दारी श्रावण दारी साजण....
पाऊस आला पाऊस आला
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
सरींवर सरी अशा कोसळल्या
डोळ्याच्या कडा ढासळल्या
असा काही बरसला श्रावण
न्हाऊन निघाली तुझी आठवण
रोज खेळते आठवणींची भातुकली
वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली
कळलेच नाही कधी ठाकला
दारी श्रावण दारी साजण....
राजेंद्र देवी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
633
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://epaper3.esakal.com/3Aug2016/Enlarge/PuneCity/page8.htm