जे न देखे रवी...
जगत् त्राही माम्
त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटी sssssल
म्हातारा बायडन अन्
कागदी घोडे नाटो
जिसकी लाठी उसकी भैस
जुनी कागदपत्रे फाटो
त्रा त्रा त्रास-पुटीन
रशीयन मोठा वाॅर मशीन
जगाचा नवा पोलीस पाटील
तुझी वाट पाहत.
अवखळ वारा
रिमझिम धारा
हळूहळू सांजावता
वाटतं ... तू येशील आता.
पावसानं झालंय
ओलंचिंब रान
मातीलाही सुचलंय
दरवळणारं गाणं.
मन माझं हेलकावतंय
विरहाच्या लाटेवर
नजर लावून बसलंय
तुझ्या नेहमीच्या वाटेवर.
असेच एकदा आठवणींचे
मेघ भरून आलेले
नकळत डोळ्यातून
झरुन गेलेले.
एकाकी
एकट्याने एकट्याशी बोलले पाहिजे
शब्दांनीही भाव वेडे तोलले पाहिजे.
कोण वेडे आहे ऐकण्या पुन्हा पुन्हा
आपुलकीचे रोप येथे रोवले पाहिजे.
दु:खा मध्ये रमून जाणे रोजचेच आहे
आनंदाचे झाड मनात वाढले पाहिजे.
स्वत: साठी जग जगते त्यात काय मोठे
दुसऱ्यासाठी कधीतरी जगले पाहिजे.
राजकारणाचा ढासळला दर्जा
कविता म्हणजे आसपास घडणाऱ्या घटनाचेच प्रतिध्वनी असतात ना ... उगाच कुठे चांदतारे पहावे.
काळ बदलला,
"वोह बुराई करे,
हम भलाई करे,
नही बदले की हो भावना,
ऐ मालिक तेरे ब्लाह ब्लाह हम "
हे राहिले नाही म्हणून संयमीत प्रतिउत्तर कविता..
निघाले किरीट सोमय्या....
१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या
https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inves...
रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...
| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||
तुझ्याचमुळे
सारे तुझेच होते,
सारे तुझेच आहे
तू आहेस म्हणून
स्वप्नांचे येणे-जाणे आहे.
शब्द तुझेच होते
भाव तुझेच आहेत
तुझ्या मुळे इथे
कवितेचे व्यक्त होणे आहे.
गीत तुझेच होते
सूर तुझेच आहेत
तुझ्याच मुळे आयुष्यात
संगीताचे लेणे आहे.
रुप तुझे होते
रंग तुझेच आहेत
तुझ्याच मुळे सदा
रंगपंचमी आहे.
शब्दचित्र
संपले का रंग सारे
का कुंचले मोडले
दोन रंगात सारे
विश्व का रे रेखले
नीळा सावळया निर्झराचा
रंग कोठे लपवीला
काय ठावे तुझ्या मानसी
शुभ्र धवल का रे भावला
अंथरुन कालीन धवल
लपवले रंग सारे
उजळून विश्व सारे
दीप तेज मंदावले
नील गगन ,धवल तारे
वाहती उष्ण वारे
शोषून धवल रंग
हळूच फुटती धुमारे
रिमझिमत्या धारातून आलीस.
रिमझिमत्या धारातून
आलीस होऊनिया चिंब
मला वाटले फुलावरती जणू जलाचे थेंब.
मातीस स्पर्शती धारा
गंधात नाहते धरा
तुझ्या तनुचा तसा दाटला, मनात मृदगंध.
पापण्या मिटून दूर
लाजून जाहली चूर
थरथरत्या ओठावर देशी तू दातांचा दाब.
दाटले मनी काहूर
डोळ्यात साठला पूर
उगा बावरी होऊ नको, का घाबरशी सांग?
आशा
नौका ही बांधलेली
राहील का बांधलेली
उरात भरूनी वारे
ही पाहतो निघालेली
वादळे येती तरी
लाटा फोडून ती गेली
थांबलो तेथेच मी
ती निघून गेलेली
मी असेन येथेच
वेळ नाही गेलेली
परत कधी येईल ती
आशा न विझलेली
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग..... विठ्ठल विठ्ठल
बरेच दिवस कविता लिहिली नव्हती ,
पेपरमध्ये वाचले
"आम्हा घरी धन,*
*शब्दांचीच रत्ने..."
_ जगतगुरू तुकाराम
मी सुटलो... बुंगाट
आम्हा घरी धन,
शब्दांचीच रत्ने,
जुळवू प्रयत्ने,
यमके ही.
काय हे जाहले,
कोसळला बाजार,
कोणता आजार
म्हणावा हा?
व्हॅलेंटाईन दिनी
कोणे एके काळी
व्हॅलेंटाईन दिनी
मोठ्या उत्सुकतेने
मी आणली होती साडी
होती जरी साधी
ती खुश मात्र झाली
प्रयत्न केला खूप तिने
पण नीट नेसता नाही आली
गोंधळली क्षणभर हसली
ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी
पण गोड आठवण प्रेमाची
तिने अजूनही जपून ठेवली
आक्रीत
सापशिडीच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
शिड्या गिळतात साप
आणि टाकतात कात
बुद्धिबळाच्या डावात
माझ्या घडते आक्रीत
राजा पांढरा, तयाची
काळ्या रंगावर प्रीत
घडे आक्रीत तसेच
माझ्या जगण्यात रोज
वास्तवाच्या कोलाहली
कानी अद्भुताची गाज
शर्यत
शर्यत अजून संपली नाही
मी अजून जींकलो नाही
घाम गाळत रक्त ओकत
धावताना अजुन संपलो नाही
हिरव्या दरीच्या धुक्या कडेशी
नीळ्या तळ्याच्या काठाशी
कधी अजुन दंगलो नाही
स्वप्ने तुटताना कचाकड्याची
ऊलटताना रात्री बीनस्वप्नांच्या
आतुन अजुन भंगलो नाही
त्या सुरांच्या स्तब्ध मैफली
ईद्रंधनुच्या शब्द चौकटी
मी अजुन रंगलोच नाही
का संपली पुण्याई.....
कोकिळा गप्प झाली का
माहीत नाही का रुसून गेली
कोण गाईल आता अंगाई
का संपली पुण्याई
कोण रिझवेल आता
कोण निजवेल आता
ऐकता भजन, भूपाळी
दिस उगवेल का नाही
गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली.
सिर्फ त्रिवेदी बचेगा।
पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर
कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली
लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर
(शोध)
बाटलीतुन वाहणारे
ओतताना लहरणारे
सोड्यातून उमलणारे
बर्फाशी झुंजणारे
चषकाच्या पृष्ठभागी
बुडबुडे साकारणारे
ढोसतो मी अल्प काही
जाणिवेला छेडणारे
नेणिवा थिजवणारे
मेंदूस व्यापणारे
तनूस डुलवणारे
ओठांच्या फटीतून
अशाश्वत भासणारे
बोलतो मी मूढ काही
रानवट
वार्याची लहर
फडफडणारा पदर
उधळले रंग विभोर
चालत होते रानवट||
उषेचे स्मित ओठांवर
दवांची माळली धार
अणू रेणूचे नुपूर
चालत होते रानवट||
कोमल स्पर्श अवनी
विखुरलेल्या दिशा वेचुनी
लाटांचे नीरज तोडूनी
चालत होते रानवट||
डोहाच्या तळाशी आठवणी
सुरूंग त्यावर पेरुनी
राखेचा घट उचलूनी
चालत होते रानवट||
शोध
निर्झरातून वाहणारे
सागरातून लहरणारे
खोल आतून उमलणारे
मी पणाशी झुंजणारे
वास्तवाच्या वाळवंटी
मृगजळे साकारणारे
जाणतो मी स्वल्प काही
जाणिवेला छेदणारे
नेणिवा ओलांडणारे
भोवताला व्यापणारे
व्यापुनी हुलकावणारे
नश्वराच्या चौकटीतून
शाश्वताशी बोलणारे
शोधतो मी गूढ काही
कळते जगत जाताना
युगायुगांचे असते एकटेपण
लाखोंच्या सोबतीने जगताना
खोल खोल भासते आयुष्य
रितेपन भरून काढताना
अनामिक नात्याची वीण
दिसते कधी घट्ट बसताना
नकळत मग तुटते काही
तिथे मनापासून गुंफताना
डोळ्यादेखत ढळते, ज्यात
वेचले आयुष्य रचताना
हे असे घडू नये वाटते
नेमके तेच घडत असताना
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं!
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली.
"या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता.
आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर.
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं...
- ‹ previous
- 22 of 468
- next ›