हवाईदलातील गणेश पूजेचे किस्से भाग २

लेखनविषय:
गणेशोत्सव १९७७ उधमपुरची विसर्जन मिरवणूक! ६० किमी अंतराची! पायलट ऑफिसर रँक बॅडमिंटनच्या खेळातील 'शटल कॉक' प्रमाणे वापरली जात असे. आता ती रँकच बंद झाली. असो. असेच "जा उदमपूरला" म्हणून पाठवले गेले होते. आम्हा जुनियर्सना काहीच हरकत नसे. कारण दर आठवड्याला ड्युटीऑफिसर म्हणून सर्व समावेशक मोठ्या होल्डॉल मधे गाशा गुंडाळून मेस पासून 35 किमी दूर एयरपोर्ट वर राहायला जाणे अंगवळणी पडले होते! शिवाय टीए डीए वेगळा! उधमपुरच्या छोटेखानी मूर्तीचे विसर्जन आठवणी राहिले. झाले असे की विसर्जन करायची जागा म्हणजे तवी नदीचा प्रवाह असे ठरवले होते.

भाग १ जब वी मेट - नाशिकाचा अत्तरवाला -कुठे कुठे शोधले नाही तुम्हांस!

लेखनविषय:
लेखनप्रकार

भाग १ जब वी मेट

काही दिवसापुर्वी म. टा. मधे जब वी मेट या सदरासाठी काही जीवनात घडलेल्या आठवणी लिहा म्हणून म्हटले गेले होेते. तो लेख पाठवून आता महिना झाला. कदाचित ते छापतील असे नाही असे वाटून इथे सादर करत आहे. 1 अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले.

दर्शनमात्रे मनकामना पूर्ती

लेखनविषय:
लेखनप्रकार
गणपती आलेले आहेत , घरोघरी आरत्या ऐकू येत आहेत ... वेळेनुसार देवांकडे काही मागणी करणे हा आस्तिकांचा स्वभाव आहे , काही गोष्टी मिळतात , काही नाही ... त्यात देवाचा किती सहभाग असतो हे तोच जाणे .... पण एकूणच देवाकडे विशेषतः घरी आणलेल्या गणपती कडे एखादी गोष्ट मनापासून मागावी आणि ती मिळू नये असं झाल्यावर देवाकडे काही मागण्यावरून लोकांचं मन उडतं असं होतं का ? आरत्या किती लोक शब्दांकडे लक्ष देऊन म्हणतात , त्यावर विचार करतात माहीत नाही त्यामुळे दर्शनमात्रे मनकामना पूर्ती ह्याचा विचार नसेलही केला कुणी .....

संध्याकाळी तू गंगेतीरी

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस..... मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.... तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे बघू देत लोकांना देवांना साधुंना माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून तिच्या देहात लयदार मिसळताना.....

शोक कुणाला? खंत कुणाला?

हरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी धडधड धडधड रान पेटते...... शोक कुणाला? खंत कुणाला? चोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती लपलप लपलप ज्वाला उठती...... शोक कुणाला?खंत कुणाला? पिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे भडभड भडभड पाने रडती.... शोक कुणाला? खंत कुणाला? पिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे चरचर चरचर डोळे झरती...... शोक कुणाला? खंत कुणाला? कुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते करकर करकर शाप जीवांचे, थरथर.... इथवर ऐकू येते..... -शिवकन्या

जन्माष्टमी२.*

लेखनविषय:
कृष्णाच्या नांवे जो होतो आजकाल दहीहंडीचा खेळ तो खेळण्या, पाहण्या सगळ्यांनाच असतो अमाप वेळ पुन्हा पुन्हा जे कष्टतात, गोविंदांचे थर रचण्या अनेक पाठीराखे, सम्राट असतात हजर त्यांचे प्रयत्न पाहण्या खेळकऱ्याना वाटते, अरे वा, आज आपल्याला बराच मिळाला भत्ता सम्राटांना वाटते, चला, आणखी काही काळ राहायला हवी सत्ता जिथे कुठे मारता आला डल्ला, त्यातलाच थोडा लुटवा आज खेळावर खेळाडूंना होऊ दे खूष, दिसू दे जोरदार जोश, होऊ दे जोरदार कल्ला हे खेळाडू, त्यांचा खेळ, त्यांचे पाठीराखे पाहताना.

द सियालकोट सागा

लेखनविषय:
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

देवघर

देवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला पहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला दिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला बोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला देव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते त्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते समईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती मध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती हार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो मागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो.... -शिवकन्या

डिप्रेशन - भाग 2

लेखनविषय:
लेखनप्रकार
डिप्रेशन विषयावर मायबोलीवर काढलेल्या धाग्यावर 2 - 3 प्रतिसाद लिहिले , तेच या धाग्यात इथे देत आहे .. डिप्रेशन असलेल्या व्यक्तीने आपल्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करून , थोडक्यात आपल्या आयुष्याच्या पॉजिटिव्ह बाजूकडे पाहून - अनेकांच्या तुलनेत आपण किती सुदैवी आहेत हे पाहून आनंदी राहावं असं बहुधा अनेकांना वाटतं . साधारण याच विचारसरणीतून - " तुला काय कमी आहे ? घर - पैसाअडका आहे , देवाने धडधाकट शरीर दिलं आहे ...

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.
Subscribe to मांडणी