मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

एक हवीहवीशी शाळा

वेल्लाभट ·
शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल. पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती.

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

प्रसाद गोडबोले ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

जय जय रघुवीर समर्थ ! प्रस्तावना : ( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६) सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!

जीवनशाळा

कवि मनाचा ·
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं एक अधिक एक बरोबर दोनच असतं शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं. फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं यशाच्या पायऱ्या चढताच कळतं इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं. ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ) मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता. भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही स्पिरीटचा दिवा, एबोनाईटचा दांडा अन् रेशमी रुमाल माझ्याशी असे का वागले तेच कधी कळलं नाही आज भौ

शब्दांची ताकद

shawshanky ·
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

समान संधीच महत्व

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेव्हा एखाद्या बाबतीत/ठिकाणी समान संधीच तत्व पाळल जात नाही तेव्हा सहसा जे संधी पासून मुकले ज्यांना संधी नाकारली गेली त्यांचाच विचार आपण सहसा करतो, समान संधीच्या तत्वाकडे दुर्लक्ष करणार्‍यांना खरेतर त्यांचे अथवा त्यांच्या संस्थेचे जे काही उद्दीष्ट आहे त्या उद्दीष्टाचीच संधी नाकारली जाती आहे हे लक्षात येत नसते, कदाचित कामास सर्वोत्कृष्ट न्याय देऊ शकणार्‍या व्यक्तिपासून नकळत तुमच्या उद्दीष्टाची संधी गेली असू शकते -शेवटी नुकसान कशाचे तुमच्याच उद्दीष्टाचे.

मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल... हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत... १. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील. २.

कुत्री पालन ---- भाग २ ---- बीगल

मुक्त विहारि ·
लेखनप्रकार
पहिल्या भागाची लिंक ===> http://www.misalpav.com/node/34821 आमची स्वीटी (लॅब्रेडॉर जातीची) देवाघरी गेली आणि मी मानसीक रोगी झालो.(साधारणपणे कुत्री पाळणारे बहूतेक जण ह्या स्थितीतून जातात.) मी जिथे असेन तिथे स्वीटी माझ्या जवळच असल्याने, तिचा विरह मला सहन होईना.बायकोच्या आणि मुलांच्या लक्षांत ही गोष्ट आली.३-४ दिवस रडण्यातच गेले पण मनाला काही आराम मिळेना.शेवटी एक दिवस बायको म्हणाली की, आपण आता अजून एक कुत्री पाळू या. ह्या वेळी मात्र एक ठरवले की, मोठे कुत्रे घेण्यापेक्षा एखादे छोटे-खानी कुत्रे घेवू. छोट्या कुत्र्यांची माहिती घेतांना बरीच कुत्री डोळ्यासमोर आली. १. पामेरियन २. पग ३.

प्रसार माध्यमे आणि टिपिंग पॉईंट - एक रोचक संशोधन

विकास ·
दि न्यूयॉर्कर साप्ताहीकाचा पत्रकार माल्कम ग्लाडवेल, याने २००० मधे एक पुस्तक लिहीले होते - "The Tipping Point - How Little Things Can Make a Big Difference". कुठलिही गोष्ट अचानक मोठी होण्याआधी कशा घटना घडत असतात त्या एकमेकांना कशा लागलेल्या असतात, याचा अन्वयार्थ लावताना या पुस्तकात अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे. असा टिपिंग पॉईंट हा रोगराई, युद्धे, गुन्हेवारी वाढ इथपासून ते राजकीय बदल या सर्वत्रच दिसू शकतो. उदा. "ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राचा खून हे पहील्या महायुद्धाचे तात्कालीक कारण" समजले जाते.

राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार, शिक्षक आणि शिक्षणाची भूमिका

माहितगार ·
लेखनविषय:
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्‍या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ?