Skip to main content

मांडणी

कोणीतरी बाजूला सरकले असेल......

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 04/05/2019 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.

विहीर खोदण्याचा विचार

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 03/05/2019 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
विहीर खोदण्याचा विचार... डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला हसण्यातील सच्चेपणा संपू लागला तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले.... जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा पाण्याची पातळी इतकी खोल इतकी खोल.... कि आतला लाव्हाच दिसू लागला! विहीर खोदल्यावर पाणीच लागेल हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले? डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे दुष्काळात विहीर खणू नये जमिनीला कष्ट देऊ नयेत ..... इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये..... विहीर खोदण्याचा विचार मात्र.....?? विचार काही माझ्या आधीन नाह

विचार मन्थन

लेखक sunil bhat यांनी शुक्रवार, 26/04/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
भारताची सध्याची आव्हाने : रोजगार निर्मिती आणि उत्पादकता सर्वसमावेशक रोजगार निर्मिती, राष्ट्रवाद :सगळ्यांची एक ओळख, आणि उत्पादकता सुधारणे हि भारत सरकार साठी तीन मोठी आव्हाने आहेत सर्व उपलब्ध संसाधनांपैकी कमीत कमी खर्च मध्ये उत्पादकता सुधारली जाऊ शकते हे जपान ने गेल्या शतकात सर्व जगाला दाखऊन दिले। जपानने गेल्या शतकात वेगवान उद्योगिकरणं सुरु केले तेंव्हा मर्यादित संसाधने वापरून गुणवत्ता व्यवस्थापनाची पद्धती लागू करून भांडवल योग्य प्रकारे वापरून खूप यश सांपदले । त्याची कारखान्याची रचना एकाद्या घरा प्रमाणे केली ज्याप्रकारे आपण आपले घर राखतो त्या प्रमाणे तेथील लोक कारखान्या मध्ये काम करतात। त्याम

माणसे कविता होऊन येतात.....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 26/04/2019 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
माणसे कविता होऊन येतात एकएक हट्टी कडवे लाडाकोडाने घालून ठेवतात, दोन कडव्यांमध्ये एक जीवघेणी कळ विसावा म्हणून ठेवून जातात... माणसे कविता होऊन येतात अलंकार भिरकावून केवळ अर्थ होऊन रात्रभर उशाशी बसतात उजाडताना परत पुस्तकाच्या अंधारात गुडूप होतात...... माणसे कविता होऊन येतात.... -शिवकन्या

विचार मंथन

लेखक sunil bhat यांनी मंगळवार, 23/04/2019 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
विचार मंथन साधारण मार्च महिन्यातील गोष्ट आहे, माझ्या मुलीला ( अदितीला) प्रोजेक्ट करायचा होता, विषय होता स्वतःच्या हाताने एक रोपटे लावणे, नेहमीच्या सवयीने मुलीने खूपच लवकर याबद्दल आम्हाला सांगितले, म्हणजे प्रोजेक्ट द्यायचा सोमवारी आणि सांगितले रविवारी दुपारी, मग काय तसेच दोघेही कॉलनी च्या बाहेर आलो, मला आठवत होते की एक माणूस हातगाडी वर विविध प्रकारची छोटी मोठी फुलझाडे ठेवतो, जरा पुढे गेल्यावर तो मनुष्य हातगाडी सहित दिसला, त्याच्या कडे जाऊन त्याला आमची निकड सांगितली, तसे तो बोलला काही काळजी नाही , या एरियात मीच सगळ्यांना प्रोजेक्ट साठी लागणारी झाडे देतो, मग काय आम्ही खुश, घासागीस करून ५० रुपयाल

पुनरागमनाय च

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 19/04/2019 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त नव्या आणि जुन्या मिपाकरांना नानबाचा नमस्कार. ४.५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिपावर पुनरागमन करण्याचे योजिले आहे. लवकरच भटकंती सदरात एक लेखमाला सुरू करतोय. सध्या सुट्टीवर भारतात असल्यामुळे भरपूर मोकळा वेळ हाताशी आहे म्हणून पुनश्च लिखाणाचा योग जुळून आला आहे. सर्व नव्या जुन्या मंडळींचा वरदहस्त डोक्यावर असावा..

तळवे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 13/04/2019 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
हेच ते जीवघेणे हळवे तळवे ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!! शक्य वा हिंमत असती तर हे तळवे बाजूला काढून फोटोत घडी घालून पुरून टाकले असते... ना ही असोशी असली असती... ना अंधारात डोळे खुपसून न उजळणार्या पूर्वेकडे पहात राहिले असते.... ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते.... नाहीतर, माझ्या दोन्ही तळव्यांना पंख व्हायची शक्ती घटकाभर देता, तर विधात्याचे काय जाते? -शिवकन्या

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ५

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 13/04/2019 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते.