Skip to main content

मुक्तक

यक्षप्रश्न

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/11/2015 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
१. गर्द जंगलात निरुद्देश भटकताना पाणी दिसले, तेव्हा त्याच्या काठाशी नकळत विसावले मी. पापणीच्या आतल्या पाण्याला अचानक बाहेरच्या पाण्याची ओढ. मी ओंजळ पुढे करताच कोठूनसा धारदार आवाज आला: “माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्याविना पाण्याला स्पर्श करू नकोस. अन्यथा प्राण गमवावे लागतील.” २. महाभारतातील कूटप्रश्न विचारणाऱ्या यक्षाची कथा वाचली होती मी फार पूर्वी, बहुधा त्याचाच वंशज असणार हा! पण आता अशा या सैलावलेल्या क्षणी कोण माथेफोड करणार? आणि ते करून ना काही सिद्ध करायचे होते, ना काही साधायचे होते. प्राण, जीवन क्षणभंगुर आहे हे खरे, पण ते उगाच दुसरे कोणी म्हणते म्हणून विनाकारण उधळून देणेही शहाणपणाचे नाही.

दोन वेडे - २

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 18/11/2015 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
हॉल! लॉझ बनवायची जागा! अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते.

दोन वेडे !

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 16/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र झाली होती. विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता. मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती. "मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला. "अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत." "येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही." "विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही." "मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर." मार्कचा आवाज कंप पावत होता. "मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं." कोण ? सिकंदर ?" "नाही, सर आर.एम.

सेकंड हनीमून

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 16/11/2015 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंड हनीमून .............................................................. सेकंड हनीमून च्या कल्पनेनं ति मोहोरुन गेली होती. ४२ ची झाली होती ति.. पार्लर मध्ये जाऊन केस ट्रिम केले होते, फेसियल..काय, काय काय चाललं होत तिच.. थट्टेत विचारले त्याने... गप्प रे तुला काही कळत नाही..त्याला गप्प केलं. . हिल स्टेशन च ते रम्य अन शांत वातावरण, सार वातावरण धुंद होते. ति त्याच्या मिठीत पहुडली होती. सार त्याला आठवलं.. ति पहिली भेट..उडालेली तारांबळ.. श्वासांचे तुफान..नजर मीळवण अन चोरण ते वाट पाहणं... सारच रोम्यान्टीक होते.. ते वय वेड होते..ती विशीतली कोवळी कळी होती..त्याची गद्धे पंचविशी नुकतीच संपत होती.. अन द

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

जमेल तितकं सांग...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितकं सांग... बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग किती अक्षरं आली, आणि पुसली, कधी हसली अन कधी रुसली कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय कधी आई बाबांचा, कधी आजी आजोबांचा, कधी मित्रमैत्रणींचा, काही मोठे काही छोटे... आठवणींचे कधी... कधी स्वप्नांचे थवे सोडतोय. आत्ताचा क्षण सरपण सेकंदा पूर्वीचा...
काव्यरस

शौ(चौ) र्यनिखारे

लेखक मोगा यांनी बुधवार, 11/11/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला...

नवकविता - ट्रॅफिक जॅम

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D विडंबन वगैरे समजू नये. मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे. प्लीज रिस्पेक्ट दॅट.