चिरजीवीत कहाणी
सरले ते पळ,......मन भरुनी
जपले सय समरांगण मी,.... ओल्या नयनी
ओतीत मधाळ पखाली;.... मनमानी
हिंदोळा झुलवित,.... खेळ खेळतो कोणी
ही भातुकली;.. डोळ्यात आणते पाणी
कधि गतवचनांची स्मरते आणीबाणी
विखुरल्या कथा परि पंख पेरते राणी;..
शब्दात नाहते; हृदयस्वरांची; बिंबित अबलख वाणी
बहु मुळे तळाशी दुर्वा शिरी ठिकाणी
मोगरी कळ्यांची गंधित सवेस वेणी
लाटेस किनारा; किनार्यालगत; अगणित; व्रत लेणी
ह्या खुणा जपाच्या;.... चिरजीवीत कहाणी
............................अज्ञात
कविता आवडली नाही. प्रचंड
+1
आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत
>>>आपलं म्हणणं मी अव्हेरू शकत
आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल
मस्त!!!! गेय!!!
कविता हि आपोआप स्फुरते .