विसरु नकोस नाते

लेखनविषय:
काव्यरस
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट

उडून गंध चालल्या...

लेखनविषय:
उडून गंध चालल्या फुलास वाटते तसे कसे सुने - सुने उदास वाटते. कधी वसंत येईल, बहरेन मी पुन्हा झडून पान चालल्या तरुस वाटते. पवन तुला करीत स्पर्श जातसे अता दरवळला चहूकडे सुवास वाटते. कशास जन्म हा जगून काढला इथे उगाच का असे - तसे मनास वाटते. निघून चाललीस तू इथून ज्या क्षणी तिथेच संपला असे प्रवास वाटते. दीपक पवार.

फिरुनी केली मनात दाटी...

लेखनविषय:
काव्यरस
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.

दुपार

लेखनविषय:
झोपली होती दुपार घेऊन कोवळ्या उन्हाला आवाज शांत स्पंदनांचा ऐकू येई मनाला तिरीप कोवळ्या उन्हाची जणू दुपारची एकदाणी झोपण्या आधी दुपारं गात होती बडबड गाणी पहुडली सुखाने अलवार पांघरून पदर थंडगार विसरून मध्यान्हीचा ताप निष्पाप सवे जीवाच्या झोपली दुपार....

बरसणाऱ्या सरी|

लेखनविषय:
नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती

चक्रव्युह

लेखनविषय:
काव्यरस
पेरणा :- तेच तेच पुन्हा पुन्हा http://misalpav.com/node/50115 शशक २०२२ मधली ही गोष्ट वाचली आणि पुन्हा एकदा विचार करू लागलो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला ठाऊक असूनही त्या मार्गाकडे पावले का बरे वळत नाहीत? पुन्हा पुन्हा फिरून याच पिंजर्यात अडकावेसे का बरे वाटते?

मेघ भरुनी येताना.

मेघ भरूनी येताना रिमझिम धारा झरताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. रिमझिमती असते बरसात चिंब चिंब भिजलेली रात कोंब प्रीतीचे मनात माझ्या हळुवार रुजताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. मृदगंध भारला वारा भारी गंधाने गगन धरा वार्‍यात मिसळल्या मातीच्या गंधावर झुलताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना. हे तरूवर सर्व स्तब्ध शांत सभोती उदास हा एकांत अंतरात या तव स्मृतींचा दिप हा जळताना मज तुझी आठवण येते पावसात भिजताना.

नको पुन्हा एकदा

लेखनविषय:
नको आता वेदनांचे प्रमाण पुन्हा एकदा नको आता आनंदाला उधाण पुन्हा एकदा नको ग्रीष्मात सोनेरी क्षणाची सावली नको आता सुखाचे विधान पुन्हा एकदा. हरवून गेले ओळखीचे रस्ते संभ्रमामध्ये नको आता ते आयुष्याचे भान पुन्हा एकदा. डंख होतो पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या इंगळीचा नको आता निद्रेला अवताण पुन्हा एकदा. देवा तुच धर हात माझा या मावळतीला झालो आहे बालकासम अजाण पुन्हा एकदा.

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२
Subscribe to भावकविता