(कश्या कश्याला मुकलो ते...)
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस
मिसळपाव