प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला"
वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने,
"फेअरग्लोला "
मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.
बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं.
"सर्फ"
मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.
मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या,
"साबण जमातीची"
दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.