदा स्व. बाळासाहेबांच्या हिंदूत्व आणि मराठीच्या युतीला १९९० ला भाजपाच्या विधानसभेच्या जिंदगीत ४२ जागा पहिल्यांदा मिळाल्या तेव्हाही स्व.बाळासाहेबांच्या बुलंद तोफेमुळे शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या हा महाराष्ट्र विधानसभेचा इतिहास आहे.
हे टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या २ जागांवरून ८६ जागांपर्यंत मोठी उडी मारली होती. तेव्हा महाराष्ट्राबाहेर कोणते बाळासाहेब मदतीला होते? त्या काळात रामजन्मभूमी आंदोलन तापले आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला. बरं १९९० मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली त्याचवेळेस गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातही विधानसभा निवडणुक झाली होती. इतर राज्यांमध्ये भाजप पूर्वीच्या तुलनेत कुठे गेला हे माहित आहे का? गुजरातमध्ये ११ वरून ६७, मध्य प्रदेशात ५८ वरून २२०, राजस्थानात ३९ वरून ८५ तर हिमाचल प्रदेशात ७ वरून ४६. त्या राज्यांमध्ये कोणते बाळासाहेब मदतीला आले होते? १९९० मध्ये महाराष्ट्रात भाजपने २८८ पैकी ११४ जागाच लढविल्या म्हणून ४२च निवडून आल्या. शिवसेनेला १७४ जागा द्यायची अवदसा आठवली नसती तर स्वबळावर ७० पर्यंत जागा तेव्हाच भाजपच्या आल्या असत्या असा माझा दावा आहे. कारण इतर राज्यांमध्ये भाजपने तशीच मोठी उडी मारली होती. ती महाराष्ट्रात मारता आली नसती असे म्हणायला काहीही कारण नाही. तरीही तुमचा मुद्दा असेल की शिवसेना बरोबर होती म्हणून भाजप १६ वरून ४२ वर गेला तर मग त्यावर माझे काऊंटर आर्ग्युमेंट हे की भाजप बरोबर असल्यामुळे शिवसेना २ (१९८५ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकलेले छगन भुजबळ आणि १९८७ मध्ये पोटनिवडणुकीत जिंकलेले रमेश प्रभू) वरून ५२ वर गेला. जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. नाही झेपायचे तुम्हाला. तुम्ही आपले कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय वगैरे विषयांमध्ये रमता तेच ठीक आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अरेरे, आवरा. >>>> आणीबाणीपूर्वी जनसंघाची सर्वोत्तम कामगिरी लोकसभेत होती. विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे.. >>> टिपीकल वागळे छाप आर्गुमेन्ट झाले. शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात. >>>> १९८४ ते १९८९ या काळात भाजपने राष्ट्रीय पातळीवर लोकसभेच्या.... पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे. >>> जाऊ द्या प्रा.डॉ. असल्या निवडणुकीच्या आकड्यांवर माझ्याशी चर्चा करायला येऊच नका. =)) गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले. -दिलीप बिरुटे

विषय महाराष्ट्र भाजप आणि शिवसेनेचं बोट धरुन मोठं झालेल्या भाजपाचा सुरु असतांना. लोकसभेचा आणि वाटचालीचा काय संबंध आहे..
कसं आहे-महाराष्ट्रात काय झाले याची आकडेवारी वरील प्रतिसादात दिली होती ती तुम्हाला समजली नसावी म्हणून मग इतर राज्यातील आणि लोकसभेतीलही द्यावी लागली.
शिवसेनेबरोबारच्या युतीमुळेच दहा पंधराचे ४२ झाले हे मान्य होत नसल्यामुळे 'भक्तछाप' विधाने करावी लागतात.
या म्हणण्यात थोडेही तथ्य नाही हा माझा मुद्दा मी अनेकवेळा मांडला आहे. परत मांडणार नाही.
पुन्हा तेच लोकसभेचं तुणतुणे एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना होऊनही महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय मजल मारू शकले नाही हे जगमान्य आहे.
घंटा
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत चारीमुंड्या चीत झालेली भाजपची आपली आकडेमोड़ पाहिलेली आहे, त्यामुळे आपल्या शाब्दिक पोचा-यांच्या चर्चा अजिबात वाचत नाही.
ते आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. बाकी माझ्या शाब्दिक पोचार्‍यांच्या चर्चा वाचत नसाल तर मग प्रतिसाद द्यायला का येता? याचा अर्थ एक तर तुम्ही खोटं बोलत आहात- म्हणजे तुम्ही ज्याला शाब्दिक पोचारे म्हणता ते वाचता इतकेच नव्हे तर त्याच पोचार्‍यांमधील एकेक वाक्य उधृत करून त्याला प्रतिसादही देता. तसे असेल तर मग वाचत नाही असे खोटे का बोलता? तुमच्या विद्यार्थ्यांना पण असेच खोटे बोलायला शिकवता का? समजा तुम्ही खोटं बोलत नसाल- म्हणजे माझे शाब्दिक पोचरे वाचत असाल तरीही वाचत नाही असे लिहित असाल तर मग कदाचित तुमची मराठी भाषेची समजच कमी असावी. कोणी दिली तुम्हाला मराठीत पी.एच.डी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं बोट धरुन भाजप कसा मोठा होत गेला त्याची आठवण म्हणून सांगावे लागले.
मराठी वाचता येत नाही वाटतं. >>>>आकडे माझेच नाही तर सगळ्याच पोलवाल्यांचे चुकले होते. म्हणूनच शाब्दिक पोचारे म्हणालो. =)) बाकी, चालू दया... =)) -दिलीप बिरुटे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुबोध खरे 08/07/2025 - 19:10
@ चंद्रसूर्यकुमार कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतंय याच चालीवर आता कुठे त्या बिरुटे मास्तरांच्या नादाला लागताय? असे म्हणण्याची वेळ त्यांनी आणली आहे. बहिऱ्या माणसाला जोरात ओरडून बोलल्यास समजते किंवा ओठाच्या हालचालीने तो समजून घेतो. पण बधिरपणाचा आव आणणाऱ्याला तुम्ही कानाशी बोम्बल्या (लाऊडस्पिकर) लावलात तरी ऐकू येणारच नाही. तेंव्हा सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

बहुतेक वेळा तेच करतो पण माझ्याच प्रतिसादाला उत्तर द्यायला आले तर कधीकधी दखल घ्यावी लागते. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून पहिल्या चार-पाच वर्षांत नक्की कोणते ४-५ आमदार आणि कोणत्या मतदारसंघातून निवडून आणले होते हे त्यांनी चुकूनमाकून लिहिले तर पुढचे बघू. अर्थात ते त्यांना लिहिता येणार नाहीच कारण मुळात तसे कोणीही आमदार निवडून गेलेच नव्हते. आणि कोणती कोणती काल्पनिक नावे पुढे आणली तर मग निवडणुक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील नावे त्यांच्या तोंडावर फेकून मारून त्या थापा आहेत हे जगजाहीर करायला मला तो प्रतिसाद लिहायला लागेल तितकाच वेळ लागेल :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेची स्थापना १९६६ ला झाल्यावर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला ढाण्या वाघ होता वामन महाडिक १९६९-७० पोटनिवडणुकीत एवढ्यात विसरले का ? भाजपचा महाराष्ट्रात जन्मही झाला नव्हता.. आपल्या शाब्दिक पोचा-यांवर भरवसा तसा नाहीच म्हणून लिहिते राहावे लागते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्या पाच सहा वर्षाच्या आत शिवसेने वामन महाडिक आणि प्रमोद नवलकर दोन आमदार दिले. आता चार कुठे दिले त्या शब्दावर आडून राहा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर यूती केली म्हणून भाजपच्या आमदारांची संख्या वाढली. ओसरी दिली नसती तर, भाजप कधीच शिरजोर झाला नसता. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो वामनराव महाडिक आणि प्रमोद नवलकर ही नावे मीच वर दिली आहेत. तीच वाचून परत मलाच काय देताय? की स्वतःचे विश्लेषण काहीही न करता ढापाढापी करायची सवय आहे ? तुम्हाला निवडणुकांच्या इतिहासातील घंटा काहीही माहिती नाही तर मग ती झाकली मूठ ठेवावी हो. आपले अज्ञान असे जगजाहीर का करत आहात? आणि परत परत तेच तेच पालुपद -बाठांमुळे भाजप वाढला चालू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये त्या काळात भाजप वाढला तसाच तो महाराष्ट्रातही वाढतच होता. उलट शिवसेनेशी युती करायची चूक केल्यामुळे वाढीला मर्यादा आल्या. बाकी तुम्ही माझे शाब्दिक पोचारे वाचत नाही नाही असे म्हणत बरेच वाचता की. मग खुलेपणाने कबुल करा की. बाळासाहेब दिलदार होते ना? की उध्दवसारखा कुचकटपणा आणि खत्रुडपणा तुम्हाला अधिक भावतो?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

शिवसेनेबद्दल जालावर ढिगभर माहिती पडलेली आहे, आपले 'शाब्दिक पोचारे' म्हणजे काही जगातलं पहिलं ज्ञान नसतं, नाही. आपल्याकड़े असलेली माहिती मिळवलेलीच असते. असलेल्या माहितीवर विश्लेषण व्यक्तिगणिक चूक बरोबर असते. आपण काही त्या काळातील प्रत्यक्ष साक्षीदार नसतो. आपले काही विशेष संशोधनही नसते. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणावर सर्व माहिती सर्वांना उपलब्ध आहे, राजकारणातील आपल्यालाच फार कळते,असेही अजिबात समजू नका. उन्नीस बीस सगळेच जाणते असतात. आपल्या सारखे भक्त सगळीकडेच असे उथळ माथळ करीत असतात त्यामुळे उगा आपल्याला राजकारणातली फार समजते असेही समजू नये असे वाटते. बाकी, लोकसभेच्या विश्लेषणात आपलं राजकारण आणि विश्लेषणातील घण्टागाडी उलथी-पालथी पाहिलेली आहे, तेव्हा उगाच शेखी मिरवू नका. =)) थेट, निर्भीड दिलादार स्व. बाळासाहेब कायम आवडले. -दिलीप बिरुटे

काल मुंबई मराठी माणसाचा एकत्रीत असा महामोर्चा निघाला. 'हिंदीसक्ती'च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना एका मिठाईविक्रेत्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मंगळवारी मोठ्या संख्येने मराठीजन मिरा-भाईंदरच्या रस्त्यावर उतरले. सुरुवातीला मोर्चाची परवानगी नाकारण्यासह पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईमुळे तणाव निर्माण झाला. मात्र, नंतर पोलिसांनी मवाळ भूमिका घेतल्याने हजारोंच्या संख्येने मराठीजनांनी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. एकूणच मराठी भाषा, मराठी माणूस विरुद्ध अमराठी असे वातातवरण धुसमुसायला लागले आहे. मराठी भाषा आणि मराठी माणूस राजकारणासाठी जरी विषय असला तरी येत्या काळात हे मुद्दे अधिक तीव्र होतील असे वाटते. भाषिक मुद्याची तीव्रता कमी करण्यासाठी हिंदू धर्म खतरेमेचं पिल्लू सोडून मराठी भाषा, मराठी माणूस यात दूही माजवण्याचं षडयंत्र सुरु होईल. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 09/07/2025 - 11:39
मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. कुठे रुग्णवाहिका उपलब्ध करून दे किंवा रिक्षात हरवलेलय गोष्टी मिळवून दे सारख्या ताबडतोब दिसणाऱ्या गोष्टी सोडल्या तर. त्या मानाने शरद पवार विखे पाटील पतंगराव कदम सारख्या नेत्यांनी साडे तीन का होईना जिल्ह्यांत सहकारी तत्त्वावर साखर कारखाने, सूतगिरण्या शिक्षण संस्था सारखे उद्योग सुरु करून स्थानिक मराठी माणसासाठी थोडी फार तरी कामे केली. मोर्चे काढणे, शक्तिप्रदर्शन करणे सोडून काही भरीव कार्य केले तरच शिवसेनेला काही भवितव्य आहे माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो. त्याच्या कडे ४० ते ५० कामगार काम करतात. आजतागायत केवळ मराठी माणसानाच त्याने कामावर ठेवले आहे. दांड्या मारणे, उत्सवासाठी चार दिवस गावी जाऊन परत येतो सांगून १० दिवसांनी उगवणे, लोकांकडून उसने पैसे घेऊन परत न करणे असे केले तरी अजून तरी त्याने भैय्या लोकांना कामावर ठेवलेले नाही. पण भूमिपुत्र म्हणून माज दाखवण्यापलीकडे मराठी कामगारांनी फार काही नाव घेण्यासारखे केलेले नाही. मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 09/07/2025 - 18:26
दुर्दैवाने हे खरं आहे. याच कारणांमुळे मराठा साम्राज्य अस्तास गेलं असावं असं मला कधीकधी वाटतं. पण नक्की सांगता येत नाही. -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

माझा भाऊ गेली ३५ वर्षे दोन कारखाने चालवतो.
आणि
मराठी म्हणून फार दिवस तो असे लाड करू शकेल असे वाटत नाही
खरे सर .दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटताहेत.

In reply to by सुबोध खरे

>>>>मराठी माणसाच्या नावाने राजकारण सोडले तर शिवसेनेने मराठी माणसासाठी काही भरीव केलेले मला तरी दिसले नाही. आपल्या मताचा आदर आहेच. स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या 'मार्मिक' मधील व्यंगचित्रापासून ते महाराष्ट्रातला सत्ता काळ हा मोठा कालखंड आहे. शिवसेनेने मराठी माणसांठी काय केले हा खरं तर एखादा 'खंड' होईल इतका तो लेखनाचा मोठा विषय आहे. एका शांत, संयमी व्यंगचित्रकाराचा प्रवास, मराठी माणूस ते शिवसेनेचा जहाल पक्षाकडे प्रवास कसा होत गेला. साठच्या दशकातील महाराष्ट्राचं राजकारण, मराठी माणसाच्या रोजगारासाठीच नव्हे तर, मराठी माणसाठी खासगी कंपन्यात आणि सरकारी नोक-यात आरक्षण मागणारा शिवसेना हा एकमेव पक्ष असावा. मराठी माणसाच्या मुद्याकडून हिदूत्वाकडे झालेला प्रवास. शिवसेना स्थापनेच्या अगोदरही मार्मिकमधून 'अमराठी' लोकांची यादी प्रसिद्ध करुन 'वाचा आणि थंड बसा' असे म्हणून मराठी माणसांमधे जनजागृतीच केली नाही तर, वाचा आणि उठा अशी हाक मारली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार कसा होत गेला. आपला पक्ष, राजकारण, पाठींबा देणे, नेते, बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कायम वेगळं राहिलं. चित्रपटसृष्टीवरही कसा दबदबा निर्माण केला. देशभर ठाकरेंचं कसं वलय होतं. गावखेड्यात गावोगावी शिवसेनेचे फलक असायचे. गावागावात भगवे उपरणे घालून कार्यकर्ते अभिमानाने शिवसैनिक म्हणून कसे मिरवायचे. बाळासाहेबांचे वक्तृत्व आणि त्यांचा एक मोठा वर्ग. मोठा विषय. शिवसेनेच्या राजकारणाच्या यश अपयशाची चर्चा होत राहील. पण भरीव काही दिसलं नाही, इतकं सहज बोलून शिवसेना पक्षाची बोळवण होऊ शकत नाही. पुस्तक वगैरे वाचत असाल तर, स्व. बाळ ठाकरेंवर, वैभव पुरंदरेचं एक चांगलं माहितीवजा पुस्तक आहे, कधी मिळालं तर नक्की वाचा. शिवसेनेचा सविस्तर प्रवास वाचायला मिळेल. मराठी माणसासाठी काय काय केलं आणि शिवसेनेचा पक्ष स्थापनेपासून ते त्यांचा राजकारणाचा प्रवास चांगला समजून घेता येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 16/07/2025 - 12:10
भरीव काही दिसलं नाही तुम्हाला भरीव काही दिसलं का? तसं असेल तर मांडा कि इथे. उगाच बोलाचीच कढी आणि बोलाचा भात कशाला

In reply to by सुबोध खरे

प्रिय काका. आज मुंबईत जो मराठी माणूस दिसतो त्याचं श्रेय शिवसेनेला दिलं पाहिजे. अमराठी लोकांच्या काळात मराठी माणसाला रोजगार दिला. मुंबैत शिवसेना बेरोजगार तरुणांना खासगी कंपन्यात नोक-या मिळाव्यात यासाठी तरुणांच्या नोंदवह्यात नोंद करुन तरुणांना, प्रशिक्षण, देऊन पात्रताधारक व्हावा म्हणून युवकांचे मेळावे, अभ्यासिका, फिस भरणे हे राजकीय पक्षाने केले त्याचं नाव शिवसेना. मराठी माणसाला अमराठींच्या भाऊगर्दीत जिथे जिथे रोजगाराच्या संधी नाकारली तिथे तिथे मराठी माणसाला नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मराठी माणसावर अन्याय अत्याचार तेव्हाही होत होता, त्यांच्यासाठी संघटन उभारले त्यांच्या हक्कासाठी लढा उभा केला. महाराष्ट्रातील माणूस एकजूट केला. गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. शिवसेनेची मार्गदेशक पाहिल्यावर मराठी माणसाला तो आपला पक्ष वाटला. महाराष्ट्रीयन उद्योगपतींनी मराठी माणसाला नोकरी द्यावी. वगैरे महाराष्ट्र गृहनिर्माण महामण्डलाची 80 टक्के घरे महाराष्ट्रातील माणसाला आरक्षित ठेवली पाहिजे ही मागणी केली. राज्यातील सरकारी नोक-या मराठी लिहिता वाचता येते त्याला मिळाली पाहिजे अशी मागणी केली पाठपुरावा केला. मराठी माणसाच्या हक्कासाठीच प्रस्थापित राजकारण्यांना शह देत ठाणे-मुंबई महापालिकेत यश मिळवले. सामान्य माणसांना अगदी वडा-पाव विकणा-यांना राजकारणात प्रतिनिधीत्व दिले. तळागाळातील लोकांचा आणि त्यातून आलेल्या सामान्य माणसाचाच पक्ष असतो हे पुढेही राजकारणात पहिल्यांदा शिवसेनेमुळेच घडले. एक ना हजार गोष्टी शिवसेनेच्या आहेत. कधीतरी त्यावर स्वतंत्र लेखन करीन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ शिवसेना म्हणजे मराठी माणूस, मराठी माणूस म्हणजे शिवसेना असेच एकत आलोय, नी जेव्हा जेव्हा मराठी किंवा मराठी माणसावर संकट आले तेव्हा शिवसेनाच उभी राहिली हे ही दिसलेय. कोवळ्या मुलांवर हिंदी लादण्याचा भाजपचा डाव उधळून लावला तो शिवसेना मनसे मराठी एकीकरण समिती ह्यांनीच! शिवसेनेचे चिन्ह घेऊन उभी राहिलेली खोटी शिवसेना ह्यावेळी उघडी पडली. शिवसेनेची सगळ्यात मोठी चूक म्हणजे भाजपला महाराष्ट्रात वाढवले, मातोश्रीवर येऊन पाया पडून, ११७ जागा “मागून” मागून मोठे झालेले पक्ष आता शिवसेनेवरच उलटलेत! भविष्यात सेनेने सावध राहावे व भाजपला लवकरात लवकर महाराष्ट्रातून उपटून फेकावे, व मुंबईत मराठी माणूस वा शिवसेना वाचवावी!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु 16/07/2025 - 15:29
मला शिवसेनेबद्दल फार राग-आणि लोभ नाही (त्यांच्या वैचारिक उड्या फार लांब पडत नाहीत). पण कुणी एक नांदगावकर नावाच्या शिवसैनिकाच्या क्लिप्स अधूनमधून फेबुवर बघायला मिळतात. त्यांचा जनता दरबार सेनाभवनात भरतो. सामान्य लुबाडले गेलेले गरीब लोक, विशेषतः ज्यांना पोलिसांकदून मदत होत नाही असे, त्यांच्या तक्रारी घेऊन येतात आणि हे गृहस्थ वेगवेगळे मार्ग अवलंबून न्याय, मदत मिळवून देतात. वसंत मोरे नावाचे गृहस्थ असेच धडक कारवाई साठी प्रसिद्ध आहेत. माझ्यामते हे खुप मोठे भरीव कार्य आहे...

In reply to by युयुत्सु

ते नितीन नांदगावकर आहेत, त्यांच्याकडे पोलिसदेखील समस्या घेऊन येतात. मागे एका पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता, त्या पोलीस हवालदाराने सगळीकडे हेलपाटे मारले पण काहीही झाले नाही शेवटी नितीन नांदगावकरांच्या एका फोनवर काम झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुक्या 31/07/2025 - 05:41
काय पण करतात लोक. त्यावर अजुन उदो उदो. व्यवथा चालयला हवी .. असली रिकाम्टेकडी थेरे फक्त भारतात चालतात. पोलिसाला बिल्डर घराचा ताबा देत नव्हता यात काय गोची होती? कोण कुणाची अडवणुक करत होते .. त्यावर रितसर खटला टाकुन व्यवस्थेवर सरळ करायचे सोडुन असल्या राजकारणी लोकांच्या आश्रयाला जाणे वर त्याचा उदो उदो करणे हे लोकशाही चे लक्षण नाही. असली कोणती चेकलिस्ट होती त्यात नांदगावकरांचा फोन आला तरच घराचा ताबा मिळेल असे लिहिले होते? व्यक्ती पुजा अजुन किती करावी ...

In reply to by सुक्या

तो खटला वर्षानुवर्षे चालला असता नी पोलिसाला असता नी बिल्डरने तोंडाला पाने पुसली असती. सिस्टीम जर स्ट्राँग असती तर का म्हणून नांदगावकरांकडे ते पोलीस आले असते? एका फोनवर काम झाले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 11:24
बिरुटे मास्तर आपण लिहिलेल्या बहुसंख्य गोष्टी ऐकीव आहेत त्यातून भरीव असे काहीही निष्पन्न झाले नाही हि वस्तुस्थिती. आमचे सर्व नातेवाईक मुंबईच्या सर्व विभागात विखुरलेले आहेत आणि आमचे आजोबा १९२५ साली मुंबईत मॅट्रिक झालेले आहेत आणि आमच्या चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. स्थानिक भूमिपुत्रांना हक्क मिळवून द्यायच्या जितक्या वल्गना केल्या त्याच्या १० % जरी काम झालं असतं तरी ते मी मान्य केलं असतं. रस्त्याच्या कोपऱ्यावरच्या जागा बळकावून तेथे शिववडापाव झुणका भाकर केंद्रे आपल्या शिवसैनिकांना ( अनधिकृत असली तरी ) मिळवून दिली ती त्यांनी परप्रांतीयांना विकून दौलत केली. याला तुम्ही भूमिपुत्रांसाठी लढा म्हणत असाल तर बोलणंच खुंटलं. एक तरी शिक्षणसंस्था ,उद्योग धंदा, रुग्णालय किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे दूरगामी काम केलेले दाखवता येईल का? कम्युनिस्टांची युनियन जाऊन शिवसेनेची युनियन आल्यामुळे कोणत्या कारखान्यात कामगाराला फायदा झाला हे सांगता येईल का? गिरणी कामगार संघटना ज्या कम्युनिष्टांच्या हातात होत्या तिथे मराठी भाषिक मराठी माणूस भेदरुन गेला अशा कम्युनिष्ट काळात भूमिपुत्रांसाठी चळवळ उभी केली. याला काही पुरावा? राष्ट्रीय मिल मजदूर संघ हि काँग्रेस प्रणित संघटना होती तिचा कम्युनिस्टांशी संबंध नाही. त्यांच्या जागी श्री दत्ता सामंत आले आणि गिरणी कामगार संपाची वाताहत झाली. निदान नीट माहिती घेऊन लिहीत चला आमचे वडील त्या काळात ३६ वर्षे एच आर मॅनेजर होते आणि एकंदर शिवसेनेच्या युनियनच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहोत. तेंव्हा तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

डॉ. खरे काका. नावडतीचे मीठ अळणी असते त्यामुळे तुम्हाला काहीही पचने तसे अशक्य आहे. शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला त्याचं थोडं वाचन करा. आपल्या प्रतिसादातील विधानं ही परस्पर विरोधी आहेत त्यामुळे आपल्याला समजून घेणे कठीण होत आहे, अर्थात वाढत्या वयात आणि वयपरत्वे असं होतं असतं आम्ही समजून घेतो. आपल्या मुंबईतील आदरणीय चार-पाच पिढ्यांकडूनही आपणास त्या काळातील योग्य माहिती मिळाली नाही असे दिसते. आपण गंभीरपणे माहिती घेतली असती तर, विविध पक्ष, कामगार संघटनेच्या काही गोष्टी, माहिती झाल्या असत्या. पण काही मुलं लहानपणी 'ढ' असतात पुढे त्यांचं कधी कधी एवढं भारी जमून जातं की आपल्याला त्याचं आश्चर्य वाटतं. बाय द वे, त्यांनी आपणास काही गोष्टी सांगितल्या नसाव्यात त्यामुळे त्याबद्दल काहीही माहिती नाही हे, लक्षात आले आहे. मुंबई हा कम्युनिष्टांचा बालेकिल्ला होता. शिवसेनेला आपली ताकद वाढवायची तर शिवसेनेला आपला संघर्ष कम्युनिष्टांशी करावा लागणार होता. शिवसेनेची आपली स्वतःची कामगार संघटना उभी केली पाहिजे हा बाळ ठाकरेंच्या मनात विचार आला आणि आणि त्यांनी ९ ऑगष्ट १९६८ रोजी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष होते दत्ताजी साळवी तर, सरचिटणीस होते अरुण मेहता. कम्युनिष्टांना विरोध करुन शिवसेनेने मराठी माणसाचा कसा फायदा करुन दिला आणि शिवसेनेला पक्ष म्हणून कसा फायदा झाला हाही मोठा विषय आहे. तर, पहिली गोष्ट विविध कारखान्यांमधे रिक्त जागांची माहिती शिवसेनेकडे यायला लागली. शिवसेनेच्या बेरोजगार तरुणांना माहिती मिळायला लागली. बाळ ठाकरेंनी शिवसेनेत रोजगार विनिमय केंद्र सुरु केलं. हा झाला रोजगाराचा पहिला भाग. दुसरा भाग विविध कंपन्यामधे भारतीय कामगार सेनेने आपली पाळंमुळं रोवण्यासाठी जी काही रणनिती आखली होती त्याबाबत मतभेद होतील पण त्यावेळच्या संघटनांना शह देण्यासाठी त्यांची भूमिका योग्यच अशी होती. बाकी आपलंही चालू द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 23/07/2025 - 18:38
या सगळ्या फापटपसाऱ्यात शिवसेनेने मराठी माणसासाठी ठोस असं काय केलं ते लिहायला विसरलात. आणि कम्युनिस्टांना विरोध केल्यामुळे मराठी माणसाला कसा काय फायदा झाला बुवा? शिवसेनेचा कम्युनिष्टांशी संघर्ष कसा केला याचा सामान्य माणसाशी काय संबंध एक डांबरट काढून दुसरा आणल्यामुळे काय होतं? बाकी आपण वैयक्तिक पातळीवर उतरलात म्हणजे आपली चिडचिड होत आहे हे स्पष्ट आहे. मुळात नीट न वाचता प्रतिसाद लिहिल्यामुळे पितळ उघडं पडलं कि अशी चिडचिड होते असू द्या चालायचंच

सौन्दर्य 09/07/2025 - 23:30
मुंबईत मला वाटते शिवसेनेनी स्थानीय लोकांच्या रोजगारासाठी झुणका-भाकर केंद्रे उघडली होती, परंतु पाचएक वर्षांतच त्यांची मालकी दक्षिण व उत्तर भारतीयांकडे गेली. झुणका - भाकरी लुप्त होऊन त्या ठिकाणी वडा - सांभार, इडली - डोसा, पाणीपुरी वगैरे मिळू लागली होती. आता ह्याचे श्रेय कोणाला द्यायचे किंवा खापर कोणावर फोडायचे हे मिपावरचे जाणकारचं सांगू शकतील .

देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राला पहिली पासून हिंदी शिकवायचीच आहे असं दिसतंय. अत्ता समितीला पुढे करून निर्णय घेतला जाईल. बचवासाठी ते ठाकरे आणि इंग्रजीचा आधार घेत आहेत. ह्यांची स्वतः ची मुलगी इंग्रजी मिडीयम मध्ये होती.
तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

हिंदी सक्तीबद्दल

आकाश खोत ·

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.