Skip to main content

विडंबन

<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 18/12/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया.

नाही चाखली चव 'लाडू'ची- (विडंबन)

लेखक विदेश यांनी सोमवार, 16/12/2013 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : नाही खर्चली कवडी दमडी...) नाही चाखली चव 'लाडू'ची, नाही घेतला ठाव उगिच घातला घाव, हाताने उगिच घातला घाव |धृ | कुणी आपटे 'तो' फरशीवर कुणा वाटते फुटे भिंतीवर फुटण्याचे ना घेतो इतुके फोडियले तरी नाव .. |१| 'काळ' मम मुखी लाडू घरचा जबडा न कळा सहतो वरचा हात दुखोनी तुटेल भीती दाताचा न टिकाव .. |२| जितुके लाडू तितुकी नावे हृदये चिडुनी शिव्यासी द्यावे मनीं न आवडे पत्नीपुढे मी दीन-अनाथ-'अ'भाव..|३| .
काव्यरस

('अ-विचारजंती'- एक विकृती - बद्धकोष्ठ विनाशाचा मार्ग)

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 12/12/2013 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
'अ'विचारजंतांवर काही म्हणायचा आधी इंटरनेट (आंतरजाला)च्या निर्मीती प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या संगणकीय भाषेत म्हणायचे झाले तर अर्पानेटच्या पहिल्या वापरापासून इंटरनेट वापर प्रक्रिया सुरु आहे. ह्याच इंटरनेटचा वापर करून 'विभिन्न तत्व' लेखकू कपाळकरंटेपणाणे (वैचारिक भाषा) एकत्र आले आणि आजची आंतरजालिय लेखन सृष्टी डोळ्यांसमोर आहे. आमच्या सारखे असंख्य लोक आंतरजालाच्या व्यासपीठाला मानणारे, लोकांच्या मते ह्याच व्यासपीठाच्या माध्यमातून अनेकाविध विचारधारा एकत्र होण्याची इच्छा निर्माण झाली आणि आंतरजालिय लेखनाची सुरवात झाली.

जत्रा

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून जत्रा -भारनियमनाची हा भार सोसंना जनता झालीय हैराण गावात लाईट नाई बंद पडलीय गिरण , सांग तू माझ्या राजा कस आणू मी दळण , दिवाळी आली हि दारात पर नाई नाई लाईट हि घरात बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . . -------------विनय गदो

बोकुल्या ये ना

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न बोकुल्या ये ना , प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे कशी ही जिंदगीत आणिबाणी रे ये ना बोकू मी तर प्रेम दिवाणी मनुली दे प्यार जरासा बोकुल्या प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले तुला सोडून मी छळून गेले रे ये बोकुल्या ! विसर झाले गेले सख्या रे शरण आले बोकुल्या तुला रे मस्त मस्त हि दुधारी हवा दुग्ध गंध हा कसला नवा साथ हि मलाच तुझी हवी एकटा असा छळतो हा tomya मला तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा दुधावर जशी गोड येई सायबाई तू ये ना, तू ये ना ना ना ना ! ये असा बिळात ये बोकुल्या तुझा नवाच ड्रेस घालूनी स्वप्न आज जा

नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र (विडंबन)

लेखक युगन्धरा@मिसलपाव यांनी मंगळवार, 03/12/2013 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, ('असुद्लेखन'च्या चुका चालु ठेवत) प्रत्येक हौशी मराठी माणसाप्रमाणे मी ही मिपावर लेखन करण्यास बरेच दिवसांपासुन खुप उत्सुक होते. बरिच स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की 'मिपा' म्ह्णजे फक्त मराठी साहित्य न्ह्वे.

<नवविवाहिताचे बाबांस पत्र>

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 03/12/2013 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (शुद्धलेखनाचा दर्जा मूळ लेखनाबरहुकुम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे) प्रिय बाबा, प्रत्येक मुलाप्रमाणे मी ही लग्नाबद्द्ल लहानपणापासुन खुप उत्सुक होतो. माझ्या बेबी डॉल, ड्रीम गर्लची स्वप्ने रंगवत होते. पण आज मला जाणिव होते आहे की लग्न म्ह्णजे फक्त अमर्याद सेक्स न्ह्वे. लग्न म्हणजे केवळ तुमच्या लाडक्या व्यक्ति सोबत हवे तेव्हा हवे ते करणे न्हवे.

तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 14/11/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
( स्वच्छ मन या लँडमार्क लेखाचा स्वैर अनुवाद. ) मी ओंफ्फसमधुन घेरीत जात होतो. पुढे काही आंतरावर मेंदू ज्याम होणार होता. मी माझ्या बायकोचा वेग कमी केला आणि तिला सोफ्यावर थांबवली. तशी त्या ज्याम मधून प्रत्येकजण बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागला. बॉडीचा आवाज, आतल्या गर्दीचा आवाज येत होता. तिथे जवळच एका म्हशीच्या ॐ चा आवाज येत होता. मी विचार केला, आयला, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. मला प्रत्येक आवाज काय सांगतोय ते जाणून घेण्याची इच्छा झाली.

तू आलीस त्याला सोडून

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 12/11/2013 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज परत फा......र दिवसांनी विडंबनाचा मूड जमून आलाय तो कितपत जमलाय हे तूम्हिच ठरवा. खालील विडंबनाचं मूळ श्री. वडापाव ह्यांच्या ह्या कवितेत आहे. सदर विडंबन श्री. वडापाव ह्यांची माफि मागुन. प्रेमाचा त्रिकोण / एक फुल दो माली हि नेहमीच एखाद्यासाठि वेदनामय घटना. त्यातुन प्रेयसी आपल्या सख्ख्या मित्राची झाली तर अजूनच नैराश्य येतं. पण कालांतराने तीला मित्राच्या प्रेमातील फोलपणा जाणवतो आणि मग ती परत त्याच्याकडे येते........कायमचीच!
काव्यरस