पांडुरंग पांडुरंग

लेखनविषय:
काव्यरस
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तुच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... तुझ्या कल्पनेने जीव उताविळ होतो दश इंद्रियांनी देह मोहरून गातो "पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग" विनवितो तुला तुझ्या चाकरीत घे रे॥२॥ पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे... भक्तिगीत --कौस्तुभ http://www.facebook.com/AseSphuraveGeet

मेटामॉर्फिसीस

लेखनविषय:
काव्यरस
मी. माझ, मला.... असा पिळदार रेशमाचा भक्कम कोष गुंफायचा स्वत:भोवतीच अन विणायची स्वप्न लपेटदार पंखांची सुरेख रंगावलीन माखलेल्या आयुष्याची. यांन द्याव, त्यानं करावं. शिवाजींन सदाच शेजारी जन्माव. मी मात्र माझ्या कोषात मग्न मनी मानसी पंखांची स्वप्न पण विसर मुख्य मुद्द्याचा स्वत:ला झोकून द्यायचा कुठे एक बोच नको माझ्या पुरती आंच नको कशी लाभावी देण पंखांची जर न सुटती कोषाच्या भिंती? असेलच बदलायचं तर बदल स्वत:ला धुडकाव पहिलं आपल्याच मताला. तरच अपेक्षांना फुटतील पंख सोस क्षणिक दु:खाचा डंख मग होशील मुक्त तू घ्याया भरारी फुटतील आशा दुज्या जीवांना काटेरी सोड आस या रेशीम कोषाची जग असा क्षणभरी की

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

लेखनविषय:
काव्यरस
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या

पंख

लेखनविषय:
काव्यरस
मि पसरून पंख माझे , देईन सखे उबारा.. हा पावसाचा इशारा..अन धुंद जरी वारा.. तु असताच सोबत , नाही तमा ग कसली.. बेभान बरसूदे ह्याला , तुझ भिती कसली ग असली.. क्षण क्षण होऊदे चिंब , अन गात्रात मुरुदे थेंब. भिजल्या पंखात माझ्या , जरा मिटवून घे ते अंग.. थांबेल हा वेडा , तू धिर जरासा घे ग. सर ओसरेल आता , चोचीत थेंब घे ग. ना येइल कधी हा क्षण , परतून पुन्हा आयुष्यात, बघ थांबेल पाऊस आता , मग परतूया घरट्यात..

परधीन

लेखनविषय:
काव्यरस
चौकोनी मावेल कसे मज सांग पिंजले असे पिसे अवशेष विखुरल्या लाटांचे वाटे झेलावे अलगदसे भंगल्या तनूचे अणुरेणू शोधिती हरवले जसे हसे पंखात नितळ दंव सोनेरी स्पर्शात भाव अस्पर्श असे मोट बांधली मेघाची पण पराधीन घरचे वासे अंदाज न सुटल्या धाग्यांचे क्षण जवळ न येती जराहिसे .....................अज्ञात

फराळ आणि फटाके : दिवाळीतले आणि जीवनातले!

लेखनविषय:
काव्यरस
सगळ्या सणांमध्ये दिवाळीचा वेगाळाच थाट सर्वांना अंधारामध्ये दाखवी प्रकाशाची वाट ... ... प्रकाश पसरवते पणतीची पेटलेली वात या दिवा़ळसणामध्ये करा दु:खावर मात ... ... निराशेच्या "भुईचक्राला" लावून टाका आग गोल गोल फिरत स्वतःमध्ये निराशा होईल खाक ... ... "फुलबाजीच्या" झगमगत्या आनंदी तुषारांद्वारे फुलवा मनामनांत आनंदाचे "झाड"... ... सद्वीचारांची ठीणगी लावा रॉकेटच्या मुखात महत्त्वाकांक्षेचे "रॉकेट" उडू द्या उंचच उंच आकाशात ... ... सुतळी "बॉम्बसारखे" छिन्नविछिन्न होवू द्या मनातले नकारात्मक कीडलेले भाग ... ... "शंकरपाळ्यांसारखी" चौकट तोडा बघा मोकळ्या मनाने या सुंदर जगात ... ... "चकलीसारखे" गुरफटू नका या

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखनविषय:
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

क्षण ते...

लेखनविषय:
काव्यरस
क्षण ते (कॉलेज डेज) क्षण ते, फांदीवरी बसलेले क्षण ते, झुळकीसवे झुरलेले क्षण ते, संपुनही उरलेले मज मिळतील का पुन्हा सवे, झुलतील का पुन्हा मज सांग रे मना. क्षण ते... ॥धृ॥ नभ भासे विहरण्या, पंखाना तोकडे थांबावे ते कुठे, नच आम्हा सापडे त्या पक्षांचे थवे, आता जमतील का पुन्हा भिजुनी मने, जुळतील का पुन्हा क्षण ते .. ॥१॥ हसण्यात आमुच्या जग सारे विरघळे गाण्यात आमुच्या मन सारे पाघळे रंगाने आमुच्या आता रंगेल का आकाश गंधाने आमुच्या पसरेल का सुवास क्षण ते ... ॥२॥ काळ जाई रे पुढे मन मागे ओढते गळलेली ती फुले पुन्हा जोडु पाहते त्या बागेत बहर आता नाचेल का पुन्हा मातीत आमुच्या दिसतील का खुणा क्षण ते ...

इतकच!

लेखनविषय:
काव्यरस
भावनांच्या आधारे केलेले वार सगळेच रिकामे नव्हते, जखमा भरुन यायला वेळ लागला इतकच ! 'हळव्या' शब्दालाहि हसण्यामागे अर्थहिन बनवलं, हसरि म्हणुन मिरवलं इतकच! मनात का कोण जाणे, बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात, कधीतरी आसवानी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, मी बहुतेक जपलं इतकच!

जंगलातले चालणे

लेखनविषय:
काव्यरस
(c) pashanbhed
जंगलातले चालणे
दुर रानात रानात शीळ घुमली कानात पाखरांची किलबील पानात पानात उभा बाजूला डोंगर झरा वाहतो समोर पाणी पिण्यासाठी त्यात सोडले कुणी जनावर शिवालय शांत भग्न गुंतले त्यात मन थेंब थेंब पाण्याचा होई अभिषेक अर्पण होती बरोबर शिदोरी झाली तीची न्याहरी दुपारी होईल काहीबाही त्यालाच काळजी सारी एकटेच चालायाचे स्वत:शीच बोलायाचे जंगल मोठे निबिड निघून एकटेच जायचे आला सुर्य माथ्यावर थेंब घामाचे अंगावर पाय
Subscribe to शांतरस