कविते.....!
कविते......!.
तू, तुला हवं तसं जग !!
उमलत राहा, फुलत रहा,
कागदांवरून मनांवर बहरत रहा, नेहमी सारखीच!
पण एक लक्षात ठेव आता ......
तू ना माझी , ना त्याची !
मी लिहिलं तुला म्हणून तो वाचेल तुला,
एवढाच काय तो उरलेला दुआ !
कारण भेटलो तर , स्वप्न वाटेल,
नाही भेटलो तर, विरक्त वाटेल !
नव्याने काही केलं तर पाप वाटेल,
जुन्यातच अडकुन राहीलो तर श्राप वाटेल!
हात दिला तर स्वार्थ वाटेल,
ढळणारा अश्रूच, सार्थ वाटेल!
काही केलं तर...काय केलं? वाटेल
नाही केलं तर...का नाही केलं? वाटेल !
आमचं काय ??...... आम्हाला काहीही वाटेल...!
तर कविते, तू जगलीस काय आणि मेलीस काय !
आता आम्हाला पर्वा नाही कशाचीच
सगळेच दुवे संपलेत कदाचित !
सगळ्या वाटाही बंद झाल्यात
एकमेकांपर्यंत जाण्याच्या !!
--------------फिझा.
ही कविता " मला लागली कुणाची
छान कविता आहे ...
मस्त
छान
छान...!