सूर्याकडुन आपल्याला नक्की काय मिळतं?
प्रकाश. उष्णता ?
पण म्हणजे नक्की काय ?
एनर्जी.
मग समजा सुर्यावरुन पृथ्वीवर जितकी एनर्जी आली त्या एनर्जीमधील किती एनर्जी पृथ्वी अवकाशात परत सोडते, रेडीयेट करते ?
५०% ? ९०%? ९९%?
बरं . थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम काय ?
"एनर्जी कॅन नायदर बी क्रियेटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. "
मग परत एकदा विचार करुन सांग - पृथ्वी सुर्यापासुन मिळालेली किती एनर्जी परावर्तित करते ?
१००% !
ग्रेट. मग सुर्यापासुन आपल्याला नक्की काय मिळतं ?
ओह डॅम्न !!!!
हिंट : थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम !
व्हॉला !
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५
स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले
वेळ- सकाळी ६ची
"बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय.
आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय.
मी नाही कुणाचा बाप
मी नाही कुणाचा आजा
रंग बदलतो मी वारंवार
कुंपणावरचा सरडा जसा
मी न कुणाचे खातो, ल्यातो
तो श्रीराम आम्हांला देतो
लळा जिव्हाळा नाती गोती
मी वेशीवर टांगून रहातो
नाही कुणाची पर्वा, आशा
नाही पुसले म्हणून निराशा
स्वानंदाचे टाळ घेऊन हाती
जगतो मी माझीच मिराशी
इकिगाई
अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई
पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आह
कॉफी___2
अनोळखी भाषेच्या शहरातल्या म्युझियमच्या लांबलचक संगमरवरी पाय-या चढता चढताच आपण थक्क होऊन जातो.
आतल्या दालनांतली रेंम्ब्रां आणि कार्व्हाजिओ आणि विंची आणि कोणन् कोणाची चित्रं शिल्पं पहाताना कळतं यांना फोटोत बंद करणं केवळ अशक्य .. आणि आपोआप मोबाईल पर्समध्ये जातो.
..….
फिरून फिरून पाय दुखायला लागले असतात, दुपार उलटून चालली असते,
आता एक शेवटचं दालन मग बाहेर पडायचं असं आपण ठरवतो.
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.
मानस - धुळवड
स्थळ: गोंदवले
दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस!
वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची
श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.
एक सांगू? उत्तरात नं, अलगद एक प्रश्न ठेवून द्यावा..
बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केसर पेरतो ना तसा.
मग संवादाला लाघवी स्वाद येतो, मोहक रंग चढतो,
दिवसभर चेह-यावर कळत नकळतसं एक हसू खेळत रहातं!
म्हणून तर! एक तरी प्रश्न उत्तरात असूच द्यावा ...
कारण हम्म् शी हम्म् असं किती वेळ चालणार?
स्माईली ला स्मायली असं किती वेळ खेळणार?
मारून मुटकून कवितेच्या, सुविचारांच्या मोळ्या तरी कुणी किती बांधणार ?
त्यापेक्षा उत्तरात अलगद एक प्रश्न असूच'च' द्यावा ...
मग कारण मिळतं, अकारण दार खटखटवायचं.
नाहीतर "बोलू की नको, आत्ता की मग?