शृंगापत्ती
रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.
प्रतिक्रिया
23 Aug 2016 - 9:45 pm | उडन खटोला
झेपलं नाही ना? राहू च द्या. तब्बेत सांभाळा.
23 Aug 2016 - 7:59 pm | सुबोध खरे
पिरा ताई,
१९८३ पासून मी वैद्यकशास्त्रात आहे परंतु अजूनही कुणी गर्भपात करण्यासाठी सोनोग्राफी साठी येतं तेंव्हा समोर दिसणाऱ्या गर्भा कडे पाहून वाईट वाटतं.
एकाच वेळेस पहिली स्त्री असलेला गर्भ नको म्हणत असते आणि तिच्या नंतरची दुसरी स्त्री वंध्यत्वावर सर्व तर्हेचे उपाय करण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करताना दिसते.
पुण्याला वंध्यत्व विभागात रोज ३०-४० बायका वंध्यत्वावर उपचारासाठी पाहत असताना एक श्रीमंत बापाची अत्यंत लाडावलेली मुलगी केवळ गरोदरपणाच्या उलटया सहन होत नाहीत म्हणून लागोपाठ चार वेळेस गर्भपात करताना पाहिलेली आहे. संतति प्रतिबंधक काम न केल्याने गरोदरपण आले यासाठी गर्भपात हे कारण दाखवून. अगतिकतेचा ती हद्द होती.
आजही एक जोडपे लग्न ठरलेले आहे परंतु लग्नाअगोदर मूल नको म्हणून गर्भपात करायला सोनोग्राफीसाठी आले होते
अशा केसेस पाहून आजही वाईट वाटते.
असेच माझ्या मित्राला वाईट वाटले हेही लोक मान्य करायला तयार होत नाहीत याचे आश्चर्य आणि खंत वाटते. इतके भावना प्रधान असून चालत नाही
म्हणून मी म्हणतो "माझ्या मना बन दगड"
23 Aug 2016 - 8:09 pm | पिलीयन रायडर
गर्भपात करायला लागणं ही अत्यंत दु:खद गोष्ट आहेच. आणि डॉक्टरांना नियतीचे हे खेळ पाहुन त्रास होत असणारच..
मलाही सोफोश ह्या अनाथ आश्रमात गेल्यावर भयानक त्रास झाला होता. तिथे १०-१२ अत्यंत तान्ही बाळं पाहिली होती. अर्थातच इकडे तिकडे सापडलेली. त्यांना तर आयुष्यभर सहन करावं लागणार ना हे?
त्याहीपेक्षा जास्त करुण होती ५-७ वर्षांची मुलं.. ज्यांना आता कुणीही दत्तक घेण्याची काहीही शक्यता नव्हती.. असंच वसतीगृहात राहुन आणि दुसर्यांच्या मर्जीवर जगत ते आयुष्य काढणार.. त्यापेक्षा ज्यांना गर्भातच संपवलं ते जास्त भाग्यवान नाहीत का? माफ करा पण लहान मुलांच्या खडतर आयुष्याकडे बघुन मला अशीच उद्विग्नता आलेली आहे. पालकांच्या चुकांची फळं मुलांनी भोगायची नसतात..
23 Aug 2016 - 11:54 pm | श्रीगुरुजी
या विशिष्ट केसमध्येसुद्धा पालकांच्या चुकीची फळे गर्भाला भोगायला लागली आहेत.
23 Aug 2016 - 6:31 pm | आजानुकर्ण
उडन खटोला, पैलवान आणि गुरुजी. अहो जर गर्भपात ही हत्या असेल तर ती हत्या त्या मुलीने केलेली नाही. तिने फारतर हत्येची सुपारी दिली असे म्हणता येईल. हत्या करणारे वेगळेच आहेत. त्यांंनाही दोषी मानणार का?
23 Aug 2016 - 6:38 pm | उडन खटोला
हो. काही अंशी तसं म्हणावं लागेल. (नैतिक दृष्ट्या)
कायदेशीर दृष्ट्या वेगळे मुद्दे असतील.
मुख्य जबाबदारी मुलीची. (हत्येचा कट करणारा मुख्य दोषी)
23 Aug 2016 - 7:08 pm | सुबोध खरे
मग काय ठरलं. गर्भपातावर बंदी आणायची कायद्याने?
23 Aug 2016 - 7:20 pm | आजानुकर्ण
ज्यांना ती हत्या वाटते त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. मला ती हत्या वाटत नाही.
23 Aug 2016 - 7:35 pm | उडन खटोला
हत्या न वाटण्याचं नेमकं कारण मला समजत नाहीये. समजावून सांगाल? वैदयकीय कारणांनी सातव्या महिन्यात गर्भ बाहेर काढून जगवला जातो त्या बद्दल काय म्हणावं? त्याला देखील विरोध आहे का?
23 Aug 2016 - 7:37 pm | आजानुकर्ण
ज्यांचं मूल आहे, त्यांनी निर्णय घ्यावा. दुसऱ्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करावं याचा निर्णय घेणारा मी कोण?
23 Aug 2016 - 11:05 pm | पिलीयन रायडर
अस्सं कस्सं?? रुपालीची छटाकभरसुद्धा माहिती नसताना तिने जाणूनबुजुन असुरक्षित संबंध ठेवले आणि बेजवाबदारपणे गरोदर राहिली आणि वर तोंड करुन पोटातल्या जीवाची हत्या केली.. अशा मुली धनाढ्य माणसासाठी उद्या नवर्यालाही सोडून जातात.. अशा सडेतोड निष्कर्षावर कसे येणार मग तुम्ही?
ह्यांना कारण माहितीही नाही, पण तरीही माहिती नसलेले कारण पटलेले नसल्याने ही हत्याच आहे बरं का! मुल कुणाला का वाढवयचे असेना, आपल्याला तर १००% घेणं देणं नाही, पण तरीही आपण इथे बसुन लोकांबद्दल जजमेंट्ल व्हायचं. आणि त्यांनी काय करायला हवं होतं हे सांगायचं.
मस्तच!
23 Aug 2016 - 11:09 pm | उडन खटोला
प्लिज, धागा वाचता का एकदा?
23 Aug 2016 - 11:15 pm | आजानुकर्ण
खटोला, तुम्ही धागा वाचलाय आणि तुम्हाला सगळं समजून आलंय. इथं रुपालीचा काही गुन्हा असेल तर अवश्य पोलीस कंप्लेंट करा. तिला काय व्हायची ती शिक्षा होईल.
23 Aug 2016 - 11:32 pm | उडन खटोला
ऑ?
असं का करता मालक? धागा लेखकाने काही लिहिलंय. त्यात स्पष्ट पणे गर्भपाताचा हेतू लिहिलाय, मुलगी काय प्रेरणा घेऊन डॉक्टर कडे आली होती याबाबत लिहिलंय तरी काहीही माहिती नसताना कसे काय लोक एखाद्या conclusion वर येतात असं पिरा लिहितात.
त्यांच्या 'अस्सं कस्सं' चा बेस देखील समजायला हवा ना? त्यांचे बाण आमच्या पेक्षा जास्त हवेत मारले आहेत.
(ते नेहमीच असतात म्हणा!)
23 Aug 2016 - 11:40 pm | आजानुकर्ण
जो काही हेतू लिहिलाय तो गुन्हा कसा हे एकदा समजावून सांगता का? 'तुम्हाला वाटतं' म्हणून तो गुन्हा होत नाही.
24 Aug 2016 - 12:04 am | पिलीयन रायडर
माताय.. आणि मी इथे चर्चा करतेय सिरीयसली!!! =))
24 Aug 2016 - 12:11 am | उडन खटोला
चालायचंच. हे ही नेहमीचंच आहे.
मोकळा वेळ सत्कारणी लावा, सातकर्णी नको.
24 Aug 2016 - 12:22 am | पिलीयन रायडर
तुम्ही बरंच फॉलो करता वाटतं माझे प्रतिसाद!! मला मात्र तुम्ही लिहीलेलं अवाक्षरही आठवत नाहीये ..!आपला कधी कुठे काही वाद झालाय का? मला आठवत नाही बुवा. तरी तुम्ही माझ्याबद्दल इतकं वैयक्तिक होऊन लिहीताय. तुम्च्या शेपटावर पाय देणारं लिहीलंय वाटतं मी कधी तरी!! बघा जमल्यास मुव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करा.
बाकी मी माझ्या वेळाचं काय करावं ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही. तेव्हा फुकटचा सल्ला नाही दिलात तरी चालेल! तुम्ही तुमच्या बिझी शेड्युल मधुन गेले काही तास इथे वाद घालत आहात हे कौतुकास्पदच आहे.
मी तसेही हवेत बाण मारत असते तेव्हा पुन्हा मला प्रतिसाद देऊन आपला बहुमुल्य वेळ वाया घालवु नये ही विनंती. (सल्ला नाही!) आपले ठोस आनी तर्कशुद्ध मुद्दे दुसर्या कुणासाठी तरी राखुन ठेवा. माझ्याही डॉक्याला कमी शॉट लागेल!
माझा बराच टाईमपास केल्याबदल मंडळ आभारी आहे...
24 Aug 2016 - 12:50 am | उडन खटोला
एवढं सगळं लिहिण्यापेक्षा जरा त्या डॉक्टरांचा गोंधळ कमी केला असतात तर???
कस्लं काय!
24 Aug 2016 - 2:25 am | स्रुजा
अगं असं काय करतेस? तू ओळखलं नाहीस का त्यांना?
24 Aug 2016 - 3:07 am | पिलीयन रायडर
असा प्रकार आहे होय!!
आधी माहिती असतं तर नादालाच लागले नसते ना राव...
पण आयडी मागचा चेहरा माहिती नसुनही शेवटी चर्चेअंती निष्कर्ष तेच निघतात हे इंटरेस्टींग आहे!!
24 Aug 2016 - 8:38 am | उडन खटोला
आणि हे म्हणतात आम्ही मुद्याशी चर्चा करतो.
खिक्क!
@ सृजा, थँक्यू बरंका.
24 Aug 2016 - 8:57 am | प्रीत-मोहर
+१११
24 Aug 2016 - 9:39 am | उडन खटोला
खिखिखि.
23 Aug 2016 - 5:49 pm | अनुप ढेरे
आयुष्य कधी सुरू होतं हा लई मोठा डिबेट आहे. हृदय सहाव्या आठवड्यात सुरू होतं. त्याला जीव आहे म्हणाल का तुम्ही?
गर्भपात हा ब्लॅक अॅंड व्हाइट विषय नक्की नाही.
22 Aug 2016 - 6:47 pm | संदीप डांगे
गा पै, प्रचंड गोंधळ हाये तुमच्याकडं...
22 Aug 2016 - 7:00 pm | राजाभाउ
तुम्ही म्हणताय ते थोड थोड समजतय, पण मग हे फक्त स्त्री बाबबतच का ? पुरूषांनाही हे लागु होइल ना ?
22 Aug 2016 - 7:22 pm | सुबोध खरे
राजाभाऊ
समानता हि कागदावर नाही मनात असायला पाहिजे.
मी पुरुष आहे मी काहीही केले तर क्षम्य आहे. स्त्री हि कशी धुतल्या तांदुळासारखी असायला पाहिजे हा पुरुषी दांभिकपणा समाजात अजूनही फार मोठ्या प्रमाणावर आहे.
हातात ग्लास घेऊन पटकन "आधुनिक" होता येतं
बायकोला समान हक्क देता आले तर खरे आधुनिकत्व
मॉडर्न सुटिंग्स ची एक जाहिरात २०- २५ वर्षांपूर्वीची आजही माझ्या मनात घोळत असते
ती म्हणजे
मॉडर्निझम इज नॉट जस्ट सुटिंग
इट इज ए स्टेट ऑफ माईंड
23 Aug 2016 - 11:34 am | राजाभाउ
मुद्दा बरोबर आहे पण वर ते (गापै) म्हणतायत कि "पुरुषी वर्चस्ववाद ही समस्या नाहीये" म्हणुन माझ्या मनात ही शंका आली.
22 Aug 2016 - 11:46 pm | गामा पैलवान
राजाभाऊ,
होय, पुरुषांनाही लागू पडतं. पण पुरुषांच्या मनाची रचना अशी आहे की तो चटकन यातून बाहेर पडू शकतो. बेफिकिर राहून वा तसा आव आणून पुरूष पुढील आयुष्यास सज्ज होऊ शकतो. मात्र त्याच्या जागी स्त्री असेल तर तिला भयंकर मानसिक यातना सोसाव्या लागतात.
आ.न.,
-गा.पै.
22 Aug 2016 - 11:52 pm | संदीप डांगे
पुरुषाचे समजले हो, पण स्त्रीबद्दल तुम्ही कसं काय इतक्या अधिकारवाणीने बोलू शकता?
23 Aug 2016 - 1:43 am | चंपाबाई
एक थी डायन ! बघितला नै का ?
23 Aug 2016 - 11:45 am | राजाभाउ
समजा वर राही म्हणतात तसा समाज बदलत गेला (अस काही येव्हड्यात होईल असे वाटत नाही तरीही) व लग्नपुर्व मुक्त लैंगीक संबंध समाजमान्य झाले तर अशा मानसिक यातना स्त्री किंवा पुरूष कोणालाच सोसाव्या लागणार नाहीत ना ?
संक्रमण काळा मध्ये तुम्ही म्हणता तशी परीस्थीती निर्माण होउ शकते. पण मग जो गोष्टी बदलतो तो अशा सर्व अव्हानांसाठी तयार असतोच किंवा किमानपक्षी असावा , केवळ याच नव्हे तर कुठ्ल्याही बाबतीत हे लागू आहे.
23 Aug 2016 - 1:07 pm | सुबोध खरे
राजाभाऊ
गामा पैलवान म्हणतात त्यात थोडेसे तथ्य आहे. सर्वसाधारणपणे पुरुष हा भावनाप्रधान नसल्यामुळे एखाद्या ताटातुटीमध्ये त्याची मानसिक वाताहत स्त्री एवढी होत नाही. स्त्रिया जास्त भावनाप्रधान असतात आणि शारीरिक संबंधांमध्ये त्यांची शारीरिक आणि मानसिक गुंतवणूक (INVOLVEMENTच नव्हे तर INVESTMENT) नक्कीच जास्त असते त्यामुळे अशा संबंधात बाधा अली तर स्त्रीला त्यातून बाहेर पडायला नक्कीच जास्त वेळ लागतो.
उदाहरण दाखल -- प्रख्यात मराठी मॉडेल्स मधु सप्रे आणि मिलिंद सोमण यांचे लिव्ह इन रिलेशन( त्यांनी जाहीर केलेले होते) असताना (त्या काळात ते समाजाच्या विचारसरणीच्या आणि पचनाच्या बरेच पुढे होते) पुढे ते विलग झाले आणि मधू सप्रे निराशेच्या गर्तेत सापडली आणि मिलिंद सोमणचे करियर पुढे चालू राहिले. हा विषय तेंव्हा मनोविकारतज्ज्ञांमध्ये पण चर्चिला गेला होता. नात्यात स्त्रीची भावनिक गुंतवणूक नक्कीच जास्त असते.
श्रीकृष्ण सामंत यांच्या धाग्यावर मी याच्या कारण मीमांसेबद्दल थोडेसे लिहिलेले आहे.
23 Aug 2016 - 12:34 am | गामा पैलवान
संदीप डांगे,
होय. आहेच मुळी प्रचंड गोंधळ. मात्र तो माझ्याकडे नसून रुपालीकडे आहे. तिच्या वर्तनाची एक संगती लावायचा प्रयत्न करतो. त्यासाठी काही तथ्ये सुस्थापित करायला पाहिजेत.
१. रूपाली गर्भपातासाठी डॉक्टर गुर्जरांकडे (काल्पनिक नाव) आली तेव्हा प्रथमेशच्या (= गर्भाचा बाप (काल्पनिक नाव)) पगाराची चर्चा करायची गरज खरंच होती का? नुसतं पोर नको म्हणून गप बसता आलं नाही का? की रुपाली दोलायमान मनस्थितीत होती म्हणून स्वत:शीच मोठ्याने बोलून निर्णयाचं लटकं समर्थन करंत होती?
२. रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का? माझ्या अंदाजाप्रमाणे तिला उशीर झालेला असावा. खरे डॉक्टरच यावर प्रकाश टाकू शकतील.
३. ज्याअर्थी रुपाली डॉक्टर गुर्जरांना बघून प्रतिक्रिया देते आहे त्याअर्थी तिने पूर्वायुष्य लपवून ठेवलं आहे.
तर आता गोंधळाकडे वळूया.
गणिकेला हवा असतो तसा पैसा रूपालीला हवाय. मात्र गणिकेचं नातं तात्पुरतं असतं. तसं न ठेवता तिला कायमस्वरूपी पत्नीचं नातं हवंय. त्यासाठी ती पत्नीधर्माचं सोंग वठवायला तयार झालीये. रुपालीची गणिकाधर्म आणि पत्नीधर्म यांच्यात ओढाताण होते आहे. हे गोंधळाचं मूळ कारण आहे.
आ.न.,
-गा.पै.
तळटीप : रुपालीने वेळेवर गोळ्या घेतल्या होत्या का यावर प्रकाश टाकावा ही खरे डॉक्टरांना विनंती.
23 Aug 2016 - 12:45 am | आजानुकर्ण
+१
and i thought my jokes were funny.
23 Aug 2016 - 9:45 am | सुबोध खरे
गामा साहेब
मी जेवढे लिहिले आहे तेवढेच मला माझ्या मित्राने सांगितले आहे. तिने संतती प्रतिबंधक साधने वापरली होती का इ. मला काहीही माहिती नाही. पुढची कथा मी त्यांना विचारणारही नाही (विचारली ही नाही)
23 Aug 2016 - 10:43 am | श्रीगुरुजी
गा. पैं.शी पूर्ण सहमत.
ही मुलगी भविष्यात दुसर्ऱ्यांंशी संबंध ठेवण्याची किंवा नवऱ्याला सोडून एखाद्या धनाढ्याबरोबर जाण्याची बरीच शक्यता आहे.
23 Aug 2016 - 1:50 am | चंपाबाई
दोन प्रश्नाम्चं एकत्र उत्तर ..
या बाईने अॅबॉर्शन न करता मूल जन्माला घालायला हवं होतं.
मग ते मूल त्या बाप न होण्याची इछा असलेल्याच्या बायकोला द्यायचं !
सगळे खुश
23 Aug 2016 - 1:58 am | संदीप डांगे
धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,
23 Aug 2016 - 6:49 am | पैसा
http://www.misalpav.com/comment/869602#comment-869602
23 Aug 2016 - 1:58 am | संदीप डांगे
धाग्यातल्या फक्त ह्याच भागावर जास्त फोकस होतोय का? अनावश्यक आहे हा भाग! संस्कृतिरक्षक चेकाळलेत त्यामुळे,
23 Aug 2016 - 8:20 am | झेन
डॉक्टर साहेब वरील विनंतीला मान देवून धागा उसवून परत निट विणावा हि विनंती.
जमल्यास त्यात तुम्ही स्वत: तुमच्या मित्राकडे त्यांच्या मुलासाठी रूपालीचे प्रपोजल घेवून गेला आहात असा सीन लिहा, म्हणजे जय वीरूचे स्थळ मौसी कडे घेवून गेला होता तसे काहीतरी.
वैसे तो लडकी आछ्छी है...हँ....मगर
23 Aug 2016 - 8:01 am | राही
सज्जड हा शब्द लेखात आहे आणि काही प्रतिसादांतसुद्धा दिसला. उपवर मुलामुलींनी मॅट्रिमोनिअल साइट्सवर लिहिलेल्या आपल्या जोडीदाराविषयीच्या अपेक्षा पाहिल्या तर रंग. उंची, बिल्ट, जात, सवयी याबरोबर वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा ठळकपणे आणि नि:संकोचपणे नमूद केलेली असते. आजकाल मुली जोडीदारनिवडीबाबत अत्यंत व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असतात. ९९% प्रमाणात मुलींची अपेक्षा आपल्यापेक्षा जास्त कमावणारा नवरा असावा हीच असते. आणि ही ग्राउंड रिअॅलिटी आहे.
23 Aug 2016 - 9:56 am | सुबोध खरे
वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा ठळकपणे आणि नि:संकोचपणे नमूद केलेली असते. आजकाल मुली जोडीदारनिवडीबाबत अत्यंत व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असतात.
राही ताई
या उदाहरणात एक खोच आहे. ती म्हणजे रुपालीचे अगोदर दुसर्याशी शारीरिक संबंध होते ज्याच्याशी तिला लग्न करायचेच नव्हते. होणाऱ्या नवऱ्याच्या उत्पन्नाबाबत अपेक्षा ठेवणे मुळीच चूक नाही. पण तेंव्हा होणाऱ्या नवऱ्याला आपल्या पहिल्या शारीरिक संबंधाबद्दल प्रामाणिकपणाने सांगण्याचे धैर्य तिच्याकडे असायला हवे. लक्षात ठेवा हि गोष्ट भारतात घडते आहे जेथे ९९ % पुरुषांना स्त्रीचे विवाहपूर्व संबंध मान्य होणार नाहीत अमेरिकेत असते तर गोष्ट वेगळी आहे. (तिने नवऱ्याला सांगितले नसावे असे एकंदर माझ्या मित्राच्या अविर्भावावरून वाटते).
अर्थात येथे डॉक्टर ओळखीचा निघाला म्हणून असे प्रश्न कदाचित उभे राहिले असावेत( उभे राहतील) अन्यथा असे सहसा होत नाही.
माझ्याकडे मुलुंडला सोनोग्राफी साठी येणाऱ्या "मुली" "बोरिवली, माहीम, कुर्ला, दिवा " अशा दूरच्या ठिकाणहून यासाठीच येतात
दांभिकपणा कृतीत नाही
तर
होणाऱ्या परिणामांची जबाबदारी नाकारण्यात आहे.
हे तुझे आहे तुजपाशी मधील अजरामर वाक्य आहे.
23 Aug 2016 - 10:06 am | संदीप डांगे
डॉक्टर्साहेब,
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"
एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..? मला तर वाटले डॉक्टरमित्राची खरेच नैतिक अडचण झाली आहे..
23 Aug 2016 - 10:22 am | उडन खटोला
नाहीये का? पुरुषांना म्हटलं जातंच की.
बायका चालु नसतात?
काल एक बातमी आली होती-
लग्न झालेली मुलगी वय 23 आणि लग्न झालेला मुलगा वय 21 ज्यांचं 6 वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं नि दोघांच्याही लग्नानंतर देखील सुरूच होतं. मुलीचा नवरा कुठेतरी बाहेर गेल्यावर मुलीने प्रियकराला झोपायला बोलावलं. रात्री वाद झाला नि तो तिला मारु लागला. मुलीने प्रियकराचा गळा दाबून खून केला.
23 Aug 2016 - 10:28 am | सुबोध खरे
डांगे अण्णा
हा आपण काढलेला अर्थ आहे. ( तो कसा काढावा हे सांगणारा मी बापडा कोण?)
पण एकच विचारावेसे वाटते.
आपल्या "भावाचे" अशा मुलीशी आपण लग्न करून द्याल का?
खाली समीर सूर यांनी अचूक लिहिलं आहे. जग "सोयीने" चालते.
बाकी "उदारमतवाद आधुनिकता" जालावर व्यक्त करायला काय जाते?
वचने किं दरिद्रता?
23 Aug 2016 - 10:47 am | संदीप डांगे
आपल्या "भावाचे" अशा मुलीशी आपण लग्न करून द्याल का?
"अशा" ह्या शब्दात येणारा अर्थही आपण स्वतःच काढत आहात की? तुम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे/नाही पण ती मुलगी 'तसल्याच टैप' ची आहे, हा ही तुमचा काढलेला दृष्टीकोनच झाला की नाही?
जरा सांभाळून. आपण अनिर्बंधपणे वैयक्तिक होत आहात. सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे ह्या भ्रमात राहून इतरांच्या (ज्या व्यक्तिंबद्दल तुम्हाला शष्प माहिती नाही) मतांची, अनुभवांची, विचारांची एकतर्फी खिल्ली उडवणे योग्य नव्हे. कधी प्रत्यक्ष भेटा, मग बोलू "वचने किं दरिद्रता" ह्या विषयावर. अधिकारी व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तेवढी काळजी घ्या म्हणजे बरं पडेल.
23 Aug 2016 - 11:00 am | उडन खटोला
मिरची काहे लग रही है भिया? भुगतो अब!
23 Aug 2016 - 11:06 am | संदीप डांगे
आपण कोण उपटसुंभ?? धन्यवाद!
बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.
23 Aug 2016 - 11:50 am | उडन खटोला
मिर्ची तिखी है शायद! ;)
23 Aug 2016 - 11:31 am | मृत्युन्जय
"अश्या" या शब्दात तुम्हाला अभिप्रेत असलेला भावच प्रतीत होइल असे नाही. "अश्या" या शब्दात एक ही & हि भाव अभिप्रेत असतो हे मान्य पण प्रसंगानुरुप एखाद्या विशिष्त भावसमूहाशी अथवा वैशिष्ट्यरचनेशी निगडीत अभिव्यक्ती निर्देशित करतानाही या शब्दाचा उपयोग होउ शकतो.
असो. तुम्हा दोघांचे बाकीचे संभाषण वाचले नसल्याने बाकी कोणी काय आणी कसे बोलावे याबद्दल काही टिप्पणी करत नाही.
23 Aug 2016 - 11:50 am | सुबोध खरे
बाकी डॉक्टर्साहेब,
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"
एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..?
हा आपणच काढलेला अर्थ आहे.
आणि "अशा" शब्दावर आपणच ठळक ठसा उठवलाय. मी नाही
हा प्रतिसाद "डांगे" या व्यक्तीला नसून जालावर साधारणपणे आधुनिकपणाचा आव आणणाऱ्या व्यक्तींसाठी आहेत.
आपण ते वैयक्तिक घेतलेत तर त्याला कोण काय करणार?
आणि मग असे भडकून जाऊन तोल गेलेले प्प्रतिसाद दिले जातात. जरा सांभाळून.आपण अनिर्बंधपणे वैयक्तिक होत आहात. सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे ह्या भ्रमात राहून इतरांच्या (ज्या व्यक्तिंबद्दल तुम्हाला शष्प माहिती नाही) मतांची, अनुभवांची, विचारांची एकतर्फी खिल्ली उडवणे योग्य नव्हे. कधी प्रत्यक्ष भेटा, मग बोलू "वचने किं दरिद्रता" ह्या विषयावर. अधिकारी व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असते. तेवढी काळजी घ्या म्हणजे बरं पडेल.
"सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे" असे कुठे म्हटले आहे ते जरा दाखवा?
23 Aug 2016 - 12:05 pm | संदीप डांगे
हे कुणी लिहिले?? हे वैयक्तिक नाही तर अजून काय आहे? ह्यानंतर तुमचं पुढचं वाक्य आहे की "जालावर उदारमतवादीपणा दाखवायला काय जातं? वचने किं दरिद्रता" इ. इ.
इथे मी तुमच्याशी तुमच्या मताबद्दल चर्चा करत आहे, तेव्हा इतर जालावरच्या लोकांचा काय संबंध?
तुमच्या प्रतिसादात तुम्ही स्पष्ट मलाच विचारले ना? पुढे त्या प्रश्नाचे उत्तर आपले आपणच गृहित धरुन पुढची वाक्ये फेकलीत. ह्यात स्पष्टपणे वैयक्तिक नाही तर काय आहे? इतर कोणाही बद्दल इतकं ठाम असण्याला "सगळ्याच जगात फक्त आपल्यालाच काय ती अक्कल आहे" असं म्हटलं जातं.
वर अनेकांनी लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच्या मताविरुद्ध प्रतिसाद आले, लूपहोल्स, विसंगती दाखवणारे प्रतिसाद आले की तुम्ही सैरभैर होता. तुम्हीही भडकूनच प्रतिसाद देत आहात. भाषा सभ्य असली म्हणून काय झाले?
23 Aug 2016 - 12:37 pm | सुबोध खरे
प्रेम विवाह नसेल तर "मिपावरील किती लोक" आपल्या भावाचे/ मुलाचे लग्न अशा "प्रामाणिक" मुलीशी करायला तयार होतील.
तसे जालावर "आधुनिक होणे" फार सोपे आहे.
हस्तादपि न दातव्यं, गृहादपि न दीयते
(मधली ओळ आत्ता आठवत नाही)
वचने किम दरिद्रता .
हे मी वर लिहिलेल्या प्रतिसादातीलच वाक्य परत आपल्याला उद्धृत करून दिलं होतं. तो प्रतिसादही आपल्यालाच काय कोणालाही उद्देशून नव्हता.
ते आपण वैयक्तिक घेतलं आणि उच्च भाषा वापरलीत याला मी काय करणार.
डॉक्टर्साहेब,
"ती पोरगी बघा किती चालू टैप आहे"
एवढ्या एका वाक्यासाठी चालू आहे का हा सगळा खटाटोप..? मला तर वाटले डॉक्टरमित्राची खरेच नैतिक अडचण झाली आहे..
याचा अध्यारुथ अर्थ आपणच काढला कि डॉक्टरांच्या मते हि मुलगी "चालू" आहे.
"खाई त्याला खवखवे" एवढच मी म्हणेन
23 Aug 2016 - 12:58 pm | संदीप डांगे
स्पष्ट बोलू का? तुम्ही त्या मुलीच्या 'चारित्र्या'वर गरजेपेक्षा जास्त स्ट्रेस देत आहात. तेही जुजबी थर्ड पार्टी माहितीच्या आधारे. त्या मुलीशिवाय इथे कोणीही ही खातरजमा करु शकत नाही की तिचे निर्णय तिने का घेतले, त्याची पार्श्वभूमी काय. तुमच्या डॉक्टरमित्राच्या 'म्हणण्या'नुसार तुम्ही मांडले आहेत म्हणता, पण तुमचेही सर्व प्रतिसाद (लेखासकट) ती मुलगी कशी 'मजामारु बेदरकार, ऐय्याश' टैप आहे अशा अर्थाचे दिसत आहेत. हा मी काढलेला अर्थ आहे म्हणत असाल तर असोच. कारण चर्चेच्या सुरुवातीला मी लेखाचा उत्तरार्ध ध्यानात घेतला होता, पण तुमचे प्रतिसाद बघता तुम्हाला पुर्वार्धात जास्त रस असल्याचे दिसत आहे.
जर असेच असेल तर हा निव्वळ बेणारेबाईंच्या उलटतपासणी सारखा खेळ झाला आहे. तुमच्या डॉक्टरमित्राने तुमच्याशी साधलेला संवाद हा खरोखर शृंगापत्तीतून आला आहे की आणखी कशातून ह्यावर आता खरेतर विचार व्हायला हवा.
बाकी अजानुकर्ण साहेबांनी दुसर्या एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे नवरा-बायको आपसात बघून घेतील. यावर चर्चा करण्यासारखे खरेच काय आहे?
23 Aug 2016 - 1:08 pm | सुबोध खरे
ब्वॉर
23 Aug 2016 - 6:42 pm | आजानुकर्ण
हाच निष्कर्ष काढण्यासाठी आटापिटा चालू आहे असं मलाही वाटतंय.
23 Aug 2016 - 1:13 pm | मराठी कथालेखक
हे ९९% चं शंभर टक्के मान्य.. पण एक शंका आहे हे ९९% पैकी किती मुलगे होणार्या पत्नीला लग्नाआधिच 'तुझे कधी कुणाशी संबंध होते का ?" असं विचारायचं धाडस दाखवितात ? ज्या गोष्टीबद्दल इतका आग्रह आहे त्या गोष्टीची निदान स्पष्ट विचारुन खात्री तरी करुन घ्यावी ना...उगा स्वतःच काहीतरी गृहीत धरायचं आणि मग वस्तुस्थिती वेगळी असली की 'फसवणूक झाली' म्हणायचं याला अर्थ नाही.
23 Aug 2016 - 1:28 pm | सुबोध खरे
अगदी बरोबर
लग्न "ठरल्यावर पण प्रत्यक्ष होण्याआधी" हि गोष्ट दोघांनी एकमेकांना विचारणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
आणि हि गोष्ट मी माझ्या होणाऱ्या बायकोला विचारली होती.
हेही विचारले होते कि लग्न तू स्वतःच्या मर्जीने करत आहेस कि नाही. जर यात १ % असहायता असेल तर लग्न मीच मोडायला तयार आहे. ( अर्थात काहीही कारण न देता लग्न मोडण्यास होकार देण्याएवढा मोकळेपणा माझ्या घरच्यांकडून मला होता हि वस्तुस्थिती).
23 Aug 2016 - 6:38 pm | आजानुकर्ण
डॉ. साहेब तुम्ही या धाग्यावर कायम म्हणताय की कुठेही जजमेंटल झालेलो नाही. मात्र अशी नैतिक शेरेबाजी दर दुसऱ्या प्रतिसादात करत आहात. रुपालीने कुठल्या परिणामांची जबाबदारी नाकारली आहे? तिने लैंगिक संबंध ठेवले, (कदाचित चुकून) गर्भ राहिला. तिला गर्भपाताचा कायदेशीर पर्याय उपलब्ध होता तो तिने स्वीकारला. (तुमच्याच मित्राने गर्भपातासाठी मदत केली आहे) तिचं पुढचं आयुष्य मार्गावर आलेलं दिसतंय. इथं कुठल्या परिणामांची कसली जबाबदारी नाकारली आहे जरा समजावून सांगाल का?
आता जरा तुमच्या मित्राच्या दृष्टिकोणातून बघण्याऐवजी तिच्या दृष्टिकोणातून बघा. पूर्वायुष्यातील - कदाचित चुकीच्या - निर्णयामुळे आयुष्याची संपूर्ण वाताहत होण्याऐवजी तिला काही वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे आयुष्य सुरळीत होण्याचा पर्याय उपलब्ध झाला. आता तिला संसार करायचाय मात्र त्या घटनेची अत्यंत जवळची साक्षीदार व्यक्ती घराशी निगडित आहे. आता त्या व्यक्तीशी तिने कसं वागावं? तिने तुमच्या मित्राशी कुठेही संपर्क केलेला दिसला नाही. तुमच्या मित्राला तिच्या नजरेत तिरस्कार दिसला आणि ही फार मोठी शृंगापत्ती आहे?
23 Aug 2016 - 7:33 pm | सुबोध खरे
छिद्रान्वेषी पणा
मी केवळ एक वाक्य लिहिले(quote) आहे ते रूपालीला उद्देशून अजिबात नाही
तुम्ही केवळ माझ्या वर टीका करण्यासाठी ते रूपालीला उद्देशून आहे असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे झालात आणि त्यावर एवढे अवडंबर रचलेत.
तिने केलेला गर्भपात योग्यच होता याबाबत मला शंका नाहीच. कारण "नको" असलेले मूल अनाथालयात देणे किंवा आयुष्यभर कुमारी माता म्हणून समाजाची अवहेलना स्वीकारत जगणे हे दोन्ही पर्याय चूकच आहेत. एकदा चूक झाली तर आयुष्यभर अश्वथाम्या सारखी कपाळावर बाळगत आयुष्य कष्टात काढणे हि गोष्ट अत्यंत चुकीची आहे.
हा मुद्दा येथे आणून काथ्याकूट करण्याचा मूळ हेतू समाजाने एखाद्या स्त्रीची एखादी चूक झाली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे यासाठी आहे. (अशा) मुलीकडे लिहिणार होतो पण डांगे साहेबानी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून दूषणे हि दिली).
मी परत म्हणतो आहे जर माझा मित्र तिला भेटला नसता तर हा मुद्दा येथपर्यंत आलाच नसता.किती तरी मुली आम्ही वारंवार पाहतो आहोत ज्या गर्भपात करून घेतात अन सुरळीत आयुष्य जगत असतात.
आजही याचे पुढे काहीही होणार नाही आणि रुपालीचा संसार सुरळीत चालेल याबद्दल मला माझ्या मित्राची खात्री आहे. पण त्याला वाईट वाटण्यापासून आपण थांबवू शकत नाही हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.
गर्भपात हा विषय असा आहे कि यात काळे आणि गोरे असे केवळ दोनच रंग नाहीत. शिवाय यात केवळ नैतिक बाजू आहे असे नाही तर कायदेशीर बाजू हि आहे. ती मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
असो.
23 Aug 2016 - 9:13 pm | आजानुकर्ण
ते वाक्य रुपालीला उद्देशून नाही तर तो दैनिक सुविचार प्रतिसादात नक्की कशासाठी होता ते कळले नाही. एकंदर चर्चेत कुणी जबाबदारी स्वीकारली आहे किंवा नाही याचा उलगडा झाला नाही. (मुंब्रा-कळवा-डोंबिवली इथल्या मुलींनी परिणामांची जबाबदारी स्वीकारली नाही की काय?)
बाकीचा प्रतिसाद मान्य. तुमची भूमिका मान्य. आणि माझ्याशी मिळतीजुळती आहे. त्याविषयी काहीच मतभेद नाही.
23 Aug 2016 - 10:33 pm | श्रीगुरुजी
>>> तिने केलेला गर्भपात योग्यच होता याबाबत मला शंका नाहीच. कारण "नको" असलेले मूल अनाथालयात देणे किंवा आयुष्यभर कुमारी माता म्हणून समाजाची अवहेलना स्वीकारत जगणे हे दोन्ही पर्याय चूकच आहेत.
निर्दोष गर्भाची सबळ कारणाशिवाय हत्या करणे हा पर्याय सुद्धा चूकच आहे.
23 Aug 2016 - 11:12 pm | पिलीयन रायडर
गर्भ निर्दोष ना? नक्की ना हे?
मग बलात्कारातुन गर्भ राहिला तर त्याला मारणं का चालणारे? त्याचा काय दोष?
कुणी तरी ह्याचं सरळ उत्तर देईल का? माझ्याच प्रश्नाला प्रतिप्रश्न न विचारता..
(हाच प्रश्न पुढे वाढवुन अपंग गर्भाचाही काय दोष? त्याला मारणारे आपण कोण? असाही विचारता येईल. तुमच्या ह्या तर्काने एकंदरितच गर्भपाताचा कुणालाही हक्क नाही हेच ध्वनित होऊ शकतं. पण ते सगळं सोडुन सध्या आपण फक्त बलात्कारातुन होणारं मुल एवढंच गृहित धरु)
24 Aug 2016 - 12:02 am | श्रीगुरुजी
मूळ लेख पुन्हा एकदा नीट वाचा. गर्भपातामागची प्रेरणा काय होती ते समजेल. गर्भात दोष असता तर डॉक्टरांना ते सोनोग्राफीत दिसले असते व त्यांनी तसे लेखात लिहिलेही असते.
बलात्कारातून गर्भधारणा झाल्याबद्दलच्या प्रश्नाला मागील प्रतिसादात उत्तर दिले आहे. त्याची पुनरावृत्ती इथे करीत नाही.
24 Aug 2016 - 12:05 am | पिलीयन रायडर
मग त्या प्रतिसदाची लिंक द्याल का प्लिझ? मला तर इतक्या गोंधळात कुठे सापडला नाही.
24 Aug 2016 - 12:25 am | संदीप डांगे
मला तर कुंभमेळ्यात आल्यासारखं वाटतंया.
"अलख षृंगापत्ती" ब्रूम..,
.
"गर्भपात गर्भपात गर्भपात, आपरेसन फोकट सिरिफ चेकींगका पईसा देनेका"
.
"बडा ढिठ है मनुष्य, सचसे मुंह छुपाता फिरता है, राधामय्याने कृष्णसे प्रेम किया पर ब्याह तो किसी औरसे रचाया, पर वह भूली नही अपने शामसावरेंको.. भक्तजनो, ये है सच्ची भक्ती.. बोलो जयरादेश्याम, जयसियाराम..."
.
"कुंती कहलायी पवित्र मां, पुत्र दिये पतीबिन चार चार,"
.
"आओ मित्र, एखाद कश मारलो, फिरतो बस सिवा का साथ है और धुयेंकी बात है"
.
"आनेवाली एलेक्सन्में हमरी पिरामय्याको सबसे जादा वोटोंसे जिताना है भैया.. तोहार को गंगामैयाकी कसम.."
.
"ये पानी हमपे काहे फेंकाबे, अबे तुम क्य्यूं रास्तेमें आये, हम तो ऐसेही फेंकरए थे, कहा कहांसे चले आते है बुडबक"
.
"अबे तू जानबूझके हमको देखतेही फेंके, हम देखा है, हम सब देखा है"
.
"देखो पंडित, इस कुंभमें तो पहिले जैसे भक्त ना रहे, ना पहिले जैसी भक्ती, अरे भक्ती तो हमार वकत हुवा करती थी..."
.
"बहुत टेन्सनमें हो का, आओ तुम्हारा भूत-भविश्य सब बता देतेंय.. अबे बैठ जाओ, पैसा दो पैसा बहुत बडी चीज है का"
23 Aug 2016 - 8:24 pm | ट्रेड मार्क
जरा त्या मुलीच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून बघा. जर -
१. तिने लग्नाआधी होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगितलं आहे - तर मग प्रश्नच मिटला. सगळं माहीत असून जर त्या मुलाने लग्न केलं असेल तर बाकी कोणी मध्ये पडण्याचं काहीच कारण नाहीये. त्या मुलीने डॉक्टरांना गाठून सांगायला पाहिजे की नवऱ्याला सर्व माहित आहे.
२. ही गोष्ट लपवून ठेवली आहे - यात त्या मुलाची फसवणूक झाली आहे असं नाही वाटत का? जर तो मुलगा एवढा क्रांतिकारी विचाराचा असेल की नुसता होणाऱ्या बायकोचा दुसऱ्याशी शरीरसंबंधच नव्हे तर त्यातून गर्भधारणाही झालेली चालणार असेल तर त्या मुलीने लपवून कशाला ठेवावे? जर त्याला असं वाटत असेल की आपली (होणारी) बायको या गोष्टींपासून लांब असावी तर मग त्याची फसवणूकच झालीये. उद्या तो आधीचा मुलगा येऊन या मुलीला ब्लॅकमेल (पैसे किंवा परत शरीरसंबंध यासाठी) करू शकतो किंवा नवऱ्याला त्याचा एखादा मित्र भेटू शकतो की ज्याला त्या मुलीबद्दल माहिती आहे. अश्या वेळेला जर लग्न झाल्यावर हे कळले किंवा त्याहूनही वाईट म्हणजे मुलं झाल्यावर जर हे आधीचे प्रकरण कळले तर काय होईल?
समजा माझ्या भावाचं किंवा मित्राचं एखाद्या मुलीवर प्रेम आहे आणि मला जर माहित आहे की ती मुलगी या आधी सुद्धा एका किंवा अधिक मुलांबरोबर गुंतलेली होती तर ते मुलाला सांगणे भाऊ किंवा मित्र म्हणून माझे कर्तव्य नाही का? या केस मध्ये ते डॉक्टर धर्मसंकटात सापडलेत कारण लग्न आधीच झालेले आहे.
अजूनही काही लोक्स म्हणत आहेत की चुकून गर्भ राहिला असेल. परंतु डॉक्टरसाहेब तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की ७२ तासांमध्ये गोळी घेऊन हे सर्व टाळता आलं असतं. जेवढा स्पष्टवक्तेपणा तिने डॉक्टरांना गर्भपात का करायचा आहे हे सांगण्यात दाखवला तेवढाच तिने लग्न ठरवताना होणाऱ्या नवऱ्याला सगळं सांगण्यात दाखवला पाहिजे होता.
23 Aug 2016 - 8:37 pm | आजानुकर्ण
आणि तिने तो दाखवलेला नाही हे तुम्हाला कसे कळले? की अंदाजपंचे दाहोदरसे?
23 Aug 2016 - 8:52 pm | मार्मिक गोडसे
अहो तिने स्वागत समारंभात "हेच ते डॉक्टर ज्यांनी माझा गर्भपात केला" अशी आपल्या नवर्याला ओळख कुठे करून दिली? :)
23 Aug 2016 - 9:00 pm | ट्रेड मार्क
तसं तर सगळ्यांचेच अंदाजपंचे दाहोदरसे चालू आहे. नक्की काय परिस्थिती आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का? असेल तर कशी आणि काय आहे ते सांगा आणि नसेल तर उगाच पंचे गुंडाळू नका.
मी फक्त एक तर्क मांडला - जर का सगळंच खुला मामला असेल म्हणजे किमान नवऱ्याला माहित असेल तर तिने डॉक्टरांना ओळख दाखवायला काहीच हरकत नव्हती. सासू सासऱ्यांसमोर जर नसेल दाखवायची तर संधी मिळेल तेव्हा भेटून परिस्थिती सांगायला हरकत नाही/ नव्हती. वर सासू सासर्यांना काही सांगू नका ही विनंती पण करता आली असती. ज्या अर्थी ओळख दाखवत नाही उलट तिरस्काराची (त्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे) भावना आहे त्याअर्थी तिने ही गोष्ट लपवून ठेवली आहे.
असो. हा तर्क आहे तुम्हाला कळेल/ पटेल असं नाही आणि माझा तसा आग्रहही नाही.
23 Aug 2016 - 9:05 pm | आजानुकर्ण
मलाही नक्की परिस्थिती माहिती नाही त्यामुळं मुलीचा संसार नीट पुढं चालावा या सदिच्छेने प्रतिसाद दिलेत.
सगळाच खुला मामला म्हणजे काय? त्या दांपत्याचं स्वतःचं खाजगी आयुष्य आहे. काय विसरायचं, काय लक्षात ठेवायचं, का उगाळायचं याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. डॉक्टरांना ओळख दाखवायची आणि परिस्थिती सांगायची काय गरज आहे हे कळले नाही. डॉक्टरांची त्या दांपत्याच्या संसारात आता काय भूमिका आहे ब्वॉ? डॉक्टर काय तिचे सासरे आहेत की काय? त्या विशिष्ट डॉक्टरांशी आता संबंध येऊ नयेत असे तिला वाटत नसेल का?
अाय लव यू टू.
23 Aug 2016 - 11:42 pm | ट्रेड मार्क
दोघांचा संसार नीट व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे आणि त्यामुळेच बहुतेक जण काय करावे हे सांगताहेत.
म्हणजे कुठलीही लपवाछपवी एकमेकांमध्ये नसणे.
दोघांना मिळून हे सिक्रेट ठेवायचं असेल तर ठीक आहे. पण ती एकटीच हे सिक्रेट ठेवतीये हे चूक आहे.
डॉ. खरेंनी एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे हे डॉक्टर भविष्यात या मुलीच्या प्रेग्नन्सीत डॉक्टर म्हणून असू शकतात. त्यावेळेला फॉर्म मध्ये प्रथम गर्भधारणा म्हणून लिहिणार? जरी दुसऱ्या गायनेक कडे गेले तरी त्या डॉक्टरला ती छोटी शस्त्रक्रिया केल्यामुळे कळण्याची शक्यता बरीच आहे.
अरे बापरे... (तुम्ही पुरुष आहात असे समजून) मी त्यातला नाही हो.
23 Aug 2016 - 10:40 pm | सुबोध खरे
जरा त्या मुलीच्या नवऱ्याच्या दृष्टिकोनातून बघा.
हा पैलू किती लोकांनी पाहिला?
23 Aug 2016 - 10:49 pm | आजानुकर्ण
मुलाच्या दृष्टिकोणातून काय बघायचंय? रुपालीनं तिचं पूर्वायुष्य नवऱ्यापासून लपवलंय की नाही ह्याची काहीच माहिती नसताना तिला आरोपी ठरवण्याची चाललेली पराकाष्ठा अनाकलनीय आहे. बरं 'समजा' तिनं पूर्वायुष्य लपवलंय तर ती आणि तिचा नवरा बघून घेतील की. इथं नक्की काय सिद्ध करायचंय मला आता समजत नाहीये.
23 Aug 2016 - 11:05 pm | राजेश घासकडवी
+१
या धाग्यात एकंदरीत 'ती मुलगी तसलीच होती, त्यामुळे बिचाऱ्या डॉक्टरची कशी पंचाइत झाली' हे सिद्ध करण्याचा प्रयत्न वाटत राहिलेला आहे. त्यासाठी 'गर्भपात म्हणजे स्त्रीने केलेली हत्याच' (डॉक्टरने ती करून दिली तरी तो बिचारा), 'कशी बेइमान, पैसे पुरेसे मिळवत नाही म्हणून आपल्या प्रियकराला सोडलं!' तसंच 'तिचं लग्न त्या डॉक्टरच्या मित्राच्या मुलाशी झालं म्हणजे त्यांची फसवणूक झाली' वगैरे मुद्दे येत आहेत.
आदूबाळने म्हटल्याप्रमाणे केस अतिशय सोपी आहे - त्या डॉक्टर मित्राने व्यावसायिक जबाबदारी घेऊन कायदेशीर काम केलेलं आहे, त्याबद्दल त्याला पैसे मिळाले. तेव्हा कायदेशीर गोपनीयता पाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. आपल्याला ती सांभाळण्यात काही त्रास होत असेल तर व्यावसायिक समुपदेशकाकडे जावं. त्याऐवजी त्याने आपली तळमळ आपल्या समुपदेशक नसलेल्या मित्राकडे व्यक्त केली. ही त्याची चूक झाली. इतकं सोपं आहे हे.
23 Aug 2016 - 11:17 pm | पिलीयन रायडर
अगदी अगदी!
हेच नाही तर ह्या मुलीने आता नवर्याला सोडून पैशेवाल्यासोबत जाण्याचीही शक्यता आहे इथवर भविष्य सुद्धा वर्तवलं आहे!
आपल्याला इतकी कमी, ते ही इतकी वरवरची माहिती असताना लोक कुठंपर्यंत जाऊ शकतात हे आज इथे पहायला मिळालं. धन्य!
23 Aug 2016 - 11:23 pm | आजानुकर्ण
एक्झॅक्टली. एक व्यक्ती एका राज्याचा मुख्यमंत्री असताना तिथं मोठी दंगल झाली. नंतर ती व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाल्यावरही देशात अशा दंगली होऊ शकतील अशा स्वरुपाचं हे फीअरमाँगरिंग वाटलं.
23 Aug 2016 - 11:39 pm | उडन खटोला
पिरा एका संस्थळावर एका समूहाची (स्वघोषित) प्रवक्ती आहे. उद्या एखाद्या वॉर्ड मध्ये विशिष्ट समुहासाठी राखीव जागा निघाली तर पिरा निवडणूक लढवू शकते.
आजच्या कृतीनुसार उद्याचे अंदाज बांधायला कुणाची का हरकत असावी?
23 Aug 2016 - 11:56 pm | पिलीयन रायडर
असं वाचा
"मला पिराचे काही प्रतिसाद वाचुन असं वाटतं की पिरा एका संस्थळावर एका समूहाची (स्वघोषित) प्रवक्ती आहे. उद्या एखाद्या वॉर्ड मध्ये विशिष्ट समुहासाठी राखीव जागा निघाली आणि त्या समुहाने एकमताने पिराला प्रतिनिधी म्हणुन निवडलं तर पिरा निवडणूक लढवू शकते. पण अर्थातच मला पिरा प्रवक्ती आहे की नाही किंवा तिला निवडणुक लढवण्यात रस आहे किंवा नाही हे माहिती नाही. तिच्या प्रतिसादांमागचे संदर्भही सुद्धा मला खरं तर ठाऊक नाहीत. मला खरं तर पिरा बद्दल काहीच माहिती नाही, मी फक्त अधुन मधुन तिचे काही प्रतिसाद वाचलेले आहेत, पण आमची ओळख वगैरे तर अजिबात नाही. काही गोष्टी इकडुन तिकडुन ऐकलेल्या असतील. किंवा कुणाला तिच्या विषयी बोलताना पाहिले असेल. पण ह्या वरुनही मी निवडणुकच काय तर तिची संवेधनशीलता ह्यावरही अंदाज बांधु शकतो!"
पिरा तरी इथे स्वतः लिहीते. पण जी व्यक्ती माहितीच नाही तिच्याविषयी मात्र १००% खात्रीने लिहाल.. हीच तरी गम्मत आहे. आणि तुम्हाला ते चुकही वाटत नाही!!
असो.. मी काय म्हणते. आपलं मत ह्या जन्मात जुळणार नाही. मला तुमच्याशी तेच तेच मुद्दे बोलण्यात रस नाही. तुम्ही काही उद्बोधक वगैरे लिहीलं असतंत तर मलाही फायदा झाला असता. पण तसंही काही दिसत नाही. तेव्हा मी थांबते.
धन्यवाद!
( स्वगतः- लोक कसे आयडी बघुन बरोब्बर हुकमी मुद्द्यांवर येतातच. ग्रेट!)
24 Aug 2016 - 12:02 am | उडन खटोला
उदाहरण दिलं होतं. तुम्हाला समजेल असं वाटलं होतं.
तरी समजलं नाही एवढं समजलं. थांबूया!
24 Aug 2016 - 12:10 am | श्रीगुरुजी
माहितीतल्या लोकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत हे भाकीत आहे.
आपल्याला इतकी कमी व वरवरची माहिती असताना सुद्धा लोकं निर्दोषत्वाची प्रमाणपत्रे देऊन चुकीच्या गोष्टींची कशी भलामण करू शकतात हे सुद्धा पहायला मिळालं. धन्य!
23 Aug 2016 - 11:35 pm | सुबोध खरे
त्याऐवजी त्याने आपली तळमळ आपल्या समुपदेशक नसलेल्या मित्राकडे व्यक्त केली. ही त्याची चूक झाली. इतकं सोपं आहे हे.
घासू गुरुजी
व्यावसायिक समुपदेशक आभाळातून पडतात काय? शिवाय अशा "माणसाला" हि कहाणी सांगणे हा व्यावसायिक नीतीमत्तेचा भंग नाही का होणार?
जो डॉक्टर हे रोज पाहत आला आहे अशा डॉक्टरचा सल्ला घेतला तर त्यात काय चूक आहे? डॉक्टर समुपदेशक होऊ शकत नाही?
त्याने मला एक्झॅक्टली यासाठीच फोन केला होता. मला मुळात या केसचे ९० % पैलू माहित होते त्याने फक्त या मुलीने माझ्या मित्राच्या मुलाशी लग्न केले एवढी एकच माहिती सांगितली कारण हि माहितीच त्याच्या अस्वस्थतेचे मूळ होते. मी त्याला "कर्मण्ये वाधिकारस्ते" सारखे समुपदेशन केले तर मिपा वर लोकांनी ब्रम्हज्ञान दिल्याचे आरोप केले. शिवाय व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग केल्याचे आरोप केले.
पुरावा नसताना किती लोकांनी निवाडे दिले आणि वर मला जजमेंटल आहे म्हणून दोषही दिला.
तुम्ही सुद्धा त्याचीच री ओढलीत
असो.
23 Aug 2016 - 11:53 pm | राजेश घासकडवी
भारतात सायकिअॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर वगैरे लोक नसतात?
कारण प्रत्येक डॉक्टरची काही स्पेशालिटी असते त्याप्रमाणे समुपदेशनाचं काम करणारे वेगळे असतात. प्रत्येकच डॉक्टर आपलं स्पेशलायझेशन आणि त्याच्या मर्यादा ओळखून 'मी या बाबतीत असमर्थ आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पेशालिस्टकडे जावं' असा सल्ला देऊ शकतो, देतोही.
तुम्ही तुमच्या परीने एक मित्र म्हणून योग्यच सल्ला दिला. बहुतांश मिपाकरांनीही सगळं बर्डन तुमच्या मित्र डॉक्टरवरच टाकल्याचं मला दिसतं. ज्यांनी तुम्हाला दोष दिला आहे असं वाटतं त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. याउप्पर आणखी काय बोलणार?
24 Aug 2016 - 12:06 am | सुबोध खरे
प्रत्येकच डॉक्टर आपलं स्पेशलायझेशन आणि त्याच्या मर्यादा ओळखून 'मी या बाबतीत असमर्थ आहे, तुम्ही या प्रकारच्या स्पेशालिस्टकडे जावं' असा सल्ला देऊ शकतो, देतोही.
हि गोष्ट तेवढ्या पातळीवर गेली तर आम्ही पण असा सल्ला देतो.साधी सर्दी झाली तर कां नाक घास तज्ज्ञाकडे जायचा आपला सल्ला उफराटा वाटतो.
परंतु दोलायमान परिस्थितीत साधी सरळ गोष्ट त्यांना समजावून सांगून समजत असेल तर समुपदेशकाकडे जायची गरज भासत नाही.रच्याकने -लष्करात असताना मी मनोविकार शास्त्रात चार महिने काम केले होते
माझ्या बहिणीला जर काही गायनॅकॉलॉजिकल प्रश्न आला तर मी लगेच स्त्रीरोग तज्ज्ञाकडे पळतो का ? तेवढे मूलभूत ज्ञान प्रत्येक एम बी बी एस डॉक्टरला असतेच. तसंच मनोविकार शास्त्र हा एम बी बी एस ला एक विषय म्हणून अभ्यासाला असतो. म्हणून बहुतेक वेळेस आपले फॅमिली डॉक्टर आपल्या समुपदेशकाचे काम आपल्या न काळात करत असतात.
अशा विश्वासाने त्यांनी मला फोन केला आणि मी त्यांना धीर दिला तर तो व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग झाला म्हणून लोकांनी कोल्हेकुई सुरु केली. मूळ मुद्दा राहिला बाजूला.
असो
24 Aug 2016 - 12:12 pm | संदीप डांगे
अशाच अर्थाचं मी काहीतरी बोललो तेव्हा झालेला गदारोळ आठवला, अखेर कोण बोललं हेच महत्वाचे आणि त्यानुसार मिपावर उपदेशाचे ढग दाटून बरसू लागतात...
=))
24 Aug 2016 - 12:19 pm | सुबोध खरे
उगी उगी
24 Aug 2016 - 12:25 pm | संदीप डांगे
स्कोअर सेटलींग बद्दल जिथेतीथे उगाच गळा काढणाराने दुसऱ्याला 'उगी उगी' करावं हे खचित मनोरंजक आहे,;)
24 Aug 2016 - 12:07 am | श्रीगुरुजी
अर्धसत्य! त्या मुलीला गर्भपाताशिवाय पर्यायच नव्हता, झाले त्याच्यात मुलीची काहीही चूक नाही, गर्भपात करणे हा तिचा हक्कच आहे, डॉक्टरांनी व्यावसायिक नितीमत्ता कशी गुंडाळली हे देखील सिद्द्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
23 Aug 2016 - 9:58 am | समीरसूर
लेख आवडला. शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. डॉक्टरसाहेबांनी एक अनुभव म्हणून शेअर केला. एवढा काथ्याकूट करण्यासारखं लेखात आक्षेपार्ह असं खरंच काही वाटलं नाही. आपली लाख इच्छा असली तरी जग हे सोयीने चालतं, कुणाच्या इच्छा-अपेक्षांप्रमाणे नाही.
23 Aug 2016 - 10:24 am | सुबोध खरे
आपली लाख इच्छा असली तरी जग हे सोयीने चालतं, कुणाच्या इच्छा-अपेक्षांप्रमाणे नाही.
you said it
23 Aug 2016 - 3:54 pm | इरसाल
मिपावर सद्ध्या "अॅब्रेव्हिएटेड टीपीबी" चालु आहे अस वाट्ट्य.
डॉक्टरांच्या मेन मुद्द्याला सोडुन दुसर्याच गोष्टींचा किस पाडला जातोय.
आणी हो कोणाला पटो ना पटो पण हळु हळु स्कोर सेटलींग दिसतय ! (कृपया तोंड वर करुन "कोण करतय स्कोर सेटलींग ?" अस विचारायला येवु नये.)
23 Aug 2016 - 4:02 pm | साहेब..
+1
23 Aug 2016 - 4:58 pm | उडन खटोला
त्रिशतक पूर्तीबद्दल डॉक्टर साहेबांना, मी नै त्यातली ट्याग असलेली कडी, व्यावसायिक मूल्यशिक्षणाच्या तासाची सीडी, दोन बुट्टया आणि महाभारताचं पुस्तक हे सगळं एक किलो हिरव्या मुगाबरोबर (गिळून गप्प बसण्यासाठी) द्यावं असा प्रस्ताव याठिकाणी ठेवत आहे.
23 Aug 2016 - 6:59 pm | मी-सौरभ
तुमचा लेख आणि त्याला आलेले ३०० प्रतिसाद वाचले. त्यातला गा पै चा त्या तुमच्या मित्राने काय करावे हा प्रतिसाद फक्त धागा सुसंगत वाट्ला. त्या मताशी मी पण सहमत आहे,
बाकी सर्व प्रतिसाद मात्र धाग्यातल्या आपल्या सोयिच्या गोष्टी धरुन व्यक्त केलेली मतमतांतरेच होती :( हे बघुन एक मिपाकर म्हणुन चांगले नक्कीच वाटले नाही.
23 Aug 2016 - 7:41 pm | सुबोध खरे
सौरभ साहेब
अनेक मते येतात. ती आपल्याला पटतात असे अजिबात नाही. पण एखाद्या प्रश्नांची दुसरी बाजू काय आहे जिचा आपण विचार केलेली नसतो ती पण आपल्या समोर येते. लोक आकसाने किंवा संतापाने अश्लाघ्य भाषा हि वापरतात. त्याचे मनावर न घेता मुद्दा काय मांडला आहे तो विचार करावा.
काही लोकांची विचारसरणी अतिरेकी असते तर काही लोक फक्त पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात.
वरील काथ्याकुटात काही लोक डॉक्टर खरे हरामखोर आहेत याही विचारसरणीचे असतील. तेहि एकुन घ्यायचे.
याच बरोबर काही लोक अत्यंत कमी शब्दात आपल्याला मांडायचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडून दाखवतात अशांपासून बरेच काही शिकता येते.
हे सर्व आपल्या वैचारिक समृद्धी आणि मानसिक प्रगल्भतेसाठी साठी आवश्यक आहे. तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका.
23 Aug 2016 - 10:20 pm | पैसा
http://www.misalpav.com/comment/869468#comment-869468 हा माझा आणि खेडूत यांचा पहिलाच प्रतिसाद वाचला नाही का!
23 Aug 2016 - 8:28 pm | तेजस आठवले
मला असे वाटते, की ह्या लेखाचा उद्देश एवढाच आहे की अश्या प्रसंगात संवेदनशील असणाऱ्या आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या माणसाला कशी टोचणी लागून राहते आणि नकळत पणे तो स्वतःला अपराधी समजतो; हे दाखवणे हा आहे.
बाकी आपल्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेणे हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. निर्णयाबरोबर जबाबदारी पण येते एवढे लक्षात ठेवले की झाले.
बाकी मूळ लेखात किंवा प्रतिसादांमध्ये रुपालीला "चालू" ठरवायचा प्रयत्न झाला आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.
निव्वळ मजा मारणे हा उद्देश त्या दोघांचाही असू शकेल. मात्र काळजी घेतली किंवा घेतली नाही तरी गर्भधारणा होऊ शकते हि शक्यता विचारात घेतली होती की नाही ते माहित नाही. गर्भधारणा झाली तर गर्भ पाडणे अथवा वाढवणे हे मलाच करावे लागणार आहे हे रुपालीने विचारात घेतले होते की नाही ते पण आपल्याला माहित नाही.
बाकी काही वाक्प्रचार आठवले,
- पकडला गेला तर चोर (इथे ह्या प्रसंगात कोणालाही रूढार्थाने चोर म्हटलेले नाहीये)
-जग खरंच खूप छोटं आहे, कोण कोणाला कश्या स्वरूपात भेटेल काही सांगता येत नाही.
23 Aug 2016 - 9:02 pm | ट्रेड मार्क
+१
23 Aug 2016 - 11:19 pm | माम्लेदारचा पन्खा
असं म्हणता येऊ शकेल की तेव्हा ती मुलगी त्यांच्यासाठी फक्त एक पेशंट होती...
गर्भपात करायला येणा-या अनेक मुली न सांगता येणा-या कारणांसाठीच तो करतात हे सत्य आहे... कालांतराने तीच मुलगी त्यांच्याच मित्राच्या मुलाशी लग्न करते हा योगायोगच आहे... त्यात त्यांना वाईट वाटता कामा नये....
मात्र आपल्याच मित्राचा मुलगा यात अडकला आहे हे कळल्यावर ते अपसेट होतात...इथे त्यांच्यातला डॉक्टर आणि मित्र यांचे द्वंद्व सुरु झाले....त्यातून ती मुलगी अशी आशा करतेय की हे परत दिसू नयेत...जरी ती पेशंट होती तरीही !
अशा परिस्थितीत मित्राने व्यावसायिक बांधिलकी जपावी, मात्र मित्राशी संबंध तोडायची गरज नाही.... ती मुलगी कधीही ही बाब उघड करणार नाही आणि त्यांना विरोधही करणार नाही त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप !
23 Aug 2016 - 11:27 pm | सुबोध खरे
आपल्याच मित्राचा मुलगा यात अडकला आहे
मामलेदार
तुम्ही पण कसे एकदम बुर्ज्वा ( असे लोक म्हणतात)
असो
+१००
आमच्या मित्राने अगदी हेच केलं.
रुपाली उद्या त्यांच्या कडे आली तरी तिला ओळखले नाही असेच ते दाखवू शकतात
शिवाय उद्या रुपालीने जरी घरच्या सगळ्यांना सांगितलं कि मी याच डॉक्टरांकडे गर्भपात केला होता तरीही हे डॉक्टर सांगू शकतील कि माझ्या कडे भरपूर रुग्ण येतात मी कोणाकोणाच्या गोष्टी लक्षात ठेवू?
एकदा लग्न झालेलं असताना दुधात मिठाचा खडा टाकण्यात काय हशील आहे.
23 Aug 2016 - 11:31 pm | माम्लेदारचा पन्खा
वडिलांच्या मित्राच्या भूमिकेत होते... त्या क्षणी त्यांच्यातल्या डॉक्टरवर त्यांच्यातला मित्र वरचढ ठरला होता नाही तर अशी चलबिचल झालीच नसती !
23 Aug 2016 - 11:45 pm | संदीप डांगे
डॉक्टरसाहेब, तुमचे अगदी सुरुवातीपासूनचे सर्व प्रतिसाद तुम्हीच एकसलग वाचून काढा अशी विनंती करतो.
१. http://misalpav.com/comment/870902#comment-870902
"होणाऱ्या नवऱ्याला आपल्या पहिल्या शारीरिक संबंधाबद्दल प्रामाणिकपणाने सांगण्याचे धैर्य तिच्याकडे असायला हवे."
२. http://misalpav.com/comment/870429#comment-870429
"आपल्या आनंदासाठी एका जीवाला जन्मापूर्वीच नष्ट करणे यात आजकाल लोकांना वावगे वाटेनासे झाले आहे हीच दुर्दैवाची गोष्ट आहे. भावनेच्या भरात आपण कामक्रीडा केलीत, तेंव्हा "काळजी" घेता आली नाही. मान्य. मग त्यानंतर तीन दिवसात (७२ तासात) आपल्याला गोळ्या घेता येत नाहीत?"
वर ठळक केलेली तुमची वाक्ये व त्यातली तुमची भूमिका, खाली दिलेल्या तुमच्या प्रतिसादांतल्या भूमिकेशी विसंगत वाटत आहेत. एकिकडे तुम्ही 'दुर्लक्ष करण्याइतके उदार झाले पाहिजे' म्हणता त्याचवेळेला मोरल पोलिसिंग करण्याचा यथोचित प्रयत्नही करता. यात तुम्ही इतरांकडून म्हणजे समाजाबद्दल असलेल्या तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या मतांमधे फरक पडतोय हे लक्षात घेतलेले नाही. म्हणजे 'समाज कसा उदारमतवादी नाही' हे सांगता, दुसरीकडे स्वतःच्या अपेक्षाही त्या मुलीवर लादता जे सर्वसाधारणपणे समाज करतो.
सुरुवातीला तुमचे प्रतिसाद खूपच संतुलित होते जेव्हा ते तुमच्या डॉक्टरमित्राशी संबंधित होते, पण जसजसे मुलीच्या वागणूकीची, चारित्र्याची चिरफाड करणारे प्रतिसाद यायला लागले तसतसे आपण त्याकडे झुकू लागलात. ही तुमची विसंगत भूमिका खटकली म्हणून तुम्हाला स्पष्ट विचारले की मुद्दा डॉक्टरमित्राच्या दुविधेचा आहे की मुलीच्या चारित्र्याच्या पोस्टमार्टेमचा? ह्याला आपण आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे म्हणत असाल तर ती वेळ आपली आपणच ओढवून आणली असे म्हणावे लागेल.
जे दिसले ते बोलतोय, इथे कुणावरही स्कोअरसेटलींग करायला, आकस ठेवून मीगाबायटींत वेळ फुकट घालवायला मला तरी रस नाही. म्हणून सुरुवातीपासून चर्चा सुरु होती तरी गप्प होतो. जिथून चर्चेचा फोकस डॉक्टरमित्राच्या दुविधेपासून हटून मुलीच्या चारित्र्यावर आला तिथेच चर्चेत उतरलो. कारण नंतरच्या इथल्या काही प्रतिसादांवरुन वाटायला लागले की "डॉक्टर्मित्राची दुविधा सॉल्वेबल नाही मग चला त्यास कारणीभूत असलेल्या मुलीच्या निर्णयांची चिरफाड करा" त्यात तुम्ही "कितीवेळा संबंध ठेवले असतील, गर्भधारणेला कितीवेळा संभोग आवश्य्क आहे" अशा अनावश्यक डिटेल्स देऊन आगीत तेल ओतलेत.
एकूणच चर्चेची पातळी खूपच घसरली. मूळ मुद्दा भरकटून 'गर्भपात चुकीचा का बरोबर' ह्या अनावश्यक मुद्द्याभोवती पिंगा घातल्या गेला. दर्जेदार चर्चेमधे फक्त डॉक्टरमित्राची दुविधाच सर्व बाजूंनी चर्चिल्या गेली असती. तिथवर थांबणे योग्य ठरले असते असे माझे वैयक्तिक मत. धन्यवाद!
24 Aug 2016 - 12:10 am | सुबोध खरे
स्वतःला पाहिजे तेवढेच शब्द घेऊन दिलेला छिद्रान्वेषी प्रतिसाद.
असो
24 Aug 2016 - 12:14 am | सुबोध खरे
लोकांनी आपल्याला पाहिजे तसे सोयीस्कर शब्द निवडून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे यापुढे वितंडवाद घालण्यात मला तरी रस राहिलेला नाही. माझ्या मर्यदित ज्ञाना नुसार मी बऱ्याच करण्याचा प्रयत्न केला. काही लोकाना त्याच फायदा झाला असावा असे वाटते. बाकी काही लोकांचा टाईमपास झाला.
माझ्या कडून आता अधिक काही लिहिणे नाही
इति लेखनसीमा
24 Aug 2016 - 12:15 am | सुबोध खरे
बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह असे हवे
24 Aug 2016 - 12:14 am | पिलीयन रायडर
मी सुद्धा थांबते.
गर्भपाताबद्दल लोकांनी भावनिक मत देणं मी एकवेळ समजु शकते. पण रुपालीच्या चारित्र्यावर चर्चा उतरली हे फार निराशाजनक आहे. लोकहो तुम्हाला खर्यांनी लिहीलेल्या १० ओळींपलीकडे काहीही माहिती नाही. तरी एवढे अंदाजपंचे दाहोदरसे प्रतिसाद?!!
बाकी चर्चा करायची इच्छा खुप असली तरी लोक आयडी बघुन प्रतिसाद देतातच. तेव्हा चर्चेला कुठे आणि कशी वळणं द्यायची हे ही नक्की असतं. साध्य काहीच करायचं नसतं, केवळ जुनी धुणी किंवा उगाच असलेला आकस व्यक्त करायचा असतो. अशांसाठी वेळ नाही. क्षमस्व!
डांगे अण्णा, एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते. आपल्या मेगाफायटी झालेल्या आहेत अनेकदा. पण तुमच्या सोबत मुद्द्यावर चर्चा होऊ शकते आणि चर्चा संपल्यावर मिपा सदस्य म्हणुन व्यवस्थित परत बोलता येतं ह्याचं कौतुक आहे. तुमच्या सोबतचे मतभेद धाग्यावरच संपतात. त्यासाठी धन्यवाद!
24 Aug 2016 - 2:58 am | प्रभाकर पेठकर
पायातल्यापायात घुटमळणार्या प्रतिसादांमधून एव्हढं मात्र लक्षात आलं आहे की मिपावर अनेक डॉक्टर आहेत (जे मला आधी माहित नव्हते) आणि संस्कृतीरक्षकही बरेच वाढले आहेत. (पूर्वी मी एकटाच होतो, निदान माझी तशीच संभावना केली जायची). जग बदलो नाहीतर न बदलो, मिपा मात्र खुपच बदलले आहे.
डॉ. खरे ह्यांच्यावर होणारे व्यावसायीक नितिमत्ता न पाळण्याचे आरोप त्यांना किती मानसिक क्लेश देऊन गेले असतील ह्याची कल्पना करवत नाही. खरंच डॉ. खरेंना आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे नैतिकतेला धरून आहे का? सुलभा देशपांडेंचे 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक आठवलं.
वैद्यकिय क्षेत्रातील आजची अनैतिकता अनेक मार्गांनी आपण पाहात/अनुभवत असतोच. वैद्यकिय क्षेत्रच का? पोलीस खाते, बांधकाम व्यावसाय क्षेत्र, राजकिय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र वगैरे वगैरे क्षेत्रात जो पराकोटीचा गैरव्यवहार, अनैतिकता रोज रोज आपण पाहात असतो त्या समोर दोन डॉक्टरांमधील संवाद आणि कथेतील पात्रांची ओळख दडवून डॉक्टर खरे ह्यांनी जी त्यांच्या मित्राची भावनिक, नैतिक आणि व्यावसायिक समस्या आपल्या समोर मांडली त्यात मुळात मला तरी कांही अनैतिक दिसले, जाणवले नाही. त्या समस्येवर उद्बोधक चर्चा होणे अपेक्षित होते पण चर्चा भरकटतच गेली.
डॉक्टर हा जरी व्यावसायिक नितिमत्तेच्या बंधनाने बांधलेला असतो तरी तो ही एक हाडामासाचा, मन असलेला, भावना असलेला माणूसच असतो हे विसरून चालणार नाही. कधी कधी त्याच्या मनाची कोंडी झाली तर त्याने कोणा जवळ मन मोकळे करावे? दुसर्या सम व्यवसायी आणि त्या केसशी संबंधीत डॉक्टर जवळ आपली व्यथा, मनाचा गोंधळ आणि आपण अपराधी आहोत का? हा यक्ष प्रश्न सोडवायचा झाल्यास त्याने आपल्या डॉक्टर मित्राजवळ आपली समस्या मांडली तर त्यात मला तरी गैर वाटत नाही. नाहीतर त्या डॉक्टरांना ती (खरी किंवा आभासी) अपराधी भावना जन्मभर जाळत राहिली असती. म्हणजे प्रत्यक्ष चितेवर जळण्याआधी ते 'चिंतेने' (आपण अपराधी आहोत ह्या) जळत राहिले असते. त्यांना समुपदेशनाची गरज होती. ती डॉक्टर खरे ह्यांनी पुरी केली आणि त्यांची अपराधी भावनेतून सुटका केली. एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी केलेला अपराध कायद्यानेही क्षम्य आहे. मग आपण का डॉक्टर खरेंना टोचत आहोत? मला नाही पटत. असेल अनैतिक पण त्या मागे स्वार्थ नाहीए.
प्रश्न उरतो की हे सर्व त्यांनी मिपावर का टाकले? तर सर्व मिपासदस्यांना विचार खाद्य मिळावे आणि मंथनातून कांही विधायक विचार सर्वांसमोर यावेत. प्रत्येक व्यावसायिक आपापल्या व्यवसायाच्या अनुभवांचे कथन करीत असतो. मीही माझ्या व्यवसायातील कांही अपप्रवृत्ती बद्दल मागे इथेच लिहीले होते. तर मग वैद्यकिय व्यवसायालाच का वगळावे?
परवाच 'रुस्तम' चित्रपट पाहिला. अर्थात तो चित्रपट आहे हे मलाही मान्य आहे पण त्यातही भारतिय नौदलाच्या गैरव्यवहाराचे वास्तव उघड केले आहे. कांही चित्रपटातून आर्मीचेही गैर व्यवहार समोर येत असतात. जरी ती चित्रपटांची कथानकं असली तरी अगदीच काल्पनिक नसतात ती बहुतांशी सत्यघटनेवर आधारीत असतात. हे सर्वही अनैतिकच मानले पाहिजे. राष्ट्रीय गुपिते जगासमोर उघड केली जातात. त्या मानाने आपल्या ह्या कथेतील अनैतिकता (असलीच तर) विषेश दखलपात्र नाहीए असे मला वाटते. म्हणजे आजूबाजूला चोर्या, खुन, दरोडे पडत असताना पोलीसांनी डबलसीट सायकलस्वाराला दंड ठोठविण्याइतपत हास्यास्पद आहे, असे मला वाटते.
24 Aug 2016 - 8:59 am | कैलासवासी सोन्याबापु
400!
24 Aug 2016 - 9:36 am | मुक्त विहारि
४०१
24 Aug 2016 - 11:58 am | अप्पा जोगळेकर
एक साधी गोष्ट सांगितली तर डॉक्टर खरेंना निष्कारण झोडपले जात आहे असे वाटते.
बाकी,
माझे लग्न होण्याआधी जर हा धागा आला असता तर मी त्या मुलीचा नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला असता.