मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधी कधी

अभिषेक पांचाळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वास्तवाला स्विकारुन , स्वप्नांना खोटं म्हणावं लागतं दुःख ठेऊन मनात , जगासमोर हसावं लागतं कधी कधी , स्वतःला विसरून , मनाविरुद्ध वागावं लागतं अपेक्षांचं ओझं , डोक्यावरतीच असतं वाईट काळातच , खरं जग दिसतं तरी दुर्लक्ष करून , सारं विसरावं लागतं कधी कधी , ओळख असून सुद्धा , अनोळखी बनावं लागतं पंख असूनसुद्धा , जमिनीवरच घरटे मोकळे ते आकाश , पाहण्यासाठीच उरते कुवत असलीतरी , पिंजऱ्यातच राहावं लागतं कधी कधी , परिस्थितीपुढेसुद्धा , नतमस्तक व्हावं लागतं देती साऱ्या जगा , ते अल्पायुषी झाले देता देता सारे , जरा घाईत मरून गेले चांगलं देण्यासाठी , अपमानाने भरावं लागतं कधी कधी , अमर होण्यासाठी , क्षणोक्षणी मरावं लागतं सारं दिसूनसुद्धा , तोंड मुकं होई भीतीपोटी कधी , दृष्टीसुद्धा जाई पेटलेल्या मनाला , शांत करावं लागतं कधी कधी , आगीलाही त्या , पाण्यात शिरावं लागतं संधीकडे कडे कधी , डोळे बघत असतात व्याकूळतेने फक्त , एक क्षण मागत असतात संधी मिळत नाही , तरी आशेत राहावं लागतं कधी कधी , इच्छा नसतानाही , हात बांधून जगावं लागतं तडजोडींशीच मग , जिव्हाळा वाटू लागे संकटांची मालिका घेऊन , नियती येई मागे जिंकता जिंकता कधी , उगाचच हरावं लागतं कधी कधी , पूर्ण संपूनही , थोडसं तरी उरावं लागतं                  - अभिषेक पांचाळ

वाचने 1112 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चांदणे संदीप 06/04/2016 - 23:28
होई-जाई, झाले-गेले, असतात, लागे-लागतं.... यात कुठेतरी कवितेचा आत्मा गुंडाळत जाऊन न सुटणारा, धाग्याचा गुंता होऊ पाहतोय. जरा शब्द/ओळी कमी करून अजून प्रभावी करता येते का बघा. चांगलच लिहिता अभिषेकराव! Sandy