एके दिवशी सहजपणे ओळी सुचत गेल्या आणि त्या मी लिहून काढल्या. काही सुधारणा असतील तर अवश्य सांगा! :)
रयतेचा राजा
हाती घेऊन तलवार अंगी लेऊन तो शेला,
मातीतला वीर रणी लढाया चालीला…
नको आहे त्यास मान अन सेवक चाकरीला,
मायभूमीस ताराया तो जिद्दीने पेटला…
शत्रू आहे मोठा द्वाड अन उत-मातलेला,
जोडीस तयाच्या मोठे लष्कर सेवेला…
कोणी म्हणे त्यास काळ, कोणी दैत्य माजलेला,
घोड्यावर बसून जणू यमच आलेला…
पण काळ्या मातीच्या वीराला नसे फिकीर कोणाची,
ना दैत्य-दानवाची ना आलेल्या यमाची…
करुनी गर्जना दिली घोड्यासी त्या टाच,
अन शत्रूच्या दिशेने तो त्वेषाने चालीला…
होते सैन्य थोडेफार अन सह्याद्री जोडीला,
कडे-कपार्यान्मधून यांनी गाठीले शत्रूला…
शत्रू होता बेसावध त्यास लगेच घेरला,
गाजवुनी पराक्रम त्यास पुरता मारिला…
होते हात जोडलेले अन चेहरा पडला,
शत्रू सेनापती आता शरण तो आला…
फुकाचा अहंकार अन सत्तेने माजला,
रयतेच्या राजापुढे नतमस्तक जाहला!
आशिष
प्रतिक्रिया
15 Jun 2015 - 2:49 pm | शब्दबम्बाळ
७४ वाचने आणि एकही प्रतिक्रिया नाही? छे!! :P
15 Jun 2015 - 3:55 pm | एस
छान लिहिलंय.
15 Jun 2015 - 4:42 pm | खटपट्या
खूप छान कविता.
पोवाडा जास्त वाटला..
15 Jun 2015 - 7:00 pm | शब्दबम्बाळ
हो पोवाड्याच्या शैलीमध्येच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे! :)
पण जमलाय का ते नक्की माहिती नाही!
15 Jun 2015 - 7:28 pm | सतिश गावडे
छान लिहिलंय. आवडलं.
20 Jun 2015 - 3:38 pm | शब्दबम्बाळ
सर्वांचे आभार! _/\_