काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
अचानक आमच्या सासूबाई प्रकट झाल्या (अतिथी), मग त्या सुद्धा बरोबर निघाल्या,माझी पत्नी आणि सासुबाईची मिसळ मंदिरास भेट देण्याची हि पहिलीच वेळ होती , रविवार असला तरी मी नेहमी बाईक घेऊन मिसळ मंदिरास भेट देत असतो, पार्किंग चा खूप त्रास असतो तिकडे... प्रवास सुरु झाला, कशीबशी फायर ब्रिगेड जवळ जागा मिळवून गाडी पार्क करण्यात यश मिळवले.
पंढरीच्या वारी वारकरी जसे विठ्ठलाच्या दर्शनाची आस डोळ्यात पाऊले चालत असतात तशीच काहीतरी माझी परिस्थिती झाली होती.
अखेर दोन मिनिटात आमची पंढरी समोर दिसली,बाहेर नेहमीचीच गर्दी, हळूहळू वाट काढत काढत एका टेबला पर्यंत येउन पोहोचलो, आधीच दोन लोक त्या टेबला वर मिसळीचा आस्वाद घेत होते. आम्ही जरा बारीक होत टेबलावर कब्जा केला.
आत गाभार्यात पोहोचताच ओळखीचे काकानी (वेटर) हसत मुखांनी स्वागत केले, बर्याच दिवसात न आल्याचे चौकशी झाल्यावर " होऊन जाऊदे" अशी हाक मारताच भरभर समोर बशीत दोन पाव अवतरले,
मेनुकार्ड नाही का ? असे सासूबाईनी विचारताच हाटेलातले सगळे आमच्या तोंडाकडे बघायला लागले. किती खजील झाल्यासारखं झालं काय सांगू. माझ्या पंढरीचा केवढा हा अपमान?
सासूबाई ची खरपूस शाळा ( समाचार ) घेतल्यावर सौ विचारत्या झाल्या," मिसळ आणि अजून काय मिळतं इकडे??",
बाकी काहीही मिळूदे आपण मिसळच खायची असा दमच दिला. मामलेदार मिसळीची प्रचीती नसल्याने मी या अज्ञानी बालकांना देवणी क्षमा करावी अशी देवाला प्रार्थना करून एक तिखट आणि दोन मेडियम अशी हाक दिली.
क्षणाचा विलंब न करता माझी परमप्रिय मिसळ समोर अवतरली, बायकोच्या हातचा मिळमिळीत खून तोंडाची चव गेली होती. जोरदार डल्ला मारायला सुरुवात झाली, हाता तोंडाची लढाई जोरदार सुरु झाली, मधेच सासूबाई बेस्लेरी आहे का ? थोडा कांदा मिळेल का ? टिशू नाहीत का ? असे काही तरी चालूच होतं.
अरे किती तिखट आहे हे , नाकातून, डोळ्यातून पाणी यायला लागलाय--- सौ, (टाऊन मधल्या लोकांना मिळमिळीत खायची सवय )
त्याच्या कडे जराही लक्ष न देता आमच रसग्रहण - पाव सुरूच होतं. शेवटी ताकाचे ग्लास समोर येउन उभे राहिले. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो.
गाडी जवळ पोचल्यावर सासूबाई आणि सौ यांची मिसळ या विषयावर चर्चा सुरूच होती, "अरे ती त्या मामाची ती हि आहे ना ती पण खूप छान मिसळ करते".
अरे … मुर्ख लोक अशी मिसळ कुठे पृथ्वी तलावावर मिळते का ?, पुण्याची , कोल्हापूरची प्रत्तेक मिसळी ची आपली वेगळी चव असते, मिसळ हि मिसळच , पण मामलेदार मिसळ म्हणजे माझं भावनिक नातं अगदी लहान पणा पासूनच …. एकदम झकास !
मुळात मामलेदार मिसळ खाण्याचे शास्त्र आहे, ते तुमच्यावर संस्कार झालेले नाहीत. -- मी म्हणालो
आमचे काही अलिखित नियम आहेत
रांग लाऊन टेबला पर्यंत पोहचणे, त्याशिवाय मजाच नाही
आधीच टेबला वर बसलेल्या लोकांबरोबर समंजस पणा दाखवून आसनस्थ होणे
टेबलावर टिशू नाहीत या बद्दल कटकट न करणे
वेटर काकांना जास्त त्रास न देता एकदाच ओर्डर देणे
समोर वाढलेल्या मिसळेवर अधाश्या सारखा तुटून पडणे,
नुसता रस्सा पाव न खाता पाचव्या पावासाठी वेगळी मिसळ मागवणे
पोटातली जागा पूर्ण पणे व्याप्त झाल्यानंतर सुद्धा अतिक्रमणाची शेवटची शक्यता संपे पर्यंत त्याचा आस्वाद घेणे
सरतेशेवटी न चुकता ताक हे घेतलंच पाहिजे
पूर्वी बशी मिळणारी मिसळ आता छोट्या लहान बाउल मध्ये मिळू लागलीये , हॉटेल मध्ये थोड्या फार प्रमाणात नुतनीकरण झालंय , फक्त पार्सल मिसळ चे वेगळे दुकान सुरु झालाय , आणि बोरीवली कांदिवली मध्ये मामलेदार मिसळीची शाखा सुरु झाल्याचं पण ऐकण्यात आहे.
मामलेदार मिसळ हि एक वेगळी पर्वणी आहे , आणि मी मामलेदार मिसळ पंढरीचा एक वारकरी आहे
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 1:03 am | सही रे सई
खुपच प्रसिद्ध आहे इथली मिसळ. एकदा खायची आहे. बघु कधि जमतय ते.
10 Feb 2016 - 1:05 am | मार्मिक गोडसे
मा मि. ची मिसळ खाणे हे येर्यागबाळ्याचे काम नाही. ह्या मिसळीच्या तिखटपणाला कोणी कितीही नाव ठेवले तरी बाकीच्या मिसळी तिच्यासमोर फिक्याच . गिरगावला एका हॉटेलमध्ये मिसळीत चक्क वालाची उसळ होती,अगदीच मिळमिळीत होती चवीला. कोल्हापुरला महाल़़क्ष्मी मंदीराच्या एका गल्लीत मिसळ खाल्ली,चव शेवेच्या आमटीसारखी वाटली. मिसळीची चेष्टा करावी ती नाशिककरांनीच , पंचवटीत (नाव विसरलो) मुठभर कांदेपोहे टाकलेली मिसळ घशाखाली उतरत नव्हती.
आणि हो ठाण्यातील 'आमंत्रण'मध्ये मिसळ खाण्यासाठी जाणार असाल तर एकदा तेथील 'मशरूम मसाला' टेस्ट करा. मुंबई ठाण्यात कुठेही इतका चवदार 'मशरूम मसाला' मला तरी सापडला नाही.
10 Feb 2016 - 6:16 am | सर्वसामान्य
मिसळीचा भ्रष्ट अवतार इकडे सिंगापुरात पेशवाई मध्ये मिळतो. पण तो खाण्यापेक्षा भारतभेटीची वाट पाहाण जास्त चांगलं :(
11 Feb 2016 - 5:42 am | पप्पुपेजर
मुंबई मकान म्हणायचे आहे का तुम्हाला, पाव सोडला तर मिसळ तशी बरी असते आणि नेहमीचे पब्लिक असले कि ती अजून जबरदस्त बनते :)
10 Feb 2016 - 8:36 am | DEADPOOL
नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती!
एकदम मस्त!
10 Feb 2016 - 8:37 am | DEADPOOL
नाशिकमध्ये साधनाची मिसळ खाल्ली होती!
एकदम मस्त!
10 Feb 2016 - 10:52 am | असा मी असामी
महाड मध्ये बाजारपेठे येथे फडके (बहुधा तेच नाव आहे. भरपुर वेळ झाला नाही गेलो)मिसळ मीळते. मस्त असते. रात्रपाळी करुन घरी जाताना तीथे मिसळ खायची आणि घरी जाउन मस्त ताणुन द्यायचे.
10 Feb 2016 - 4:42 pm | अस्वस्थामा
इथं सातारचे इतके लोक्स असूनही कोणी अजून "माधवराव"चं नाव कसं काढलं नै हो ?
अख्ख्या सातार्यात एकच.. फुल फेमस.
गेल्या पंधरा एक वर्षात आहे तेवढाच सेटप आणि चव देखील बर्यापैकी तशीच आहे आणि अजूनही स्वतः माधवराव मिसळ बनवत बसलेले असतात.
एक मिसळ आणि वरुन एक चहा नाहीतर लिंबू सरबत. बास्स.. :)
11 Feb 2016 - 10:48 am | सिरुसेरि
सुपनेकर स्टॉल माहित आहे .
10 Feb 2016 - 5:02 pm | पी महेश००७
आयला, मिसळ पाहिली की नाशिककरांच्या तोंडाला पाणी सुटते... कधी या आमच्या नाशिकला, कौतुक करून थकाल.. आणि हो, एखाद्या हॉटेलाचं नाव सांगून आमच्या मिसळचा अपमान करणार नाही... प्रत्येक मिसळचा वेगळा ठसका आहे...
10 Feb 2016 - 9:47 pm | प्रचेतस
नाशिकला आमची फेवरिट म्हणजे अंबिका मिसळ, सुरतीची कढी भेळ, शौकीनची झटका पाणीपुरी, सायंताराचे साबुदाणावडे, राउतचा डबल जीरा सोडा आणि पांडेची लस्सी. अकबर सोडा पण बरा आहे तसा.
11 Feb 2016 - 3:14 pm | घाटावरचे भट
अकबरचा मसाला सोडा मस्त असतो. बाकी 'अंबिका'मधली मिसळ एकदाच खाल्ली आहे. मिसळीसोबत तळलेला पापड नाशकातच मिळतो बहुतेक. इतर कुठे पाहिला नाही. शाळेत असताना एकदा रविवार कारंज्यावर एका गाडीवर मिसळ खाल्ली होती. ती झकास चव अजून आठवते.
10 Feb 2016 - 11:07 pm | काकासाहेब केंजळे
मिसळ कोल्हापुरलाच खावी, मामलेदार फामलेदार,बेडेकर येडेकर खुळचट पुणेरी व मुबंईच्या यड्याचे वाढवलेले प्रस्थ आहे.
11 Feb 2016 - 12:19 pm | अजया
एकच काका! प्रतिसाद देतात बाका ;)
11 Feb 2016 - 12:23 pm | वेल्लाभट
मी काय म्हणतो काका; कोल्हापूरची चांगली असतेच. पण म्हणून बाकी वाईट होत नाहीत ना? मिसळ ही एक पवित्र पाककृती आहे. असं बघा, कुणाला सिद्धिविनायक पावतो, कुणाला दत्तगुरू पावतात कुणाला आणि कुणी. पण वाईट कुणीच कुणाला म्हणत नाही ना? तसंय ते. एकेकाची आवड.
12 Feb 2016 - 10:57 pm | बोका-ए-आझम
काका, तुम्ही कुठले? येरवड्याचे वाटतं! की डायरेक्ट आग्रा?
11 Feb 2016 - 12:42 am | खटपट्या
नका हो नका !
नोस्टेलॅजीक का काय म्हणतात ते व्ह्यायला झालेय. तुम्ही जीथं कार पार्कींग केलीत तीथं आमचा जल्म झाला. आनि मामलेदारची मिसळ खात ल्हानाचा मोटा झालोय.. त्यामुळे आता मिसळ न खाता डोळे पाणावले.
11 Feb 2016 - 2:17 pm | काकासाहेब केंजळे
खर्या मिसळीचे कॅरॅक्टर वेगळे असते, आजकाल लाल तिखट घालून दिलेलीइ तर्री खाउन अनेकांचा असा गैरसमज झाला आहे की मिसळ खाल्ल्याने तोंडाची आग झालीच पाहीजे.खरी मिसळ तीच जिचा तिखटपणा हवाहवासा वाटतो,तोंड भाजण्याऐवजी कानशिलं उबदार वाटायला लागतात ,डोळे धुंधावतात,प्रत्येक पुढचा घास ही अनुभूती आणखी वाढवतो.अशि अनुभूती देणारी मिसळ मी फक्त कोल्हापुरलाच खाल्ली आहे .
14 Feb 2016 - 1:07 am | हेमन्त वाघे
http://postimg.org/image/gezvuo1jl/
14 Feb 2016 - 1:08 am | हेमन्त वाघे
[url=http://postimg.org/image/gezvuo1jl/full/][img]http://s8.postimg.org/8z0m...
[url=http://postimage.org/]free image uploader[/url]
14 Feb 2016 - 1:08 am | हेमन्त वाघे
14 Feb 2016 - 1:13 am | हेमन्त वाघे
अड्मीन हा धागा कृपया काढून टाका - परत खाली प्रतिसाद दिला aahe
14 Feb 2016 - 1:12 am | हेमन्त वाघे
आज इकडचे वाचून मामलेदार ला जुनाच आलो . मिसळ चांगली होती पण इकडे सांगितली तेवढी पण जगावेगळी नव्हती !
14 Feb 2016 - 12:28 pm | खटपट्या
मामलेदार मधे मिसळी भरल्या जात असताना !!!
14 Feb 2016 - 2:55 pm | Rahul D
कोल्हापूर बावडा मिसळ पाव आणि चहा अतिशय उत्कृष्ट. मी पुण्याचा असूनही पुण्यातील काटाकीर , बेडेकर मिसळ विशेष आवडत नाही.
14 Feb 2016 - 4:45 pm | रमेश भिडे
२०० झाल्याबद्दल दोन करंट मिसळ विथ अनलिमिटेड रस्सा!
14 Feb 2016 - 8:48 pm | भिंगरी
इतक्या लोकांचे मिसळपुराण वाचले.प्रत्येक टिकाणच्या मिसळीची स्वत:ची अशी खासियत असते.
तशीच आमची भिवंडीची 'कंपनीची मिसळ'
जुन्या अस्सल भिवंडीकरांना ही मिसळ खाल्ल्याशिवाय न्याहारी झाली असे वाटतच नसे.जोडीला दुधीहलवा आणि पुरी खाल्ले की त्रुप्त झाले.
मात्र त्यासाठी सकाळी लवकर जावे लागते. सकाळी नऊ नंतर मिसळ संपलेली असते.सकाळी मित्रांबरोबर गप्पा मारत कंपनीची मिसळ खायची आणि रात्री 'निशान'मध्ये बसून चहा पित दिवसभरच्या घडामोडींवर चर्चा करणे हा भिवंडीकरांचा दिनक्रम आहे.
आता भिवंडीत अनेक ठिकाणचे लोक कामासाठी आले आहेत.त्यामध्ये अस्सल भिवंडीकरांची संख्या कमी होत चालली आहे..त्यामुळे ही मिसळीची महती सांगणारे कमी होत चालले आहेत.
16 Feb 2016 - 5:19 pm | सूक्ष्मजीव
मुंबईत असताना मी एकदा मिसळ खाण्यासाठी म्हणून ठाण्याला गेलो होतो, भरीस भर म्हणून पुण्याहून एका मित्राला खास मिसळ खाण्यासाठी ठाण्याला बोलावले होते. त्यादिवशी नेमका रविवार होता व हॉटेल बंद होते. तेंव्हा तिथल्या काही दुकानवाल्यांनी एका हॉटेलचे (आमंत्रण की काहीतरी) नाव सांगितले, व तिथे हीच मिसळ मिळते असे सांगितले. तिथे जाऊन मिसळ खाल्ली पण आवडली नाही. :-(
मालालेदार मिसळवाल्यांचे असे एखादे हॉटेल ठाण्यात आहे का?
बाकी चिंचवडमधल्या नेवाळे मिसळ बद्दल कुणीच बोलले नाही........
16 Feb 2016 - 5:29 pm | नाखु
इथे उल्लेख
आहे
पिंचीकर नाखु