सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
2 Nov 2016 - 5:04 pm | अभ्या..
वैभव, टिचकीची लिंक गंडली राव. एक झलक दिसती औरंगाबाद ग्रुपची आणि नंतर अॅड्रेस वॉजन्ट अन्डरस्टुड म्हणतंय.
2 Nov 2016 - 5:21 pm | वैभव पवार
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/Gl1xYSfpA8b60rPDVQq0Ww
2 Nov 2016 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणत्याही मिपाकट्ट्याचा धागा इथेच मिपावर टाकून सर्व मिपाकरांना त्याची माहिती दिली तर ते जास्त चांगले होईल.
कारण त्यामुळे विशिष्ट कायप्पागृपवर नसलेल्या स्थानिकांना, परगावाहून येऊ इच्छिणार्यांना * किंवा परगावच्या पण कर्मधर्मसंयोगाने कट्ट्याच्या जागेजवळ असणार्यांनाही कट्ट्यात भाग घेता येईल. शिवाय वाचनमात्र मिपाकरांना भेटण्याची आणि त्यांना मिपापरिवारात अधिक घट्ट सामावून घ्यायची संधीही मिळेल.
* : ८ तास चारचाकी चालवत कट्ट्याला येऊन कट्टा संपल्यावर लगेच परत ८ तास चारचाकी चालवत परतीचा प्रवास करण्याचा स्पृहणिय विक्रम करणारे लोक मिपापरिवारात आहेत, काय समजलात ! :)
2 Nov 2016 - 9:17 pm | वैभव पवार
ठीक आहे सर नविन धागा काढतो!
2 Nov 2016 - 11:23 pm | अभ्या..
ओ एक्काकाका, ते विक्रम परदेशातल्या मख्खन रस्त्यावर, भारी भारी एसी गाडी आणि शिस्तीत ट्राफिकमध्ये.
म्या कट्ट्यासाठी टूव्हीलरवर, पावसात भिजत, सोलापूर ते पुण्यातल्या दिव्य ट्राफिकात ५ तास चालवून आलोय, आणि परत गेलोय. काय समजलात ;)
2 Nov 2016 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
मग तर माझा मुद्दा अजूनच जास्त ठामपणे सिद्ध झाला नाही का ?
भारतातले ५ तास पावसात दुचाकी चालवणे => अम्रिकेतले ८ तास चारचाकी चालवणे... हाकानाका ! ;) :)
2 Nov 2016 - 11:31 pm | अभ्या..
पन मी औरंगाबादला जाणार नाही.
(सरांनी बोलावल्याशिवाय. ते नाराज हैत)
3 Nov 2016 - 8:32 am | नाखु
लोकांनी मध्यवर्ती ठिकाणी (अर्थात पुणे किंवा नगर इथे कट्टा करावा ) हजेरी लावू.नगरच्या जवळ काही लेणी-मंदीरे आहेत का? म्हणजे आम्चे गडकरी येतील.
महानगरी नागरीक नाखु