मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्तक

Boys Played well..!

kool.amol ·
हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल. मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.

कवितेचा शब्द शब्द

अनन्त्_यात्री ·
प्रपाताने थेंबुट्यास कमी कधी लेखू नये पिंडी वसते ब्रह्मांड कदापि विसरू नये महापुरात लव्हाळी वाचतील? खात्री नाही लवचिकतेचा ताठा लव्हाळ्याने धरू नये आरशाने आरशात प्रतिबिंब पाहू नये अनंताने कोंदटसे सान्तपण लेवू नये कवितेचा शब्द शब्द ओळ बनण्याच्या आधी दोन ओळींच्या मधल्या अनाघ्राता स्पर्शू नये

माझी योगचर्या

अनन्त्_यात्री ·
भुजंगासनाची माझी रीत न्यारी डसेन जिव्हारी नकळत ॥१॥ शीर्षासन तर माझे आवडते नको ते उलटे पाहतो मी ॥२॥ "धनुरा"सनाची सवय लाविली "मशाल" फेकली दूरवर ॥३॥ सध्या "पद्मा"सन घालतो मुकाट ED चे झेंगट कोणा हवे? ॥४॥

बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?

टर्मीनेटर ·
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?" प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह

अज्ञाताचे लेख

कर्नलतपस्वी ·
मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा । अज्ञात झऱ्यावर रात्री, मज ऐकू येतो पावा ॥ -ग्रेस मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या. "खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा". 'मला भेटलेला कार्व्हर,'प्रभाते चारियासी जाये', 'पावगढ-चंपानेर 'असे तीन लेख अर्धवट लिहीले आहेत पण याच कारणास्तव पुर्ण होत नव्हते. काहीही करावेसे वाटत नव्हते.गाडी जवळ जवळ थांबल्यासारखीच म्हणायचे.

देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी?

माहितगार ·
देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाची चोरी? देशद्रोही दरोडेखोर भारतदेशाचे तुकडे करण्याचे भाषण स्वातंत्र्य मागत उड्या मारत मिरवून घेताना असे कुणि देशद्रोही दरोडेखोर माझा मुलगा मुलगी निघाले तरी उभ्या चितेवर चढवण्याची शिक्षा असावी एवढेही म्हणावयची देशप्रेमींनाच चोरी? देशद्रोहींच्या उड्या आणि देशप्रेमींनाच सात्विक संतापाचीही चोरी? - सात्विक संतत्प्त माहितगार

अरण्यऋषीचं वनोपनिषद

चक्कर_बंडा ·
'जंगलाचं देणं' जणु 'चकवाचांदणं' 'केशराचा पाऊस' ओते 'शब्दांचं धन' 'नवेगावबांधचे दिवस' जशी फुटे 'चैत्रपालवी' 'निळावंती' उलगडे तशी 'मृगपक्षीशास्त्रा'ची पोथी 'पक्षी जाय दिगंतरा' झाडांच्या कवेतून 'घरट्यापलीकडे' उभा 'रातवा' पाऊसथेंब पिऊन 'आनंददायी बगळे' करविती 'निसर्गवाचन' 'सुवर्णगरुड' झेपावे 'चित्रग्रीवां''च्या गर्दीतुन 'पक्षीकोश' उलगडतो 'पाखरमाये'ची गणितं 'मत्स्यकोशा'च्या जोडीने सुटे 'वृक्षायुर्वेदा'चं कोडं 'जंगलाची दुनिया' ही सारी 'रानवाटां'ची कहाणी अरण्यऋषीच्या साहित्यसोबतीने फळासं पावली... #चक्कर_बंडा रूढार्थाने ही कविता नाही तर एक प्रयोग आहे आपल्या आवडत्या साहित्यिकाच्या सर्व प्रकाशित तथा

सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?

आजी ·
भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती. मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता. पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.

तटबंदी

अनन्त्_यात्री ·
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी ओतप्रोत जे असे सांग ते का न तुला दिसतसे? त्रिमितीच्या पिंजर्‍या वेढुनी अमित असे जे वसे सांग ते का न तुला दिसतसे? धन-ऋण एकाकार होती त्या- -स्थळी शून्य जे वसे सांग त्या अभाव मानू कसे? जड-चेतन सीमेवर धूसर तटबंदी जी असे सांग ती का न मला दिसतसे?

तांडव (ऐसी अक्षरे -१८)

Bhakti ·
तांडव-पुस्तक परिचय लेखक-महाबळेश्वर सैल अ पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.