Skip to main content

मुक्तक

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

तगमग....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/12/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ?? आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ? तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत …. उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत …. मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना…. मग बाकीच्यांना काहीही करू देत …. गीतेत वाचलं की शरीर मरतं…आत्मा अमर ! इथे आत्माच मेलाय,फक्त शरीरांची भर वाचलं ते बरोबर की पाहतोय ते….
काव्यरस

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 11/12/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ================

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 06/12/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

बाबा तू चुकला रे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 01/12/2015 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(हल्ली कुणीही उठतो आणि शिक्षणाला नावे ठेवतो. मी शिकलो नाही, अभ्यास केला नाही, पिरेड केले नाही, शिक्षणात ढ होतो हे सार अभिमानाने सांगतो.

मुमुक्षु

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 01/12/2015 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
निओकॉर्टेक्सच्या सीमावर्ती भागात सगळ्यात सामसूम न्यूरल पथावरच्या सगळ्यात शेवटच्या न्यूरल नोडच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर मुमुक्षु राहतो. रेप्टिलियन पाताळ अन् लीम्बिक धरतीवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि निओकॉर्टेक्समध्ये ज्याचे फिरतात दूत न्यूरल रस्त्यांवर हवे तसे ट्रॅफिक वळवत तो त्रैलोक्याधीश डीएनेश्वर. ईश्वराचे एजंट सतत नजर ठेवतात पाठलाग करतात केमिकल बंदुका घेऊन हल्ला करतात अचानक दिसेल तिथे अतिप्रबळ साम्राज्याचा एकटाच हा शत्रू. मुमुक्षु.
काव्यरस

(जिलेबी कथा - लिहायचे नियम)

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
'पेरणी'साठी बियाणे! मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत! प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये! १. कथा शक्यतो १च भागात द्यावी किंवा जास्त स्क्रोल करायला लावून कुणाकडूनही 'भाग थोडे मोठे टाका' किंवा 'हात दुखला स्क्रोल करून' अशी प्रतिक्रिया मिळवून आपल्या अतिशहाणपणाचा प्रत्यय देऊ नये.

लंगोटनगरी पोपटराजा.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 27/11/2015 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
लंगोटनगरी पोपटराजा वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! लंगोट कड्यावरून घसरले, अन पोपट सगळे फांद्यांवर दिसले. जितकी विद्वत्ता जास्त, तितके त्यांचे पोपट पंचरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘लंगोटवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि लंगोट उडवणाऱ्या वादळामागे पोपट सावरत मूढ सगळे अमाप धावले. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ .........

पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 26/11/2015 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत! प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये! १. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.) २. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल. ३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल. ४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये.