Skip to main content

शांतरस

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

काव्यरस

आठवण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 06/03/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला. दूर किती दूर जाशी लागे मज हुरंहूरं शांत आहे ही तृप्तता की भावनांचे काहूरं? वेड असे भीत आहे हाक कशी देऊ मी? का तुझिया स्मरणाने फक्त तृप्त होऊ मी??? आसवांचे नजराणे का मागे प्रीत ही? सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही? दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो. वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
काव्यरस

श्रीराम

लेखक अनिल आपटे यांनी मंगळवार, 05/03/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे पहा तुम्हाला आवडते का श्रीराम विसावले मन माझे श्रीराम चरणी भास मात्र होतो खास माउलींचा मनी राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई अमृताची गोडी अनुभवास येई वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १ नामाचा महिमा आहे अनंत अपार सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २. दिनांचा दयाळू मनाचा मवाळू तसा माझा सदगुरु नेई पैलपारू सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३. जय श्रीराम
काव्यरस

नकोच शिवबा, जन्म इथे तू पुन्हा कधी घेऊ -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 21/02/2013 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच शिवबा, जन्म कधी तू पुन्हा इथे घेऊ कर्तव्याची नाही जाणिव, जयघोषातच दंगुन जाऊ नाही येथे कुणी जिजाऊ- शिकवण्यास बाळा म्हणती भाऊ तरि ते टपले दाबण्यास रे गळा , येथ जाणती बळ एकीचे जरी सर्व लोक गडबडती स्वबळावर जगण्या कोपऱ्यात नेक - शिवबा, तुजसाठी जगणारे संपले मर्द मावळे आता उरले येथे सारे संधीसाधू डोमकावळे , पायपोस तो कुणास नाही उरला कुणाचा आता सत्तेसाठी केवळ सारा आटापिटा पहाणे आता ! जन्मलास जरी आता शिवबा, इथल्या तू भूवरी सिंहासन तव तुजसाठी नुरले हपापलेले भारी ऐकू येते डरकाळी शिवबाची नुस्ती सगळीकडे फलकावर झळकणे ध्येय तुजवाचुन नेत्याचे इकडे म्हणतो आहे जो तो येथे, मी शिवबाचा अनुयायी खुर्ची
काव्यरस

स्वतंत्र

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 17/02/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांनी सजवित जावे वृत्तांचा ना हव्यास मज वाटे कविता झाली असतो रचनेचा भास मी नाही कुठला पंथी मज नकाच कोठे जुंपू कुणी शोधित जाती खांब मी माझा नाथ स्वयंभू ही माझी स्वतंत्र रचना हे माझे निराळे कूळ तुंम्ही अर्थ शोधुनी जाता तरी गवसत नाही मूळ एकाकी या वळणावर मी पुढे चालतो आहे. शब्दांचा नाजुक गजरा मी मनी माळितो आहे. मज ठाऊक नाही पुढती असणार कोठचे गाव? नसतात तेथल्या गावी कुणी राजा आणिक राव शब्दांचा मी सहकारी वाटांना शोधित जाई जोवरी मिळे ना वाट तोवरी तेथला राही...
काव्यरस

घरपण

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 10/02/2013 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
घर चार कुडाच्या भिंती घरपण अमृत रसना नाती आकाश निळे झरणार्‍या चांदण राती ओंजळी भरूनी स्वातीचे मोती स्वप्ने जरतरी नयनी आतुर भरती हृदयी गाभारा तृप्त तेवत्या ज्योती आवेग कळांचे लाटेवर देहाच्या रुधिरातिल माया ममता लय ओघवती शरिरापलिकडले गोत सवे सांगाती दुष्काळी निर्मळ सोबत नित अनुप्रीती घर हे अनुभूती अनुबंधांची व्याप्ती घरपण पण असते रेष रसिक रसरसती ....................अज्ञात
काव्यरस

घर

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 07/02/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
या घराला विचारले मी एकदा असा रिकामा रिकामा असतोस वाईट नाही वाटत? क्षणभर विचार करून घर म्हणाले, नाही, म्हणजे नेहमीच नाही . . म्हणाले या भिंती पाहिल्यास किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत इकडे ये, या खिडक्या पहा आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत . . अन् ते दार बघितलेस सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक येणार्‍याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे . . हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास ते कां? . . म्हणाले जरा वर पहा ते झगमगणारे आक
काव्यरस

आई

लेखक शुचि यांनी शनिवार, 02/02/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री मैत्रिणीबरोबर "आई" या अथांग विषयावर खूप गुज बोलून झाले. सकाळी उठले तेच हुंदका गळ्यात दाटून. या विषयावर एक तर लिहाल तितके कमी आहे शिवाय कविता हा माझा प्रांत नाही. पण जे काही खरडले ते गोड मानून घ्यावे. आशा करते कवितेमागील भावना पोचतील. संस्कार, त्याग, गर्भाशय, ऊब, दिलासा, अंगाईगीत, उन्हात वणवणताना मिळालेली शीतल सावली व झुळूक सवयी, व्यक्तीमत्त्वाची जडणघडण आणि हो प्रार्थनादेखील. नाळ, रुजलेली पाळंमूळं व दाटून आलेला हुंदका सुद्धा या सार्‍या गोष्टींचा , लहान प्रेमळ देव आणि त्याला जोडलेले हात. माझं भलं तिला लागो, तिचं वाईट मला मिळो.
काव्यरस

माझ्या गावात कधी आता -

लेखक विदेश यांनी बुधवार, 30/01/2013 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या गावात कधी आता माझा मामा रहात नाही - आजोळी जाण्याचा त्यामुळे प्रसंग कधी येतच नाही...... धूर सोडणारी झुकझुक गाडी साधे झाडही दिसत नाही शहरात राहिला मामा आता त्याला नोकरी मिळत नाही ... वेळ नसल्यामुळे तो मला कधी बोलवत नाही मामी सुगरण आहे का त्यामुळेच माहित नाही... वर्षात कधीतरी एकदाच शिकरण-पोळी खाते म्हणे - एवढे मात्र ऐकून आहे बाकीच काही ठाऊक नाही... मामाची रंगीत गाडी नाही मामाची उंचउंच माडी नाही लपली काळाच्या पडद्याआड आजी बरळते काहीबाही.... माझ्या गावात कधी आता माझा मामा रहातच नाही !
काव्यरस

प्रेम - तुझे माझे ...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/01/2013 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
‎'तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - ' --विचारून माझ्या प्रेमाचा का अपमान करतोस रे..... वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर तू सावरलेल्या माझ्या चेहऱ्यावरच्या अवखळ बटा... सागरतीरी मी वाळूत ओढलेल्या रेघोट्यावर तुझे अलगद फिरलेले बोट... ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे तू आपल्या ओठांनी टिपून घेतलेला पावसाचा एकेक थेंब... क्याफेतल्या उष्टावलेल्या कॉफीच्या मग धरलेल्या माझ्या हातावर तो हळूच फिरलेला तुझा हात ... डोळ्यात डोळे घालून अगणित काळापर्यंत पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ... माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या एका कोपऱ्यात मी दडवलेल्या त्या सगळ्या आठवणी ... तू कधीच आपल्या मनाने जाणून घ्यायला हव्यास
काव्यरस