मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

मुक्त विहारि ·
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

वैज्ञानिक दृष्टीकोण

सोहम कामत ·
चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती.. Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती.. Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय.. Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय.. Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं.. Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं.. वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला.. Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला.. विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय.. मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय.. Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन.. जहाज

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!-भाग ३

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/37792 http://www.misalpav.com/node/37794 भाग ३ सांस्कृतिक उदिष्ट म्हणजेच सांस्कृतिक तसेच मूल्य शिक्षण – आतापर्यंत आपण पाहिलेली उद्दिष्ट हि तशी वैयक्तिक किंवा कौटुंबिक अशी होती पण आताचे हे उद्दिष्ट समष्टी करता असून ते मुलभूत उद्दिष्टांमध्ये का समाविष्ट केले आहे? असा प्रश्नदेखील कुणाला पडू शकतो.आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून हे लक्षात आलेलं असेलच की शिक्षण आणि शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ अभ्यासक्रम त्याची आखणी आणि लोकांना किमान साक्षर करण्याचा एक सरकारी कार्यक्रम एवढच त्याच स्वरूप असून चालत नाही. प्रत्यक्षात ते तस कधी असत हि नाही.

'घोकंपट्टी'

वसुधा आदित्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात.

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती! भाग २

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
२. समाजाभिमुखता (सामाजिक उद्दिष्ट ) माणूस हा समुहात रमणारा प्राणी असल्यामुळे लहानपणापासून त्याचे सामाजिक शिक्षण सुरु झालेलेच असते. सामाजिक शिक्षण घेण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे समाजात मिसळणे, अधिकाधिक लोकांच्या संपर्कात येणे आणि लहान वयात हे शाळेत सगळ्यात उत्तम तऱ्हेने होते. शाळेतल्या वर्गात काय शिकवतात! हा वादाचा मुद्दा असू शकतो पण तिथे ४०-५० मुलांमध्ये, सदासर्वकाळ आपल्या पाठीशी असणाऱ्या आई वडिलांच्या छत्रछायेशिवाय स्वतःच्या हिम्मतीवर एखादे मूल इतर मुलांशी कसे वागायचे, बोलायचे हे स्वत: ठरवते, शिकते..

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी काही शिक्षणतज्ञ नाही. माझा लौकिकार्थाने शिक्षणक्षेत्र अथवा शिक्षकीपेशाशी काहीही संबंध नाही. शालेय, महाविद्यालीन शिक्षणानंतर माझा या क्षेत्राशी गेली १५-१६ वर्षे काहीही संपर्क नाही. पण माझ्यासारखे अनेक जण, ज्यांची मुलं आताशा शाळेत जाऊ लागली आहेत अशांचा, या ना त्या कारणाने शिक्षणाच्या सद्यस्थितीशी आणि एकंदर शिक्षण नावाच्या ह्या कमालीच्या गुंतागुंतीच्या आणि जराशा भीतीदायक अशा गोष्टीशी, मनात इच्छा असो वा नसो संबंध येतोच. त्यात जे मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील पालक आहेत ते तर या बाबत जास्तच हळवे/ संवेदनशील असतात.

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

जप

निनाद ·
इशारा: सदर लेख धार्मिक लिखाण या प्रकारात येऊ शकतो. ज्यांना या लिखाणाची अ‍ॅलर्जी असेल त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. तसेच या लेखात प्राचीन भारतीय विचारांची भलामणही आहे. ज्यांना याचा त्रास होतो त्यांनीही त्यांनी येथेच थांबावे, पुढे वाचू नये. या लेखातील दावे काही जणांना वैज्ञानिक स्वरूपाचे वगैरे वाटू शकतील. तर ते दावे तसे नसतीलच अथवा असतीलच असेही नाही. इशारा संपला! --- हा लेख येथे का? पैसा ताईंनी प्राचीन भारतीय वेद पुराणे विज्ञान हा कायप्पा समुह काढताना सांगितले होते की तेथे काही चांगली चर्चा झाली तर ती येथे ही यावी.

" या पुस्तकांवर बंदी आहे! "

दासबोध.कॊम ·
लेखनप्रकार
" या पुस्तकांवर बंदी आहे! ", हे वाक्य अखेरीस इंग्रज गव्हर्नराने उच्चारलेच! "काळ" च तसा होता तो! आजच्या "सकाळ" किंवा "नवा काळ" वाचणा-या पिढील न मानवेल असा! "काळ" हे एका अत्यंत ज्वलज्वलनतेजस जहाल व "अस्सल" मराठी पत्रिकेचे अथवा वृत्तपत्राचे नाव... त्याचे कर्ते होते शिवराम महादेव परांजपे!