मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
धुंदीत जर कळाले, तारुण्य या कळ्यांना सांभाळ का म्हणावे, गालातल्या खळ्यांना गंधाळत्या नशेला, शृंगारुनी गुलाबी देऊन कोण गेले, गुलकंद पाकळ्यांना हे कायदे निजामी, का लावता फुलांना भेदी कुणी पहारे, टाळून सापळ्यांना अंधार दाटताना, रंगून सांज यावी थांबावयास सांगा, डोळ्यांत सावल्यांना ह्या रेशमी क्षणांनी. सृजनास जाग यावी कविता हळू फुलाव्या, अनुभूतल्या मळ्यांना संध्या

वाचन 6471 प्रतिक्रिया 0