माझ्या या पोस्ट्मध्ये (https://www.misalpav.com/node/52703) २०२२४ मध्ये एका संघोट्याशी झालेल्या भांडणाची हकीकत लिहीली होती. चीनबद्दल मी जेव्हा ही भूमिका घेतली तेव्हा ब्लूमबर्गने आयोजित केलेल्या एका परिसंवादात केलेल्या भाषणाचा त्याला आधार होता. हा चीनचा प्रतिनिधी मोठ्या अभिमानाने सांगत होता की आमची पॉलिसी डॉक्युमेण्ट वाचा. आमच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीचा दर ८०-८५% टक्के आहे. भविष्यात चिनी अर्थव्यवस्था मुख्यतः ए० आय० आणि कृत्रिम जीवशास्त्र या दोन तंत्रज्ञानामधल्या चीनच्या आघाडीवर अवलंबून असेल.
या चीनी प्रतिनिधीच्या आवेशाने मी स्तब्ध झालो होतो. कृत्रीम जीवशास्त्र या शब्दांनी माझे कान ट्वकारले गेले. मग कृत्रीम जीवशास्त्राबद्दल जेव्हढी मिळेल तेव्हढी माहिती वाचायला, पहायला सुरुवात केली. थोडक्यात सांगायचे तर कृत्रीम जीवशास्त्र म्हणजे निसर्गात लूडबूड करायचे तंत्रज्ञान. हे प्रत्यक्षात यायला अजून वेळ लागेल असा मी माझा समज करून घेतला...
पण आज हे माझ्या कालरेषेवर झळकलं आणि चर्र झालं...माझ्या आकलनानुसार हे तंत्रज्ञान ए०आय० पेक्षा भयानक असेल कारण याचे फायदे सर्वसामान्याना मिळणे मला तरी अवघड वाटते. ज्या राष्ट्रांना हे तंत्रज्ञान मिळेल त्याना अनफेअर आघाडी मिळणार हे निश्चित...
प्रतिक्रिया
1 Jul 2025 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर
काहीतरी भयानक दिसते आहे.

1 Jul 2025 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली
आपण भयंकराच्या दारात आहोत.
3 Jul 2025 - 9:48 am | विवेकपटाईत
काही तरी निश्चित भयंकर घटित होत आहे. आजच एका आणखीन देशाने एका संघोट्याला सर्वोच्च पुरस्कार दिला. आता पर्यन्त बहुतेक 25 देशांनी दिला असेल. ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. मला तर शंका आहे, डीएनए बदल तंत्रज्ञानाचे योगदान यात असण्याची शक्यता आहे. कदाचित 2029 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी संघोटे सर्वांचे डीएनए ही बदलतील. (एक तांनाशाह दुसर्या तांनाशाहची मदत नक्कीच करणार). सावधान करण्यासाठी लेखकाला धन्यवाद.
3 Jul 2025 - 11:44 am | युयुत्सु
<ही संख्या आधीच्या सर्व प्रधानमंत्रींना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे. >
हरदासाची कथा मूळ पदावर आली... मोदींना मिळणार्या पुरकारांनी देशात पेटंट इकॉनॉमी थोडीच येणार आहे?
3 Jul 2025 - 3:43 pm | विवेकपटाईत
. मोदी आले आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती झाली ही सत्य नाकारण्यात अर्थ नाही. बाकी गुगल वरून
2014 से 2024 के बीच भारत में लगभग 1 लाख पेटेंट पंजीकृत हुए हैं। 2023-24 में, 41,010 पेटेंट दिए गए, जो एक रिकॉर्ड है. 2013-14 में यह संख्या 4,227 थी.